Author: माधवी जोशी माहुलकर

Avatar photo

एम.ए.(इंग्रजी) बी.एड. असून सध्या नागपूरमध्ये स्थायिक आहेत. लग्नाआधी चार वर्षे मेडिकल रीप्रेझेन्टेटिव्ह म्हणून अकोला येथे कार्यरत. तीन वर्षे शिक्षिका. वाचन, प्रवास करणे, वेगवेगळ्या विषयांवर लिखाण तसेच चर्चा करणे, गायन याची आवड. गायनात गंधर्व महाविद्यालयाच्या परीक्षा प्रथम श्रेणीसह उत्तीर्ण. पती Additional S.P. Anti corruption Bureau Nagpur येथे कार्यरत.

संजीव कुमार, शबाना आझमी, राकेश रोशन आणि सारीका यांच्या अभिनयाने नटलेला ‘देवता’ नावाचा सिनेमा आठवतोय? त्याच सिनेमातील किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या तलम आवाजातील नितांत सुंदर गाण ‘गुलमोहर गर तुम्हारा नाम होता, मौसम-ए-गुल को हँसाना भी हमारा काम होता…’ आहे न रेशमी वस्त्र ल्यायल्यासारखे गर्भरेशमी गाणे? हे गुलजार या मनस्वी संवेदनशील कवीचे पिवळ्या गुलमोहरासारखे सोनसळी शब्द आहेत आणि त्यावर आपल्या रेशमाच्या जरतारी तारांनी साज चढवला आहे, गुलजार इतक्याच हळव्या आणि नाजूक दिलाचे संगीतकार आर. डी. बर्मन यांनी. काय एकेक शब्द आहेत गुलजार यांचे! एखाद्या झाडाविषयी सुद्धा इतकं समरसून लिहावे? आणि त्यावर कोटीचा संगीताचा साज चढवावा तो आर.डी. यांनीच! तो…

Read More

मुंबई, पुणे यासारख्या मोठ्या शहरांमध्ये वॉशिंग मशीन, भांडी धुवायचे मशीन यासोबत आटाचक्की किंवा जिला ‘घरघंटी’ म्हणूनही संबोधले जाते, ते मशीन घरामधे असणे अगदी अनिवार्य झाले आहे. या मशीनला ‘घरघंटी’ का म्हटले जात असावे, याबाबतीत काही माहिती नाही. ही घरघंटी किंवा आटाचक्की मी जेव्हा पुण्यात माझ्या भाच्याकडे पहिल्यांदा पाहिली, तेव्हा मला जरा नवल वाटले, पण ही वस्तू किती उपयोगी आहे, हे नंतर समजले. त्याच्याकडे तर सर्व काम या इलेक्ट्रॉनिक्स गॅजेटनेच होतात. त्याच्या घराची फरशी पण त्याची ‘गंगाबाई’ नावाची फ्लोअर क्लिनर मशीन किंवा ‘रोबोट’ म्हणू हवं तर ती झाडून पुसून स्वच्छ करते. ही गंगाबाई आकाराने लहान आणि गोल असल्याने प्रत्येक रूममध्ये गरागरा…

Read More

सध्या चर्चा आहे ती, रणबीर सिंग, अक्षय खन्ना आणि संजय दत्त अभिनीत ‘धुरंधर’ चित्रपटाची! अगदी कंदहार विमान अपहरण ते मुंबईवरील 26/11चा दहशतवादी हल्ला या सर्वांचा पाकिस्तानशी असलेला संबंध दाखवला आहे. या चित्रपटाची आणखी एक खासियत म्हणजे, पूर्वीच्या एव्हरग्रीन गाण्यांची आठवण हा चित्रपट करून देतो. ‘ना तो कारवाँ की तलाश हैं…’ या ओळीचा अतिशय चपखलपणे वापर केला आहे. वास्तवात जवळपास 65 वर्षांपूर्वी झळकलेल्या भारत भूषण आणि मधुबाला अभिनीत ‘बरसात की रात’ (1960) या चित्रपटातील ही कव्वाली आहे. ही कव्वाली तुफान गाजली… तिची जादू आजही कायम आहे. संगीतकार रोशन यांनी या चित्रपटातील कव्वाली संगीतबद्ध केल्या होत्या. त्यानंतर आलेल्या ‘दिल ही तो हैं’…

Read More

माझी आजी फार सोवळ्याची नव्हती, परंतु तिचे घरात काही नियम होते. ते नियम तिला कोणी मोडलेले आवडत नसे. जसे उन्हाळ्यात आई आणि आजी जेव्हा घरात उडदा-मुगाचे पापड करायच्या तेव्हा त्या पापडाच्या पीठाचा एक गोळा गोमुत्र टाकुन वेगळा भिजवायचा म्हणजे ते पापड सणावारांना देवाच्या नैवेद्याकरता वापरायचे… दिवाळीत सगळे चिडीचूप झाल्यावर अनारसे शांततेत करायचे म्हणजे येणाऱ्या-जाणाऱ्यांचा, कोणाचा पायरव होऊन ते तळताना हसत नाहीत वगैरे असे तिचे त्या काळानुसार नियम होते. आमचे कुटुंब शाकाहारी असल्यामुळे नॅान-व्हेज आणि अंडे खाणाऱ्या माझ्या वडिलांच्या मित्रांशी ती थोडी फटकून वागे. त्या काळात शाकाहारी कुटुंबातील व्यक्तीने नॅान-व्हेज खाणे म्हणजे त्या घरात क्रांती घडवून आणण्यासारखे होते. चिकन, मटण खाणे…

Read More

चहा! माणसांमधील दूरावा मिटविणारा…. परक्याला आपलसं करून घेण्याची किमया या चहानेच साधू शकते. गरीब, श्रीमंत असा भेदभाव न करणारी, सर्वांच्या खिशाला परवडणारा आबालवृद्धांच्या पसंतीस उतरणारा असा हा चहा! अनेक वेळा समस्यांचे निराकारण करणारे पेय म्हणजे चहा! चहाचा पहिलाच घोट सैरभैर धावणारे मन शांत करते आणि समस्येतून मार्ग निघतो… सकाळच्या वेळेस कुटुंबासोबत चहाचे घोट घेत गप्पा करणे म्हणजे आपल्या सर्वांच्या घरातील आवडता ‘टी टाइम’. सकाळचा एक कप वाफाळलेला चहा तर सर्वांकरिता गरजेचाच वाटतो… अनेक घरांमध्ये त्या सकाळच्या तासाभरात दोन वेळेस चहा तर नक्कीचं होतो! सकाळी सकाळी एका बाजुला मंद आचेवर दूध तापवत ठेवून दुसऱ्या शेगडीवर चहाचे आधण ठेवताना गृहिणीचा मूड प्रसन्न…

Read More

ये दौलत भी ले लो, ये शोहरत भी ले लो भले छीन लो मुझसे मेरी जवानी मगर मुझको लौटा दो बचपन का सावन वो कागज़ की कश्ती, वो बारिश का पानी आज बऱ्याच दिवसांनी जगजित सिंगची ही गझल कानावर पडली आणि नकळत माझे मन भूतकाळात गेले. चाळ हा तसा सगळ्याच मराठी लोकांच्या जिव्हाळ्याचा विषय! बहुतेक मध्यमवर्गीय लोक याच चाळ संस्कृतीमध्ये वाढलेले… या चाळीच्या असंख्य आठवणी अनेकांच्या मनावर कायमच्या कोरल्या गेल्या आहेत. जे लोक या चाळींमधे राहिलेले आहेत, त्यांचे त्यांच्या शेजाऱ्यांशी अजूनही ऋणानुबंध आहेत. आम्हीसुद्धा अशाच चाळ संस्कृतीमध्ये लहानाचे मोठे झाले आहोत… आमची चाळ अगदी मुंबईतल्या चाळीसारखी खूप मोठी नव्हती, पण…

Read More

विदर्भ काही खास कारणांसाठी प्रसिद्ध आहे. खवय्येगिरी करणाऱ्यांना काही रेसिपींनी नवनवीन वैदर्भीय पदार्थांची वेळोवेळी ओळख करून दिलेली आहे. कोल्हापूरचा जसा तांबडा पांढरा रस्सा, सोलापूरची शेंगा चटणी, पुण्याचा मिसळपाव, मुंबईचा वडापाव आणि पावभाजी, कोकणातीस मासे, तांदळाची भाकरी आणि सोलकढी हे लोकांचे जिव्हाळ्याचे विषय आहेत, तसे मिरचीची भाजी, सांबार वडी, पाटवडी रस्सा, डाळकांदा हे आम्हा विदर्भवासीयांचे मनपसंद मेन्यू आहेत. गाव-खेड्यांमधून काही परंपरागत पदार्थांची मेजवानी हमखास वैशिष्ट्यपूर्ण ठरते. सुगीच्या दिवसांत पिके तरारून वर आलेली असतात. त्या काळ्या आईविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तसेच तयार झालेली पिकं आपापसांत वाटून खाण्यासाठी शेतांमधून विविध प्रकारची गावजेवणं घालण्यात येतात. कोणी काही नवस बोललेले असतात, त्याकरिताही अशा जेवणाची मेजवानी…

Read More

दिवाळी, दसरा, होळी अशा प्रत्येक महत्त्वाच्या सणावारांना हमखास आईची आठवण येते. कोणालाच ऐकू न येणारी ही अज्ञात स्पंदनं हृदयात कुठेतरी जाणीव करून देत असतात… कधीच न विझणारी तिच्या विचारांची ज्योत मनात असते अन् ती जीवनातील अनेक चढ-उताराच्या प्रसंगी तुम्हाला मार्गदर्शन करत असते… जणू तुम्हाला सांगत असते की, “घाबरू नकोस! तू एकटी नाहीस… कारण माझा अंश तुझ्यात आहे! मी तुझ्यामध्येच आहे!” आई प्रत्येक क्षणाला आठवते… विशेषतः सणावारांच्या दिवसांत तर जास्तच! जीवनात रंग भरायला तीच शिकवते! तिने दिलेली एकूण एक शिकवण लहानपणापासून मनात अधोरेखित होते… रूचकर स्वयंपाक कसा करायचा? कोणता पदार्थ कुठल्या सणाला करायचा? घरातील सर्वांच्या आवडी-निवडी कशा लक्षात ठेवायच्या? कुळाचारांचे पूजाविधी…

Read More

दिवाळीला मी दरवर्षी घरीच शेव तयार करते आणि ती तयार करत असताना मला नेहमी ग्रामीण भागातील आठवडी बाजार आठवतो. नोकरीच्या निमित्ताने बहुतांश लोकांचे ग्रामीण भागात वास्तव्य असतं, त्याप्रमाणे आमचेही विदर्भातील चंद्रपूर, अहेरी, वर्धा जिल्ह्यांतील देवळी, आर्वी, वर्धा शहर, अमरावती, नागपूर अशा वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये फिरस्ती झालेली आहे. त्यामुळे अहेरी, आर्वी, देवळी या छोट्या गावांत भरणारे आठवडी बाजार कायम लक्षात राहिले आहेत. या आठवडी बाजारांमध्ये शेतकरी त्यांच्या शेतातील ताज्या भाज्यांसोबत प्रत्येक ऋतुनुसार शेतीत उपलब्ध असणारी पपई, पेरू, बोर यासारखी फळे विक्रीसाठी ठेवतात. हा आठवडी बाजार म्हणजे प्रत्येक गावातील लोकांचे आकर्षण बिंदू आहे. या बाजारात भाजीपाला आणि फळे तर विक्रीस असतात, परंतु सोबत…

Read More

भाग – 1 मी कुंती, तसे माझे जन्मनाव पृथा… माझे पिता शूरसेन महाराजांनी दिलेले! पण त्यांच्या आतेभावाला कुंतीभोज महाराजांना मला दत्तक दिल्यामुळे त्यांच्या नावावरून मला ‘कुंती’ हे नामानिधान प्राप्त झाले. राजघराण्यात जन्म होऊनही आणि दत्तक राजकन्या असूनही मला त्या राजवैभवात कधी जास्त रमावेसे नाही वाटले… लहानपणापासूनच मी थोडी विरक्त स्वभावाची होते. जेव्हा बाबांनी आपले वचन पूर्ण करण्यासाठी मला लहानपणीच कुंतीभोज महाराजांना दत्तक दिले तेव्हापासूनच माझ्या बालसुलभ मनामध्ये अनेक प्रश्न उभे रहिले होते, दत्तक म्हणजे काय असतं? हे समजण्याचे माझे वयही नव्हते. ज्या आईच्या उदरात मी नऊ महिने वाढले, तिने काहीच प्रतिकार केला नसेल का बाबांना? का तिच्या मातृत्वाला, ममतेला न…

Read More