Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: प्रदीप केळुस्कर
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कुडाळ तालुक्यातील पाट गावात वास्तव्य. स्वतःचा व्यवसाय आणि बागायती असून गेल्या पाच वर्षांत 120 कथा लिहिल्या. आतापर्यंत तीन कथासग्रह प्रकाशित झाले असून स्वतःचे युट्यूब चॅनेल आहे. त्यावर सर्व कथा आपल्या आवाजात रेकॉर्डिंग केल्या आहेत. मोबाइल – 9307521152 / 9422381299
उत्तरार्ध त्या दिवशी स्नेहल, पार्वती आणि रंभा यांनी ठरवले, घराचे काम सुरू करण्याआधी मुंबादेवीला नमस्कार करून येऊ. म्हणून तिघींनी महालक्ष्मी स्टेशनवर जमायचे ठरविले. स्नेहल गोरेगावहून निघाली. तिने पार्वतीला फोन केला, तेव्हा तिला कळले ती पण मुलुंडवरून निघाली आहे. रंभा माहीममध्ये राहत होती… ती पण निघाली. सकाळी अकरा वाजता तिघी मैत्रिणी महालक्ष्मी स्टेशनवर दोन नंबर प्लॅटफॉर्मवर भेटल्या. प्लॅटफॉर्मवरील गर्दी कमी होताच, तिघी जिना चढायला लागल्या. पुढे रंभा, मधे पार्वती आणि तिच्या मागे स्नेहल अशा पायऱ्या चढता चढता पाचव्या पायरीवर असताना स्नेहलच्या छातीत कळ आली आणि गडगडत खाली जाऊ लागली… मागून येणाऱ्या माणसाने तिला अडवले आणि तो ओरडू लागला… “गिर गयी.. गिर…
पूर्वार्ध स्नेहल ऑफिसला जायची तयारी करत होती. आता हा शेवटचा महिना नोकरीचा. एक एक दिवस संपतोय, आता काही शेवटचे दिवस… पस्तीस वर्षांच्या नोकरीत दहा शाखांमध्ये बदली झाली, पण मुंबईतल्या मुंबईत. बाहेर ती गेली नाही, बढती होती पण नाकारली. आता पुढे काय करायचे? नोकरी धंदा न करणाऱ्या बायका घरी काय करतात? कसा वेळ घालवतात? याचा स्नेहलला प्रश्न पडे. आता तिच्यावर ही वेळ आली होती. महिन्यानंतर आपणही घरीच. नवरा दोन वर्षांपूर्वी निवृत्त झालाय. पण त्याचा वेळ जातो मजेत… एकतर महिन्यातले दहा दिवस तो गावी असतो, इथे असतो तेव्हा त्याचे मित्रमंडळ… कुठे कुठे ट्रिप्स सुरू असतात त्याच्या… शिवाय नाटकावर प्रेम! त्या लाइनमधली अनेक…
विनायकचे मंदाशी लग्न झाले आणि मंदा परबांची सून म्हणून आमच्या गावात आली. खरंतर, विनायक नीलाशी लग्न करणार, असा सर्वांचा अंदाज होता; कारण कुठल्या कुठल्या जत्रेत दोघे फिरताना दिसत होती. नीला विनायकच्या दुकानात बऱ्याच वेळा दिसे आणि कारण नसताना त्याच्याशी हसत बोलत असे. त्यामुळे माझ्यासकट सर्वाना वाटतं होते, विनायक नीलाशी लग्न करेल, पण अचानक एक दिवस बातमी आली, विनायकचे लग्न ठरले… पण नीलाशी नाही तर तालुक्याच्या गावातील कुणा दुसरीबरोबर! माझी पत्नी पण आश्चर्यचकित झाली. तिला ही बातमी समजली तेंव्हा ती मला म्हणाली, “काय चल्ला तुमच्या मित्राचा? एका मुलीक फिरवल्यानं आणि दुसऱ्याबरोबर पाट धरता?” “आसता बाये एखाद्याचा नशीब… तेंका होयो तितके बायलो…
उत्तरार्ध पंधरा दिवसात पांडूच्या लग्नाची पत्रिका आली, पांडूचा फोन पण आला. लग्न कोलगांवला होते. मी आणि दाजी लग्नाला गेलो. पांडूकडून लग्नाला फक्त मित्र नंदू आणि पत्नी तसेच आम्ही दोघे. सगळे मिळून 20 ते 25 माणसे. लग्न लागले, आम्ही आहेर केला. पांडूची चेष्टामस्करी केली आणि निघालो. पांडू आज गृहस्थाश्रमाला लागला. आता निदान दोनवेळचे जेवण मिळेल. त्याच्या बर्यावाईट प्रसंगात त्याच्या सोबत राहणारी धर्मपत्नी मिळाली, चला चांगले झाले… पंधरा दिवसांनंतर नंदूचा फोन आला, म्हणाले – “तुमच्या मित्राचे काहीतरी बिघडले आहे. काही बोलत नाही. परवा दुकानात आला, तो पाच-सहा सिगारेटी ओढत बसला. तुम्ही येऊन जा.” मी म्हटले “अजून याच्यामागचे कष्ट, हाल संपत नाहीत काय?”…
पूर्वार्ध इयत्ता तिसरीचा वर्ग सुरू होता. गुरुजी हजेरी घेत होते. एवढ्यात दरवाज्याकडे एक मुलगा पाठीवर दप्तर घेऊन उभा असलेला दिसला. गुरुजींनी त्याच्याकडे पाहिले आणि ‘आत ये’ म्हणाले. तो मुलगा आत आला, जुनी ठिगळं मारलेली खाकी पँट आणि सदरा, बारीक केस आणि थोडीशी शेंडी असा अवतार होता. कदाचित एक-दोन महिन्यांपूर्वी त्याची मुंज झालेली असावी. गुरुजी आम्हा मुलांना म्हणाले, “हा एक नवीन विद्यार्थी आपल्या वर्गात आला आहे.” त्याच्याकडे बघून म्हणाले, “हं! काय नाव तुझे? कुठून आलास? या आधी कुठल्या शाळेत होतास?” तो मुलगा मान वर करुन म्हणाला, “मी पांडुरंग वसंत दामले. गाव कलंबिस्त, ता. सावंतवाडी.” गुरुजी म्हणाले, “बरं, बरं, म्हणजे बांद्याजवळ. मग…
नरू जोरात सायकल चालवत होता, त्याच्या पाठीमागे शिऱ्या बसला होता. शिऱ्या घड्याळ बघत म्हणाला, “साडेसहा वाजले की रे, जोरात घे…” “घेतो रे, पन चढ हाय न्हवं…” “अरे, सात वाजले की सर दरवाजा बंद करत्यात… जल्दी.” नरूने जोरात सायकल घेतली आणि पावणेसात वाजता सायकल हॉलच्या पायऱ्याला लावली. दोघे घाम पुसत उभे राहिले. लहानशी वाऱ्याची झुळूक आली, त्याने त्या दोघांना बरे वाटले. मग नरूने हळूच हॉलचा दरवाजा ढकलला… हॉलमध्ये जयवंत सर खुर्चीत बसून पुस्तक वाचत होते. त्यांच्यासमोर, बाकावर आठ मुले आणि चार मुली, दोन वयस्क पुरुष आणि एक वयस्क स्त्री पण बसली होती. नरू आणि शिरीष आत जाऊन एका बाकावर बसले… सात…
गाडी पुण्याच्या दिशेने धावत होती. ड्रायव्हर जयदेव सोडून बाकी तिघेजण भयंकर तणावाखाली होती. ड्रायव्हरच्या बाजूला डॉ. जगदाळे बसले होते. मागील बाजूला त्त्यांची पत्नी विजया आणि मोठी मुलगी अश्विनी बसली होती. सर्वजण उसासे टाकत होती. डॉक्टर सतत मोबाइलवर कुणाशीतरी बोलत होते. मागील बाजूला अश्विनी पण मोबाइलवर हळूहळू बोलत होती… विजयाबाई फक्त हुंदके देत होत्या. डॉ. जगदाळे यांचा मुलगा, हेरंबचा ॲक्सिडेन्ट झाला होता. कॉलेजवरून रूमवर येताना मोटरसायकल स्लिप झाली होती आणि मागून येणाऱ्या ट्रकच्या चाकाखाली त्याचे पाय चिरडले होते. तो रुबी नर्सिंगमध्ये ॲडमिट होता आणि तातडीचे ऑपरेशन सुरू होते.. रात्री विजयाबाई आणि अश्विनी जेवत असताना पुण्याच्या पोलीस स्टेशनवरुन फोन आला. विजयाबाई तर…
आपा मास्तर नेहमीच्या दुकानात उभे होते. दुकानात गर्दी होती. आज संक्रात, हळदीकुंकू प्रत्येकाकडे असतेच. त्यामुळे गूळ, तीळ, साखर घ्यायला गर्दी झाली होती. आपा मास्तरनी पावं किलो साखरेचे तिळगूळ मागितले. दुकानातला आगाऊ नोकर मास्तरना म्हणाला, “असा काय मास्तर, सासवेसुनेक मिळान फक्त पाव किलो तिळगूळ?” दुकानदाराने हे ऐकले आणि तो ओरडला, “तुकाराम…” तुकारामने जीभ चावली आणि त्याने मास्तरांना हात जोडले. मास्तरांनी त्याला हात दाखवला… आणि ते मालकाकडे गेले. मालक म्हणाला, “राग मानू नकात गुरुजी… तो जरा जादा आसा.” मास्तर म्हणाले, “तेची तरी काय चूक! एवढी तरूण सून घरात दिसता म्हणून तेना विचारल्यानं.” मास्तर घरी निघाले. हळदीकुंकूचे दिवस आले की, ते बेचैन व्हायचे.…
भाग – 2 नंदा… म्हणता म्हणता मी बारावी झाले आणि रत्नागिरीस डीएडची ॲडमिशन घेतली. आप्पा मला रत्नागिरीस घेऊन गेले, तेव्हा माझ्या लक्षात आले, रत्नागिरीत सुद्धा आप्पांच्या किती ओळखी? अगदी एसटी स्टॅण्डवर सुद्धा लोक आप्पांशी बोलायला येत होती… आम्ही ज्या लॉजवर राहिलो एक रात्र, तेथे पण आप्पांना मोठं मान…! कॉलेजमध्ये ॲडमिशनसाठी पोहोचलो तेथील क्लार्क आप्पांना ओळखत होते, त्यांनी भरभर आमची कामे केली. नाट्यप्रेमाने आणि भजनी गाण्याने आप्पांनी माणसे जोडली होती. आप्पांचे नाट्यप्रेम आणि भजनप्रेम जोरात होते, त्यांनी पंचक्रोशीतील धडपड्या तरुणांना एकत्र करून नाटके सुरू ठेवली… आमच्या गावात नोकरीनिमित्त आलेल्या दोन बाई पण नाटकात भाग घेऊ लागल्या आणि आप्पा बाळ कोल्हटकरांची, मधुसूदन…
भाग – 1 माझी शाळा सुटली तशी मी धावतच घरी आले. बाकी वर्गातील मुले रेंगाळत रेंगाळत येत होती मागाहून… पण मला घाई होती. दूध पिऊन आप्पांसोबत देवळात जायचे होते. आमच्या घराच्या पानंदीजवळ आप्पाच दिसलें. काठीने आमच्या काळू आणि सैना या गाईना हाकवत गोठ्याकडे नेत होते. मला पहाताच आप्पा म्हणाले, “नंदा, धावतेस कशाला? कोण पाठी लागलंय?” मी म्हटलं, “अहो आप्पा, तुमच्याबरोबर देवळात यायचंय, रोजच येते ना मी!” आप्पा हसून म्हणाले, “होय बाई, मला माहात होते पण गमतीने विचारलं.” मी धावत धावत घरात घुसले आणि दप्तर कोपऱ्यात ठेवले. घरात गेले तर आईने नुकतेच चुलीवरून दूध उतरवून ठेवले होते. चुलीच्या बाजूला ठेवलेल्या फडक्याने…

