Author: प्रणाली मंगेश महाशब्दे

प्रणाली महाशब्दे

संचालिका सोहन वाचन कट्टा, लेखिका, निवेदिका, Counsellor, Signature Analyst, Music Therapist, Flower Remedies Therapist, NLP practitioner, 25 वर्षांपासून शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत. Online-offline स्वरूपात अनेक ठिकाणी मुले, पालक, शिक्षक यांच्यासाठी वेगवेगळ्या विषयांवर कार्यशाळा घेतल्या आहेत. मोबाइल – 9730020494

एकदा एका सुंदर राज्यात “मननगर” नावाचे एक छोटेसे गाव होते. त्या गावात आरव नावाचा एक मुलगा राहात होता. आरव हुशार होता, मेहनती होता; पण हल्ली तो सतत उदास असायचा. एके दिवशी तो आपल्या आजोबांना म्हणाला, “आजोबा, माझ्याकडे सगळं आहे, तरी मला आनंदी का वाटत नाही?” आजोबा हसले आणि म्हणाले, “असे जर आहे तर तुला तुझ्या शरीरात राहणाऱ्या चार खास मित्रांची ओळख करून घ्यायची आहे का?” आरवने उत्सुकतेने विचारले, “माझ्या शरीरात मित्र?” “हो! त्यांची नावे आहेत — डोपामिन, सेरोटोनिन, ऑक्सिटोसिन आणि एंडॉर्फिन.” हेही वाचा – हे बंध रेशमाचे ठेवू जपून जीवा… तेवढ्यात आरवच्या कल्पनेत एक अद्भुत राज्य उभे राहिले. पहिला मित्र –…

Read More

घरात तीन पिढ्या आनंदाने नांदत आहेत. छोटे-मोठे खटके तर सगळीकडेच उडत असतात, त्याला हे अपवाद कसे असतील? तर, असे हे एकत्र कुटुंब आजी-आजोबा त्यांची दोन मुलं, त्यांची पुन्हा दोन दोन मुलं असे 10 जण एका छताखाली गुण्यागोविंदाने रहातात. (काय स्वप्नातील गोष्ट वाटते ना? पण खरंच असे कुटुंब आहे) 10 जणांचे 10 स्वभाव म्हणजे 10 वेगवेगळे मणी, पण तरी सगळे एका धाग्यात बांधले गेले आहेत. कोणाला कधी कोणाची गोष्ट पटते तर, कधी पटत नाही. पण सगळ्यांनीच रात्री जेवण एकत्र करायचे असे ठरविले आहे. त्यामुळे दिवसभराच्या सगळ्या कुरबुरी झोपण्यापूर्वीच संपवायच्या! ज्यामुळे शांत झोप लागते, असे त्यांचे म्हणणे. आता मुलांमुळे थोडे वेळेचे गणित…

Read More

चातुर्मास सुरू झाला आणि आजीची गडबड सुरू झाली. सणांसाठीचे नियोजन तिला वेगळे करावे लागत नव्हते. ते तर तिच्यासाठी सरावाचे होते. तिच्या बरोबरीने तिची सून सगळे करत होती. आजीच्या हाताखाली छान तयार झाली होती ती सुद्धा. आतातर दोन वर्षांपूर्वी नातवाचे लग्न झाल्यामुळे नातसून प्रिया पण होती. मागचे वर्ष तर सगळे पहिले सण या नावाखाली साजरे झाले. आताची परिस्थिती मात्र वेगळी होती. आजी आणि सासू यांची गडबड बघून प्रियाला समजतच नव्हते की, काय करावे? वेळ नाही, सुटी नाही ही कारणं कशी सांगावी तेच समजत नव्हते! त्यातच, मुळात का वेळ वाया घालवतात या दोघी? असेपण वाटत होते. आजीला प्रियाच्या चेहऱ्यावरचा गोंधळ लक्षात आला.…

Read More

बऱ्याच दिवसांनी सुमन आणि दीपाची बाजारात भेट झाली. तसं बघितले तर, दोघीजणी लहानपणापासून मैत्रिणी. दोघींची लग्न झाली एकाच गावात. पण रोज भेटणाऱ्या मैत्रिणी नंतर धावपळीत कधीतरी भेटू लागल्या. तसं तर, दोघींची एकत्र कुटुंबात लग्न झालेली, पण सुमनच्या घरी थोडे अध्यात्मिक वातावरण होते; तसे दीपाकडे नव्हते. दोघींच्या घरी सासू-सासरे आहेत. दोघींचे यजमान पण चांगल्या ठिकाणी नोकरीला… तसेच या दोघीजणी पण चांगल्या ठिकाणी नोकरीला आहेत. दोघींची मुलं पण चांगल्या शाळेत शिकत आहेत. एकूण काय तर सगळं कसं छान चाललंय… आज बाजारात भेटल्यावर दोघींना खूप आनंद झाला आणि जवळच असलेल्या हॉटेलमध्ये जाऊन चहा प्यायचा, असे ठरले… त्यानिमित्ताने गप्पा होतील ना! दोघींच्या गप्पा सुरू…

Read More

आठ-दहा दिवसांपासून लेकाची आणि सुनेची होणारी चिडचिड बघत होते. दोघेही चांगल्या कंपनीत कामाला होते. चांगल्या पोस्टमुळे चांगला पगार, पण त्याबरोबरच येणारा कामाचा ताण, यामुळे त्यांची चिडचिड ही नेहमीचीच झाली होती. प्रोजेक्ट्स, डेडलाइन्स, टीमवर्क आणि इतर अनेक गोष्टी, या दोघांमुळे आम्हाला पण रोजच्याच झाल्या होत्या. पण तरी यावेळेस मात्र ते जरा जास्तच जाणवत होते… आज सकाळी तर त्या चिडचिडीचा कडेलोट झाला, असे म्हणायला हरकत नाही. ‘आता जॉबच सोडणार’ यावर बोलणे सुरू होते दोघांचे. झाले! आता हा काय पर्याय आहे का? तरी पण दोघांचे ऐकून घेतले. सुनेच्या कामाच्या ठिकाणी नवी टीम आलेली असल्यामुळे त्या टीमला शिकवता-शिकवता वेळ जातो… आणि परिणामी कामं बाजूला…

Read More

काय म्हणता! कॅडबरीची जाहिरात पुन्हा समोर आली… अरे बापरे, या जाहिरातीने तर बाकीचे गोड पदार्थच मागे टाकले (कुछ मीठा हो जाए)… हो ना! पण काय करणार बाहेर पटकन उपलब्ध असणारे आणि परवडणारे तेच आहे… पण फक्त असे वाटते, यापेक्षा चांगले आणि सर्वच दृष्टीने परवडणारे अनेक पदार्थ आपल्याकडे आहेत. सगळीकडे एकादशीची तयारी, चातुर्मासाची तयारी सुरू झाली आहे. सगळीकडे आनंदाचे वातावरण असते. या दिवसांमध्ये वेगवेगळ्या सणांची धामधूम असते. त्यानिमित्त वेगवेगळे पदार्थ आपण करतो. खरंतर, असे म्हटले जाते की, ‘आषाढ तळावा, श्रावण भाजावा, भाद्रपद उकडावा’ यानुसार तर घरांमध्ये आता पदार्थांची रेलचेलच सुरू होते. हेही वाचा – लक्ष्मी आणि गृहलक्ष्मी आषाढ म्हटले की, कापण्या, पुऱ्या,…

Read More

“तुज सगुण म्हणो की निर्गुण रे…” हे गाणे ऐकले आणि विचार सुरू झाले की, खरंच सगुण आणि निर्गुण म्हणजे काय? कोण महत्त्वाचे? त्यांची उपासना कशी करायची? एकदम लक्षात आले की, याचे उत्तर ‘श्रीमद्भगवद्गीता’मध्ये मिळेल. त्यानुसार चवथ्या अध्यायात ज्ञानयोगाबद्दल सांगितले म्हणजेच सुरूवात करून दिली, त्यानंतर पुढील अध्यायांमध्ये सगुण साकार आणि निर्गुण निराकार उपासनेचे महत्त्व सांगून त्याचे फळ काय याबद्दल पण सांगितले. हे ऐकल्यावर मात्र दोन्हीमध्ये नक्की श्रेष्ठ कोण? असा प्रश्न अर्जुनाला पडला. त्याचे उत्तर पण बाराव्या अध्यायात दिले. त्यामध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात की, सोन्याचा पर्वत असो किंवा सोन्याचा तुकडा दोघांचाही कस सारखाच! म्हणजेच खंड हा प्रारंभ तर अखंड हा शेवट. अनेक…

Read More

‘श्रीमद्भगवद्गीता’ म्हणजे असे पुस्तक ज्यामध्ये आपल्याला आपल्या प्रश्नांची उत्तरे मिळतात. असे म्हटले तर ते चुकीचे नाही. याचा विचार करताना सर्वप्रथम आपण कृष्ण-अर्जुन आहोत हे पक्के समजले पाहिजे. आपली अर्जुनासारखी अवस्था नेहमीच होते. म्हणजेच… ”सीदन्ति मन गात्राणि मुखं च परिशुष्यति| वेपथुश्र्च शरीरे मे रोमहर्षश्र्च जायते ||1.29|| मग काय शोधत बसतो, कोणी कृष्ण येईल का? मला मदत करेल का? असे कोणी आपल्याला भेटले तर, सर्वांत महत्वाचे असते ते संवाद साधला जाणे. समोरच्याचे ऐकणे. कसाही प्रश्न असला तरी, शांतपणे प्रश्नावर आपले मत देणे. त्याला त्याचे उत्तर शोधायला मदत करणे, एकमेकांच्या भावनांचा आदर करणे अशा अनेक गोष्टी प्रामुख्याने पुढे येतात. एवढे होऊन सुद्धा कृष्णचे…

Read More

दोन मैत्रिणींमधला संवाद… पहिली – अगं फोटो बघितला का? आज किनाई माझ्या लेकाने मला पोळी करायला मदत केली. दुसरी – हो का? वा मस्तच की! पहिली – हो ना, अगं कणीक पण त्यानेच भिजवली आणि पोळी पण लाटली. दुसरी – अरे वा… चला छान सुरुवात झाली म्हणजे… 0000 काही दिवसांनी… दुसरी – काय गं काय चालले आहे? पहिली – स्वयंपाकाशिवाय काय करणार दुसरे? दिवसभर नुसते खायलाच करावे लागते. दुसरी – अगं पण मुलं करतात ना तुला मदत? पहिली – कशाचे काय? सुरुवातीला केली मदत, आता काही नाही! त्यादिवशी तर मुलाने सांगितले की, ‘आता मला पोळी करता येते, परत नाही करणार!’…

Read More

हस्तस्य भूषणं दानं सत्यं कण्ठस्य भूषणम् । श्रोत्रस्य भूषणं शास्त्रं भूषणै: किं प्रयोजनम्।। दान करणे हे हाताचे भूषण आहे. सत्य बोलणे हे कंठाचे भूषण आहे. शास्त्र ऐकणे हे कानाचे भूषण आहे. मग इतर अलंकारांची काय गरज आहे? खरंच दानाचे किती महत्त्व आहे! माणूस हा परोपकारी वृत्तीचा आहे. त्याला नेहमीच दुसऱ्याच्या कामी / उपयोगी येण्याची सवय असते. अगदी लहानपणापासूनच मुलांना आपल्या जवळील वस्तू वाटून घेण्याची सवय लावली जाते. कळत नकळत आपण अनेक गोष्टी दुसऱ्यांना देत असतो. त्यामध्ये काही वेळेस ती गोष्ट परत मिळावी, अशी इच्छा असते तर, काही वेळेस असे काही वाटत नाही. समोरच्या व्यक्तीला एखादी गोष्ट हवी आहे आणि त्यासाठी…

Read More