Author: डॉ. अस्मिता हवालदार

Avatar photo

डॉ. अस्मिता हवालदार नायर दंत रुग्णालयातून BDS. टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून MA Indology; Diploma in Archeology Mumbai University. 27 वर्षे इंदूरमध्ये प्रॅक्टिस करते. विविध मासिक, दिवाळी अंकातून कथा आणि लेख प्रसिद्ध होतात. ‘विजयनगर हृदयस्थ साम्राज्य’, ‘विजयनगरचे शिल्प काव्य’, ‘विजयनगरचे लेपाक्षी मंदिर’ ही पुस्तके आणि ‘आव्हानांचे लावून अत्तर’ हा कथासंग्रह प्रकाशित.

Whiplash (व्हिप्लॅश) हा सिनेमा शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या नात्यावर असला तरी, आपल्या आजपर्यंतच्या या नात्याच्या संकल्पनांना धक्का देणारा आहे. शिक्षकी पेशाभोवती परोपकार, सद्गुण आणि सत्शीलतेच वलय असतं, अपेक्षा असते. गुरू – शिष्याच्या नात्याला आपल्या संस्कृतीत परमोच्च स्थान आहे, गुरूला देव मानले आहे. जाझ ड्रमर अँड्र्यू नेमान या शिष्याची आणि टेरेंस फ्लेचर या गुरूची कथा आहे. नेमान 19 वर्षांचा मुलगा असून त्याने एका सुप्रसिद्ध संगीत विद्यालयात प्रवेश घेतला आहे. फ्लेचर हा तिथला सर्वात नावाजलेला प्रतिष्ठित शिक्षक. वाद्यवृंदाचे संयोजन करणारा कंडक्टर आहे. फ्लेचर एकदा अँड्र्यूला ड्रम वाजवताना ऐकतो आणि न आवडल्याने नाराजी दर्शवतो, पण पुन्हा त्याला आपल्या वाद्यवृंदात घेतो. मुख्य ड्रमर कार्ल…

Read More

श्री. ना. पेंडसे यांच्या गारंबीचा बापू, तुंबाडचे खोत, यशोदा वगैरे गाजलेल्या कादंबऱ्या आहेत. कोकणच्या पार्श्वभूमीवर या कादंबऱ्या असल्याने त्यांची प्रादेशिक कादंबरीकार अशी ओळख आहे. रथचक्र ही कादंबरी सुद्धा लोकप्रिय झाली. यावर आधारित टीव्हीवर मालिकाही आली होती. कादंबरी वाचायला घेतल्यावर मुखपृष्ठ लक्ष वेधून घेते. निळ्या रंगांच्या छटात जमिनीत अर्ध्याहून अधिक रुतलेले रथाचे चाक दाखवले आहे. रुतलेल्या रथचक्राशी संबंधित दोन कथा आठवतात – एक रामायणातल्या कैकयीची आणि दुसरी कर्णाची. यापैकी एकाचे हे चाक आहे का? की संसाराच्या रथाचे चक्र आहे? संसाराचा रथ दोन चाकांचा असतो – एक पतीचे आणि दुसरे पत्नीचे… की हे कालचक्र आहे? ‘चक्रवत् परिवर्तन्ते दुःखानि च सुखानि च।’ ही…

Read More

नंदा खरे लिखित ‘उद्या’ ही भविष्यकाळाचा वेध घेणारी विलक्षण कादंबरी आहे. सध्या कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आल्यापासून जगभरात अनिश्चिततेच वातावरण आहे – नोकऱ्यांचे स्वरूप काय असेल? नोकर्‍या मिळतील की नाही? इथपासून हुकूमशाही येईल… इथपर्यंत. माणसाचे अस्तित्व धोक्यात आहे, ही भीती आहेच. भविष्यात मानव जातीपुढे काय वाढून ठेवले आहे? हे दाखवणाऱ्या या कादंबरीला 2020मध्ये साहित्य अकादमीचा प्रतिष्ठित पुरस्कार मिळाला आहे. कादंबरी Dystopia (अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतला समाज) प्रकारात येते. ‘सबव्हर्जन सर्व्हेलंस प्रोग्राम्स’ हे शब्द पहिल्याच पानावर, खरं तर अर्ध्या पानावर वाचायला मिळतात आणि आपल्या भुवया उंचावतात. ‘समजायला कठीण वाटतंय’, असं वाटत असताना ‘तरी कळून घ्यायलाच हवं’ हा विचार मनात येतो. अनेक इंग्रजी वाक्ये…

Read More

Rental family… हा जापनीज सिनेमा एका वेगळ्याच विषयावर आहे. भाडोत्री नातलग किंवा गरजेनुसार व्यक्ती मिळवून देणारी संस्था असते. थोडक्यात, नात्याचा आभास निर्माण करून देणारी एजन्सी. अभिनयाची आवड असलेले पण यशस्वी नसलेले, पैशांची गरज असलेले नटनटी या संस्थेसाठी काम करतात. फिलीप नावाचा मध्यमवयीन अमेरिकन नागरिक जपानमध्ये राहात असतो. काही जाहिराती आणि मालिकांमध्ये काम केल्यावर आता बरेच दिवस या परक्या देशात त्याच्याकडे काम नाही. तो एजन्सीसाठी ‘टोकन व्हाइट गाय’ असतो आणि एजन्सी त्याला पहिले काम देते, एका लेस्बियन मुलीच्या नवऱ्याची भूमिका करण्याचा. तिचा खोटा खोटा विवाह सोहळा करण्याचे काम संस्था करत असते. यानंतर वेगवेगळ्या भूमिका त्याला मिळतात. वडील नसलेल्या मुलीचा पिता, सुप्रसिद्ध…

Read More

डॉ. अमित महाजन यांच्या ‘मेधावी : एक स्वैर अनुवाद’ या पुस्तकात जगभरातल्या प्रसिद्ध कथालेखकांच्या निवडक कथांचा स्वैर अनुवाद आहे. वेगवेगळ्या लेखकांच्या वीस कथा यात समाविष्ट केल्या आहेत. अल्बर्ट कामू, गाय मोपासा, ऑस्कर वाइल्ड,चेखोव वगैरे लघुकथेवर आपली अमीट छाप सोडणाऱ्या लेखकांच्या सशक्त कथा देशोदेशीची खबर घेऊन येतात. रशियन, ब्रिटीश, फ्रेंच आणि भारतीय लेखकांच्या 19व्या आणि 20व्या शतकातल्या गाजलेल्या कथा माणसाच्या अंतरंगाचे रहस्य उलगडून सांगायचा प्रयत्न करतात. लघुकथेत कमी शब्दांत आपले विचार मांडायचे असतात तेही रंजकतेने! फापटपसारा करून चालत नाही. कथा विसविशीत असून चालत नाही. नेमका अर्थ पोहोचवणे आणि साहित्यिक मूल्य जपणे, ही तारेवरची कसरत करावी लागते. लेखकाने निवडलेल्या सर्वच कथा अप्रतिम…

Read More

युवल नोआ हरारी लिखित आणि वासंती फडके अनुवादित ‘सेपियन – मानवाचा संक्षिप्त इतिहास’ हे पुस्तक हिब्रू भाषामध्ये 2011 साली प्रसिद्ध झाले आणि इंग्लिशमध्ये 2014 साली, तेव्हापासून जगभर गाजते आहे. आतापर्यंत 65 भाषांत अनुवादित झाले आहे. 498 पानांचे हे पुस्तक अक्षरशः आपल्याला खिळवून ठेवते. हे पुस्तक जसे मला मैत्रिणीने आग्रहाने वाचायला लावले, तसे कोणाच्या मित्राने, भावाने, भावाच्या मित्राने, बहिणीने, ट्रेनमधल्या मित्राने, ग्रंथपालाने, पुस्तकमैत्र समूहाने एकमेकांना सांगितले. समाजमाध्यमांतून यावर लिहिले गेले. असे म्हणतात, जेव्हा ‘गीता रहस्य’ प्रसिद्ध झाले होते, तेव्हा आपल्याकडे लोक ते हातात घेऊन रस्त्यातून मिरवत असत! असेच इम्प्रेशन मारण्यासाठी सुद्धा ‘सेपियन – मानवाचा संक्षिप्त इतिहास’ पुस्तक लोकांनी विकत घेतले आणि…

Read More

लेखक श्री ना पेंडसे यांचे ‘तुंबाडचे खोत’ म्हणजे, दोन खंडांत, चार भागांत 1358 पानांत लिहिलेली ही तुंबाड गावाच्या खोतांच्या घराण्याची कथा आहे. जगबुडी नदीकाठी नांदलेल्या एका घराण्याच्या चार पिढ्यांची द्विखंडात्मक दीर्घकथा असे सुरुवातीला लिहिले आहे. सन 1725 ते 1942 पर्यंतचा घराण्याच्या तुंबाड आणि लिंबाड या दोन वंशशाखांचा इतिहास आहे. सव्वाशे वर्षांचा कालखंड. मलपृष्ठावर लिहिले आहे की, तुंबाडच्या खोतांच्या कुलवृत्तांचा ही बखर एखाद्या रम्याद्भूत आणि उग्रभीषण कहाणीसारखी आहे. लेखकाने कोकणाच्या संस्कृतीवर सत्य वाटावी, इतकी काल्पनिक सृष्टी निर्माण केली आहे. अशी संस्कृती प्रत्यक्षात नांदली असावी, या व्यक्ती खऱ्या असाव्यात याबद्दल शंका उरत नाही, इतकी ही कादंबरी सशक्त आहे. त्यावेळी भारतात राजकीय उलाढाली…

Read More

डॉ. गो. बं. देगलूरकर यांच्या ‘मंदिर कसे पहावे’ या पुस्तकाची प्रथम आवृत्ती 2019मध्ये प्रसिद्ध झाली आणि आजवर पाच आवृत्या निघाल्या आहेत. भारताच्या इतिहासात रस असल्यामुळे हे पुस्तक प्रसिद्ध झाल्यावर मी लगेच ते वाचलं होतं. आजही अधूनमधून वाचत राहते. मंदिर कसे पहावे? हा कसला विषय! मंदिरात जायचं, गाभार्‍यातल्या देवाचं दर्शन घ्यायचं, प्रसाद घ्यायचा की झालं… असं वाटलं असेल. पण मंदिर पहाणे, हे अभ्यास करण्यासारखे आहे. कसे? ते हे पुस्तक वाचून समजते. मंदिर का पहावे, याचे उत्तरही मिळते. अगदी लहानसं 94 पानांचं हे पुस्तक असलं तरी, एका बैठकीत वाचून होत नाही! कारण प्रत्येक पान विचार करायला उद्युक्त करते. इतकेच नाही तर या…

Read More

लेखक रमेश इंगळे उत्रादकर यांची ‘निशाणी डावा अंगठा’ ही कादंबरी 2005 साली प्रसिद्ध झाली आणि मी त्यानंतर चार वर्षांनी वाचली. यावरचा सिनेमा सुद्धा पाहिला. प्रौढ साक्षरता अभियान हा या उपहासात्माक कादंबरीचा विषय आहे. शिक्षकांनी प्रौढ अशिक्षित लोकांना शिकवायचे, असा आदेश शासनाकडून आला होता. प्रौढ अशिक्षितांना शोधायचे आणि त्यांचे वर्ग भरवायचे. एकतर वयाने मोठे हे लोक कशासाठी शिकतील? रोजचे कामकाज, कौटुंबिक जबाबदाऱ्या पूर्ण करून उरलेल्या वेळात का शिकतील? त्यामुळे त्यांच्या राहणीमानात फरक पडणार नसल्याने मध्यमवर्गीय, निम्न मध्यमवर्गीय आणि आर्थिकदृष्ट्‍या कमकुवत लोक का शिकतील? याचा विचार न करता निरक्षरता निर्मूलन उपक्रम राबवला होता आणि अर्थात, जे सरकारी योजनांचे होते तेच झाले होते.…

Read More

विष्णूभट गोडसे वरसईकर  यांचे ‘माझा प्रवास’ (संशोधित आवृत्ती- चिंतामणी विनायक वैद्य (1907)) हे मराठीतले पहिले प्रवास वर्णन आहे. 1857च्या स्वातंत्र्य युद्धाच्या वेळी लेखक विष्णूभट गोडसे वरसईकर उत्तर भारतात फिरत होते. त्यांनी ‘याचि देही याचि डोळा’ अनुभवलेले स्वातंत्र्य समर लिहून ठेवले आहे. त्यांचा हेतू मात्र इतिहासाची नोंद करण्याचा नव्हता. त्यांनी डायरी लिहिली आहे, असे म्हणायला हरकत नाही. या पुस्तकाला इतिहासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्व आहे, कारण हे बखरीसारखे लिहिले आहे. परदेशी प्रवाशांनी भारतात आल्यावर अशा प्रकारच्या बखरी लिहून ठेवल्या, ज्या आज ऐतिहासिकदृष्ट्‍या मौलिक पुरावा आहेत. उदा. मॅगस्थेनीसचे इंडिका. पुस्तकाच्या प्रस्तावनेत चि. वि. वैद्य म्हणतात की, 1857च्या युद्धाबद्दल (‘बंड’ असे लिहिले आहे, पण…

Read More