Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: तृप्ती देव
मी भिलाई (छत्तीसगड) येथे वास्तव्यास असलेली गृहिणी आणि हौशी लेखिका आहे. मला स्वयंपाक, वाचन आणि लेखनाची विशेष आवड आहे. खाद्यसंस्कृती, सामाजिक विषय, कौटुंबिक नाती आणि दैनंदिन जीवनातील अनुभवांवर मी ब्लॉग लेखन करते. कथाविश्व तसेच इतर विविध व्यासपीठांवर माझे लेख प्रकाशित होत असतात. एखादा विषय मनाला भिडला की, त्यावर सकारात्मक आणि संवेदनशील दृष्टिकोनातून लिहिण्याचा मी प्रयत्न करते. भिलाई वनवासी महिला संघटनेची सदस्य म्हणून सामाजिक कार्यातही माझा सहभाग आहे. शब्दांच्या माध्यमातून सकारात्मक विचार, संस्कार आणि जीवनमूल्ये वाचकांपर्यंत पोहोचवणे हेच माझ्या लेखनाचे उद्दिष्ट आहे.
“अभिनंदन! यंदाच्या राज्यस्तरीय भव्य कथालेखन स्पर्धेसाठी तुमची मुख्य अंतिम फेरीसाठी निवड झाली आहे.” सकाळी सकाळी मोबाइल स्क्रीनवर चमकलेला तो अनपेक्षित संदेश वाचून माझ्या आनंदाला पारावार उरला नाही. चहाचा गरम कप तसाच हातात धरून मी तो संदेश एकामागून एक दोन-तीनदा वाचला. चेहऱ्यावरचं हसू ओसंडून वाहत होतं आणि कित्येक दिवसांची माझी कठोर मेहनत आज फळाला आली, असं मला वाटत होतं. मी मनातून खूप सुखावले, पण हा आनंद फार काळ टिकू शकला नाही, कारण पुढच्याच मिनिटाला कमिटीकडून दुसरा एक सविस्तर मेसेज आला… त्या नव्या संदेशात पुढची अट आणि नियम लिहिले होते. त्यात लिहिलं होतं, “यंदाच्या अंतिम फेरीचा मुख्य विषय – मर्डर मिस्ट्री म्हणजेच…
फ्रीज बिघडला… टीव्ही बंद… वाय-फाय डाऊन… शनिवारी सकाळपासून घरात अघोषित आणीबाणी जाहीर झाल्यासारखं वातावरण होतं. “आता यालाही काहीतरी झालं वाटतं!” – तो कपाळावर हात मारत फ्रीजकडे पाहात होता. सहा वेळा प्लग काढून लावला… टीव्हीचा रिमोटही चालेनासा झाला… नेट कनेक्शन गायब… सगळीकडे जणू “No Signal”. तो चिडून म्हणाला, “हे घर आहे की, संकट केंद्र? दर आठवड्याला काहीतरी बिघडतंय.” त्या आवाजावर ती स्वयंपाकघरातून बाहेर आली. ओढणी खांद्यावर टाकत, केस मानेवरून बाजूला करत तिने विचारलं, “काय झालं?” हेही वाचा – कार्यक्रम कांदेपोह्यांचा! “काय झालं? बघ ना, फ्रीज बंद, टीव्ही बंद, वाय-फाय नाही… म्हणजे मी इथे घरात राहत आहे की, तुटक वस्तूंमध्ये?” ती थोडं हसली.…
A few words of appreciation uplift the other person’s spirits ‘कौतुक’… एक जादुई शब्द तृप्ती देव “अगं सुनबाई, तांदूळ थोडे कमी घे, कालचा भात उरलाय अजून,” सासूबाई म्हणाल्या, “ओट्यावर भांडी आहेत, ती पण लावून ठेव.” “हो आई, लक्षात ठेवलंय…” सुनबाईने सौम्यपणे हसून उत्तर दिलं. ती अजूनही स्वयंपाकघरात फुरसतीनं स्थिरावत नव्हती. चार महिन्यांपूर्वी लग्न झालं होतं. नवीन घर, नवीन माणसं, आणि त्या सगळ्यांच्या सवयी समजून घेताना ती आपल्याच विचारात हरवून जात होती. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत, ती स्वतःसाठी थांबत नसे. स्वयंपाक, आवराआवरी, सासूचं सासऱ्याचं वेळवर जेवण, नवऱ्याची तयारी… सगळं सुरळीतपणे व्हावं म्हणून ती धडपडत राहायची. पण या सगळ्यात एक गोष्ट कायम…
आषाढ मास आला की घरात काहीसं वेगळंच वातावरण असायचं. पंढरपूरचं दर्शन भले नसायचं, पण पंढरपूरचं पावित्र्य आमच्या घराच्या स्वयंपाकघरात दरवळायचं. आषाढी एकादशी म्हणजे आमच्यासाठी उपवास नव्हता, तर ‘चंगळ’ होती. आईच्या हातची चव, आजीच्या शब्दांतली भक्ती आणि संपूर्ण घरात पसरलेला विठोबाचा अनुभव… “उद्या कोण उपवास करणार?” आईचा आवाज यायचा, आणि आम्ही भावंडं एका सुरात म्हणायचो — “मी!” कोणीही नाही म्हणायचं नाही, कारण उपवास म्हणजे फक्त काही न खाणं नव्हतं — ते म्हणजे काही तरी खास खाणं! आई आणि आजीचं सुरेल युती सुरू व्हायची. उपवासाचें थालीपीठ, भाजणी साबुदाणा, शिंगाडा पीठ, राजगिरा, बटाटे, सैंधव मीठ, रताळी… यादी वाढायची, पण थकवा कधी यायचा नाही.…
झाडावरची नैसर्गिक कच्ची केळी जेव्हा अनैसर्गिक पद्धतीने पिकवून बाजारात येतात, तेव्हा गृहिणीच्या मनात एकच प्रश्न असतो… “ही केळी लवकर खराब तर होणार नाहीत ना?” घरी आणलेली ती टपोऱ्या रंगाची केळी रोज माझ्याकडे पाहत असतात आणि मी त्यांच्याकडे! “आज कोण खाणार?” “उद्या खाऊ…” “अजून आहेत की!” असा संवाद घरात सुरू असतो. हेही वाचा – शिळ्या पोळ्यांचा सिंधी जलवा — “सेयाल फुलका” दोन-तीन दिवसांतच केळी आपला रंग बदलायला लागतात. आधीच घाईघाईत पिकवलेली असल्यामुळे घरी आल्यावर ती आणखी भराभर मऊ पडतात आणि मग घरातल्या प्रत्येकाचा एकच सूर… “मला नको केळं!” खरं सांगायचं तर, केळं आजकाल फारसं कुणाचं आवडतं फळ राहिलेलं नाही. मग अशा वेळी…
आजकाल शुगर हा विषय इतका कॉमन झाला आहे की, चार लोक जमले की त्यात एक तरी शुगरचा पेशंट नक्की असतो. मग चर्चा सुरू होते… “हे खायचं नाही…” “ते खाणं बंद…” “गोड तर अजिबात नाही…” “पोळ्या कमी करा…” ऐकून असं वाटतं की आता खायला काहीच उरलं नाही! खरंतर, आजार कोणाला व्हावा किंवा होऊ नये, हे आपल्या हातात नसतं. पण तो झाल्यानंतर स्वतःची काळजी कशी घ्यायची, हे मात्र नक्कीच आपल्या हातात असतं. माझ्या एका मैत्रिणीच्या मिस्टरांना डायबिटिसचं निदान झालं, तेव्हा डॉक्टरांनी एक वेगळाच सल्ला दिला… गव्हाच्या पोळ्या कमी करा किंवा बाद करा आणि आहारात ज्वारी, बाजरी, नाचणीबरोबर जवाची पोळी / भाकरी सुरू…
कधी कधी आयुष्यात काही क्षण असे येतात, जे दिसायला अगदी साधे असतात; पण त्यात दडलेल्या भावना आयुष्यभर मनात घर करून राहतात. “पाहणं” हा शब्द उच्चारला की, घरात एक वेगळंच वातावरण तयार होतं. उत्सुकता… धडधड… संकोच… आनंद… आणि भविष्याची एक हळवी चाहूल… पण या सगळ्यांच्या मध्यभागी कायम असतो एक साधासुधा पदार्थ — कांदेपोहे! त्या दिवशी सुमनच्या घरात सकाळपासूनच लगबग सुरू होती. आई कधी पडदे नीट करत होती, तर कधी टेबलावर ठेवलेली फुलदाणी सरळ करत होती. बाबा पाहुण्यांच्या येण्याची वेळ पुन्हा पुन्हा घड्याळात पाहत होते. स्वयंपाकघरातून फोडणीचा खमंग सुगंध संपूर्ण घरभर दरवळत होता. थोड्याच वेळात दारावरची बेल वाजली. मुलाकडची मंडळी आली. स्वागत…

