Author: प्रणाली मंगेश महाशब्दे

प्रणाली महाशब्दे

संचालिका सोहन वाचन कट्टा, लेखिका, निवेदिका, Counsellor, Signature Analyst, Music Therapist, Flower Remedies Therapist, NLP practitioner, 25 वर्षांपासून शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत. Online-offline स्वरूपात अनेक ठिकाणी मुले, पालक, शिक्षक यांच्यासाठी वेगवेगळ्या विषयांवर कार्यशाळा घेतल्या आहेत. मोबाइल – 9730020494

मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण… संत तुकाराम महाराज यांच्या या अभंगात त्यांनी किती छान विचार मांडले आहेत. मन हे असे कोडे आहे की, दिसत तर नाही, पण सगळे काही सामावून घेते, सगळे काही घडवून आणते. मन प्रसन्न असेल तर कामं इतक्या चांगल्या पद्धतीने होतात की आश्चर्य वाटावे! सकाळी जर छान गाणे ऐकले की, मन दिवसभर छान, प्रसन्न रहाते. समोर छानसे छोटेसे फूल जरी बिघतले तरी ते खूश होते. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये समाधान मानणारे, आनंद मानणारे हे मन कठीण परिस्थिती पण तेवढ्याच ताकदीने हाताळते. मन खंबीर असले की, कोणत्याच प्रकारे कोलमडून न जाता आपण उत्तर शोधू शकतो. तर असे…

Read More

अधिक महिना सुरू होण्यापूर्वीच कितीतरी दिवस आधीच त्याचे वेध लागले. सगळीकडे जावयाला काय काय देता येईल याबद्द्ल वेगवेगळ्या कल्पना समोर येत आहेत… आणि अशातच मन थोडे विचारात रमले. मुलगी जन्माला येतेच मुळी लक्ष्मीच्या पावलांनी. लक्ष्मी जन्माला आली असेच म्हटले जाते. (नारायण जन्माला आला असे नाही म्हणत.) तेवढ्याच लाडात तिला वाढवले जाते. वयात आल्यावर लग्न होते आणि या लक्ष्मीला नारायण मिळतो. लग्नाला येणारा प्रत्येकजण, मग तो कोणाच्याही बाजूचा असो, “किती छान लक्ष्मी-नारायणाचा जोडा आहे” असेच म्हणत असतो. सासरी तर तिचे गृहलक्ष्मी म्हणूनच स्वागत केले जाते. लक्ष्मी (गृहलक्ष्मी)- नारायणाचा प्रवास सुरू होतो. वेगवेगळे सण, कार्यक्रम, सोहळे दोघांचे एकमेकांच्या साथीने सुरू होतात. पहिल्या…

Read More

आज सकाळपासून नानांची गडबड सुरू होती. मुलगा, सुन यांना लेकींना फोन लावून द्यायला सांगितलं होतं. त्यामुळे कधी बोलणे होते, यासाठी उगीचच घरात चकरा मारत होते. तसे तर नाना म्हणजे वय वर्षे 90 पार केलेले आणि आई 80 पार केलेल्या, पण उत्साहात सगळ्यांना मागे टाकणारे. छान भरलेला संसार दोन मुली आणि दोन मुले… सगळ्यांची लग्न झालेली. दोघी मुलींना एक मुलगी आणि एक मुलगा. त्यांची पण लग्न झालेली. मुलांच्या मुलांचे लग्न अजून व्हायचे होते. तर, असा हा नानांचा छान गोतावळा. बाकी बहीण-भाऊ तर नानांचे मस्तच आहेत. काही आहेत काही नाहीत… वयोमानाप्रमाणे दिसत नाही, ऐकू येत नाही. पण सगळे मस्त! तर असो. अशा…

Read More

दोन-तीन दिवसांपासून अनुचे काहीतरी बिनसले होते. समजत नव्हते काय, पण तिच्या एकूण वागण्यावरून अजयच्या ते लक्षात येत होते. थोड्यावेळाने अजयने चहा दिला तरी, तिचे चिडचिड करणे चालूच होते. ऑफिसमध्ये काही झाले असेल, असे समजून अजय शांतपणे त्याचे काम करीत बसला. तेवढ्यात दार वाजल्यामुळे अजय दार उघडायला गेला. त्यावेळेस पण “कोणाला आत्ताच यायचे होते? कोण आले काय माहीत?” असे म्हणत अनू आत निघून गेली… अचानक आलेल्या आईला बघून अजयला खूप आनंद झाला. हातातील बॅग घेत त्याने आईचे हसून स्वागत केले. आईला बसायला सांगून तो पाणी आणायला आत गेला. बाकी घरात एकदम शांतता वाटली. त्यामुळे आईला अनू घरी नसेल, असे वाटले. कारण…

Read More

“चला उद्या रविवार छान आरामात उठणार आणि निवांत आवरणार… रोजची गडबड असतेच उद्याची सुटी मात्र एन्जॉय करणार… असेही उद्या बरेच दिवसांनंतर घरात कोणीच नाही, त्यामुळे काय केव्हाही उठा केव्हाही आवरा! असा विचार मनात करून मी झोपण्याच्या तयारीला लागले. खरंच उद्या मी घरी एकटीच होते. नवरा, पोरं, सासू-सासरे त्यांच्या त्यांच्या काही कारणांमुळे आज संध्याकाळीच घराबाहेर गेले, जे एकदम सोमवारी सकाळनंतर घरी येणार होते. मी तर मनात केव्हाच हुश्श केलं होतं! सगळ्यांना बाय करून आता आरामात बसले होते. कोणी बोलायला नाही की, कोणी काही म्हणायला नाही… “चला, मॅडम बरेच दिवसांत निवांत बसून पुस्तक पण वाचलेले नाही आज जरा बघू एखादे पुस्तक घेऊ…

Read More

रंगूनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा गुंतूनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा… नुकतेच हे गीत ऐकण्यात आले. पूर्ण गाण्यातील या दोन ओळी जास्त मनाला भावल्या. पण लगेचच विचार आला की, माणूस तर समाजप्रिय प्राणी आहे. मग हे कसे शक्य आहे? माणूस जन्माला आल्याबरोबर लगेचच काही नाती त्याच्या भोवती जमा होतात. यामध्ये आई, बाबा, आजी, आजोबा, काका, काकू, मामा, मामी, मावशी, आत्या, ताई, दादा यांचा पहिला नंबर लागतो. या सर्वांबरोबर जमवून घेईपर्यंतच ‘मित्र’ आपल्या आयुष्यात येतो आणि सगळे जगच बदलून जाते. त्यानंतर समोर येतात ते आपले शिक्षक! अनेक चांगले-वाईट अनुभव घेऊन आपण पुढे पुढे चालत असतो. यानंतर कायदेशीर नाती आयुष्यात येतात……

Read More

“ए आई कसला मस्त वास येतोय गं भाजीचा!” कालच माहेरी आलेली मीना स्वयंपाकघरात आली. “ए आई, किती दिवस झाले  गं तुझ्या हातची बटाट्याची भाजी खाऊन, चल मला तर लगेचच वाढ.” लेक माहेरी आलेली आहे. तिच्या आवडीच्या भाज्या, गोडाचे जेवण सगळे करण्यात धन्यता मानणारी आई लेकीला थोडे थांबवत म्हणाली, “अगं पण बटाटा शिजू तर दे. तोपर्यंत पोळी करते, मग निवांत सगळे ताट वाढून देते.”. मीना, ”काय गं आई, मग असा वास येऊच द्यायचा नाही ना!” “बरं चल, तोपर्यंत आपण गप्पा तर मारू शकतो; जेणेकरून भाजी होईपर्यंत तुला थांबता येईल.” आई म्हणाली. “अगं आई, हे भाज्यांचे वास कसले भन्नाट असतात गं. म्हणजे…

Read More

रांगोळी म्हटलं की, आजकाल मोठमोठ्या रस्त्यावर काढल्या जाणाऱ्या रांगोळ्या डोळ्यांसमोर येतात. पायघड्यांसारख्या रांगोळ्या घातल्या जातात. त्याचबरोबर धान्याच्या, फुलांच्या रांगोळ्या पण मोठ्या प्रमाणात काढल्या जातात. याच मोठ्या रांगोळ्यांचे छोटे स्वरूप सणावाराला घराच्या दारासमोर दिसते. पण खरंच रांगोळी आणि आपले खूप जवळचे नाते आहे, हे रांगोळी काढताना लक्षात येते. सकाळी उठले की, पहिले सडा-रांगोळी हे महत्त्वाचे काम. मला असे वाटते की, कालची रांगोळी आधी गोळा करायची (खराट्याने नाही बरं का. त्याचे फरशीवर ओरखडे उमटतात.) नंतर व्यवस्थित भरून घ्यायची. त्यानंतर सडा टाकायचा. त्यावर सुबक अशी रांगोळी काढायची. ती पण ठिपक्यांची. यामागे असे तर नसेल ना? कालचे सर्व “रात गयी बात गयी” याप्रमाणे विसरून…

Read More

पाठवणी हा शब्द जरी ऐकला तरी किती गोष्टी डोळ्यांसमोर येतात. प्रत्येक स्त्रीवर्गाबरोबरच पुरुषवर्गाचा सुद्धा हळवा कोपरा असतो हा शब्द. बायकोच्या पाठवणीच्या वेळेस तिच्या माहेरच्यांना काय वाटले असेल, हे वडील म्हणून मुलीच्या पाठवणीच्या वेळेस जाणवते. एकूणच काय तर, नको असलेला पण हवाहवासा असा हा शब्द! एक छोटा जीव जन्माला येतो. घरातील सगळे जण त्या छोट्या जीवाचे कोडकौतुक करण्यात दंग होतात. हळूहळू हट्ट करून, रडून, कट्टी-बट्टी करून, दिवस-महिने-वर्ष उलटतात. सगळ्यांना एकमेकांची सवय लागलेली असते. अशा या 20-22 वर्षांच्या (आता 30 किंवा त्यापेक्षा जास्त पण) सहवासानंतर त्या छोट्या जीवाला म्हणजेच मुलीला दुसऱ्याच्या हातात सोपवायचे. किती कठीण आहे ना हे! त्यानंतर ती मुलगी परत…

Read More