Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: माधवी जोशी माहुलकर
एम.ए.(इंग्रजी) बी.एड. असून सध्या नागपूरमध्ये स्थायिक आहेत. लग्नाआधी चार वर्षे मेडिकल रीप्रेझेन्टेटिव्ह म्हणून अकोला येथे कार्यरत. तीन वर्षे शिक्षिका. वाचन, प्रवास करणे, वेगवेगळ्या विषयांवर लिखाण तसेच चर्चा करणे, गायन याची आवड. गायनात गंधर्व महाविद्यालयाच्या परीक्षा प्रथम श्रेणीसह उत्तीर्ण. पती Additional S.P. Anti corruption Bureau Nagpur येथे कार्यरत.
उन्हाळा आला की, विदर्भात चिवळीची आणि घोळीची भाजी दिसायला लागते. पुष्कळ लोक घोळीलाच चिवळ समजतात. परंतु विदर्भातील लोक या दोन भाज्यांमधील फरक अचूक ओळखतात. चिवळीची पाने एकदम बारीक आणि आकाराने तांदळाच्या दाण्यांएवढी असतात. याची देठे लालसर गुलाबी आणि एकदम गवताच्या काड्यांसारखी असतात. याची पाने मऊसर आणि पाण्याने भरलेली असल्याने स्पर्शाला एकदम नरम तसेच थंड असतात. त्यामुळे पूर्वी बऱ्याच गावांमध्ये जेव्हा कूलर, एसी नव्हते, त्या काळात उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये एका मोठ्या दुरडीत म्हणजे बांबूच्या टोपलीत ही चिवळ भाजी पसरवून घेत आणि त्यावर नरम सुती कापडाची किंवा साडी / पातळाची अथवा धोतराची चौघडी अंथरवून त्यावर लहान बाळांना ठेवत असत. कारण, ही भाजी मुळातच…
इराण-अमेरिका-इस्रायल युद्धाचा फटका भारताला बसला आहे. अनेक ठिकाणी गॅस सिलिंडरचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा जाणवू लागल्याने लोकांनी इंडक्शन, इलेक्ट्रिक कूकर, मायक्रेवेव्ह तातडीने विकत घेण्यास सुरुवात केली. परंतु आता तर युद्धविराम झाले तर, या इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा पुढे वापर झाला तर बरं, नाहीतर या वस्तू अडगळीत जातील किंवा त्यांचा गरजेनुसार उपयोग केला जाईल, असं वाटतं. कारण, माझ्यासारख्या गृहिणींना अजूनही गॅसवरच स्वयंपाक करायची सवय आहे आणि पोहे, रवा, शेंगदाणे यासारखे पदार्थ भाजण्याकरिता मला गॅसवर कढईत हे पदार्थ भाजायला बरे वाटतात… माझ्या मते शेवटी भारतीय गृहिणींना त्यांच्या किचनमध्ये अनेक पदार्थ वेगवेगळ्या तापमानावर करायची सवय असते; फार क्वचित त्या मायक्रोवेव्ह किंवा ओटीजीचा वापर करताना दिसतात. परंपरागत…
विदर्भात बहुतेक वेळेस सकाळच्या किंवा दुपारच्या नाश्त्याकरिता बनवला जाणारा पोटभरीचा पदार्थ म्हणजे उकडपेंडी (उकरपेंडी)! गव्हाच्या किंवा ज्वारीच्या पिठापासून तयार केला जाणारा चविष्ट असा हा पदार्थ आहे. खूपजण उकडपेंडी ही एकतर फक्त गव्हाच्या पिठाची करतात किंवा फक्त ज्वारीचे पीठ वापरून करतात, परंतु मी मात्र दोन्ही पिठं मिक्स करून उकडपेंडी करते. करायला सोपा आणि फारशी तयारी न करता चटकन होणारा हा पदार्थ आहे. रव्याचा उपमा नाश्त्याचा अविभाज्य अंग झालेला आहे, परंतु कधीतरी थोडाबहुत उपम्यासारखाच परंतु वेगळ्या पिठांचा आणि चवीला वेगळा असा उकडपेंडी हा पदार्थ करायला काहीच हरकत नाही. संध्याकाळी पोळ्या करायचा कंटाळा आला अथवा कुठून थकून-भागून आलात तर ही उकडपेंडी लगेच तयार…
1984 साली क्राऊन कंपनीचा ब्लॅक ॲण्ड व्हाइट टीव्ही आमच्या घरी आला, तोही माझ्या आजीच्या आग्रहाखातर! त्या सालात भारताच्या आयर्न लेडी आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या झाली होती, त्याच्या तीन-चार महिनेआधी हा टीव्ही आमच्या घरी आला होता. त्या सालात जसा या टीव्हीने आमच्या घरात प्रवेश केला, तसा चोवीस तास घरात वाजणारा रेडिओ मान टाकून हिरमुसला होऊन खुंटीवर जाऊन लटकला. त्या काळात त्याच्याकडे जरा दुर्लक्षचं झालं… तेव्हा घराघरातून सतत रेडिओचा आवाज ऐकायला मिळायचा. सकाळी सहा वाजता त्याच्या विशिष्ट ट्युनने रेडिओ सगळ्या लोकांची सकाळ प्रसन्न करायचा. त्यानंतर भक्तीगीतांच्या स्वरांनी सर्व घर न्हाऊन निघायचं. महाराष्ट्रात सकाळी बरोबर सात वाजता मराठी बातम्या देणाऱ्या…
॥ अथश्री इडलीका कुमारी कथा आरंभस्य ॥ दक्षिण भारताचे प्रमुख खाद्यपदार्थांपैकी एक अशी ओळख असलेली ‘इडली’ ही आता संपूर्ण भारतातच नव्हे तर पार साता समुद्रापलीकडे आपल्या नावाचा डंका पिटत आहे. दक्षिण भारताची ही लाडकी इडली नावाची राजकुमारी भारतातील तमाम अन्नपदार्थांमध्ये आपल्या पौष्टिक घटकांमुळे मानाचे स्थान पटकावून बसली आहे. या इडलीकुमारीची कहाणी देखील मनोरंजक आहे बरं का! तुम्हाला जर सांगितले की, इडली ही दक्षिण भारतीय पदार्थ नाही तर, तुमचा यावर विश्वास बसेल? नाही ना? माझाही नव्हता बसला! परंतु मी जेव्हा इडलीच्या इतिहासाचा मागोवा घेतला, तेव्हा या इडलीकुमारीच्या बऱ्याच रंजक कथा समोर आल्या. तुम्हालाही ऐकायला आवडेल, या इडलीकुमारीची कथा… चला तर मग…
उन्हाळ्यात कैरी बाजारात यायला सुरुवात होते, तेव्हापासून विदर्भातील गाव-खेड्यांमध्ये, घरोघरी आंब्याची कढी केली जाते. आमच्याकडे कच्च्या कैरीलाही आंबाच म्हणतात आणि पिकलेल्या आंब्याला सुद्धा आंबाच म्हणतात! रोडगे, वांगी-बटाट्याची भाजी, साधं वरण, गूळ- तूप आणि ही आंब्याची कढी याने हनुमान जयंतीच्या भंडाऱ्यांची सांगता होत असते. वर्धा, नागपूर जिल्ह्यांमध्ये हनुमान जयंतीच्या निमित्ताने जे कार्यक्रम होतात, तेव्हा गावागावांतील हनुमानाच्या मंदिरांमध्ये हा प्रसाद ठरलेला असतो. नाहीच काही तर, मसालेभात आणि कढी हे नागपूरच्या कुठल्याही भंडाऱ्यातील ठरलेले पदार्थ आहेत. याच कढी प्रकारातील वैशिष्ट्यपूर्ण अशी ही आंब्याची किंवा कैरीची कढी आहे. उन्हाळ्यात तलखी देणारा असा पदार्थ आहे. चला तर मग जाणून घेऊया कैरीच्या कढीची रेसिपी! साहित्य कैऱ्या…
यावर्षी नागपूरच्या रेशीमबाग येथे भरलेल्या ‘महालक्ष्मी सरस’ या प्रदर्शनात जाण्याचा योग तीन वर्षांनी आला. तीन वर्षांपूर्वी मी अमरावती जिल्ह्यातील अचलपूर येथे ‘दत्तकृपा शेवई केंद्र’ चालवणाऱ्या हिराताई शेकोकार यांच्याकडून पालक शेवया आणि बिटरूट शेवया या प्रदर्शनात विकत घेतल्या होत्या. त्या वेळेस त्यांचे शेवयांमधील हे नाविन्यपूर्ण प्रकार मनाला भावले. त्यानंतर मागील दोन वर्षांपासून त्यांच्याकडून मी दोन-तीनदा या विविध प्रकारच्या शेवया आणि पापडा (जो विदर्भात प्रसिद्ध आहे) हिराताईंकडून ॲानलाइन विकत मागवला. आमचे हे सगळे व्यवहार कुरिअरद्वारे चालायचे. हिराताईंच्या व्हॅाट्सॲप नंबरवर मला हव्या असलेल्या पदार्थांची ॲार्डर टाकल्यावर लगेच चार ते पाच दिवसांत नागपूरला घरपोच हे वाळवणाचे पदार्थ मिळायचे. याशिवाय, बाकी आमच्यात तसे फारसे काही…
रामनवमी विशेष कबीराचे विणतो शेले, कौसल्येचा राम भाबड्या या भक्तांसाठी देव करी काम कौसल्येचा राम बाई, कौसल्येचा राम… श्रीराम! संपूर्ण भारताचं आराध्य आणि लाडकं दैवत! रामनाम घेतले की, सगळी संकटं दूर होतात, तो सर्व परिस्थितीमध्ये आपला पाठीराखा असतो, ही सर्व भारतीयांची श्रीरामाच्या प्रती भावना आहे. तो आपल्यातीलच एक वाटत असल्यामुळे आपण त्याला ‘राम’ अशा एकेरी नावाने संबोधतो. सावळा, नीलवर्णी असा विरळा रंग असलेला, मानवजन्म घेऊनही आपले आगळेपण राखणारा राम! तो आपल्या प्रत्येकाचा हृदयस्थ आहे. वर्षानुवर्षे आपण रामायण ऐकतो, तीच कथा कितीतरी विद्वानांनी आपापल्या रसाळ वाणीत मांडली, पण आजही संपूर्ण कथा माहिती असूनही नव्याने ऐकताना रटाळ वाटत नाही, अशी अवीट गोडीची…
मध्यंतरी माझ्या वाचनात असे आले की, सुप्रसिद्ध चरित्रअभिनेत्री दिवंगत लीला मिश्रा या जेवताना पक्की रसोईतील पदार्थ खात असत. सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यग्र असताना देखील त्या आपला हा नियम मोडत नसत. त्या सेटवर नेहमी आपले जेवण स्वतःच तयार करायच्या… त्याकरिता त्या स्वतःसोबत एक स्टोव्ह, स्वयंपाकाची भांडी आणि शिधा सोबत नेत असत. तुपात किंवा तेलात तळलेले अन्न ‘पवित्र’ मानले जाते आणि त्याला बाहेरील अशुद्धतेचा विटाळ होत नाही, अशी त्यांची धार्मिक धारणा होती. पक्की रसोई लवकर खराब होत नाही, त्यामुळे शूटिंगच्या लांबच्या वेळापत्रकात ते सोयीचे पडायचे. ‘ शोले’ चित्रपटाच्या शूटिंग दरम्यानचा एक प्रसिद्ध किस्सा सांगितला जातो की, रामगडच्या सेटवरही त्यांनी आपले सोवळे पाळले होते.…
हरीश राणा या 31 वर्षीय तरुणाच्या इच्छा मरणाची बातमी ऐकून मन सुन्न झाले. गाझियाबाद येथील हरीश राणा हा त्याच्या आई-वडिलांचा अत्यंत हुशार आणि अभियांत्रिकीचे शिक्षण घेणारा गुणवंत मुलगा. पण नियतीला काहीतरी वेगळेच मान्य होते. अचानक एक दिवस तो राहत्या घराच्या चौथ्या मजल्यावरून कोसळला आणि त्या अपघातामुळे त्याच्या मेंदूला गंभीर इजा झाली. या एका घटनेने संपूर्ण कुटुंबाचे हसते-खेळते आयुष्यच उद्ध्वस्त झाले. गेली 13 वर्षे हा तरुण कोमामध्ये असून, मृत्यूशी झुंज देत होता. “आज ना उद्या आपला मुलगा डोळे उघडेल, तो बरा होईल…” या एकाच आशेवर हरीशच्या आई-वडिलांनी दिल्लीतील ‘एम्स’सारख्या (AIIMS) नामांकित रुग्णालयाचे उंबरठे झिजवले. मात्र, त्यांच्या नशिबात नियतीने कधीच न संपणारा…

