Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: डॉ. अस्मिता हवालदार
डॉ. अस्मिता हवालदार नायर दंत रुग्णालयातून BDS. टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून MA Indology; Diploma in Archeology Mumbai University. 27 वर्षे इंदूरमध्ये प्रॅक्टिस करते. विविध मासिक, दिवाळी अंकातून कथा आणि लेख प्रसिद्ध होतात. ‘विजयनगर हृदयस्थ साम्राज्य’, ‘विजयनगरचे शिल्प काव्य’, ‘विजयनगरचे लेपाक्षी मंदिर’ ही पुस्तके आणि ‘आव्हानांचे लावून अत्तर’ हा कथासंग्रह प्रकाशित.
डॉ. गो. बं. देगलूरकर यांच्या ‘मंदिर कसे पहावे’ या पुस्तकाची प्रथम आवृत्ती 2019मध्ये प्रसिद्ध झाली आणि आजवर पाच आवृत्या निघाल्या आहेत. भारताच्या इतिहासात रस असल्यामुळे हे पुस्तक प्रसिद्ध झाल्यावर मी लगेच ते वाचलं होतं. आजही अधूनमधून वाचत राहते. मंदिर कसे पहावे? हा कसला विषय! मंदिरात जायचं, गाभार्यातल्या देवाचं दर्शन घ्यायचं, प्रसाद घ्यायचा की झालं… असं वाटलं असेल. पण मंदिर पहाणे, हे अभ्यास करण्यासारखे आहे. कसे? ते हे पुस्तक वाचून समजते. मंदिर का पहावे, याचे उत्तरही मिळते. अगदी लहानसं 94 पानांचं हे पुस्तक असलं तरी, एका बैठकीत वाचून होत नाही! कारण प्रत्येक पान विचार करायला उद्युक्त करते. इतकेच नाही तर या…
लेखक रमेश इंगळे उत्रादकर यांची ‘निशाणी डावा अंगठा’ ही कादंबरी 2005 साली प्रसिद्ध झाली आणि मी त्यानंतर चार वर्षांनी वाचली. यावरचा सिनेमा सुद्धा पाहिला. प्रौढ साक्षरता अभियान हा या उपहासात्माक कादंबरीचा विषय आहे. शिक्षकांनी प्रौढ अशिक्षित लोकांना शिकवायचे, असा आदेश शासनाकडून आला होता. प्रौढ अशिक्षितांना शोधायचे आणि त्यांचे वर्ग भरवायचे. एकतर वयाने मोठे हे लोक कशासाठी शिकतील? रोजचे कामकाज, कौटुंबिक जबाबदाऱ्या पूर्ण करून उरलेल्या वेळात का शिकतील? त्यामुळे त्यांच्या राहणीमानात फरक पडणार नसल्याने मध्यमवर्गीय, निम्न मध्यमवर्गीय आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत लोक का शिकतील? याचा विचार न करता निरक्षरता निर्मूलन उपक्रम राबवला होता आणि अर्थात, जे सरकारी योजनांचे होते तेच झाले होते.…
विष्णूभट गोडसे वरसईकर यांचे ‘माझा प्रवास’ (संशोधित आवृत्ती- चिंतामणी विनायक वैद्य (1907)) हे मराठीतले पहिले प्रवास वर्णन आहे. 1857च्या स्वातंत्र्य युद्धाच्या वेळी लेखक विष्णूभट गोडसे वरसईकर उत्तर भारतात फिरत होते. त्यांनी ‘याचि देही याचि डोळा’ अनुभवलेले स्वातंत्र्य समर लिहून ठेवले आहे. त्यांचा हेतू मात्र इतिहासाची नोंद करण्याचा नव्हता. त्यांनी डायरी लिहिली आहे, असे म्हणायला हरकत नाही. या पुस्तकाला इतिहासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्व आहे, कारण हे बखरीसारखे लिहिले आहे. परदेशी प्रवाशांनी भारतात आल्यावर अशा प्रकारच्या बखरी लिहून ठेवल्या, ज्या आज ऐतिहासिकदृष्ट्या मौलिक पुरावा आहेत. उदा. मॅगस्थेनीसचे इंडिका. पुस्तकाच्या प्रस्तावनेत चि. वि. वैद्य म्हणतात की, 1857च्या युद्धाबद्दल (‘बंड’ असे लिहिले आहे, पण…
भाग – 2 भालचंद्र नेमाडेंच्या ‘हिंदू : जगण्याची समृद्ध अडगळ’ या कादंबरीच्या पहिल्या दोन भागांत असलेले कथानक या लेखाच्या पहिल्या भागात पाहिले. खंडेराव विठ्ठल या पुरातत्वात पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्याचे हे स्वगत आहे. हा मूळचा मोरगाव नावाच्या खेड्यात राहणारा श्रीमंत शेतकऱ्याचा मुलगा असून शिकण्यासाठी शहरात येऊन राहिला आहे. सिंधू संस्कृती ते विसाव्या शतकातल्या सामान्य भारतीयांचा तो प्रतिनिधी आहे. कादंबरीची सुरुवात, ‘कोण आहे? मी खंडेराव. तू कोण आहेस? मी तू आहे…’ अशी आहे. तिसऱ्या भागाची सुरुवात बडोद्याच्या सयाजीराव गायकवाड महाविद्यालयात खंडेराव प्रवेश घेतो, या प्रसंगाने होते. तिथला क्लार्क मोरगावच्या एका मुलीचा मुलगा असल्याने खंडेरावाला घरी घेऊन जातो. त्या बडोद्याच्या आत्याला जुन्या आठवणी…
भाग – 1 ज्ञानपीठ पुरस्कार विजेते लेखक भालचंद्र नेमाडेंची पहिली कादंबरी कोसला लोकप्रिय आहे. ‘हिंदू : जगण्याची समृद्ध अडगळ’ या कादंबरीवर उलटसुलट प्रतिक्रिया आल्या. त्यांचे भाषण वादग्रस्त झाले. त्यांनी भाषणात व्यक्त केलेल्या मतांशी मी अजिबात सहमत नाही. त्यांच्या राजकीय मतांशी सुद्धा सहमत नाही. तरीही Seperate Art from the artist हे मनापासून पटल्यामुळे हे पुस्तक वाचायचे ठरवले. ‘हिंदू : जगण्याची समृद्ध अडगळ’ हे नाव पुस्तकाला का दिले असेल? असा प्रश्न पडतो. अडगळही आणि समृद्ध सुद्धा! इंग्लिशमध्ये oxymoron म्हणतात तसं. अडगळीतले सामान, अडगळीची खोली हेच डोळ्यासमोर येते तर, समृद्ध म्हटल्यावर वैभवशाली, गौरवशाली असे काही. दिवाळीची सफाई करताना माळ्यावर ठेवलेले जुने सामान दरवर्षी…
लक्ष्मण माने यांच्या ‘उपरा’ या विलक्षण आत्मचरित्राला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे. भटक्या विमुक्त कैकाडी समाजाचे चित्रण यात येते. पुस्तकाचे मुखपृष्ठ नीट पाहायला हवे. गाढवाच्या पाठीवर सामानसुमानासकट मुले बसली आहेत. गाढवाच्या आकारापेक्षा सामानाचा बोजा मोठा आहे. गाढवाचा एक पुढचा आणि एक मागचा पाय बांधला आहे. कैकाडी समाजातले लोक गाढवाच्या पाठीवर संसार बांधून एका गावाहून दुसऱ्या गावी फिरत राहतात. फक्त पावसाळ्यात एका ठिकाणी राहतात. गाढवाचे बांधलेले पाय समाजाने त्यांना घातलेली बंधने दाखवतात. पाठीवर असह्य ओझे आणि पायात बंधन अशा परिस्थितीत या समाजाला जगावे लागते. टोपल्या विणणारी ही जमात भारतभर पसरली असून सर्वांची भाषा एकच आहे. भटकी जमात असल्यामुळे त्यांचा विचार कोणी…
लेखक गो. नी. दांडेकर यांची ‘पडघवली’ कादंबरी खूप गाजलेली आहे. यावर आधारित एक हिंदी टीव्ही मालिका आली होती. कोकणातल्या एका गावावर लिहिलेले हे कथानक आहे. पडघवली गाव कसे वसले? मूळ पुरुष कोण? इथपासून कथानक सुरू होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात समुद्रीचाचे किनारपट्टीवरच्या गावातल्या लोकांना त्रास द्यायचे, लूटमार करायचे, बायका-मुली उचलून न्यायचे. त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी महाराजांनी शेणवीला खरमरीत पत्र लिहिले. त्याच्याकडे असलेल्या केशवभटाने युक्तीने त्यांना पकडले. केशव भटांनी इनामात एक घोंगडी जमीन मागितली. घोंगडी पूर्ण उसवून दोऱ्याचा बिंडा केला.एक खुंट जमिनीत रोवून त्याला दौऱ्याचे एक टोक बांधले आणि दुसरे हातात घेऊन चालत उलगडत गेला. जेवढी जमीन पायाखालून गेली तेवढी घेतली. तेच…
वि. स. खांडेकर यांची ‘ययाती’ ही गाजलेली कादंबरी आजही वाचकांची आवडती आहे. महाभारतातल्या ययातीच्या उपाख्यानावर आधारित ही कादंबरी असली तरी लेखकाने साहित्यिक स्वातंत्र्य घेतले आहे. जसे महाभारतातली आणि कालिदासाची शकुंतला वेगळी तसेच या कादंबरीतील देवयानी वेगळी! कादंबरीच्या मलपृष्ठावर असलेले विवेचन पुस्तकाचा सारांश आहे. लेखक म्हणतात, ‘ही कादंबरी ययातीची कामकथा, देवयानीची संसारकथा, शर्मिष्ठेची प्रेमकथा आणि कचाची भक्तीगाथा आहे, हे लक्षात घेऊन वाचकांनी वाचावी.’ ही एक सूडकथा सुद्धा आहे. देवयानीचा अपमान शर्मिष्ठा करते तिच्यावर सूड घेण्यासाठी ती ययातीशी विवाह करून तिला दासी करते आणि ययाती त्याच्या आईने बालमैत्रिणीचा खून केल्याबद्दल तिला शिक्षा करण्यासाठी ब्राह्मणकन्येशी प्रतिलोम विवाह करतो. त्याने क्षत्रिय कन्येशी विवाह करावा,…
द. मा. मिरासदारांनी अनेक विनोदी कथा लिहिल्या आहेत. त्यांनी ललित लेखन, वगनाट्य, नाटिका, चित्रपटाचे संवाद या सर्व साहित्य प्रकारात विपुल लेखन केलं आहे. व्यंकूची शिकवणी ही त्यांची गाजलेली कथा. माझ्या बापाची पेंड, भुताचा जन्म आणि हुबेहूब हे विनोदी कथासंग्रह मला आवडतात. त्यांच्या कथा पुन्हा पुन्हा वाचाव्याशा वाटतात. माणसाच्या रूपाचे वर्णन करताना ते गमतीदार शब्द वापरतात. उदा. नानाचे नाक नम्रपणे खाली वाकलेले असून टोकाशी फुगा आला होता. ते नम्रपणे हा शब्द असा वापरतात की, वाचताना प्रत्येक वेळी हसू येते. समाजातल्या कुरीती, अंधविश्वास आणि माणसाच्या स्वभावातले दोष यावर मार्मिक टिप्पणी करत ते कथा लिहितात. कोणीतरी आपली चूक दाखवून टपली मारावी तसेच! ‘भुताचा…
‘बापलेकी’ (संपादन – पद्मजा फाटक, दीपा गोवारीकर, विद्या विद्वांस) हे पुस्तक प्रसिद्ध वडील आणि त्यांच्या मुली (प्रसिद्ध अप्रसिद्ध) यांनी लिहिलेल्या लेखांचं संकलन आहे. सुरुवातीचा भाग लेकींनी वडिलांवर लिहिलेल्या लेखांचा, मधला भाग वडिलांनी मुलींबद्दल लिहिलेल्या लेखांचा आणि शेवटी संकलक लेखिकांचे आकलन, मानसोपचार तज्ज्ञांचे मत असे तीन भाग आहेत. बापलेक म्हटल्यावर ‘गाई पाण्यावर काय म्हणुनी आल्या?’ ही कवी बींची कविता आठवते आणि संदीप खरेंची दमलेल्या बापाची कहाणी सुद्धा! बापलेकीचे नाते काही वर्षांपूर्वी फारसे विचारात घेतले गेलेले नसल्याने हा विषय औत्सुक्यपूर्ण, अनोखा होता त्यात विजय तेंडुलकर – प्रिया तेंडुलकर, विद्याधर पुंडलिक – मोनिका गजेंद्रगडकर, वसंत गोवारीकर, अनंत अंतरकर, गौरी देशपांडे, जाई निंबकर, अरुणा…

