Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: सतीश बर्वे
वय वर्षे 65. Adhesive क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय पातळीवर दबदबा असणाऱ्या भारतीय कंपनीच्या कायदा विभागात प्रदीर्घ काळासाठी काम करून निवृत्त. लेखनाचा वारसा आईकडून आलेला आहे. फेसबुकवरील 7-8 वाचक समुहात विपुल लेखन करून अल्पावधीतच लोकप्रिय होऊन स्वतःचा वाचक वर्ग तयार केला आहे. प्रवासाची आवड. डोळे आणि कान उघडे सतत उघडे ठेवल्याने माझ्या कथेतील बरीच पात्रं आणि प्रसंग मला सापडत गेले. मनमोकळ्या स्वभावाने मी सतत माणसं जोडत गेलो आणि त्यांच्या आयुष्यात मिसळून गेलो.
परवा रात्री नीताच्या, म्हणजे राघवच्या मोठ्या बहिणीच्या हळदीचा कार्यक्रम धुमधडाक्यात साजरा झाला होता. आवराआवरी करायला एक वाजून गेला होता. राघवने मला गेल्याच आठवड्यात निक्षून सांगितले होते की, हळदीचा कार्यक्रम संपल्यावर त्याला माझ्या आणि त्याचा आणखी एक जवळचा मित्र, चैतन्यसोबत रात्रभर गप्पा मारायच्या आहेत. त्याप्रमाणे राघवच्या बंगल्याच्या गच्चीवर आम्ही निवांतपणे बसलो होतो… “काका, आजवर एकही दिवस असा नसेल गेला की, मी आणि दिदी भांडलो नसू. खूप भांडायचो आम्ही, पण दुसऱ्या दिवशी सकाळी ते विसरून देखील जायचो! आम्ही कॉलेजला गेल्यावर आमची भांडणं कमी झाली. पण आता दोन दिवसांनी दिदी नसेल भांडायला… खूप कठीण जाणार आहे मला हे सगळं पचवायला,” असं म्हणून राघव…
त्याला जाऊन आज आठवडा झाला. पण ती गोष्ट मन मानायला तयार नाही. वाटलं येईल कुठून तरी आणि पायाशी घुटमळत बसेल, जोवर मी डोके कुरवाळून त्याचे लाड करत नाही! माझा बेस्ट फ्रेंड होता तो. खऱ्या मित्रांपेक्षाही जवळचा. सगळे लाड आणि हट्ट पुरवून घ्यायचा. आमच्या घरातील एक हक्काचा बनला होता तो! काही वर्षांपूर्वी एक दिवस दुपारचा भाजी मार्केटमधून आमच्या माईच्या मागोमाग थेट बंगल्यात आला पाहुणा म्हणून. झाले विक्रमला म्हणजे माझ्या धाकट्या भावाला तो फार आवडला. त्याने बाबांजवळ हट्ट धरून त्याला बंगल्यात ठेऊन घेतला. बघता बघता घरातील सगळ्यांनाच त्याचा लळा लागला. त्याच्या काळ्यासावळ्या रंगावरून माईने त्याचे नाव ‘कन्हैया’ ठेवले! त्याचा काही हट्ट नसायचा.…
आज तो इथून जाणार याचा आनंद व्यक्त करायचा की उद्यापासून तो नसणार याचं दुःख व्यक्त करायचं? खरंच कठीण आहे उत्तर देणं! आम्हा सगळ्या डॉक्टर्स, नर्सेस आणि आमच्या इतर सहकाऱ्यांना… कोरोना महामारीच्या काळात आमच्या हॉस्पिटलमध्ये तो महिन्याभरापूर्वी दाखल झाला होता जनरल वॉर्डात. मला आठवतंय आमच्यातील पहिले संभाषण… “आईच्या गावात इतका देखणा डॉक्टर? डॉक्टर तुम्ही चुकीच्या क्षेत्रात आला आहात. चित्रपटसृष्टीत असायला पाहिजे होता तुम्ही…” त्याचं बोलणं ऐकून खरंच कित्येक दिवसांनी मी हसल्याची जाणीव मला झाली होती. मी हसूनच त्याला म्हणालो की, “मी तिथे असतो तर तुझी माझी भेट कशी झाली असती. देवाची काहीतरी योजना नक्कीच आहे यात.” त्याला तपासून मी पुढे निघालो,…
आज घड्याळ खूप हळू चाललंय, असं वाटत होतं मला. सहा वाजले होते… एव्हाना चिनार घरी परत यायला निघाला असेल. माझ्या डोक्यात तेच विचार सुरू होते. माझ्या मनाची घालमेल सुनबाईने अचूक ओळखून ती मला म्हणाली, “आबा चिनारचा फोन येऊन गेला. तो निघाला आहे ऑफिसमधून, येईल सातपर्यंत. इथे येरझाऱ्या मारण्यापेक्षा तुम्ही थोडावेळ आराम करा तुमच्या खोलीत.” सुनबाईचंही बरोबर होते. मी माझ्या खोलीत गेलो खरा, पण लक्ष मात्र दरवाजाकडे होते. त्याच नादात डुलकी लागल्याचं, मला कळलं देखील नाही. 0000 “राजे आता हळूहळू माझ्या मांडीवर थोडा वेळ झोपायची सवय मोडायला लागा. लग्न ठरलंय तुमचं आता. उद्या माझ्या नातसुनेने तक्रार केली तर मग अवघड होऊन…
भाग – 2 मी दादांच्या कपाळावर हात ठेवून थोपटत असताना दादांनी महत्प्रयासाने डोळे उघडले… तेव्हा मी त्यांच्या जवळ जाऊन म्हणालो की, दादा तुम्ही मघाशी काहीतरी हळू आवाजात बोललात! दादांनी मोठा सुस्कारा सोडला आणि मला म्हणाले, “तेव्हा रागाच्या भरात मोठी चूक करून बसलो. अरुणच्या सच्च्या प्रेमाचे रंग मी नाही रे ओळखू शकलो. त्याला घराबाहेर काढण्याएवढा त्याचा गुन्हा निश्चितच गंभीर नव्हता. पण तेव्हा माझ्या डिवचलेल्या अहंकाराने माझ्यातील वडिलांच्या मायेवर विजय मिळवला आणि त्या दिवशी पराकोटीला पोहोचलेल्या आणि रागीट शब्दांच्या हमरातुमरीवर आलेल्या आमच्या नात्याच्या तिसऱ्या अंकाचा पडदा मी अरूणला मी घराबाहेर काढून पडला. मी क्रोधाने इतका लालबुंद झालो होतो की, अरुणची आई माझा…
भाग – 1 घड्याळाचा काटा जसजसा पुढे सरकत होता, तशी माझ्या मनात धाकधूक वाढत चालली होती. ते सगळं अचूक ओळखून दिप्ती काकूने म्हणजे अजितदादांच्या बायकोने मला शेवटी विचारले, “सुहास तुझा चेहरा का असा पडलाय?” हे ऐकून समोरच्या बेडवर शांतपणे आडवे झालेल्या दादांनी पण मला विचारले, “सुहास सगळं ठीक आहे ना?” “हो दादा सगळं ठीक आहे,” मी जेमतेम म्हणालो खरं, तसं पण माझ्या मनात काय सुरू होते, ते मला कोणालाच सांगता येणार नव्हते. सहा महिन्यांपूर्वी अचानकपणे झालेली अरुणची भेट आठवली. त्या छोट्या गावात निराधार गरीब मुलांना शिकवण्यासाठी अरुणने मोठ्या हिमतीने सुरू केलेला तो शैक्षणिक प्रकल्प आठवला… मला दिसताक्षणी त्याने कडकडून मारलेली…
बल्लाळच्या श्रद्धांजलीच्या कार्यक्रमात बोलायला म्हणून मी उभा राहिलो खरा, पण काय बोलायचं ते काही सुचेचना. काही क्षण असेच गेले नि:शब्द आणि मी बोलता झालो… मित्रांनो, तुम्हाला सर्वांना माहीत आहे की, तो कायम घाईत असायचा. घड्याळात सव्वापाच वाजले की, दहा मिनिटांत सगळं आवरून तो ऑफिसबाहेर पडायचा 5:59ची बदलापूर लोकल पकडायला. सकाळी 8:30-8:35 दरम्यान आपल्या टेबलावर हजर असायचा तो. बाजूलाच ठेवलेल्या गणपतीच्या फोटोजवळ जास्वंदीचे फूल ठेऊन नमस्कार करायचा आणि लगेच कामाला सुरुवात! गेली कित्येक वर्षे हा नित्यक्रम त्याचा वरिष्ठ म्हणून मी बघत आलो होतो. शिस्तबद्ध आणि नाकासमोर चालणारा माणूस. ऑफिसमध्ये काम करता करता अधूनमधून होणाऱ्या गप्पा, लंच टाइममधली मस्ती, मजा आणि गॉसिपिंग…
ध्यानीमनी नसताना त्याने व्हॉट्सॲपवर मेसेज पाठवला. “मिसिंग यु अ लॉट…” ते वाचून मी मनातल्या मनात म्हटलं इतकं मिसिंग होत असेल तर, मग भांडायचं तरी कशाला? यावेळी मी ठरवलं होतं की, आपली चूक नसताना माघार घ्यायची नाही. त्यालासुद्धा आपली चूक कळली पाहिजे. एखादेवेळी त्याने माफी मागितली तर, बिघडलं कुठे? इतके दिवस त्याने भांडायचं आणि मी जाऊ दे, जाऊ दे, करून माफी मागायची हेच चाललं होतं… यावेळी मी मुद्दामच काही न झाल्यासारखे उत्तर दिले, “मिसिंग यु अ लॉट म्हणजे नेमकं काय?” “ते नाही सांगता येणार…” “हे बरंय तुझं. मिसिंग म्हणजे नेमकं काय, हे जर कळत नाही तर मग मेसेज पाठवून मोकळा बरा…
‘मित्रप्रेम’ आणि ‘घट्ट मैत्री’ म्हणजे काय याचं जिवंत उदाहरण म्हणजे बाबा आणि काळे काका! पन्नास वर्षांहून अधिक काळ एकमेकांपासून दूर राहून देखील त्या दोघांचं एकमेकांवर असलेले प्रेम आणि विश्वास किंचितही कमी झाला नव्हता. त्यांच्यातील मैत्रीच्या रेशीमगाठी काळे काकांनी मर्मबंधातली ठेव असल्यागत मनांच्या कोपऱ्यात छानपैकी जपून ठेवल्या होत्या. हे सगळं कदाचित तसंच गुलदस्त्यात राहिले असते आणि काळाच्या ओघात विस्मृतीत गेले असते. पण तसं घडायचं नव्हतं, ही नियतीची इच्छा होती आणि त्याची सुरुवात एका विचित्र गोष्टीने आमच्या घरापासून सुरू झाली… साधारण सहा महिन्यांपूर्वी… त्याचं असं झालं… बाबा नुकतेच हृदयविकारातून बरे होऊन हॉस्पिटलमधून घरी परतले होते. घरातील वातावरण प्रसन्न आनंदी आणि तणावमुक्त ठेवण्यासाठी…
आज खूप महिन्यांनी माझ्या आवडत्या रेस्टॉरंट मध्ये जाण्याचा योग आला. हमरस्त्यापासून लांब असलेल्या या रेस्टॉरंटची मी नेहमी निवड करायचो ती तेथील शांत वातावरण बघून. वरचेवर तिथे जाण्यामुळे माझी तिथल्या वेटर्स आणि मालकांसोबत छानपैकी ओळख झाली होती. जेवण झाल्यावर बिल घेऊन आज वेटरऐवजी मालक आल्याचे बघून मला आश्चर्य वाटले. “अरे सर, तुम्ही का घेऊन आलात बिल?” मी त्यांना विचारले. माझ्याकडे मंद स्मित करत, “त्याला कारणच तसं आहे,” असं म्हणत मालकांनी एक बंद लिफाफा माझ्या समोर धरला. “हे काय आहे?” मी न राहवून विचारले. त्यावर मालकांनी खुलासा केला, “रमेश वेटर इथली नोकरी सोडून गेला. पण जाताना तुमच्यासाठी हा लिफाफा देऊन गेला आहे.…

