Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    …अन् संदीपने स्वतःचा स्वाभिमान वाचवला!

    April 20, 2026

    कर्तव्याने घडतो माणूस…

    April 20, 2026

    लव यू बाबा फॉर एव्हर…!

    April 20, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Tuesday, April 21
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » …अन् संदीपने स्वतःचा स्वाभिमान वाचवला!
    ललित

    …अन् संदीपने स्वतःचा स्वाभिमान वाचवला!

    ॲड. कृष्णा पाटीलBy ॲड. कृष्णा पाटीलApril 20, 2026No Comments7 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेखक, मराठीवाचन, मराठी साहित्य, मी मराठी, अभिजात मराठी, लग्नाळू मुलींच्या अपेक्षा, मुलींच्या मागण्या, मुलाबद्दल मुलीची अपेक्षा, उच्चशिक्षित मुलगा हवा, मुलाला गलेलठ्ठ पगार हवा, मुलाला वरकमाई हवी, संदीपचा स्वाभिमान, संदीपच्या शिक्षणाबद्दल संशय, संदीपची नवोदयमध्ये निवड,
    फोटो सौजन्य - गूगल जेमिनी - (प्रातिनिधीक)
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link
    भाग – 1

    “हल्ली मुलींच्या आई-वडिलांना नेमकं काय झालंय, हेच समजेनासं झालंय. मुलीचं लग्न ठरवताना त्यांच्या अपेक्षा इतक्या वाढलेल्या असतात की, मुलाचे डोळे पांढरे व्हायची वेळ येते. जावयाला सरकारी नोकरी हवी. फक्त नोकरी नव्हे, तर मोठ्या पदावरची हवी. पगार भरपूर हवा. गावाकडे जमीन हवी. शहरात फ्लॅट हवा. चार चाकी गाडी हवी. भविष्यात अजून मोठं पद मिळणार, याची खात्री हवी. आई-वडिलांपासून वेगळं राहण्याची तयारी हवी. मुलगा नम्र, आज्ञाधारक आणि मुलीला ‘राणी’सारखं ठेवणारा हवा. मुलीच्या माहेरच्यांनी त्याच्या स्वाभिमानावर रोज पाय ठेवला तरी, तो हसतमुख रहायला हवा!

    एकूणच काय तर मुलीच्या आई-वडिलांना मुलगा नको असतो… त्यांना एक ‘पॅकेज’ हवं असतं. बरं, पॅकेज तर पॅकेज… परंतु त्या पॅकेजमध्ये प्रेम, स्वभाव, माणुसकी, समजूतदारपणा हे घटक कमी असतात. ‘अपेक्षा’ हा घटकच फार मोठा असतो. त्यामुळे अनेक चांगली स्थळं केवळ दिखाऊपणा आणि अवास्तव मागण्यांच्या ओझ्याखाली चिरडली जातात. म्हणूनच आजकाल लग्न ठरवण्याचा कार्यक्रम म्हणजे दोन कुटुंबांचं मिलन कमी आणि एखाद्या उमेदवाराची उच्चस्तरीय चौकशी जास्त वाटते. पण आयुष्याची गंमत अशी असते की, तुम्ही कितीही चौकशी करा, मुलगा- मुलगीचा स्वभाव, संस्कार, कुटुंबाच्या चालीरीती, माणुसकी आणि जुळवून घेण्याची वृत्ती नसेल तर, लग्नाच्या भवितव्याचा निकाल ठरलेला असतो…”

    स्कॉर्पियो गाडीत ड्रायव्हर शेजारी बसलेले महेशराव तावातावाने बोलत होते. पाठीमागच्या सीटवर आनंदराव दादा, शरद नाना, मानकर आण्णा, दिलीप बिरुटे, नारायण आप्पा आणि पांडुरंग काका हे दाटीवाटीने बसले होते. रस्ता हायवेचा होता. काळ्या रंगाची स्कॉर्पियो सुसाट वेगाने पळत होती. थोड्या अंतरावर चढ लागला आणि ड्रायव्हरने गियर बदलला. खिडकीची काच खाली घेत पांडुरंग काका म्हणाले, “आता तरी गरीब आणि समजूतदार कुटुंब आहे ना? नाहीतर अव्वाच्या सव्वा अपेक्षा असल्या म्हणजे मागचं तेच पुढं? या तीन महिन्यांत हे सहावं स्थळ बघायला निघालोय आपण.”

    हेही वाचा – दादू… घराचेच वासे फिरले!

    “घेरडीच्या पाहुण्याने चौकशी तर केली आहे. तो म्हणाला की, साधी रहाणीमान आहे. उच्चशिक्षित कुटुंब आहे. फार अपेक्षा नाहीत.”

    त्यांना मधेच तोडत, शरद नाना म्हणाले, “देव करो आणि मागचा अनुभव न येवो.”

    सर्वजण हसायला लागले. परंतु महेशराव मात्र चिंतीत झाले. त्यांना मागचा प्रसंग जसाच्या तसा आठवला…

    बरोबर तीन महिन्यांपूर्वी आजच्यासारखेच संदीपसाठी स्थळ पहायला गेलो होतो. संदीप देशमुख. माझा पुतण्या, म्हणजे थोरल्या भावाचा मुलगा. गावाकडच्या साध्या शेतकरी कुटुंबात जन्माला आला. घरात पैशांची श्रीमंती नव्हती. मात्र, संस्कारांची श्रीमंती होती. वडील कष्टकरी होते. आई साधीभोळी आहे. लहानपणापासून हुशार आहे तो. पाचवीला असताना प्रवेश परीक्षा दिली आणि नवोदयमध्ये निवड झाली. गावातल्या चिखलातून, कंदिलाच्या उजेडातून, आईच्या कष्टाच्या भाकरीतून आणि वडिलांच्या फाटलेल्या अंगरख्यातून तो पुढे गेला.

    त्याने रात्रीचा दिवा करून अभ्यास केला. खूप संघर्ष केला. अपयश आल्यावर पुन्हा प्रयत्न केला. सगळं सहन करून तो उभा राहिला. कधी कधी वडापाव खाऊन दिवस काढले, पण तो ढळला नाही. एलएलबी झाला. ‘रुनवाल’ या जगप्रसिद्ध रियल इस्टेट कंपनीमध्ये ‘लॉ ऑफिसर’ या पदावर त्याची निवड झाली. कुणालाही सहजासहजी मिळत नाही, अशी नोकरी त्याने मिळवली. त्या दिवशी त्याच्या आईच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. ती म्हणाली, “बाळा, आज तुझ्या बापाच्या आयुष्याचं सार्थक झालं.” त्याने आईच्या चरणी माथा टेकला. उठून म्हणाला, “आई, मला अजून खूप पल्ला गाठायचा आहे. मी स्पर्धा परीक्षा देणार. नक्की क्लास वन अधिकारी होणार.”

    संदीपच्या यशाने गाव उजळलं. नातेवाईकांची गर्दी वाढली. ज्यांनी पूर्वी वडिलांच्या माघारी याचे काय होणार? असे प्रश्न उपस्थित केले होते, तेच आता म्हणू लागले, “आमचा संदीप, साहेब झाला!”

    आणि मग सुरू झाला… लग्नाचा विषय.

    स्थळं येऊ लागली. फोटो, बायोडाटा, चौकशा, नातेवाईक, मध्यस्थ… जणू मुलगा नव्हे, तर एखाद्या मालमत्तेचा लिलाव सुरू आहे, असा भास व्हायला लागला. कोणाला सरकारी नोकरी हवी होती. कोणाला मोठं घर हवं होतं. कोणाला शहरात फ्लॅट हवा होता. कोणाला मुलगा दिसायला गोरा हवा होता, तर कोणाला “अजून वरची पोस्ट मिळणार आहे ना?” याची खात्री हवी होती.

    संदीप मात्र शांत होता. तो आईला एकच म्हणायचा, “आई, मुलगी स्वभावाने चांगली असावी. घर गरीब असो, श्रीमंत असो, मला काही फरक पडत नाही. पण स्वभाव आणि संस्कार महत्त्वाचे.” आई हसायची. “तुझ्यासारखा साधा मुलगा आहे म्हणून हे बोलतोस. पण जग इतकं साधं राहिलेलं नाही रे.” आईचं ते वाक्य किती खरं आहे, याचा अनुभव त्याला लवकरच यायला लागला.

    एके दिवशी गडहिंग्लज गावचं स्थळ आलं. मुलगी पदवीधर होती. दिसायला छान. घरची परिस्थिती बेताची. वडील एका छोट्या सहकारी संस्थेत कारकून. आई गृहिणी. नातेवाईकांच्या माध्यमातून बोलणी पुढे गेली. “मुलगी चांगली आहे.” मध्यस्थाने सांगितलं. “घर जरी साधं असलं तरी लोक थोडे चौकस आहेत… पण तुमच्या मुलासाठी योग्य स्थळ आहे. जमून जाईल. आजकाल थोडीफार चौकशी सगळेच करतात.”

    आम्ही गडहिंग्लजला गेलो. रतनबापू मध्यस्थी होते. आमची वाट पाहत ते बसस्थानकावर उभे होते. आम्ही बसस्थानकावर गेलो. त्यांना गाडीत घेतले. थेट मुलीच्या घराकडे गेलो.

    रतनबापूंनी मुलीच्या अंगणातच गाडी उभा केली. आम्ही खाली उतरलो. घर साधंच होतं. पण अंगण मात्र ऐसपैस होतं. अंगणातच उजवीकडच्या कोपऱ्यात नळ होता. आम्ही हात पाय धुतले. तोपर्यंत गोविंदराव बाहेर आले. रतनबापूनी त्यांची ओळख करून दिली. म्हणाले, “हे मुलीचे वडील.” आम्ही सर्वांनी नमस्कार केला. त्यांच्या मागोमाग आत गेलो.

    छोट्या हॉलमध्ये बरेच लोक बसले होते. काही महिला पण बसल्या होत्या. ते सर्वजण नीटनेटके होते. रतनबापूंनी दोन्हीकडील लोकांच्या एकमेकांशी ओळखी करून दिल्या. वातावरण सैल झालं. तोपर्यंत चहा आला. चहा घेत घेत पाऊसपाणी, शेतमालाला दर अशा ओघाने गप्पा सुरू झाल्या.

    सुरुवातीला मुलीच्या वडिलानी, गोविंदरावनी खूप नम्रपणे विचारलं, “साहेब, पगार किती आहे सध्या?” संदीपने हसत उत्तर दिलं, “कंपनीचा पगार आहे. नियमाप्रमाणे जेवढा आहे तेवढा.”

    मुलीची आई थोडी पुढे झुकली, “हं… आणि वरचे काही असते का?”

    संदीपला प्रश्नाचा अर्थ कळला. पण त्याने शांतपणे उत्तर दिलं, “आई, मी पगारावर जगतो. बाकी काही सवय नाही.”

    क्षणभर वातावरण गारठलं. मग दुसरा प्रश्न. “जमीन किती आहे गावाकडे?” संदीपच्या काकांनी, महेशरावनी साधेपणाने सांगितलं, “चार एकर आहे. पावसावर आहे. फार काही उत्पन्न नाही. पण आमचं पोट भरतं.”

    “फक्त चार एकर?” मुलीच्या मामांनी भुवया उंचावल्या. संदीपने मनातल्या मनात दीर्घ श्वास घेतला. महेशराव म्हणाले, “परंतु मुलगा ‘लॉ ऑफिसर’ आहे. तो अजूनही स्पर्धा परीक्षा देत आहे. तो आज ना उद्या न्यायाधीश होणार आहे.”

    नंतर प्रश्नांची सरबत्तीच सुरू झाली. फ्लॅट आहे का? गाडी कोणती आहे? पुढे बदली कुठे होऊ शकते? आई सोबत राहणार का? मुलगा किती खर्चिक आहे, नातेवाईक कसे आहेत. आमच्या शिकलेल्या मुलीला नोकरी लावणार का? तिने नोकरी केली तर घरामध्ये स्वयंपाक कोण करणार?… असे एकामागून एक प्रश्न. जणू लग्नाची बोलणी नव्हती, एक उच्चस्तरीय चौकशी आयोग बसला होता.

    तरीही संदीप शांत होता. मुलगी मात्र जास्त बोलत नव्हती. ती आईकडे पाहूनच उत्तरे देत होती. तिच्या चेहऱ्यावर स्वतःचं मत नसल्याची सावली दिसत होती. थोड्या वेळाने मुलीची आई म्हणाली,

    “आम्हाला ऐकिवात आलंय की, तुम्ही सहावीनंतर नवोदयला होता?” संदीपने मान हलवली. “हो. निवड झाली होती.”

    “मग खरंच होता काय? कारण आजकाल लोक खूप काही सांगतात. आम्ही चौकशी करून घेऊ का? काही हरकत नाही ना?”

    हे वाक्य ऐकताच खोलीत काही क्षण अगदी शांतता पसरली.

    संदीपच्या आईच्या चेहऱ्यावर अपमानाची रेषा उमटली. ती गोष्ट महेशरावांच्या जिव्हारी लागली. संदीपच्या आईच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. रतनबापू तर खूप अस्वस्थ झाले. त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट नाराजी उमटली. संदीपने मात्र हळूच पाण्याचा ग्लास उचलला. एक घोट घेतला आणि अतिशय स्थिर आणि शांत आवाजात म्हणाला, “चौकशी जरूर करा. सहावीला नवोदयला होतो की नाही, तेही तपासा. सहावीतल्या प्रगतीपुस्तकापासून ते बारावीच्या मेरिट लिस्टपर्यंत सगळं पाहा. आमची काही हरकत नाही.‌”

    हेही वाचा – दादू… लेकीच्या उदारपणाने गाव गहिवरला

    महेशरावांनी अजूनही खाली मान घातली होती. मुलाच्या कष्टाची, मुलाच्या प्रामाणिकतेची, घरच्या संस्कारांची, सगळ्याचीच जणू खिल्ली उडाली होती. त्यांच्या आयुष्यभराच्या कष्टाला, मुलाच्या प्रामाणिकपणाला, घरच्या संस्कारांना जणू कोणी उघडपणे संशयाच्या कचऱ्यात फेकून दिलं होतं. मुलाच्या सध्याच्या नोकरीबाबत, पगाराबाबत चौकशी करणं, आपण समजू शकतो. परंतु तो पाचवीला असताना काय करत होता? सहावीला असताना मार्क किती होते? याची चौकशी करणं म्हणजे हास्यास्पद गोष्ट होती. कोणी काही बोललं नाही. त्या भेटीचा शेवट औपचारिक हसण्यात झाला.

    घरी परतल्यावर आईच्या डोळ्यात पाणी आलं.

    “संदीप बाळा, एवढं सगळं करूनही आपल्याला लोक मोजतात… जमीन, पगार, नवोदय, वरची कमाई…” संदीपने आईचा हात धरला. “आई, त्यांना काय मोजायचं ते मोजू दे. आपण स्वतःला विकायला बसलो नाही. तू कशाला काळजी करतेस?”

    दुसऱ्या दिवशी मध्यस्थाचा, रतनबापूंचा संदीपला फोन आला. “त्यांना काय सांगू साहेब… मुलीकडून अजून थोडी चौकशी बाकी आहे. नवोदयची खात्री, पदाची खात्री, पुढे प्रमोशनची शक्यता… त्यांना थोडा वेळ द्या. बाकी त्यांना स्थळ बऱ्यापैकी पसंत आहे.” संदीपने निर्विकारपणे उत्तर दिलं. “नको बापू. मला अशा प्रकारची मुलगी पण नको… आणि अशा प्रकारचे मुलीचे आई-वडील पण नकोत.”

    फोन कट झाला. त्या एका वाक्यात त्याने फक्त नातं नाही तोडलं, तर स्वतःचा स्वाभिमान वाचवला.

    क्रमश:
    ॲड. कृष्णा पाटील

    मोबाइल – 9372241368

    Related Posts

    कर्तव्याने घडतो माणूस…

    April 20, 2026 ललित

    लव यू बाबा फॉर एव्हर…!

    April 20, 2026 ललित

    असाही ड्राय-डे! तुम्ही सहमत आहात?

    April 20, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    कर्तव्याने घडतो माणूस…

    By पराग गोडबोलेApril 20, 2026

    सहकारी आहेत एक माझे, शिरीष आपटे नावाचे. वय सत्तर पार, पण प्रत्येक कामात तरुणांना लाजवेल…

    लव यू बाबा फॉर एव्हर…!

    April 20, 2026

    असाही ड्राय-डे! तुम्ही सहमत आहात?

    April 20, 2026

    आरूने शिवला सियापासून दूर करताच सर्व अवाक् झाले…

    April 19, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    …अन् संदीपने स्वतःचा स्वाभिमान वाचवला!

    April 20, 2026

    कर्तव्याने घडतो माणूस…

    April 20, 2026

    लव यू बाबा फॉर एव्हर…!

    April 20, 2026

    असाही ड्राय-डे! तुम्ही सहमत आहात?

    April 20, 2026

    Dnyaneshwari : तुझें विश्वरूप आकळे, ऐसे जरी जाणसी माझे डोळे

    April 20, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 20 एप्रिल 2026

    April 20, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 273
    • अवांतर 182
    • आरोग्य 103
    • थर्ड अंपायर 4
    • पंचांग आणि भविष्य 391
    • फिल्मी 45
    • फूड काॅर्नर 197
    • मैत्रीण 18
    • ललित 567
    • शैक्षणिक 77
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    …अन् संदीपने स्वतःचा स्वाभिमान वाचवला!

    April 20, 2026

    कर्तव्याने घडतो माणूस…

    April 20, 2026

    लव यू बाबा फॉर एव्हर…!

    April 20, 2026
    Most Popular

    …अन् संदीपने स्वतःचा स्वाभिमान वाचवला!

    April 20, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.