Author: माधवी जोशी माहुलकर

Avatar photo

एम.ए.(इंग्रजी) बी.एड. असून सध्या नागपूरमध्ये स्थायिक आहेत. लग्नाआधी चार वर्षे मेडिकल रीप्रेझेन्टेटिव्ह म्हणून अकोला येथे कार्यरत. तीन वर्षे शिक्षिका. वाचन, प्रवास करणे, वेगवेगळ्या विषयांवर लिखाण तसेच चर्चा करणे, गायन याची आवड. गायनात गंधर्व महाविद्यालयाच्या परीक्षा प्रथम श्रेणीसह उत्तीर्ण. पती Additional S.P. Anti corruption Bureau Nagpur येथे कार्यरत.

छत्तीसगढ हे एक असे राज्य आहे, जिथे अनेक प्रकारच्या पालेभाज्या आढळतात. हिरव्या पालेभाज्या हा योग्य आणि संतुलित आहाराचा एक आवश्यक भाग आहेत. या पालेभाज्या मानवी शरीराला मिळणाऱ्या जीवनसत्त्वांचा तसेच आयर्न (लोह), कॅल्शियम, फोलेट, मॅग्नेशियम, झिंक आणि फायबर (तंतूयुक्त पदार्थ) इत्यादींचा एक उत्तम स्रोत असतात, जे आपल्याला निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यास मदत करतात. तिथे मायाळू किंवा पोई भाजी (मलबार स्पिनॅच) ही भाजी केली जाते. नागपूर, भंडारा, गोंदिया हे जिल्हे छत्तीसगढ राज्याला लागून असल्याने या भागांतील स्थानिक लोकसुद्धा त्यांच्या आहारात पोई भाजीचा वापर मोठ्या प्रमाणात करतात. पोई भाजी आणि आयुर्वेदिक ‘वावडिंग’ हे एकच असल्याचा खूप लोकांचा गैरसमज होतो, कारण या दोन्ही वनस्पतींमध्ये…

Read More

‘आसमान से गिरे और खजूर पे अटके…’ ही म्हण आपण आयुष्यात कधी ना कधी नक्कीच वापरतो किंवा ऐकतो. एका संकटातून सुटून दुसऱ्या संकटात अडकणे, या अर्थाने वापरली जाणारी ही म्हण खजुराच्या झाडाच्या उंचीवरून आणि त्याच्या वैशिष्ट्यावरूनच तयार झाली आहे. परंतु हेच खजूर वाळवंटातील लोकांकरिता जीवनदायी फळ मानले जाते. काल बाजारात फेरफटका मारताना मला एक वेगळेच दृश्य दिसले. एका फळवाल्याकडे सुंदर, टवटवीत लाल रंगाच्या खजुरांचे घोस दिसले. त्याने सांगितले की, हे ताजे खजूर आपल्या शेजारच्या गुजरातमधील ‘कच्छ’ भागातून आले आहेत. सफरचंदासारखे कुरकुरीत आणि जिभेवर रसाळ गोडवा सोडणारे हे लाल खजूर खाताना मनात विचार आला की, आपण जे पेंडखजूर किंवा खारीक खातो,…

Read More

साधारणपणे पन्नास वर्षांपूर्वीचा काळ एकत्र कुटुंबाचा होता. घरामध्ये काका-काकू, एखादी आत्या, आजी-आजोबा असायचे. नवरा-बायको दोघे जरी नोकरी करणारे असले, तरी त्यांच्या लहान मुलांना सांभाळणारे, त्यांच्यावर लक्ष ठेवणारे, त्यांच्या अभ्यासात थोडीफार मदत करणारे आजोबा; त्या मुलांचे दुपारचे खाणेपिणे उरकणारी, त्यांना कुशीत घेऊन झोपणारी, त्यांना गोष्ट सांगणारी आजी; वेळप्रसंगी फिरायला घेऊन जाणारी, मुलांना ट्युशनला सोडणारी आणि हक्काने रागवणारी आत्या अशी मंडळी एकत्र त्या घरात नांदायची. मुलांचे आई-वडील निर्धास्त आपल्या नोकरीवर जात असत. संध्याकाळी कामावरून घरी आले की, एखादी पोह्यांची अथवा उपम्याची, शिऱ्याची डिश आणि वाफाळता चहा त्यांच्या स्वागताला तयार असायचा. संध्याकाळी सासूबाई जरी स्वयंपाकघरात नसल्या, तरी भाजी, आमटी किंवा खिचडी, थालीपीठ असे…

Read More

सुकी बटाट्याची भाजी उरली तर माझ्या घरी त्याचे आलू पराठे किंवा बटाटेवडे होतात! आलू पराठे करण्याकरता यामध्ये एक-दोन मसाल्यांचा चवीनुसार वापर केला तर या उरलेल्या बटाट्याच्या भाजीचे सुद्धा चवदार पराठे तयार होतात. परंतु आज मी ताजे आलू पराठे आणि बटाटेवडे करण्याची कृती सांगणार आहे. आलू पराठा साहित्य मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे – पाच ते सहा आलं- लसणाची पेस्ट – दोन चमचे हिरवी मिरची – चार (बारीक कापलेल्या) धणे पावडर – एक चमचा जिरे पावडर – एक चमचा आमचूर पावडर – अर्धा चमचा हळद – एक चमचा तिखट – दोन ते अडीच चमचे मीठ – चवीनुसार कणीक – दोन वाट्या मैदा…

Read More

आज सरगुंडे हा विदर्भातील उन्हाळ्यात तयार करण्यात येणारा पदार्थ आठवण्याचे कारण म्हणजे लग्नानंतर दुसऱ्यांदा हा पदार्थ माझ्या खाण्यात आला. मला हा पदार्थ खायला कधीच जमले नाही. एकतर नवीन सुनबाई म्हणून सासरी वावरताना रोज काहीतरी नवीन प्रश्नांना सामोरे जावे लागायचे. खरंच, लग्नानंतर सासरी गेल्यावर तिथे नवीन लोकांशी आणि नवीन वातावरणात बाईच्या जातीला कितीतरी गोष्टी नव्याने शिकाव्या लागतात नाही का? विदर्भात सरगुंडे हे प्रामुख्याने आंब्याच्या रसासोबत खाल्ले जातात. उन्हाळ्यात पाहुण्यांना देण्यात येणाऱ्या पाहुणचारामध्ये या आमरस आणि सरगुंड्यांचा बेत हमखास असतो. तर, त्याच झाल असं की, माझे लग्न झाल्यावर माझ्या सासुबाईंच्या एका मैत्रिणीकडे आम्हा सर्वांना जेवायला बोलावले. ज्यांनी जेवायला बोलावले होते त्या मावशी…

Read More

पोह्यांचा इतिहास पाहिला, तर हा पदार्थ महत्त्वाचा आणि पवित्र ठरवण्यामागे थेट द्वापारयुगातील ‘कृष्ण-सुदामा’ भेटीचा फार मोठा वाटा आहे! जेव्हा अत्यंत गरीब सुदामा आपले परममित्र द्वारकेचे राजे श्रीकृष्ण यांना भेटायला निघाले, तेव्हा आपल्या मित्राला रिकाम्या हाताने कसे भेटावे, हा प्रश्न त्यांच्यासमोर होता. सुदामाच्या पत्नीने घरात असलेले मूठभर पोहे एका जुन्या कापडाच्या पुरचुंडीत बांधून दिले. द्वारकेच्या भव्य महालात सुवर्णपात्रात 56 भोग घेणाऱ्या श्रीकृष्णाने सुदामाची ती गरिबीची पुरचुंडी आनंदाने हिसकावून घेतली आणि अत्यंत आवडीने ते कच्चे पोहे खाल्ले. देवाला सोन्या-चांदीच्या ताटातील ऐश्वर्यापेक्षा भक्ताने प्रेमाने दिलेले ‘पोहे’ जास्त प्रिय वाटले. आयुर्वेदात आणि प्राचीन ग्रंथांमध्ये पोह्यांचा उल्लेख ‘पृथुक’ असा केला आहे. प्रवासात टिकणारा, पचायला हलका…

Read More

‘लबाड वांगे’ ऐकून हसायला आले ना? परंतु हीच खरी या भाजीची मेख आहे. विदर्भात आमरसाचा बेत असला की, पाटवडीची भाजी, भरली वांगी, शेव टमाटर भाजी, गोळा आमटी, मूग वड्यांची भाजी किंवा लबाड वांग्याची तर्रीदार भाजी आवर्जून केली जाते. गोड रसाच्या भरपेट जेवणाचा सुबक तोल सांभाळण्यासाठी या भाज्या अगदी उत्तम पर्याय आहेत. सोबतीला मऊ लुसलुशीत पोळ्या किंवा गरमागरम पुऱ्या असतील, तर मग जेवणाची रंगत काही वेगळीच! आमरस आणि अशा मसाल्याच्या भाज्या आणि अशा सुग्रास बेताचा विचार एकदम पारंपरिक आणि भारी आहे. विदर्भातील स्वयंपाकाचा आणि पारंपरिक सुगरणपणाचा हा एक अप्रतिम नमुना आहे. एरवी देखील भाजी नसेल तर ही फसवी वांगी किंवा लबाड…

Read More

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाची ‘धो-धो’ सुरुवात होते, पण आमच्या विदर्भात मात्र पावसाचे आगमन जरा उशिरानेच होते. सध्या आकाशातील ढग हुलकावणी देऊन, वाकुल्या दाखवून पळून जात आहेत आणि उकाड्याने सगळेच त्रस्त आहेत. पण या वातावरणातही निसर्ग आपल्याला एक खूप मोठी गोष्ट शिकवतो, ती म्हणजे ‘संयम’! मान्सूनपूर्व पावसामुळे आमच्या विदर्भातील ताडोबा, पेंच, मेळघाट आणि टिपेश्वर यासारखी घनदाट जंगले अबोलपणे हिरवाईची चादर ओढू लागली आहेत. त्या थोड्याशा पावसाने जंगलातील पशू-पक्षी आणि प्राण्यांच्या जिवाला सुखावणारा गारवा मिळतो. पावसाच्या पाण्याने साचलेल्या डबक्यात वाघ किंवा रानगवे आनंदाने लोळताना, चिखलाने स्वतःचे अंग बरबटवून घेताना आणि हरणे उड्या मारताना, तर पक्षी पाण्यात डुबक्या मारताना पाहणे हा एक…

Read More

कढी हा प्रकार बहुतांश भारतीयांचा आवडता प्रकार आहे. ठिकठिकाणी कढी करण्याची पद्धतही वेगवेगळी आहे. काही लोकांना तुपाच्या फोडणीतील कढी आवडते तर, काहींना तेलाच्या फोडणीतील, काही लोकांना जरा आंबट कढी आवडते तर काहींना गोडसर चवीची, काहींना पातळसर कढी आवडते तर, काहींना घट्टसर, काही लोकांना दह्याची केलेली कढी चालते तर काहींचा आग्रहच असतो की, लोणी काढलेलं ताक असेल तरच कढी करावी नाहीतर नाही! बरं त्याच्या फोडणीत कढीपत्ता, जिरं, जाड मोहरी/ बारीक मोहरी किती आणि कसे वापरायचे तेही प्रमाण त्या कुटुंबातील सदस्यांच्या आवडी निवडीनुसार ठरते. फोडणीमध्ये फक्त हिरवी मिरची आणि आलं वापरायचं की लसूणही घालायचा, यावरूनही बरीच काथ्याकूट होते. काहींना कढीपत्ता वगैरे दाताखाली…

Read More

रविवारी (01 जून 2026) एक आणखी कर्णमधुर आवाज काळाच्या पडद्याआड गेला. सुमन कल्याणपूर यांच्या निधनाने मागील शतकातील सदाबहार संगीत युगाचा अंत झाला आहे, असे म्हणावे लागेल. आवाजातील गोडवा आणि गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या आवाजाशी असलेले साधर्म्य, यामुळे त्यांना ओळख तर मिळाली आणि त्या प्रस्थापितही झाल्या, पण तरीही त्या काहीशा मागेच राहिल्या. कुणासारखं तरी असणं हे फारसं फलदायी नसतं. कारण, सुमन कल्याणपूर यांचा मूळ आवाज जो लता मंगेशकर यांच्या अत्यंत जवळचा आणि तितकाच सुश्राव्य होता… पण लतादिदी संगीत जगताच्या केंद्रस्थानी विराजमान होत्या. कदाचित, सुमनजींनी जर एखादी वेगळी वाट निवडली असती, तर आशा भोसले आणि गीता दत्त यांच्यासारखे अढळ स्थान त्यांना नक्कीच…

Read More