Author: नीता चंद्रकांत कुलकर्णी

Avatar photo

एमए असून माझे वय 73 आहे. मी किर्लोस्कर, स्त्री, मनोहर इत्यादी मासिकांत कथा लिहित होते. माझा ‘पूजा’ हा कथासंग्रह सरकारी प्रकाशनातर्फे प्रसिद्ध झालेला आहे. पूर्वी छोट्या ग्रुपमध्ये कथाकथन करत होते. माझे मिस्टर स्टेट बँकेत नोकरीला होते. आता रिटायर आहेत. आम्ही सांताक्रुजला रहात असताना काही वर्षं तेथे कौन्सिलिंग करत होते. पुण्यात आल्यानंतर काही वर्षे मी पौरोहित्य करत होते. सध्या थोडेफार लिखाण सुरू आहे. मोबाइल - 9763631255

आमच्या सोसायटीच्या दारातच चिंचेचे झाड आहे. मोठे होत होत ते आमच्या गॅलरीपर्यंत आले. कोवळी पोपटी मऊशार पानं दिसायला लागली. त्यावरून अलगद हात फिरवावा, असं वाटे… पानं मोठी होत जाताना बघणं फार आनंदाचं वाटत होतं. अगदी गॅलरीतल्या कठड्याजवळच फांद्या होत्या. काही फांद्या आतही आल्या… एके दिवशी बघितलं तर गुलाबी पिवळसर रंगाची फुलं दिसली… “अरे, म्हणजे आता चिंचा येणार!” मी अगदी आतुरतेनी वाट पाहायला लागले… कोवळी नाजूक चिंच दिसली… हळूहळू मोठी होत गेली… निसर्गाचा तो सोहळा बघताना फार मजा येत होती. रोज उत्सुकतेने मी बघत होते. होता होता चिंच चांगलीच मोठी झाली. चिंचेचे आकडे तयार झाले. ते बघून मन मागे गेले… शाळेच्या…

Read More

माईची खूप दिवसांपासून इच्छा होती, एकदा तरी आळंदी, पंढरपूर पायी वारी करावी. तो सोहळा डोळे भरून पाहावा. तीन मुलं, तीन मुली… त्यांची शिक्षणं, लग्न, सणवार… यात वारीचा विचारसुद्धा मनात आणता येत नव्हता. संसाराच्या जबाबदाऱ्या पार पाडता पाडता  माईचं वय झालं होत… आता कुठलं वारीला जायला जमणार? पंढरीची वारी आपल्या नशिबात नाही, असं म्हणून ती गप्प बसायची. घरीच नाम घेत स्वस्थ बसावं झालं… अशी तिने स्वतःच मनाची समजूत काढली होती. वारी जवळ आली होती… त्यामुळे ते दुःख अजूनच जाणवत होते. मुलाला ती म्हणाली, “वारी करायची इच्छा अपुरी राहिली… माझ्या पिंडाला कावळा शिवणार नाही बघ…. दर्भाचा करून लावावा लागेल!” आईचं बोलणं त्याने…

Read More

“विठ्ठलाच्या दर्शनाला जाऊन येते,” ती सुनबाईला म्हणाली. “आज कशाला जाता? एकादशीची फार गर्दी असेल.” “अगं, पंढरपूरला जायचं नशिबात नाही. इथल्या तरी विठ्ठलाला भेटून येते. देऊळ जवळ तर आहे…” सासूबाईंचं म्हणणं ऐकून ती म्हणाली, “बरं, या जाऊन.” “आजे मी येणार…” बारका नातू मागे लागला. “अरे, तुला कुठे गर्दीत सांभाळू?” तस नातवानं भोकांडच पसरलं… “मला पण विठ्ठलाला यायचंय…” तशी सुनबाई म्हणाली, “एवढं रडतंय तर न्या की… हे घ्या अकरा रुपये, ठेवा देवाला. या दोघं दर्शन करून…” पोरगं खूश झालं… खिदळायला लागलं… देवळात ही गर्दी होती! लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पोरगं आनंदात होतं… नाचत होतं…. रांग हळूहळू पुढे सरकत होती. तसं पोरग…

Read More

इंद्रायणीच्या तीरी असलेल्या आळंदीची आज आठवण येत आहे. आळंदीचं माझ्या मनाशी वेगळंच नातं आहे… तिथे गेल्यानंतर रांगेत उभं असताना हरीपाठ म्हणायचा. मग ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीचे दर्शन घ्यायचं. त्यांच्यामागे विठ्ठल रुक्मिणी आहेत. लांबून त्यांना नमस्कार करायचा. मग उजव्या हाताला निघायचं… ज्ञानेश्वर माऊली समाधीसाठी जिथून आत गेले, ती ही जागा आहे…आत जाताना गुरू निवृत्तीनाथांनी त्यांचा हात धरला असेल… सोपान, मुक्ताबाई बाजूला उभ्या असणार… हे सगळं चित्र समोर उभ राहतं… किती विलक्षण आहे हे सगळं… तिथे डोकं टेकवलं की, पोटात गलबलून येत… डोळे भरून येतात… पाय रेंगाळतात… माऊली आत कसे गेले असतील? इतक्या लहान वयात त्यांना हे कसं साधलं असेल? जे काम करायला…

Read More

येई वो विठ्ठले माझे माऊली ये निढळावरी कर ठेवूनी वाट मी पाहे… आलीया गेलीया हाती धाडी निरोप पंढरपुरी आहे माझा मायबाप… विठ्ठलाची ही आरती मला फार आवडते. ‘येई वो…’ किती प्रेमाने, लडिवाळपणे, आपलेपणाने  विठू माऊलीला साद घातलेली आहे… “अरे ये रे…” लांबवर कोणी दिसतंय का हे बघायला आपण कपाळावर (निढळावर) आडवा हात धरतो. डोळे बारीक करून कोणी दिसतंय का, हे आतुरतेने बघायला लागतो. तशीच आम्ही तुझी वाट बघतोय… तू येरे…. आमचा प्रतिपाळ करणारा तो माय आणि बाप दोन्ही आहे. येणाऱ्या जाणाऱ्यांबरोबर त्याला निरोप दिलेला आहे… त्यामुळे त्याच्या वाटेकडे डोळे लावून बसलो आहोत… तो येणार ही मनाशी खात्री  आहे… त्याची वाट…

Read More

सकाळी साडेसहाची वेळ. शांत वातावरणात गाण्याचे सूर कानावर पडले – “जाता पंढरीसी सुख वाटे जीवा…” कुणीतरी रेडिओ लावलेला असावा. इतक्या सकाळी कधी आवाज ऐकू आला नसल्याने तिकडे लक्ष गेले. हळूहळू आवाज बंद झाला. दुसरी दिवशी पण, “सावळ्या विठ्ठला तुझ्या दारी आले…” ऐकू आले. तिसऱ्या दिवशी फिरायला निघाले तेव्हा आवाज कुठून येतो ते समजले… एक पन्नास-पंचावन्न वर्षांच्या बाई रस्ता झाडत होत्या. त्यांनी मोबाईलवर गाणी लावली होती. आपल्याच तंद्रीत त्या गाणी ऐकत काम करत होत्या. त्यांना विचारलं, “ताई तुम्ही नवीन आलात का?” “हो बदलीवर आले आहे, आठ दिवसांच्या… माझी मैत्रीण इथं काम करायची, तिला बरं नाही म्हणून मी येत आहे…” “असं का?…

Read More

वारीचं कुतूहल काही केल्या उलगडत नाही. त्यातल्या प्रत्येक गोष्टीचं कौतुक, अप्रूप वाटत राहतं. मला तर या वारकऱ्यांच्या पांढऱ्या कपड्यांचं पण वाटतं! शर्ट, पायजमा, टोपी पांढरे  शुभ्र… इतके पांढरे कपडे घालून कसे येतात हे लोक? त्याविषयी  विचारावं असं वाटलं. आळंदी पुणे वारीला गेले होते, तेव्हा त्यांच्याशी संवाद साधला. घोळका करून रस्त्याच्या कडेला वारकरी बसले होते. गंमत अशी असते की – “नमस्कार माऊली कुठून आले?” – अशी सहज सुरुवात करून त्यांच्याशी बोलता येते. औपचारिकपणा अजिबात नसतो. तेही अगदी मनमोकळेपणाने गप्पा मारतात. त्यातल्या काही दादांनी जे सांगितलं ते तुम्ही वाचा – “आम्ही हे कपडे फक्त वारीलाच घालतो, इतर वेळेस नाही. घरी गेलो की…

Read More

सखूबरोबर वारीला पंढरपूरला जायची तुळशीबाईची तयारी सुरू झाली होती. पितळेचे तुळशी वृंदावन सखूने लख्ख घासून घेतलं. हळदीकुंकू वाहून तुळशीची पूजा केली. हार घातला. भक्तीभावाने नमस्कार केला… बोला पुंडलिक वरदे हारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय! असा गजर करून सखूने तुळशी वृंदावन डोक्यावर घेतलं आणि म्हणाली, “तुळशीबाई चला निघूया वारीला…” हा सोहळा इतर झाडं कौतुकाने बघत होती. “किती गं भाग्यवान दरवर्षी तुला वारी घडते.” “ये गं बाई जाऊन…” “विठुरायाला, रुक्मिणी मातेला आमचा नमस्कार सांग…” असं म्हणून झाडांनी तिला हात जोडले. “मी कुठली जाते! सखुबाई दिवसभर मला डोक्यावर घेते, म्हणून घडतं बघा. येते हं जाऊन…” असं म्हणत, झाडांचा निरोप…

Read More

श्रीयुत जनार्दन महाराजांच्या दिंडीबरोबर बहिणीने आणि मी आळंदी ते पुणे पायी वारी करायची ठरवली. त्या दिंडीचे नियोजन शैलाताई करत होत्या. त्यांनी सांगितले, “वारीमुळे आळंदीपासूनचा पाच-सहा किलोमीटरचा रस्ता वाहनांसाठी बंद असतो. त्यामुळे आपल्याला  बऱ्यापैकी चालावे लागणार आहे. म्हणून आपण लवकर निघू. तुम्ही बरोबर पहाटे पाच वाजता सारसबागेच्या दारात या.” आदल्या दिवशीच मी बहिणीकडे रहायला गेले. बहिणीचा मुलगा डॉक्टर श्रीपाद पुजारी रात्री दोन वाजता दीनानाथ हॉस्पिटलमधून घरी आला होता. त्याला इमर्जन्सी आली म्हणून जावं लागलं होतं. तेव्हा, तिच्या सुनेने डॉक्टर दिप्तीने आम्हाला सोडायचे ठरले. पहाटे साडेचार  वाजता आम्ही गाडीने निघालो. थोडा पाऊस पडून गेला होता. रस्त्यावर नीरव शांतता होती. रस्ता एकदम सुनसान…

Read More

आषाढ महिना सुरू झाला की, “भेटी लागी जीवा लागलीसे आस…” अशी स्थिती वैष्णवजनांची असते. मन धावू लागते पंढरपूरच्या सावळ्या विठ्ठलच्या दर्शनासाठी… आषाढी एकादशीनिमित्त महाराष्ट्रभरातून दिंड्या निघतात, त्यातील वारकऱ्यांच्या मुखी अखंड ‘ग्यानबा तुकारामा’चा जप आणि विठूरायाची भजनं असतात. या वारीत वर्षानुवर्षे सहभागी होणारे असतात, तसे पहिल्यांदाच वारीचा अनुभव घेणारे असतात. शनिवार, दि. 25 जुलै 2026 रोजी पंढरपुरी चंद्रभागेच्या तीरी वैष्णवांचा मेळा जमेल, त्यानिमित्ताने… लेखनवारी माऊलींची पालखी निघाली डौलात कळस हालला वर बघा गगनात वारीचे गारूड भल्याभल्यांना भुलवते संसार सोडून म्हातारी वारीत पळते पाण्याची घागर डोक्यावर वाहते तेच मस्तकं आज वृंदावन पेलते थंडी वारा पाऊस सारंच सोसते सखी बरोबर आनंदाने फुगडी खेळते…

Read More