ॲड. अमोल दोरवट
जे नक्षत्रांमधून (किंवा तारका समूहांमधून) भ्रमण करतात त्यांना ग्रह म्हणतात. राशिचक्र 27 नक्षत्रांचे बनलेले आहे, ज्याची सुरुवात अश्विनीपासून होते. हाच प्रदेश 12 समान भागांत विभागलेला असून ते 12 राशी (किंवा चिन्हे) आहेत, ज्यांची सुरुवात मेष राशीपासून होते. ग्रहांची नावे सूर्यापासून सुरू होतात. जन्मवेळी उगवणाऱ्या राशीला लग्न (किंवा उदय राशी) म्हणतात. या लग्नावर आणि ग्रहांच्या एकमेकांशी संयोग आणि वियोगावरून, मनुष्याच्या शुभ आणि अशुभ फळांचा निर्णय केला जातो.
टीप : ग्रह राशिचक्रामधून भ्रमण करताना नक्षत्रांमधून (तारकागृहे / नक्षत्रमंडळे) जातात.
नक्षत्रांची नावे अशी आहेत –
- अश्विनी, 2. भरणी, 3. कृत्तिका, 4. रोहिणी, 5. मृगशिरा (मृगशीर्ष), 6. आर्द्रा, 7. पुनर्वसू, 8. पुष्य, 9. आश्लेषा, 10. मघा, 11. पूर्वा फाल्गुनी, 12. उत्तरा फाल्गुनी, 13. हस्त, 14. चित्रा, 15. स्वाती, 16. विशाखा, 17. अनुराधा, 18. ज्येष्ठा, 19. मूळ, 20. पूर्वाषाढा, 21. उत्तराषाढा, 22. श्रवण, 23. धनिष्ठा, 24. शतभिषा (शततारका), 25. पूर्वा भाद्रपदा 26. उत्तरा भाद्रपदा 27. रेवती
हेही वाचा – ज्योतिष, मनोविज्ञान आणि वेदांत
लग्न म्हणजे काय?
लग्न हा जन्मकुंडलीतील अत्यंत महत्त्वाचा बिंदू आहे. तो म्हणजे जन्मवेळी जन्मस्थानाच्या अक्षांशावर पूर्व क्षितिजावर उगवणारी राशी. राशीचे असे उगवणे, हे पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्यामुळे (गतीमुळे) दिसते. पृथ्वीच्या या फिरण्याच्या वेगामुळे राशिचक्रातील प्रत्येक अंश पूर्व क्षितिजावर उगवताना भासतो.
साधारणपणे, एका राशीला क्षितिजावरून जाण्यास सुमारे दोन तास लागतात; त्यामुळे प्रत्येक अंशाला उगवण्यासाठी चार मिनिटे लागतात. तथापि, हा कालावधी त्या जन्मस्थानाच्या अक्षांशावर अवलंबून असतो.
ग्रहांची गती (Daily Average Speed)
प्रत्यक्षात सूर्याला स्वतःची गती नाही; पृथ्वीच्या फिरण्यामुळे तो चालत असल्याचा भास होतो. इतर ग्रह, तसेच राहु-केतू यांना मात्र वेगवेगळ्या गती आहेत.
हेही वाचा – नक्षत्रांच्या पुराणकथा
ग्रहांची दररोजची सरासरी गती (जी निश्चित नाही) साधारणत: पुढीलप्रमाणे आहे –
सूर्य : 1°
चंद्र : 13° ते 15°
मंगळ : 30′ ते 45′
बुध : 65′ ते 100′
शुक्र : 62′ ते 82′
गुरु : 5′ ते 15′
शनी : 2′
राहू / केतू : 3′
या विविध गतींमुळे ग्रह परस्परांशी वेगवेगळ्या दृष्ट्या (aspects) तयार करतात. हे दृष्टिसंबंध त्यांच्या रेखांशांतील अंतरावर अवलंबून असतात. ज्योतिषशास्त्रात या दृष्ट्यांचा मोठा उपयोग आहे. यावर विचार करावा, असे ऋषी सुचवतात.


