Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: डॉ. अस्मिता हवालदार
डॉ. अस्मिता हवालदार नायर दंत रुग्णालयातून BDS. टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून MA Indology; Diploma in Archeology Mumbai University. 27 वर्षे इंदूरमध्ये प्रॅक्टिस करते. विविध मासिक, दिवाळी अंकातून कथा आणि लेख प्रसिद्ध होतात. ‘विजयनगर हृदयस्थ साम्राज्य’, ‘विजयनगरचे शिल्प काव्य’, ‘विजयनगरचे लेपाक्षी मंदिर’ ही पुस्तके आणि ‘आव्हानांचे लावून अत्तर’ हा कथासंग्रह प्रकाशित.
लेखक गो. नी. दांडेकर यांची ‘पडघवली’ कादंबरी खूप गाजलेली आहे. यावर आधारित एक हिंदी टीव्ही मालिका आली होती. कोकणातल्या एका गावावर लिहिलेले हे कथानक आहे. पडघवली गाव कसे वसले? मूळ पुरुष कोण? इथपासून कथानक सुरू होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात समुद्रीचाचे किनारपट्टीवरच्या गावातल्या लोकांना त्रास द्यायचे, लूटमार करायचे, बायका-मुली उचलून न्यायचे. त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी महाराजांनी शेणवीला खरमरीत पत्र लिहिले. त्याच्याकडे असलेल्या केशवभटाने युक्तीने त्यांना पकडले. केशव भटांनी इनामात एक घोंगडी जमीन मागितली. घोंगडी पूर्ण उसवून दोऱ्याचा बिंडा केला.एक खुंट जमिनीत रोवून त्याला दौऱ्याचे एक टोक बांधले आणि दुसरे हातात घेऊन चालत उलगडत गेला. जेवढी जमीन पायाखालून गेली तेवढी घेतली. तेच…
वि. स. खांडेकर यांची ‘ययाती’ ही गाजलेली कादंबरी आजही वाचकांची आवडती आहे. महाभारतातल्या ययातीच्या उपाख्यानावर आधारित ही कादंबरी असली तरी लेखकाने साहित्यिक स्वातंत्र्य घेतले आहे. जसे महाभारतातली आणि कालिदासाची शकुंतला वेगळी तसेच या कादंबरीतील देवयानी वेगळी! कादंबरीच्या मलपृष्ठावर असलेले विवेचन पुस्तकाचा सारांश आहे. लेखक म्हणतात, ‘ही कादंबरी ययातीची कामकथा, देवयानीची संसारकथा, शर्मिष्ठेची प्रेमकथा आणि कचाची भक्तीगाथा आहे, हे लक्षात घेऊन वाचकांनी वाचावी.’ ही एक सूडकथा सुद्धा आहे. देवयानीचा अपमान शर्मिष्ठा करते तिच्यावर सूड घेण्यासाठी ती ययातीशी विवाह करून तिला दासी करते आणि ययाती त्याच्या आईने बालमैत्रिणीचा खून केल्याबद्दल तिला शिक्षा करण्यासाठी ब्राह्मणकन्येशी प्रतिलोम विवाह करतो. त्याने क्षत्रिय कन्येशी विवाह करावा,…
द. मा. मिरासदारांनी अनेक विनोदी कथा लिहिल्या आहेत. त्यांनी ललित लेखन, वगनाट्य, नाटिका, चित्रपटाचे संवाद या सर्व साहित्य प्रकारात विपुल लेखन केलं आहे. व्यंकूची शिकवणी ही त्यांची गाजलेली कथा. माझ्या बापाची पेंड, भुताचा जन्म आणि हुबेहूब हे विनोदी कथासंग्रह मला आवडतात. त्यांच्या कथा पुन्हा पुन्हा वाचाव्याशा वाटतात. माणसाच्या रूपाचे वर्णन करताना ते गमतीदार शब्द वापरतात. उदा. नानाचे नाक नम्रपणे खाली वाकलेले असून टोकाशी फुगा आला होता. ते नम्रपणे हा शब्द असा वापरतात की, वाचताना प्रत्येक वेळी हसू येते. समाजातल्या कुरीती, अंधविश्वास आणि माणसाच्या स्वभावातले दोष यावर मार्मिक टिप्पणी करत ते कथा लिहितात. कोणीतरी आपली चूक दाखवून टपली मारावी तसेच! ‘भुताचा…
‘बापलेकी’ (संपादन – पद्मजा फाटक, दीपा गोवारीकर, विद्या विद्वांस) हे पुस्तक प्रसिद्ध वडील आणि त्यांच्या मुली (प्रसिद्ध अप्रसिद्ध) यांनी लिहिलेल्या लेखांचं संकलन आहे. सुरुवातीचा भाग लेकींनी वडिलांवर लिहिलेल्या लेखांचा, मधला भाग वडिलांनी मुलींबद्दल लिहिलेल्या लेखांचा आणि शेवटी संकलक लेखिकांचे आकलन, मानसोपचार तज्ज्ञांचे मत असे तीन भाग आहेत. बापलेक म्हटल्यावर ‘गाई पाण्यावर काय म्हणुनी आल्या?’ ही कवी बींची कविता आठवते आणि संदीप खरेंची दमलेल्या बापाची कहाणी सुद्धा! बापलेकीचे नाते काही वर्षांपूर्वी फारसे विचारात घेतले गेलेले नसल्याने हा विषय औत्सुक्यपूर्ण, अनोखा होता त्यात विजय तेंडुलकर – प्रिया तेंडुलकर, विद्याधर पुंडलिक – मोनिका गजेंद्रगडकर, वसंत गोवारीकर, अनंत अंतरकर, गौरी देशपांडे, जाई निंबकर, अरुणा…
राम नगरकर आपल्याला माहीत आहेत… ते विनोदी नट म्हणून आणि नंतर त्यांनी केलेल्या ‘रामनगरी’ या एकपात्री प्रयोगांमुळे! ‘विच्छा माझी पुरी करा’मधली त्यांची भूमिका अनेकांना आठवत असेल. ‘रामनगरी’ हे त्यांचे आत्मचरित्र आपल्याला हसायला लावते… कधी गालातल्या गालात तर कधी खळखळून… त्यांनी ग्रामीण, रांगड्या बोलीभाषेत लिहिलेले त्यांचे अनुभव हसवतात आणि विचार करायला भाग पाडतातही. सुरुवातच त्यांनी हजाम आणि हजामती या शब्दांवर कोटी करून केलेली आहे. काही न करणाऱ्याला किंवा कुठलेही काम न येणाऱ्याला ‘हजाम आहेस’ असं का म्हणतात? ड्रायव्हर आहेस, कुंभार, लोहार आहेस, असं का म्हणत नाहीत? असं ते विचारतात. त्यांच्या आजोबांनी नाभिक शब्दाची सांगितलेली उत्पत्ती सांगून फुशारक्या मरणाऱ्याला गप्प केलं होतं……
‘मास्तरांची सावली’ हे सुप्रसिद्ध कवी नारायण सुर्वे यांच्या पत्नी कृष्णाबाई नारायण सुर्वे यांनी लिहिलेले आत्मचरित्र आहे. शब्दांकन नेहा सावंत यांनी केलं आहे. लहानसंच पुस्तक असलं तरी फार मोठं आयुष्य त्यातून दिसत राहत. अनेक आव्हानांच्या, विपरीत परिस्थितीच्या नजरेला नजर भिडवून अर्थपूर्ण जगलेले हे सहजीवन आहे. कृष्णाबाई एकदा मास्तरांना म्हणजे नारायण सुर्वेंना म्हणाल्या होत्या, ‘तुमच्या सावलीच्या पाठी मी कायम उभी राहीन.’ त्या सावलीसारखी साथ देणाऱ्या सहचारिणी आहेतच, पण अंधारात सावली गडप झाल्यावरसुद्धा पाठ न सोडणारी, खंबीर उभी राहणारी ही पत्नी कृष्णाबाई आहे! कृष्णाबाई अशिक्षित असल्यामुळे नेहा सावंत यांनी शब्दांकन करून दिले आहे. इतके सहज की, कृष्णाबाई स्वत:च सांगत आहेत, असे वाटते. त्यांचे…
माधवी देसाई यांचं ‘नाच ग घुमा’ हे आत्मचरित्र मी साधारण पंधरा-वीस वर्षांपूर्वी वाचलं होतं, तेव्हा ते मला आवडलं नव्हतं. नंतर अनेकदा या पुस्तकाचा उल्लेख कोणी न कोणी करताना ऐकला, वाचला. फेसबुकवर या पुस्तकाबद्दल सकारात्मक पोस्ट वाचली होती. ‘पुस्तक किती छान आहे’ अशा आशयाच्या पोस्ट अन् खाली काही कमेंट्स होत्या, ज्यात रणजीत देसाई यांच्याबद्दल फारच वाईट मत व्यक्त केलं होतं. पुस्तक का आवडलं असेल? याबद्दल मला कुतूहल वाटू लागलं म्हणून पुन्हा एकदा वाचायला घेतलं… माधवी देसाईंच्या या आत्मचरित्राच्या चौदा आवृत्ती निघाल्या आहेत. निश्चितच वाचकांचं हे आवडतं पुस्तक आहे. माधवी देसाई या भालजी पेंढारकरांची कन्या आणि स्वामीकार रणजीत देसाई यांच्या पत्नी! त्या…
लेखक ह. मो. मराठे यांची ओळख म्हणजे, कथाकार, कादंबरीकार, पत्रकार, संपादक… त्यांच्या ‘निष्पर्ण वृक्षाखाली भर दुपारी’ यासारख्या कादंबऱ्या गाजल्या आहेत. अनेक नियतकालिकांचे संपादन त्यांनी केले आहे. ‘बालकाण्ड’मध्ये लेखकाने स्वतःची कहाणी सांगितली आहे. पुस्तक वाचताना मनाला वेदना होतात. पुस्तकाच्या मुखपृष्ठावर तुळतुळीत गोटा, शेंडी असलेल्या चेहऱ्यावर हरवलेले भाव असलेल्या लहान मुलाचे चित्र आहे. कोकणस्थी भाषेचा प्रयोग या पुस्तकात आहे. ही भाषा बोली भाषा आहे, मराठीची एक बोली भाषा… फारशी माहीत नसलेली! लेखक हनु (हनुमंत) सात-आठ वर्षांचा असतानाचा काळ यात आहे. या वयाच्या मुलाच्या नजरेतून कहाणी सांगितली आहे. त्याला इतक्या लहान वयात द्वेष, मत्सर, राग, करुणा या भावना असू शकत नाहीत किंवा त्याच्यावर…
‘लिटिल वुमेन’ या कादंबरीवर सिनेमा आहे आणि हिंदीत ‘कच्ची धूप’ नावाची मालिकाही होती. या कादंबरीचे भाषांतर प्रसिद्ध कवियत्री शांता शेळके यांनी समर्पक शब्दांत केलं आहे. लेखिका लुइसा मे अल्कॉट हिचे हे आत्मवृत्त नसले तरी, एकीच्या आयुष्यावरून प्रेरणा घेऊन लिहिलेले कथानक आहे. चार बहिणी आणि त्यांची आई यांच्यावर असलेले कथानक, अमेरिकेत महायुद्धाच्या वेळी घडते. वडील युद्धावर गेले आहेत आणि आई मिसेस मार्च, या चार मुलींना वाढवते. ती जगभरातली आईसारखीच असते. मुलांना संस्कार देते, संगोपन करते, मुलींना मूल्य शिकवते. ही कादंबरी किशोर वयात वाचायला हवी. मी शाळेत असताना वाचली होती आणि तेव्हा अतिशय आवडली होती. परीकथेसारख्या या कथेत प्रत्येक मुलीने स्वतचे प्रतिबिंब…
गो. नी. दांडेकर यांच्या ‘पवनाकांठचा धोंडी’ या कादंबरीची पहिली आवृत्ती 1955 साली प्रसिद्ध झाली आणि 2022मध्ये चौदावी आवृत्ती आली, यावरून तिची लोकप्रियता लक्षात येते. वाचकांच्या हृदयाला स्पर्शून गेलेली ही कादंबरी आहे. मुखपृष्ठावर मुंडासे बांधलेल्या, पिळदार मिशा अन् करारी चेहरा असलेल्या पुरुषाचा चेहरा आहे. चेहऱ्यावरच्या सुरकुत्या त्याचे वय आणि अनुभव दोन्ही सांगत आहेत. हिरव्या रंगातल्या मुखपृष्ठावर बैलही दाखवला आहे. बैल, ती व्यक्ती आणि हिरवा निसर्ग यातून चित्रकार कथानक सांगायला सुरुवात करतो आहे, असे वाटते. पुस्तक वाचून झाल्यावर खात्री पटते, धोंडी असाच दिसत असावा. मलपृष्ठावर धोंडी हवालदार या तुंगी गडाच्या रक्षकाच्या वंशजाची ही कहाणी आहे, असे लिहिले आहे. ‘दोन पिढ्यांतला संघर्ष’ हे…

