|| श्री स्वामी समर्थ || ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करताना तर्क लावला तर, गणिते लवकर सुटतात. पत्रिकेत 6 8 12 या भावांना त्रिक भाव म्हटले आहे आणि त्यातून आपल्याला मनस्ताप, कटकटी, आजार, कर्ज, दवाखाना, तुरुंग अशा अनेक गोष्टींची शृंखला पाहायला मिळते. पण प्रत्यक्षात तसे नाही. जे दिसते, तसे नेमके आहे का? हे पाहताना खऱ्या अर्थाने अभ्यास सुरू होतो. जर हे भाव इतके वाईट फलादेश देणारे असते, तर ऋषीमुनींनी ते मुळात पत्रिकेत ठेवलेच नसते. असो. चित्रात सगळे रंग पाहिजेत, तसे आयुष्यात सगळी माणसेही हवीत. अगदी त्याचप्रमाणे पत्रिकेत प्रत्येक ग्रह, नक्षत्र, भाव, राशी आणि दशा या प्रत्येकाला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. एक दुसऱ्यापेक्षा वेगळा…
Read More