Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: माधवी जोशी माहुलकर
एम.ए.(इंग्रजी) बी.एड. असून सध्या नागपूरमध्ये स्थायिक आहेत. लग्नाआधी चार वर्षे मेडिकल रीप्रेझेन्टेटिव्ह म्हणून अकोला येथे कार्यरत. तीन वर्षे शिक्षिका. वाचन, प्रवास करणे, वेगवेगळ्या विषयांवर लिखाण तसेच चर्चा करणे, गायन याची आवड. गायनात गंधर्व महाविद्यालयाच्या परीक्षा प्रथम श्रेणीसह उत्तीर्ण. पती Additional S.P. Anti corruption Bureau Nagpur येथे कार्यरत.
भाग – 1 “सौमित्र, अरे रात्रीचे अकरा वाजलेत, तुझी आई परत घरात दिसत नाही रे….” नानासाहेबांच्या त्या हाकेने सौमित्र एकदम आपल्या खोलीतून बाहेर आला. पाठोपाठ मेघापण बाहेर आली. तिच्या चेहऱ्यावर थोडे त्रासिक भाव दिसले, पण त्याकडे दुर्लक्ष करून नानासाहेब आणि सौमित्र सुमतीताईंना शोधायला बाहेर पडले. इतक्या रात्री कुठे गेली असेल? कोणाला विचारणार? तसे करणे बरेही वाटत नव्हते. दोघेही आपापल्या विचारांच्या तंद्रीत चालत चालत घराजवळील गणपतीच्या मंदिराजवळ आले. तिथे त्यांना मंदिराच्या पायरीवर एकट्याच बसलेल्या सुमतीताई दिसल्या… त्यासरशी सौमित्र झपझप चालत त्यांच्याजवळ जाऊन जवळपास ओरडलाच, “आई, काय हे? का अशी त्रास देतेस? न सांगताच कशी काय निघून येऊ शकते तू आणि तेही…
डिसेंबर महिन्याच्या शेवटी आणि जानेवारीत मिळणारे एक नैसर्गिक आंबट-गोड चव असलेले बहुतांश महिला आणि लहान मुलींचे आवडते फळ म्हणजे गावरान बोरं! लहानपणी आमच्या शाळेच्या कंपाऊंडबाहेर एक आजी बोरं, आवळे, चिंचा विकायची. तिच्याकडे ही गावरान ताजी बोरं हिवाळ्यात खूप सुंदर आणि टवटवीत असायची. त्या काळात एक पैसा, दोन खडकू, तीन पैसे, पाच पैसे, दहा पैसे, वीस पैसे अशी नाणी चलनात होती, किरकोळ खरेदी सगळी या नाण्यांवरच चालायची. ती आजी पाच पैशाला पाच आवळे, पाच पैशात चार-पाच चिंचेची बुटकं आणि दहा पैशाला एक छोटंस मापटं भरून बोरं द्यायची. मधल्या सुट्टीत शाळेतल्या सगळ्या मुली आजीजवळ बोरं, आवळे, चिंचा, कवठं घ्यायला झुंबड करायच्या, ती…
सिनेमांमधून मुंबईच्या सण-उत्सवांचे दर्शन होत असते. गोविंदाच्या जल्लोषापासून बाप्पाच्या दर्शनापर्यंत सर्व उत्साहात दाखवलं जातं. विशेष म्हणजे, सिनेमांमध्ये दाखविले जाणारे सण-उत्सव हे कधी सामाजिक एकतेचे रूप म्हणून दाखवले गेले तर, कधी असामाजिक अराजकता या उत्सवांच्या पार्श्वभूमीवर दाखविले गेले. खरंतर, हे सण, उत्सव आपणच निर्माण केलेत सामूहिक एकोप्यासाठी आणि सामूहिक आनंदाकरिता ना? परंतु त्यामधील ही एकत्मतेची भावना मात्र दिवसेंदिवस बीभत्स होत चाललीय, अस वाटत. दोन हात, दोन पाय, एक डोकं अशा सारख्याचं शरीराचा मनुष्य केवळ त्याच्या वैचारीक भेदामुळे एकमेकांशी वैर घेऊन बसला आहे. अग्नी, जल, वायु, पृथ्वी, आकाश ही निसर्गातील पंचतत्व. मनुष्यरुपी चालता बोलता देह जेव्हा निष्प्राण होतो तेव्हा तो पंचतत्वात विलीन…
संजीव कुमार, शबाना आझमी, राकेश रोशन आणि सारीका यांच्या अभिनयाने नटलेला ‘देवता’ नावाचा सिनेमा आठवतोय? त्याच सिनेमातील किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या तलम आवाजातील नितांत सुंदर गाण ‘गुलमोहर गर तुम्हारा नाम होता, मौसम-ए-गुल को हँसाना भी हमारा काम होता…’ आहे न रेशमी वस्त्र ल्यायल्यासारखे गर्भरेशमी गाणे? हे गुलजार या मनस्वी संवेदनशील कवीचे पिवळ्या गुलमोहरासारखे सोनसळी शब्द आहेत आणि त्यावर आपल्या रेशमाच्या जरतारी तारांनी साज चढवला आहे, गुलजार इतक्याच हळव्या आणि नाजूक दिलाचे संगीतकार आर. डी. बर्मन यांनी. काय एकेक शब्द आहेत गुलजार यांचे! एखाद्या झाडाविषयी सुद्धा इतकं समरसून लिहावे? आणि त्यावर कोटीचा संगीताचा साज चढवावा तो आर.डी. यांनीच! तो…
मुंबई, पुणे यासारख्या मोठ्या शहरांमध्ये वॉशिंग मशीन, भांडी धुवायचे मशीन यासोबत आटाचक्की किंवा जिला ‘घरघंटी’ म्हणूनही संबोधले जाते, ते मशीन घरामधे असणे अगदी अनिवार्य झाले आहे. या मशीनला ‘घरघंटी’ का म्हटले जात असावे, याबाबतीत काही माहिती नाही. ही घरघंटी किंवा आटाचक्की मी जेव्हा पुण्यात माझ्या भाच्याकडे पहिल्यांदा पाहिली, तेव्हा मला जरा नवल वाटले, पण ही वस्तू किती उपयोगी आहे, हे नंतर समजले. त्याच्याकडे तर सर्व काम या इलेक्ट्रॉनिक्स गॅजेटनेच होतात. त्याच्या घराची फरशी पण त्याची ‘गंगाबाई’ नावाची फ्लोअर क्लिनर मशीन किंवा ‘रोबोट’ म्हणू हवं तर ती झाडून पुसून स्वच्छ करते. ही गंगाबाई आकाराने लहान आणि गोल असल्याने प्रत्येक रूममध्ये गरागरा…
सध्या चर्चा आहे ती, रणबीर सिंग, अक्षय खन्ना आणि संजय दत्त अभिनीत ‘धुरंधर’ चित्रपटाची! अगदी कंदहार विमान अपहरण ते मुंबईवरील 26/11चा दहशतवादी हल्ला या सर्वांचा पाकिस्तानशी असलेला संबंध दाखवला आहे. या चित्रपटाची आणखी एक खासियत म्हणजे, पूर्वीच्या एव्हरग्रीन गाण्यांची आठवण हा चित्रपट करून देतो. ‘ना तो कारवाँ की तलाश हैं…’ या ओळीचा अतिशय चपखलपणे वापर केला आहे. वास्तवात जवळपास 65 वर्षांपूर्वी झळकलेल्या भारत भूषण आणि मधुबाला अभिनीत ‘बरसात की रात’ (1960) या चित्रपटातील ही कव्वाली आहे. ही कव्वाली तुफान गाजली… तिची जादू आजही कायम आहे. संगीतकार रोशन यांनी या चित्रपटातील कव्वाली संगीतबद्ध केल्या होत्या. त्यानंतर आलेल्या ‘दिल ही तो हैं’…
माझी आजी फार सोवळ्याची नव्हती, परंतु तिचे घरात काही नियम होते. ते नियम तिला कोणी मोडलेले आवडत नसे. जसे उन्हाळ्यात आई आणि आजी जेव्हा घरात उडदा-मुगाचे पापड करायच्या तेव्हा त्या पापडाच्या पीठाचा एक गोळा गोमुत्र टाकुन वेगळा भिजवायचा म्हणजे ते पापड सणावारांना देवाच्या नैवेद्याकरता वापरायचे… दिवाळीत सगळे चिडीचूप झाल्यावर अनारसे शांततेत करायचे म्हणजे येणाऱ्या-जाणाऱ्यांचा, कोणाचा पायरव होऊन ते तळताना हसत नाहीत वगैरे असे तिचे त्या काळानुसार नियम होते. आमचे कुटुंब शाकाहारी असल्यामुळे नॅान-व्हेज आणि अंडे खाणाऱ्या माझ्या वडिलांच्या मित्रांशी ती थोडी फटकून वागे. त्या काळात शाकाहारी कुटुंबातील व्यक्तीने नॅान-व्हेज खाणे म्हणजे त्या घरात क्रांती घडवून आणण्यासारखे होते. चिकन, मटण खाणे…
चहा! माणसांमधील दूरावा मिटविणारा…. परक्याला आपलसं करून घेण्याची किमया या चहानेच साधू शकते. गरीब, श्रीमंत असा भेदभाव न करणारी, सर्वांच्या खिशाला परवडणारा आबालवृद्धांच्या पसंतीस उतरणारा असा हा चहा! अनेक वेळा समस्यांचे निराकारण करणारे पेय म्हणजे चहा! चहाचा पहिलाच घोट सैरभैर धावणारे मन शांत करते आणि समस्येतून मार्ग निघतो… सकाळच्या वेळेस कुटुंबासोबत चहाचे घोट घेत गप्पा करणे म्हणजे आपल्या सर्वांच्या घरातील आवडता ‘टी टाइम’. सकाळचा एक कप वाफाळलेला चहा तर सर्वांकरिता गरजेचाच वाटतो… अनेक घरांमध्ये त्या सकाळच्या तासाभरात दोन वेळेस चहा तर नक्कीचं होतो! सकाळी सकाळी एका बाजुला मंद आचेवर दूध तापवत ठेवून दुसऱ्या शेगडीवर चहाचे आधण ठेवताना गृहिणीचा मूड प्रसन्न…
ये दौलत भी ले लो, ये शोहरत भी ले लो भले छीन लो मुझसे मेरी जवानी मगर मुझको लौटा दो बचपन का सावन वो कागज़ की कश्ती, वो बारिश का पानी आज बऱ्याच दिवसांनी जगजित सिंगची ही गझल कानावर पडली आणि नकळत माझे मन भूतकाळात गेले. चाळ हा तसा सगळ्याच मराठी लोकांच्या जिव्हाळ्याचा विषय! बहुतेक मध्यमवर्गीय लोक याच चाळ संस्कृतीमध्ये वाढलेले… या चाळीच्या असंख्य आठवणी अनेकांच्या मनावर कायमच्या कोरल्या गेल्या आहेत. जे लोक या चाळींमधे राहिलेले आहेत, त्यांचे त्यांच्या शेजाऱ्यांशी अजूनही ऋणानुबंध आहेत. आम्हीसुद्धा अशाच चाळ संस्कृतीमध्ये लहानाचे मोठे झाले आहोत… आमची चाळ अगदी मुंबईतल्या चाळीसारखी खूप मोठी नव्हती, पण…
विदर्भ काही खास कारणांसाठी प्रसिद्ध आहे. खवय्येगिरी करणाऱ्यांना काही रेसिपींनी नवनवीन वैदर्भीय पदार्थांची वेळोवेळी ओळख करून दिलेली आहे. कोल्हापूरचा जसा तांबडा पांढरा रस्सा, सोलापूरची शेंगा चटणी, पुण्याचा मिसळपाव, मुंबईचा वडापाव आणि पावभाजी, कोकणातीस मासे, तांदळाची भाकरी आणि सोलकढी हे लोकांचे जिव्हाळ्याचे विषय आहेत, तसे मिरचीची भाजी, सांबार वडी, पाटवडी रस्सा, डाळकांदा हे आम्हा विदर्भवासीयांचे मनपसंद मेन्यू आहेत. गाव-खेड्यांमधून काही परंपरागत पदार्थांची मेजवानी हमखास वैशिष्ट्यपूर्ण ठरते. सुगीच्या दिवसांत पिके तरारून वर आलेली असतात. त्या काळ्या आईविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तसेच तयार झालेली पिकं आपापसांत वाटून खाण्यासाठी शेतांमधून विविध प्रकारची गावजेवणं घालण्यात येतात. कोणी काही नवस बोललेले असतात, त्याकरिताही अशा जेवणाची मेजवानी…

