Author: ॲड. कृष्णा पाटील

मोबाइल – 9372241368

नोकरीसाठी गाव सोडून आता बरोबर पंचवीस वर्षे झाली. तरीही गाव अन् गावाची ओढ काही कमी होत नाही. उन्हाळ्याची सुट्टी सुरू झाली की, नोकरीची रखरखीत, तणावग्रस्त जिंदगी तात्पुरती गठुळ्यात गुंडाळून, गावाकडच्या शांत आणि स्थिर जगण्याकडं जावं, ही इच्छा उफाळून येते आणि माझी पावलं आपोआप गावाकडे वळतात… निवाळसंख खळाळत्या पाण्याचा ओढा ओलांडून गावच्या वेशीला पोहचतो न पोहचतो तोच, दिवसरात्र वाजणाऱ्या मारुतीच्या देवळातील, बापू दादाच्या महिपाने नवसाने बांधलेल्या, भल्या मोठ्या पितळी घंटेचा प्रसन्न लहरी उत्पन्न करणारा, गावचा आसमंत भरून टाकणारा, पवित्र घंटानाद लहरत राहतो. पहाटेच्या काकड आरतीला पेटविलेल्या धूपाचा दरवळ देवळातून बाहेर पडून गावभर मांगल्य लेऊन पसरलेला असतो. पंढरीची वारी करून परत येताना…

Read More

उत्तरार्ध आज बारावीचा निकाल लागला. सौरभ हुशार आहे… चुणचणीत आहे. शाळेत नेहमी डिस्टिंक्शनमध्ये असतो. त्यामुळे आज निकालही तसाच लागणार अन् तो मेडिकलला जाणार, असं सर्वांनी परस्पर ठरवून टाकलं. अर्थात, तोही “हो”ला “हो” म्हणत गेला. पण प्रत्यक्षात सौरभला केवळ बहात्तर टक्के मार्क मिळाले. सौरभची अवस्था वाईट झाली होती. रडून रडून डोळे लाल झाले होते. पार चोळामोळा झाल्यासारखी त्याची स्थिती होती. पोराचा हा निकाल ऐकून माणिकराव आणि वैशाली हे दोघेही हादरले होते. माणिकरावांनी लगेच सयाजी नानांना बोलावून घेतले. पण दोन दिवसांनी सालाबादप्रमाणे पंढरपूरच्या वारीला अन्नदान करण्याचा कार्यक्रम असल्याने सर्व पॅकिंग करायला रात्री अकरा वाजले, त्यामुळे ते दुसऱ्या दिवशी सकाळीच आले. सयाजी नाना सौरभला म्हणाले,…

Read More

पूर्वार्ध जेवणाचे ताट बाजूला सारून तो गुडघ्यात मान घालून तसाच बसून राहिला. कोपऱ्यात पडलेल्या बारावीच्या मार्कलिस्टकडे अपराधी नजरेने पाहू लागला. कातर आवाजात वैशाली पुन्हा म्हणाली, “पोटभर खा आणि आता डोक्यातून सगळं काढून टाक. आम्ही तुला काय बोललो का? कशाला उगाच डोक्यात राख घालून घ्यायची?” तो आईकडे विमनस्क होऊन पाहात राहिला. सकाळपासून तिने अंघोळही केली नव्हती. चुरगळलेली साडी नेसून तिने निमूटपणे चार भाकरी थापल्या होत्या. सौरभच्या बारावीच्या निकालानंतर तिची सगळी हालचाल कोरडी आणि यांत्रिक झाली होती. घरात तर कोण कुणाशी बोलत नव्हतं. सगळं घर चार भिंतीत थंड, निर्जीव होऊन गेलं होतं. बारावीचा निकाल लागेपर्यंत म्हणजे आज सकाळपर्यंत आई, बाबाचे उत्साहाने ओसंडून…

Read More

भाग – 2 घरात पहिल्यांदाच मोठं कार्य होतं. मुलगा शिकून नोकरीला लागला होता. कष्टाने संसार उभा केलेल्या बापासाठी हा दिवस मोठा होता. नामदेवला वाटलं, आमदार साहेबांना पत्रिका दिली, त्यांनी दोन शुभेच्छा दिल्या, तर मुलालाही आनंद होईल. त्यासाठी नामदेव सकाळीच साहेबांच्या बंगल्यावर जाऊन बसला होता. साहेब बाहेर आले, पण त्या गर्दीत नामदेवला भेटताच आलं नाही. ते गाडीत बसून कुठेतरी जायच्या तयारीत होते. पुढे होऊन हातातली पत्रिका उंचावत तो म्हणाला, “साहेब, मुलाचं लग्न आहे… पत्रिका द्यायची होती…” आमदार साहेबांनी एक क्षण त्याच्याकडे पाहिलं की नाही, ते समजलंच नाही. ते फक्त म्हणाले, “आज खूप मोठा दौरा आहे. मी उद्या किंवा परवा फ्री असेन.…

Read More

भाग – 1 मोठ्ठं, नक्षीदार कमानीचं लोखंडी गेट आणि समोर भव्य आवार. गेटच्या समोर दोन-तीन अलिशान पांढऱ्या शुभ्र गाड्या आणि आवारात इकडून तिकडे फिरणारे कार्यकर्ते. मोबाइलवर बोलणारे कांजीच्या खादी कपड्यातले काही नेते आणि धावपळ करणारे खाकी वर्दीतले नोकर. शिट्या वाजवणारे वॉचमन आणि हातातल्या रंगीत फाईली सावरत इकडून तिकडे फिरणारा पीए. ‘आमदार साहेब बाहेर कधी येतील,’ असे वारंवार विचारणारे लोक… सगळीकडे सगळ्यांचीच लगबग आणि गडबड. ही गर्दी न्याहाळत त्या गेटजवळ उभा राहिलेला नामदेव मात्र शांत होता. त्याच्या अंगावर धुतलेला, पण फिकट झालेला पांढरा शर्ट होता. कमरेला जुनी पॅन्ट होती. पायात घासून झिजलेल्या चपला होत्या. डोक्यावर उन्हाचा तडाखा लागू नये म्हणून खांद्यावर…

Read More

दिवस उगवायला ते घराबाहेर पडणार होते. तसं कालच ठरलं होतं. परंतु सकाळचे नऊ-साडेनऊ झाले तरी काही हालचाल नव्हती. बाहेर रखरखीत ऊन पडलं होतं. खरं म्हणजे बंटी शेठचा घरातनं पाय निघत नव्हता. न राहून ड्रायव्हरने दोन वेळा हॉर्न वाजवला. दारात गाडी येऊन बराच वेळ झाला होता. तरीही बंटी शेठ घरातून हालत नव्हते. रंगू पुढे झाली आणि झटक्याने म्हणाली, “कोर्ट बंद झाल्यावर वकिलांकडे जायाचं आहे का? आठ दिवस झालं चाललंय… आज जाऊ, उद्या जाऊ… आज तरी जायाचं हाय का न्हाय?” बंटी शेठ पटकन उठले. त्यांनी पान खायची पिशवी बरोबर घेतली. चपचपीत तेल लावलेल्या केसावर कसा तरी कंगवा फिरवला. अंगणात उभ्या असलेल्या पांढऱ्या…

Read More

भाग – 2 स्कॉर्पिओने वळण घेतलं आणि एका हॉटेलसमोर गाडी थांबली. महेशराव विचारांच्या तंद्रीतून बाहेर आले. शरद नाना म्हणाले, “वॉशरूमला जाऊया. थोडा चहा घेऊया… म्हणजे फ्रेश वाटेल.” टेबलवर चहा आला सर्वजण चहा घेऊ लागले. चहा घेत घेत महेशराव म्हणाले, “हे स्थळ घेरडीच्या विलास नानाने सुचवले आहे. त्याने स्वतः जाऊन खात्री केली आहे. मुलीचं नाव वैशाली आहे. वडील किराणा दुकानात अकाऊंटंट आहेत. आई शेतमजुरी करते. मुलगी बी.ए. झालेली आहे. बोलण्यात गोडवा आहे. वागण्यात साधेपणा आहे. अत्यंत मनमिळाऊ आहे. रोज संध्याकाळी आजी-आजोबांच्या फोटोसमोर दिवा लावल्याशिवाय घरी कोणी जेवत नाहीत. वारकरी संप्रदायाचा वारसा आहे. अत्यंत सुसंस्कृत कुटुंब आहे. त्यामुळे गेल्या वेळेसारखा आपल्याला अनुभव…

Read More

भाग – 1 “हल्ली मुलींच्या आई-वडिलांना नेमकं काय झालंय, हेच समजेनासं झालंय. मुलीचं लग्न ठरवताना त्यांच्या अपेक्षा इतक्या वाढलेल्या असतात की, मुलाचे डोळे पांढरे व्हायची वेळ येते. जावयाला सरकारी नोकरी हवी. फक्त नोकरी नव्हे, तर मोठ्या पदावरची हवी. पगार भरपूर हवा. गावाकडे जमीन हवी. शहरात फ्लॅट हवा. चार चाकी गाडी हवी. भविष्यात अजून मोठं पद मिळणार, याची खात्री हवी. आई-वडिलांपासून वेगळं राहण्याची तयारी हवी. मुलगा नम्र, आज्ञाधारक आणि मुलीला ‘राणी’सारखं ठेवणारा हवा. मुलीच्या माहेरच्यांनी त्याच्या स्वाभिमानावर रोज पाय ठेवला तरी, तो हसतमुख रहायला हवा! एकूणच काय तर मुलीच्या आई-वडिलांना मुलगा नको असतो… त्यांना एक ‘पॅकेज’ हवं असतं. बरं, पॅकेज तर…

Read More