Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: माधवी जोशी माहुलकर
एम.ए.(इंग्रजी) बी.एड. असून सध्या नागपूरमध्ये स्थायिक आहेत. लग्नाआधी चार वर्षे मेडिकल रीप्रेझेन्टेटिव्ह म्हणून अकोला येथे कार्यरत. तीन वर्षे शिक्षिका. वाचन, प्रवास करणे, वेगवेगळ्या विषयांवर लिखाण तसेच चर्चा करणे, गायन याची आवड. गायनात गंधर्व महाविद्यालयाच्या परीक्षा प्रथम श्रेणीसह उत्तीर्ण. पती Additional S.P. Anti corruption Bureau Nagpur येथे कार्यरत.
दरवर्षी 30 मे रोजी संयुक्त राष्ट्रांच्या वतीने ‘जागतिक बटाटा दिवस’ (International Day of the Potato) साजरा केला जातो. आपल्या सर्वांचा लाडका बटाटा हा मूळ भारतीय नाहीये तर, तो युरोपातून पोर्तुगीज आणि डच लोकांनी भारतात आणला. परकीय जातीची ही भाजी भारतीय मातीत अशी काही रुजली की, जशी ती इथेच जन्माला आली! आपल्या देशाचे वैशिष्ट्यच असे आहे की, या भूमीच्या प्रत्येक कणात कोणालाही आपल्यामध्ये सामावून घेण्याची क्षमता आहे. कितीतरी परकीय असलेले लोक या मातीच्या प्रेमात पडले आणि ते नंतर त्यांच्या देशात परत गेलेच नाहीत. त्याउलट, त्यांनी आपली संस्कृती येथे रुजवण्याचा प्रयत्न केला. अगदी खानपानापासून पेहरावापर्यंत बदल या मातीत घडले… मग बटाटा त्याला…
गरम चहाच्या घोटासोबत ताज्या बन-मस्का पावाचा आस्वाद देणारे आणि अनोळखी माणसांचे ओळखीत रुपांतर करणारे तसेच गप्पांचा फड जमविण्यासाठी मुंबईकरांचे आवडते ठिकाण म्हणजे ग्रांट रोड येथील ‘बी मेरवान कॅफे’! आता तो बंद झाल असला तरी, अनेकांच्या मनात त्याचा स्मृतीगंध अद्याप कायम आहे. मुंबई हे सातत्याने बदलणारं शहर आहे. इथे रात्रीतून इमारती उभ्या राहतात, जुनं मोडून नवं उभारलं जातं आणि लोक तंत्रज्ञानाच्या वेगासोबत धावत असतात. पण या धावपळीच्या मुंबईत एक अशी जागा होती, जिथे वेळ जणू 100 वर्षांपूर्वीच थांबली होती. ग्रांट रोड रेल्वे स्टेशनच्या पूर्वेकडे अगदी बाहेर पाऊल टाकताच डाव्या हाताला दिसणारा हा ‘बी मेरवान कॅफे’. जुने लाकडी दरवाजे आणि तिथून येणारा…
दुपारचा दीड वाजत आला होता, आज सुमनला सकाळची धुणं-भांड्यांची काम आटोपून घरी जायला जरा वेळच झाला होता. चार वाजता तिला परत सिन्हा बाईंकडे किटी पार्टी असल्यामुळे कामावर जायचे होते, तिला सध्या काळजी लागली होती ती, घरी एकटा असलेल्या आपल्या पोराची, दीपकची! सुमनचा नवरा रिक्षा चालवायचा, त्यामुळे त्याची घरी येण्याची अशी ठराविक वेळ नव्हती. दीपकचे सगळे काम सुमनलाच करावे लागत असे. दीपक, सुमनचा मुलगा तेवीस, चोवीस वर्षांचा होता. आता एवढ्या मोठ्या मुलाची कसली काळजी करायची? बाब त्याच्या वयाची नव्हती, तो सामान्य मुलांसारखा नसल्यामुळे काळजीची होती. तो वयाने आणि शरीराने जरी वाढला होता तरी, बुद्धीने विकसित नव्हता. तो अॅबनॉर्मल होता. त्याचे मन…
राजस्थानी दाल-बाटी हा केवळ एक पदार्थ नसून तो राजस्थानच्या संस्कृतीचा आणि इतिहासाचा एक महत्त्वाचा भाग आहे. या चविष्ट पदार्थाचा इतिहास थक्क करणारा असून तो प्रामुख्याने युद्धभूमी आणि वाळवंटी हवामानाशी जोडलेला आहे. याची रंजक कथा कशी आहे ते वाचा! दाल-बाटीचा उगम साधारण आठव्या शतकात, मेवाडचे शासक बप्पा रावळ यांच्या काळात झाला, असे मानले जाते. त्या काळी राजपूत योद्धे दीर्घकाळ युद्धावर असायचे. वाळवंटात अन्न शिजवणे आणि ते टिकवून ठेवणे मोठे आव्हान होते. दालबाटी हा युद्धभूमीवरील ‘जुगाड’ आहे, असे म्हटले तर त्यात काही गैर नाही. सैनिक सकाळी युद्धावर जाण्यापूर्वी पिठाचे गोळे करून ते वाळवंटातील तप्त वाळूत पुरून ठेवत असत. दिवसभर रणरणत्या उन्हात आणि…
अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोलकात्यामध्ये एका झालमुरीच्या दुकानाजवळ आपला ताफा थांबवून तेथील स्थानिक दुकानातील भेळीचा म्हणजेच तेथील झालमुरीचा आस्वाद घेतला, या बातमीने सर्वांचे लक्ष वेधले… या भेळीमध्ये वेगळेपण असं काय आहे, त्याचा शोध घ्यायला मी सुरुवात केली. भेळ… नाव काढलं तरी तोंडाला पाणी सुटतं! दिसायला अगदी साधा, खिशाला परवडणारा, चवीलाही तितकाच लाजवाब असलेला हा पदार्थ. श्रीमंतांच्या पार्ट्यांपासून ते गरिबांच्या झोपडीपर्यंत… शाळेच्या बाहेरचे आजीचे दुकान ते ऑफिसच्या कट्ट्यापर्यंत भेळीचं साम्राज्य पसरलेलं आहे. सर्व आबालवृद्धांना आवडणारा पदार्थ म्हणजे भेळ! या साध्याशा वाटणाऱ्या भेळीचा इतिहास आणि भूगोल दोन्ही तितकेच रंजक आहेत. मुंबईला भेळीचे ‘माहेरघर’ म्हटलं तर वावगं ठरणार नाही. भेळीचा खरा उगम आणि…
नागपूरसारख्या कडक उन्हात कैरीचे ‘उन्हातले लोणचे’ (Sun-dried Pickle) घालणे म्हणजे एक उत्तम प्रयोग असतो! या लोणच्यात कैरीच्या फोडी नैसर्गिकरीत्या उन्हात मुरवल्या जातात, त्यामुळे ते लोणचे वर्षभर टिकते आणि त्याची चवही अधिक खुलते. या लोणच्याकरिता सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे कैऱ्यांची निवड करणे आहे. दोन किलो कैरीसाठी ही ‘पारंपारिक उन्हातल्या लोणच्याची’ कृती खालीलप्रमाणे आहे. कडक आणि करकरीत तसेच आंबट गावरान कैऱ्या घ्या. कैऱ्या स्वच्छ धुवून, कोरड्या कपड्याने पुसून घ्या. मग त्यांच्या फोडी करून घ्या. (कोय नको असेल तर काढून टाका. मी तर यांच्या कोवळ्या कोयीपण लोणच्यात टाकते म्हणजे लोणचं खाताना मिठात मुरलेल्या कोयींची चव अफलातून लागते.) या फोडींना हळद आणि मीठ लावून…
माझे माहेर आणि सासर हे दोन्ही विदर्भातील अकोल्याचे. आमचे शालेय आणि महविद्यालयीन शिक्षण सर्व अकोल्यातून झाले. त्या काळात जीवाची चैन करणे हे सामान्य लोकांच्या खिशाला परवडणारे नव्हते. माझे वडील भिकमचंद खंडेलवाल या त्यावेळच्या नावाजलेल्या शाळेत शिक्षक होते, त्यामुळे घरी शिस्तीचे वातावरण असल्याने सिनेमा पाहणे, बाहेर जाऊन भेळपुरी, पाणीपुरी खाणे असले प्रकार नव्हते. त्याकरिता आठ-आठ दिवस आधीपासून वडिलांची परमिशन कशी काढायची आणि कोणी काढायची, हा मोठा प्रश्न असे. अगदीच ते काही ‘नाही’ म्हणायचे नाहीत, परंतु ही परवानगी आम्हाला दोन तीन महिन्यांतून एकदा मिळत असे. बरं, ते स्वतः चोखंदळ असल्याने बऱ्याच वेळेस तेच स्वतः घरी आईला विविध पदार्थ करायला लावत असत. सगळ्यांच्याच…
सन 2023 हे आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष म्हणून भारताने जाहीर केलं, कारण आपल्या कैक पिढ्या याच भरडधान्यावर पोसल्या गेल्या आहेत. भारतात जवळपास सर्वचं राज्यात वेगवेगळ्या प्रकारची भरडधान्य ऋतुमानानुसार आहारात समाविष्ट होत असतात. महाराष्ट्रात तर आदिवासीबहुल जिल्ह्यांमध्ये तसेच ग्रामीण भागामध्ये यांचा रोजच वापर केला जातो. माझ्या घरी मिलेट्स मी मागील पाच वर्षांपासून वापरते आहे. त्यामध्ये फॅाक्सटेल मिलेट्स, लिटील मिलेट्स, बार्नयार्ड मिलेट्स, कोदो मिलेट्स यांचा समावेश आहे. याशिवाय, बाजरी, ज्वारी, भगर, नाचणी, नागली यासारखे मिलेट्स तर आपण नेहमीच वापरत आलेले आहोत. त्यातीलच बाजरी (ज्याला पर्ल मिलेट्स असं म्हणतात) हिरवी मुगाची डाळ किंवा अख्खे मूग, आणि तांदुळ यांचे डोसे आणि इडल्यांची रेसिपी सांगणार…
नुकताच एक लेख वाचनात आला, ज्यामध्ये स्वयंपाकघर, स्त्री-पुरुषांमधील कामाची विभागणी आणि पुरुषांचा घरकामातील सहभाग यावर भाष्य केलं होतं. तो लेख वाचताना असं जाणवलं की, आपण आजकाल प्रत्येक विषयाकडे ठराविक चौकटीतून पाहू लागलो आहोत. पण या वादात ‘सहजीवन’ हा जो मूळ गाभा आहे, तो कुठेतरी हरवत चालला आहे. कोणत्याही नात्याचा विचार हा एकांगी करून चालत नाही, तर त्यातील परस्पर सामंजस्य समजून घेणं महत्त्वाचं असतं. बदलत्या काळातील आव्हाने पेलताना आज नवरा आणि बायको दोघांचीही ओढाताण होताना दिसते. आजच्या काळात सहजीवन पूर्वीपेक्षा कितीतरी जास्त कठीण झालं आहे. वाढत्या महागाईमुळे पती-पत्नी दोघांनाही नोकरी करणं अनिवार्य झालं आहे. ‘न्यूक्लिअर फॅमिली’च्या संस्कृतीमुळे घरात वडिलधाऱ्यांचा आधार उरलेला…
‘खवय्येगिरी’ आणि ‘महाराष्ट्र’ हे समीकरण मांडताना पुरणपोळी, मिसळ किंवा वडापाव जितके महत्त्वाचे आहेत, तितकीच महत्त्वाचे स्थान आहे, ते ‘भडंग’चे! प्रवासात सोबतीला असणारा, चहाच्या वेळेचा गप्पांचा फड रंगवणारा आणि जिभेवर रेंगाळणारी चव देणारा हा पदार्थ आहे. भडंगचा उगम प्रामुख्याने सांगली जिल्ह्यातील ‘जयसिंगपूर’ आणि कोल्हापूर परिसरात झाला असे मानले जाते. या भागातील हवामान आणि तिथल्या लोकांची तिखट-झणझणीत खाण्याची आवड यातूनच या चिवड्याचा जन्म झाला असावा. ‘भडंग’ या शब्दाचा अर्थच मुळी ‘प्रचंड’ किंवा ‘मोठ्या प्रमाणात’ असा होतो. कदाचित, जुन्या काळी हा चिवडा मोठ्या प्रमाणावर एकत्र बनवला जात असे, म्हणून त्याला हे नाव पडले असावे. इतर चिवड्यांमध्ये लसणाचा वापर ऐच्छिक असतो, परंतु भडंगची खरी…

