Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
What's Hot
Author: माधवी जोशी माहुलकर
एम.ए.(इंग्रजी) बी.एड. असून सध्या नागपूरमध्ये स्थायिक आहेत. लग्नाआधी चार वर्षे मेडिकल रीप्रेझेन्टेटिव्ह म्हणून अकोला येथे कार्यरत. तीन वर्षे शिक्षिका. वाचन, प्रवास करणे, वेगवेगळ्या विषयांवर लिखाण तसेच चर्चा करणे, गायन याची आवड. गायनात गंधर्व महाविद्यालयाच्या परीक्षा प्रथम श्रेणीसह उत्तीर्ण. पती Additional S.P. Anti corruption Bureau Nagpur येथे कार्यरत.
उन्हाळ्यात अंगाची काहिली करणारा उष्मा सहन करावा लागत असला तरी, या ऋतुची वाट पाहण्यासारखी जर काही एक गोष्ट असेल, तर ती म्हणजे ‘आंबा’! कच्चा आणि पिकलेला, या दोन्ही आंब्यांची माझ्या घरात खूप आतुरतेने वाट पाहिली जाते. बाजारात सर्वात आधी येतो तो म्हणजे कच्चा आंबा म्हणजेच कैरी. कैरीचा मंद सुगंध आणि जिभेवर रेंगाळणारी तिची आंबट-गोड चव. कैरी म्हणजे केवळ एक फळ नाही, तर ती आपल्या भारतीय संस्कृतीतील ऋतुचक्राची एक महत्त्वाची खूण आहे. आपल्याकडे महाराष्ट्रात कैरीचे पन्हे, तक्कू किंवा आंबे डाळ बनवून उन्हाळ्याचे स्वागत केले जाते. यापासून चटण्या, लोणची, सरबते तयार केली जातात. पण तुम्हाला माहीत आहे का की, कैरीचा हा प्रवास…
होळी झाली की, वातावरणामध्ये बदल होतो. दिवसाचे तापमान हळूहळू वाढायला सुरुवात होते. मार्चअखेर त्यामध्ये चांगलीच वाढ झालेली असते. वातावरणातील बदलासारखेच निसर्गामध्ये वसंतोत्सवाची तयारी दिसायला लागते. पळस, पांगीरा, बहावा, गुलमोहर, बोगनवेलीया, करंज, काटेसावर आपापले देखणे रंग लेवून आपल्या हृदयात वसंत फुलवतात… “हृदयी वसंत फुलतांना प्रेमास रंग यावे…” असे तर स्वतःशीच म्हणत नसतील ना? कारण झाडांना भावना असतात, असं लहानपणापासून ऐकिवात आहे, ते काही असू दे पण निसर्ग मात्र आपल्या मुक्त हस्ताने रंगांची उधळण, या उत्सवात करत असतो, हे मात्र खरे आहे. प्रत्येक ऋतुमध्ये निसर्ग आपल्या मनमोहक अदाकारीने मानवाला भुरळ पाडतो. निसर्गातील हे ऋतुचक्र एकमेकांच्या हातात हात घालून अनादी काळापासून असेच सुरू…
दरवर्षी 23 एप्रिल हा दिवस ‘जागतिक पुस्तक दिन’ (World Book Day) म्हणून साजरा केला जातो. हा दिवस म्हणजे केवळ पुस्तकांचे वाचन करण्यासाठी नसून, मानवी संस्कृतीतील ज्ञानाचा वारसा जपणाऱ्या लेखकांचा सन्मान करण्याचा आणि वाचन संस्कृती वाढविण्याचा एक सुंदर सोहळा आहे. पुस्तके… आपले मूक मित्र धावपळीच्या आणि तंत्रज्ञानाच्या युगात आपण अनेकदा शांतता शोधत असतो. पुस्तक हे अशा वेळी एक उत्तम सोबती ठरते. पुस्तकाच्या पानांत दडलेले शब्द आपल्याला कधी इतिहासाच्या सफरीवर नेतात, तर कधी भविष्यातील विज्ञानाची स्वप्ने दाखवतात. जेव्हा आपण एखादे पुस्तक वाचतो, तेव्हा आपण केवळ अक्षरे वाचत नसून एका वेगळ्या विश्वात प्रवेश करतो. ‘वाचाल तर वाचाल’ – हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संदेश…
पूर्वीच्या काळात म्हणजे साधारणपणे 1960 ते 1990च्या काळात लग्नसमारंभांमध्ये पंगतीला वरण भात, मसालेभात, पातळ भाजी, एखादी सुकी भाजी, चटण्या, कोशिंबीरी, कढी किंवा मठ्ठा, पापड-कुरड्या (अख्खे नाही बरं, एकत्र चुरा केलेल्या), गोडाला बुंदीचा लाडू किंवा जिलेबी असा मेन्यू ठरलेला असायचा. त्यामध्ये आचारी सांगेल तसंच व्हायचं. यामध्ये कुठलाही बदल दिसायचा नाही. परंतु आधुनिक जीवनशैली लोक अनुसरत गेले आणि या लग्नातील पंगतींच्या गंमतीजमती मागे पडून सोफेस्टिकेटेड बुफे पद्धत अगदी शहरांपासून ते खेडेगावांपर्यंत अवलंबिली जाऊ लागली. पंगतीला बसायलाही लोक आजकाल गावठीपणा समजतात. यामध्ये मसालेभात अर्थात तोंडलीभाताला विशेष महत्त्व होते. कधी कधी याची जागा बटाटा घ्यायचा. हळूहळू यामध्ये फुलकोबी आणि मटारने आपले विशेष स्थान निर्माण…
पोहे हा प्रकार जवळपास सर्वांच्याच आवडीचा आहे! पोह्यांचे विविध प्रकार महाराष्ट्रात प्रचलित आहेत. अगदी मुलगी पाहण्याचा कार्यक्रम तर कांदे पोह्यांशिवाय अपूर्णच आहे! हे समीकरण ठरलेलेच… बटाटे पोहे, मटकीची उसळ पोहे, चण्याचा रस्सा पोहे, दडपे पोहे, नारळाच्या दुधातील पोहे, कोळाते पोहे, चहा पोहे, दूध पोहे, तिखट-मिठाचे पोहे… याशिवाय गोपाळकाला, दिवाळीतील पोह्यांचा चिवडा असे सर्व पदार्थ जाड किंवा पातळ पोह्यांशिवाय अधुरेच नाही का? अशा या पोह्यांचा आज एक नवीन आणि टेस्टी प्रकार म्हणजेचं पोह्यांचे पराठे कसे करतात ते आपण पाहुयात. साहित्य पोहे – दीड वाटी बटाटे – 3 हिरवी मिरची – 2 कोथिंबीर – चिरलेली मूठभर आलं – एक इंच तुकडा धणे…
आशाताई भोसले निवर्तल्या हे स्वीकारायला, अजूनही मन तयार होत नाहीये. अफाट व्यक्तिमत्व असलेल्या आशाताई एका अढळ दीपस्तंभासारख्या जीवनात आलेल्या अनेक संकटांशी सामना करीत होत्या, तरीही त्यांच्या चेहऱ्यावरचे खळीदार हास्य कधीच कमी झाले नव्हते! अतिशय खट्याळ, खोडकर परंतु प्रसंगी धीरगंभीर, निडर, आक्रमक… जे रुचेल, पटेल तेच करणाऱ्या आशाताई म्हणजे बंडखोर व्यक्तिमत्त्वाची धनीच म्हणायला हवे! याबाबतीत त्यांचे वैयक्तिक असे स्वतःचे निर्णय असतील तर, ते निभावून नेण्याची क्षमता त्यांच्याकडे निश्चितच होती. खरंतर, लता मंगेशकरसारखी दैवी सुरांची नैसर्गिक देणगी असलेली मोठी बहीण लाभलेल्या आशाताईंना नेहमीच दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. परंतु लता दिदींसारख्या तेजस्वी आणि प्रतिभावान गायिकेसमोर तिच्या इतकेच मानसन्मान मिळवून तिच्याबरोबरीने गात राहून…
भारतीय मसाल्यांचा प्रवास ही एक विस्मयकारक गाथा आहे. या मसाल्यांचा उल्लेख 3000 ते 5000 वर्षांपूर्वीच्या ऋग्वेदात आणि अथर्ववेदात आढळतो. त्याकाळी मसाले केवळ चवीसाठी नाही, तर औषध (Medicine) म्हणून वापरले जात. सुश्रुत आणि चरक यासारख्या ऋषींनी मसाल्यांच्या औषधी गुणधर्मांचे दस्तऐवजीकरण केले. मेसोपोटेमिया आणि इजिप्तच्या संस्कृतींशी भारताचा मसाल्यांचा व्यापार ख्रिस्तपूर्व काळापासून सुरू होता. इजिप्तमधील ‘ममी’ जतन करण्यासाठी भारतीय दालचिनी आणि मिरी वापरली जात असे! मध्ययुगात भारतीय मसाल्यांची मागणी युरोपमध्ये प्रचंड वाढली. काळी मिरी इतकी मौल्यवान होती की, तिला ‘काळे सोने’ म्हटले जाई. अनेकदा खंडणी किंवा कर भरण्यासाठी सोन्याऐवजी मिरी वापरली जात असे. मध्यकाळात मसाल्यांचा व्यापार प्रामुख्याने अरब व्यापाऱ्यांच्या हातात होता. ते भारतातून…
उन्हाळा आला की, विदर्भात चिवळीची आणि घोळीची भाजी दिसायला लागते. पुष्कळ लोक घोळीलाच चिवळ समजतात. परंतु विदर्भातील लोक या दोन भाज्यांमधील फरक अचूक ओळखतात. चिवळीची पाने एकदम बारीक आणि आकाराने तांदळाच्या दाण्यांएवढी असतात. याची देठे लालसर गुलाबी आणि एकदम गवताच्या काड्यांसारखी असतात. याची पाने मऊसर आणि पाण्याने भरलेली असल्याने स्पर्शाला एकदम नरम तसेच थंड असतात. त्यामुळे पूर्वी बऱ्याच गावांमध्ये जेव्हा कूलर, एसी नव्हते, त्या काळात उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये एका मोठ्या दुरडीत म्हणजे बांबूच्या टोपलीत ही चिवळ भाजी पसरवून घेत आणि त्यावर नरम सुती कापडाची किंवा साडी / पातळाची अथवा धोतराची चौघडी अंथरवून त्यावर लहान बाळांना ठेवत असत. कारण, ही भाजी मुळातच…
इराण-अमेरिका-इस्रायल युद्धाचा फटका भारताला बसला आहे. अनेक ठिकाणी गॅस सिलिंडरचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा जाणवू लागल्याने लोकांनी इंडक्शन, इलेक्ट्रिक कूकर, मायक्रेवेव्ह तातडीने विकत घेण्यास सुरुवात केली. परंतु आता तर युद्धविराम झाले तर, या इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा पुढे वापर झाला तर बरं, नाहीतर या वस्तू अडगळीत जातील किंवा त्यांचा गरजेनुसार उपयोग केला जाईल, असं वाटतं. कारण, माझ्यासारख्या गृहिणींना अजूनही गॅसवरच स्वयंपाक करायची सवय आहे आणि पोहे, रवा, शेंगदाणे यासारखे पदार्थ भाजण्याकरिता मला गॅसवर कढईत हे पदार्थ भाजायला बरे वाटतात… माझ्या मते शेवटी भारतीय गृहिणींना त्यांच्या किचनमध्ये अनेक पदार्थ वेगवेगळ्या तापमानावर करायची सवय असते; फार क्वचित त्या मायक्रोवेव्ह किंवा ओटीजीचा वापर करताना दिसतात. परंपरागत…
विदर्भात बहुतेक वेळेस सकाळच्या किंवा दुपारच्या नाश्त्याकरिता बनवला जाणारा पोटभरीचा पदार्थ म्हणजे उकडपेंडी (उकरपेंडी)! गव्हाच्या किंवा ज्वारीच्या पिठापासून तयार केला जाणारा चविष्ट असा हा पदार्थ आहे. खूपजण उकडपेंडी ही एकतर फक्त गव्हाच्या पिठाची करतात किंवा फक्त ज्वारीचे पीठ वापरून करतात, परंतु मी मात्र दोन्ही पिठं मिक्स करून उकडपेंडी करते. करायला सोपा आणि फारशी तयारी न करता चटकन होणारा हा पदार्थ आहे. रव्याचा उपमा नाश्त्याचा अविभाज्य अंग झालेला आहे, परंतु कधीतरी थोडाबहुत उपम्यासारखाच परंतु वेगळ्या पिठांचा आणि चवीला वेगळा असा उकडपेंडी हा पदार्थ करायला काहीच हरकत नाही. संध्याकाळी पोळ्या करायचा कंटाळा आला अथवा कुठून थकून-भागून आलात तर ही उकडपेंडी लगेच तयार…

