भाग – 1 “हल्ली मुलींच्या आई-वडिलांना नेमकं काय झालंय, हेच समजेनासं झालंय. मुलीचं लग्न ठरवताना त्यांच्या अपेक्षा इतक्या वाढलेल्या असतात की, मुलाचे डोळे पांढरे व्हायची वेळ येते. जावयाला सरकारी नोकरी हवी. फक्त नोकरी नव्हे, तर मोठ्या पदावरची हवी. पगार भरपूर हवा. गावाकडे जमीन हवी. शहरात फ्लॅट हवा. चार चाकी गाडी हवी. भविष्यात अजून मोठं पद मिळणार, याची खात्री हवी. आई-वडिलांपासून वेगळं राहण्याची तयारी हवी. मुलगा नम्र, आज्ञाधारक आणि मुलीला ‘राणी’सारखं ठेवणारा हवा. मुलीच्या माहेरच्यांनी त्याच्या स्वाभिमानावर रोज पाय ठेवला तरी, तो हसतमुख रहायला हवा! एकूणच काय तर मुलीच्या आई-वडिलांना मुलगा नको असतो… त्यांना एक ‘पॅकेज’ हवं असतं. बरं, पॅकेज तर…
Read More