Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    आराध्याची नवी मैत्रीण नंदिनी कोण होती?

    July 10, 2026

    चला तोंड गोड करू या…

    July 10, 2026

    आठवण आषाढी वारीची

    July 10, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Saturday, July 11
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » वाळवंटातील ‘जीवनदायिनी’ ते शाही थाट…
    फूड काॅर्नर

    वाळवंटातील ‘जीवनदायिनी’ ते शाही थाट…

    माधवी जोशी माहुलकरBy माधवी जोशी माहुलकरJuly 10, 2026No Comments5 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठी लेख, मराठी कथा, मराठी साहित्य, मी मराठी, अभिजात मराठी, मराठी लेखक, वाळवंटातील जीवनदायिनी, खजुराचा रंजक इतिहास, माधवी जोशी माहुलकर, हयात बख्श बाग, शाही खजूर, खजुराचा इतिहास, मुघलकालीन शाही खजूर हलवा, शाही खजूर हलवा रेसिपी, पारंपरिक खजुराची राब, खजुराची राब
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    ‘आसमान से गिरे और खजूर पे अटके…’ ही म्हण आपण आयुष्यात कधी ना कधी नक्कीच वापरतो किंवा ऐकतो. एका संकटातून सुटून दुसऱ्या संकटात अडकणे, या अर्थाने वापरली जाणारी ही म्हण खजुराच्या झाडाच्या उंचीवरून आणि त्याच्या वैशिष्ट्यावरूनच तयार झाली आहे. परंतु हेच खजूर वाळवंटातील लोकांकरिता जीवनदायी फळ मानले जाते. काल बाजारात फेरफटका मारताना मला एक वेगळेच दृश्य दिसले. एका फळवाल्याकडे सुंदर, टवटवीत लाल रंगाच्या खजुरांचे घोस दिसले. त्याने सांगितले की, हे ताजे खजूर आपल्या शेजारच्या गुजरातमधील ‘कच्छ’ भागातून आले आहेत. सफरचंदासारखे कुरकुरीत आणि जिभेवर रसाळ गोडवा सोडणारे हे लाल खजूर खाताना मनात विचार आला की, आपण जे पेंडखजूर किंवा खारीक खातो, त्याचा इतिहास आणि प्रवास नेमका काय असेल? मग काय… यावर थोडी सविस्तर माहिती गोळा केली, आणि जो रंजक खजिना हाती लागला, तो खरचं खूप छान आहे.

    खजूर हे मानवी संस्कृतीतील सर्वात जुन्या फळांपैकी एक आहे. साधारण 5000 ते 7000 वर्षांपूर्वी आजच्या इराक (प्राचीन मेसोपोटेमिया) आणि इराणच्या भागात याची शेती सुरू झाली. रखरखत्या वाळवंटात जिथे पाण्याचा टिपूस नसायचा, तिथे केवळ खजूर आणि उंटाच्या दुधावर तेथील भटकी जमात कित्येक महिने प्रवास करायची. म्हणूनच याला वाळवंटातील ‘जीवनदायिनी’ म्हटले गेले. भारतात मुघलांनी खजूर आणला, हा आपल्याकडील एक मोठा गैरसमज आहे! आपल्या सिंधू संस्कृतीच्या उत्खननातही खजुराच्या बिया सापडल्या आहेत. म्हणजेच, मुघल येण्याच्या हजारो वर्षे आधीपासून भारतीयांना खजूर माहीत होता. पुढे अरब व्यापाऱ्यांमुळे भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर, विशेषतः गुजरातच्या कच्छ भागात खजुराची झाडे रुजली.

    परंतु, मुघल कालखंडात खजुराला ‘शाही’ प्रतिष्ठा मिळाली. मुघल साम्राज्याचा संस्थापक ‘बाबर’ याला मध्य आशियातील फळांची भारी आवड होती, त्याने विशेष पुरवठा साखळीद्वारे उत्तम खजूर भारतात मागवले होते.

    ‘हयात बख्श बागे’त खजुराला शाही स्थान

    खजुराबाबतचा एक रंजक ऐतिहासिक संदर्भ मुघल बादशहा शाहजहान यांनी बांधलेल्या दिल्लीच्या लाल किल्ल्याशी जोडलेला आहे. किल्ल्याच्या आत एक अत्यंत सुंदर आणि भव्य बाग तयार करण्यात आली होती, जिचे नाव होते ‘हयात बख्श बाग’ म्हणजेच ‘जीवन देणारी बाग’! ऐतिहासिक नोंदींनुसार, या शाही बागेत मध्य आशिया आणि अरब देशांतून खास मागवून आणलेली विविध फळझाडे लावण्यात आली होती, ज्यात खजुराच्या वैशिष्ट्यपूर्ण जातींचाही समावेश होता. मुघल दरबारात या बागेतील ताजी फळे आणि खजुरांचा वापर खास शाही मेजवान्यांसाठी केला जायचा. राजघराण्यातील मुख्य आचारी (बावर्ची) खजुराचा सिरका (व्हिनेगर), चटण्या आणि विविध पक्वान्ने तयार करण्यासाठी या फळांचा वापर मोठ्या प्रमाणावर करत असत; कारण त्या काळात खजूर हे केवळ एक फळ नसून वैभव आणि आरोग्याचे प्रतीक मानले जायचे. त्या काळात आजच्यासारखी साखर नव्हती, त्यामुळे गोडव्याचा राजा ‘खजूर’ हाच होता.

    हेही वाचा – गोष्ट एका ‘व्हेज अंडाकरी’ची!

    खजुराच्या शेतीबद्दल जगभरात एक अत्यंत प्रसिद्ध इंग्रजी म्हण वापरली जाते –

    “The Date Palm likes its head in the fire and its feet in the water.”

    म्हणजेच काय तर, खजुराच्या झाडाचे ‘डोके उन्हात आणि पाय पाण्यात’ असावे लागतात! वर कडक वाळवंटी ऊन आणि मुळाशी चांगला ओलावा असणे, हाच या शेतीचा मूळ मंत्र आहे. खजुराची शेती खूप संयमाची आणि रंजक असते :

    जमीन आणि हवामान – याला अत्यंत उष्ण आणि कोरडे हवामान लागते. फळे धरण्याच्या काळात पाऊस नसावा. हे झाड अगदी निकृष्ट किंवा खारट जमिनीतही तग धरू शकते.

    टिश्यू कल्चर आणि परागीकरण – आजकाल आधुनिक शेतीमध्ये ‘टिश्यू कल्चर’ पद्धतीने तयार केलेली मादी रोपे लावली जातात. खजुरामध्ये नर आणि मादी झाडे वेगवेगळी असल्याने, शेतकऱ्यांना स्वतः हाताने ‘कृत्रिम परागीकरण’ करावे लागते. नर झाडाचे परागकण गोळा करून ते मादी फुलांवर शिंपडावे लागतात, तरच झाडाला फळे धरतात.

    आयुष्यमान – झाड लावल्यापासून साधारण 3 ते 4 वर्षांत फळे यायला सुरुवात होते. एकदा लावलेले खजुराचे झाड तब्बल 70 ते 80 वर्षे भरपूर उत्पादन देत राहते! आज आपल्या महाराष्ट्रातील सोलापूर, लातूर आणि विदर्भातील काही उष्ण भागांतही शेतकरी याचे यशस्वी प्रयोग करत आहेत.

    सुरुवातीला आपण “आसमान से गिरे और खजूर पे अटके” ही म्हण संकटाच्या अर्थाने पाहिली. पण या म्हणीचा सकारात्मक आणि दुसऱ्या बाजूने विचार केला, तर असे लक्षात येते की, जेव्हा माणूस वाळवंटात भटकत असेल, तेव्हा त्याच्या पोटापाण्याचा प्रश्न तर हे खजुराचे झाड सोडवत असेलच; परंतु हे उंच आणि खडबडीत खोड असलेल्या तसेच टोकदार पाने असलेल्या खजुराच्या झाडावरील खजूर तोडताना माणसाचे हालही तितकेच होत असतील नाही का? या म्हणीतील गंमतीचा भाग सोडला तर अगदी संकटकाळात हक्काचा आधार देणे हा खजुराचा मोठा गुणधर्म आहे. निसर्गाने वाळवंटातील अत्यंत कठीण परिस्थितीत मानवी संस्कृतीला जिवंत ठेवण्यासाठी आणि आपत्कालीन स्थितीत मदतीसाठी दिलेली ही एक अनमोल भेट आहे.

    आयुर्वेदातही याला थकवा घालवणारे आणि ताकद देणारे उत्तम अन्न मानले आहे. हिवाळ्यात किंवा उपवासाला आपण खारीक-खजुराचे लाडू आवडीने खातोच, पण हा शाही इतिहास, त्याची लागवड आणि संकटकाळी धावून येणारा त्याचा गुणधर्म जाणून घेतल्यानंतर आता प्रत्येक खजूर खाताना त्याची चव नक्कीच अधिक ‘शाही’ आणि कृतज्ञतेची वाटेल, नाही का?

    हेही वाचा – आठवडी बाजारातील भातकं!

    खजुराची माहिती संकलित करत असताना मला यापासून तयार होणाऱ्या दोन सुंदर आणि चविष्ट रेसिपी देखील कळल्या, ज्या मी खाली देते आहे. मुघल बावर्चीखान्यात तयार होणारे हे पदार्थ देखील तितकेच रंजक आहेत… जे शाही पद्धतीने तुमच्या स्वयंपाकघरात विराजमान होऊ शकतात –

    पारंपरिक ‘खजुराची राब’ (Dates Syrup) –

    ही राब एकदा बनवून ठेवली की, महिनाभर खराब होत नाही आणि साखरेला उत्तम पर्याय ठरते.

    कृती

    दोन कप बिया काढलेले मऊ खजूर तीन कप कडक गरम पाण्यात 2-3 तास भिजत ठेवा. नंतर त्याच पाण्यासह ते गॅसवर मंद आचेवर शिजवून घ्या आणि शिजताना चांगले मॅश करा. मिश्रण थोडे कोमट झाल्यावर सुती (कॉटनच्या) कपड्यातून त्याचा रस घट्ट पिळून गाळून घ्या. हा रस पुन्हा गॅसवर मंद आचेवर आटवायला ठेवा. रसाचा घट्टपणा मधासारखा झाला की त्यात एक लहान चमचा लिंबाचा रस घाला आणि गॅस बंद करा.

    वापर : ही राब तुम्ही खीर, शिरा किंवा रात्रीच्या दुधात साखरेऐवजी वापरू शकता!

    मुघलकालीन ‘शाही खजूर हलवा’ (Halwa-e-Khajoor)

    कृती

    दोन कप बिया काढलेले मऊ काळे खजूर आणि अर्धा लिटर फुल फॅट दूध एका जाड बुडाच्या कढईत एकत्र करा. नंतर दूध आटेपर्यंत ते शिजवून घ्या. दूध आटल्यावर कढईतच खजूर मॅश करा. आता दुसऱ्या कढईत चार-पाच चमचे साजूक तूप गरम करून आधी सुकामेवा तळून बाजूला काढा. त्याच तुपात दुधात शिजवलेले खजुराचे मिश्रण टाकून मंद आचेवर तूप सुटेपर्यंत 15-20 मिनिटे परता. नंतर त्यात अर्धा कप खवा (किंवा दुधाची साय) आणि दोन चमचे दुधात भिजवलेले केशर घालून पाच मिनिटे परता. शेवटी वेलची-जायफळ पूड आणि तळलेला सुकामेवा घालून गरम-गरम सर्व्ह करा!

    वाळवंटातून थेट शाही मुघल बावर्चीखान्यापर्यंत पोहचलेल्या खजुराची यात्रा म्हणजे एक समृद्ध इतिहास आहे. साखर नसलेल्या काळातदेखील आपल्या नैसर्गिक गोडव्याने परिपूर्ण असलेल्या या फळाने विपरीत परिस्थितीत अनेक प्रकारच्या प्राण्यांचे सुरक्षाकवच म्हणून रक्षण केले आहे, असं समजल्यास ते वावगे ठरणार नाही.

    तुम्हाला खजुराचा हा रंजक प्रवास, या पारंपरिक रेसिपी आणि या म्हणीमागचा नवा दृष्टिकोन कसा वाटला? कमेंट्समध्ये नक्की सांगा!

    Avatar photo
    माधवी जोशी माहुलकर

    एम.ए.(इंग्रजी) बी.एड. असून सध्या नागपूरमध्ये स्थायिक आहेत. लग्नाआधी चार वर्षे मेडिकल रीप्रेझेन्टेटिव्ह म्हणून अकोला येथे कार्यरत. तीन वर्षे शिक्षिका. वाचन, प्रवास करणे, वेगवेगळ्या विषयांवर लिखाण तसेच चर्चा करणे, गायन याची आवड. गायनात गंधर्व महाविद्यालयाच्या परीक्षा प्रथम श्रेणीसह उत्तीर्ण. पती Additional S.P. Anti corruption Bureau Nagpur येथे कार्यरत.

    Related Posts

    चला तोंड गोड करू या…

    July 10, 2026 फूड काॅर्नर

    बनाना डिलाइटची गोष्ट…

    July 9, 2026 फूड काॅर्नर

    Recipe : वरी तांदूळ – आमरस खीर अन् लाल भोपळ्याच्या कुरकुरीत वड्या

    July 3, 2026 फूड काॅर्नर
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    फूड काॅर्नर

    चला तोंड गोड करू या…

    By प्रणाली मंगेश महाशब्देJuly 10, 2026

    काय म्हणता! कॅडबरीची जाहिरात पुन्हा समोर आली… अरे बापरे, या जाहिरातीने तर बाकीचे गोड पदार्थच…

    बनाना डिलाइटची गोष्ट…

    July 9, 2026

    Recipe : वरी तांदूळ – आमरस खीर अन् लाल भोपळ्याच्या कुरकुरीत वड्या

    July 3, 2026

    Kitchen Tips : जॅमचे आइस्क्रीम अन् स्वस्त आणि मस्त जेली!

    July 2, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    आराध्याची नवी मैत्रीण नंदिनी कोण होती?

    July 10, 2026

    चला तोंड गोड करू या…

    July 10, 2026

    आठवण आषाढी वारीची

    July 10, 2026

    वाळवंटातील ‘जीवनदायिनी’ ते शाही थाट…

    July 10, 2026

     सार्थ ज्ञानेश्वरी : जयाचेनि उजाळें, उघडती बुद्धीचे डोळे

    July 10, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 10 जुलै 2026

    July 10, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 356
    • अवांतर 194
    • आरोग्य 128
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 483
    • फिल्मी 55
    • फूड काॅर्नर 234
    • मैत्रीण 24
    • ललित 770
    • शैक्षणिक 82
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    आराध्याची नवी मैत्रीण नंदिनी कोण होती?

    July 10, 2026

    चला तोंड गोड करू या…

    July 10, 2026

    आठवण आषाढी वारीची

    July 10, 2026
    Most Popular

    नूतन… मौनाचा संवाद!

    July 5, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.