Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: माधवी जोशी माहुलकर
एम.ए.(इंग्रजी) बी.एड. असून सध्या नागपूरमध्ये स्थायिक आहेत. लग्नाआधी चार वर्षे मेडिकल रीप्रेझेन्टेटिव्ह म्हणून अकोला येथे कार्यरत. तीन वर्षे शिक्षिका. वाचन, प्रवास करणे, वेगवेगळ्या विषयांवर लिखाण तसेच चर्चा करणे, गायन याची आवड. गायनात गंधर्व महाविद्यालयाच्या परीक्षा प्रथम श्रेणीसह उत्तीर्ण. पती Additional S.P. Anti corruption Bureau Nagpur येथे कार्यरत.
माझं माहेर विदर्भातील अकोला! अकोल्याला स्वतःचा एक वेगळा असा खाद्यसंस्कृतीचा वारसा आहे. स्त्री वयाने कितीही मोठी झाली तरी, माहेरच्या आठवणी तिच्या कायम स्मरणात असतात, त्याला मीदेखील अपवाद नाही. आमच्या अकोल्याला भाज्या खूपच छान मिळतात. पालक, मेथी, आंबटचुका अशा ताज्या हिरव्या पालेभाज्यांच्या जुड्या पाहिल्या की, माणूस मोहात पडणारच ना? रसरशीत लालचुटुक टोमॅटो, काटेरी गुलाबीसर वांगी, हिरवी आणि जांभळी वांगी, भरताची मोठी पण मऊ-लुसलुशीत ठसठशीत वांगी, कोवळी-लुसलुशीत घोसाळी (ज्याला आम्ही गिलके म्हणतो), शिरी दोडके, पांढरेशुभ्र आणि हिरवीगार पाने असलेले कोवळे मुळे, तांबडा भोपळा (काशीफळ), वाल, चवळी, गवारीच्या कोवळ्या हिरव्या शेंगा… इतक्या ताज्या भाज्या पाहून मला काय घ्यावं अन् काय नको असं होतं.…
राजेश खन्ना आणि तनुजा यांच्या अभिनयाने सजलेला ‘हाथी मेरे साथी’ हा सिनेमा आमच्या पिढीतील जवळजवळ प्रत्येकानेच पाहिला असेल. लहानपणी हा सिनेमा पाहताना त्यातील हत्तींच्या करामती पाहून जशी मजा वाटायची, तसेच हीरो राजेश खन्ना आणि ‘रामू’ नावाच्या हत्तीमधील जिव्हाळ्याचे नाते पाहून हत्तींबद्दल एक वेगळेच आकर्षण निर्माण झाले होते. सिनेमातील रामू हत्ती जेव्हा मरतो आणि राजेश खन्ना आर्त स्वरात, आतून काही तुटल्यासारखे “नफरत की दुनिया को छोडके प्यार की दुनिया में खुश रहना मेरे यार…” हे गाणे पडद्यावर साकारायचा; तेव्हा चित्रपटगृहातील प्रत्येक व्यक्ती हमसून हमसून रडायची. खरं ना? हत्ती आणि मानव यांचा संबंध असा पुरातन काळापासून अबाधित आहे. पृथ्वीवरील या विशालकाय जीवाने…
दीप अमावस्या, जिवतीची अमावस्या, दिव्याची अवस असा उल्लेख या आषाढ अमावस्येबद्दल लहानपणापासून कानावर पडलेला असताना, गेल्या काही वर्षांमध्ये ‘गटारी अमावस्या’ असा हीन शब्द रूढ होताना दिसतो. खरंतर, लहान मुलांच्या दीर्घायुष्याकरिता, घरातील इडापिडा टळून जाण्याकरिता, मुलांचे आरोग्य सुदृढ राहण्याकरिता आणि घरामध्ये सुखशांती नांदण्याकरिता घरोघरी या अमावस्येला दिवे स्वच्छ घासून-पुसून त्यांचे पूजन केले जायचे आणि देवाकडे प्रार्थना केली जायची. ‘गतहारी’ या शब्दाचा ‘गटारी’ असा अपभ्रंश होऊन तोच सध्या प्रचलित झालेला दिसतो. गतहारी म्हणजे मागे पडलेला आहार! आषाढ महिना हा पावसाच्या सुरुवातीचा महिना. या महिन्यात पाऊस पडून पृथ्वी नवरूप धारण करत असते. निसर्गातील झाडे, पशू-पक्षी या पावसाच्या पाण्याने सचैल स्नान करून शुचिर्भूत होतात.…
स्प्राऊटेड मुग आणि स्वीट कॉर्न चीज बॉल्स हा पदार्थ म्हणजे स्वयंपाकघरातील उरलेल्या साहित्याचा हा मेकओव्हर आहे, असं म्हणायला हरकत नाही. कारण माझ्या स्वयंपाकघरात वाटीभर मोड आलेले मूग आणि दीड वाटी स्वीट कॉर्न उरले होते. सॅलडमध्ये वापरून झाले होते आणि वाफवून खाऊनही झाले होते. आता या उरलेल्या मक्याच्या दाण्यांचे आणि मोड आलेल्या मुगाचे करायचे काय, हा प्रश्न होता. उसळीसारखे करावे म्हटले तर, मुले म्हणाली, “हे असले काही करू नको!” हे दाणे वापरून पुलाव करावा म्हटले तर, त्यांची भाताचा प्रकार खायची इच्छा नव्हती. बाहेर पडणारा पाऊस पाहून काहीतरी चटपटीत खायला हवे, असा त्यांचा आग्रह होता! मला तर कसेही करून हे स्वीट कॉर्नचे…
आता येत्या 12-15 दिवसांत श्रावण महिना सुरू होईल. या महिन्यांत अनेकांचे, प्रामुख्याने महिलांचे उपासतपास सुरू होतील. भगर, आमटी, साबुदाणा वडे तसेच वेफर्स, फराळी चिवडा, शेंगदाणा आणि गुळाचे लाडू असे काही ना काही पदार्थ अनेक घरांत होतील. तरीही, संध्याकाळी सात वाजता, “आई भूक लागली, काहीतरी खायला कर…” हा पुकारा असतोच! वस्तुत:, वर्षातून दोन-तीन महत्त्वाचे उपास घरातील सर्वांनीच करायला हवेत, या मताची मी असल्याने सर्वांना उपवासाचे महत्त्व सांगून आषाढी आणि कार्तिक एकादशी, महाशिवरात्र असे दोन-तीन उपवास करायायला लावते. मग त्याकरिता मला थोडा त्रास झाला तरी चालतो. उपवासाचे थालिपीठ करायचे असतील तर, त्यासाठी घरीच भाजणी तयार करते. आषाढी एकादशीला केप्र या कंपनीचे उपवासाच्या…
तुरीचं साधे वरण आणि गरम भाताची वाफाळलेली मूद, त्यावर साजूक तुपाची धार… हे केवळ स्वर्गसुख! ‘वरण-तूप-भात’ म्हणजे प्रत्येक महाराष्ट्रीयन माणसाचे हक्काचे ‘Comfort Food’. या साध्याशा जेवणावर मराठी लोक अगदी निर्व्याज प्रेम करतात. हॉटेलच्या चकचकीत मेन्यूकार्डवर शेकडो पक्वान्नांची नावं चमकत असतील, देश-विदेशातील नवनवीन चवी आपल्या जिभेला भुरळ घालत असतील; पण सरते शेवटी मनाला आणि पोटाला जे सात्विक सुख हवे असते, ते फक्त याच एका घासात मिळते. आपल्या मराठी घरात या सुखाचे कितीतरी चवदार प्रकार आहेत. कधी तूप, मोहरी, जिरे, कढीपत्ता आणि हिंगाची कडकडीत फोडणी जेव्हा मऊ शिजलेल्या तुरीच्या वरणावर बसते, तेव्हा सुटणारा तो सुवास थेट शेजारच्या घरापर्यंत जातो आणि भूक खळबळून…
छत्तीसगढ हे एक असे राज्य आहे, जिथे अनेक प्रकारच्या पालेभाज्या आढळतात. हिरव्या पालेभाज्या हा योग्य आणि संतुलित आहाराचा एक आवश्यक भाग आहेत. या पालेभाज्या मानवी शरीराला मिळणाऱ्या जीवनसत्त्वांचा तसेच आयर्न (लोह), कॅल्शियम, फोलेट, मॅग्नेशियम, झिंक आणि फायबर (तंतूयुक्त पदार्थ) इत्यादींचा एक उत्तम स्रोत असतात, जे आपल्याला निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यास मदत करतात. तिथे मायाळू किंवा पोई भाजी (मलबार स्पिनॅच) ही भाजी केली जाते. नागपूर, भंडारा, गोंदिया हे जिल्हे छत्तीसगढ राज्याला लागून असल्याने या भागांतील स्थानिक लोकसुद्धा त्यांच्या आहारात पोई भाजीचा वापर मोठ्या प्रमाणात करतात. पोई भाजी आणि आयुर्वेदिक ‘वावडिंग’ हे एकच असल्याचा खूप लोकांचा गैरसमज होतो, कारण या दोन्ही वनस्पतींमध्ये…
‘आसमान से गिरे और खजूर पे अटके…’ ही म्हण आपण आयुष्यात कधी ना कधी नक्कीच वापरतो किंवा ऐकतो. एका संकटातून सुटून दुसऱ्या संकटात अडकणे, या अर्थाने वापरली जाणारी ही म्हण खजुराच्या झाडाच्या उंचीवरून आणि त्याच्या वैशिष्ट्यावरूनच तयार झाली आहे. परंतु हेच खजूर वाळवंटातील लोकांकरिता जीवनदायी फळ मानले जाते. काल बाजारात फेरफटका मारताना मला एक वेगळेच दृश्य दिसले. एका फळवाल्याकडे सुंदर, टवटवीत लाल रंगाच्या खजुरांचे घोस दिसले. त्याने सांगितले की, हे ताजे खजूर आपल्या शेजारच्या गुजरातमधील ‘कच्छ’ भागातून आले आहेत. सफरचंदासारखे कुरकुरीत आणि जिभेवर रसाळ गोडवा सोडणारे हे लाल खजूर खाताना मनात विचार आला की, आपण जे पेंडखजूर किंवा खारीक खातो,…
साधारणपणे पन्नास वर्षांपूर्वीचा काळ एकत्र कुटुंबाचा होता. घरामध्ये काका-काकू, एखादी आत्या, आजी-आजोबा असायचे. नवरा-बायको दोघे जरी नोकरी करणारे असले, तरी त्यांच्या लहान मुलांना सांभाळणारे, त्यांच्यावर लक्ष ठेवणारे, त्यांच्या अभ्यासात थोडीफार मदत करणारे आजोबा; त्या मुलांचे दुपारचे खाणेपिणे उरकणारी, त्यांना कुशीत घेऊन झोपणारी, त्यांना गोष्ट सांगणारी आजी; वेळप्रसंगी फिरायला घेऊन जाणारी, मुलांना ट्युशनला सोडणारी आणि हक्काने रागवणारी आत्या अशी मंडळी एकत्र त्या घरात नांदायची. मुलांचे आई-वडील निर्धास्त आपल्या नोकरीवर जात असत. संध्याकाळी कामावरून घरी आले की, एखादी पोह्यांची अथवा उपम्याची, शिऱ्याची डिश आणि वाफाळता चहा त्यांच्या स्वागताला तयार असायचा. संध्याकाळी सासूबाई जरी स्वयंपाकघरात नसल्या, तरी भाजी, आमटी किंवा खिचडी, थालीपीठ असे…
सुकी बटाट्याची भाजी उरली तर माझ्या घरी त्याचे आलू पराठे किंवा बटाटेवडे होतात! आलू पराठे करण्याकरता यामध्ये एक-दोन मसाल्यांचा चवीनुसार वापर केला तर या उरलेल्या बटाट्याच्या भाजीचे सुद्धा चवदार पराठे तयार होतात. परंतु आज मी ताजे आलू पराठे आणि बटाटेवडे करण्याची कृती सांगणार आहे. आलू पराठा साहित्य मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे – पाच ते सहा आलं- लसणाची पेस्ट – दोन चमचे हिरवी मिरची – चार (बारीक कापलेल्या) धणे पावडर – एक चमचा जिरे पावडर – एक चमचा आमचूर पावडर – अर्धा चमचा हळद – एक चमचा तिखट – दोन ते अडीच चमचे मीठ – चवीनुसार कणीक – दोन वाट्या मैदा…

