Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Team Avaantar
दर्शन कुलकर्णी कालाष्टमी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष भारतीय क्रिकेटर विजय हजारे टीम अवांतर भारताला पहिली टेस्ट मॅच ज्यांनी जिंकवून दिली होती, त्या भारतीय क्रिकेटर विजय सॅम्युएल हजारे यांचा जन्म 11 मार्च 1915 रोजी सांगली येथे झाला. देवासचे महाराजा विक्रम सिंग यांनी ऑस्ट्रेलियाचे दिग्गज फिरकीपटू क्लॅरी ग्रिमेट यांना भारतात बोलावले होते. त्यावेळी मध्यमगती गोलंदाजी किंवा थोडीफार लेगस्पिन गोलंदाजी करणाऱ्या विजय हजारे यांच्यावर ग्रिमेट यांची नजर पडली. त्यांना हजारे यांची फलंदाजी अधिक आवडल्याने त्यांनी हजारे यांना फलंदाजीवर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले. ग्रिमेट यांचा सल्ला मानून हजारे यांनी फलंदाजीवर मेहनत करण्यास सुरुवात केली. क्रिकेटर म्हणून वयाच्या 18 व्या वर्षीच त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात…
डॉ. अस्मिता हवालदार प्रतिभा कणेकर लिखित ‘इरावती कर्वे : भारतीय मानवशास्त्राच्या प्रांगणातील आद्य दीपमाळ’… पुस्तकाचे नाव लांबलचक असले तरी सार्थ आहे. 2025मध्ये जानेवारी महिन्यात पहिली आवृत्ती निघाली आणि लगेच ऑगस्टमध्ये दुसरी सुद्धा आली. मुखपृष्ठावर इरावती बाईंचा सुंदर प्रसन्न हसरा फोटो आहे. लेखिकेची भाषा ओघवती आहे. इरावती बाईंचे संशोधन सोपे करून, समजेल अशा भाषेत सांगितले आहे. लेखिकेचे मनापासून आभार. इरावती कर्वेंबद्दल मला कुतूहल वाटत होतं, ते पुरातत्वाच्या अभ्यासक होत्या म्हणून! त्यावेळी हा विषय लोकांना माहीत नव्हता. आजही ते पुरेसे गांभीर्याने घेतले जात नाही. मी या विषयात पदविका अभ्यासक्रम केला, त्यावेळी याचे महत्त्व अधिकच लक्षात आले. इरावतीबाईंबद्दल बापलेकी पुस्तकात त्यांच्या दोन्ही मुलींनी…
दिलीप कजगांवकर गेल्या महिन्यात जयपूर–दिल्ली फ्लाइटमध्ये मला एक छान सोबत लाभली. आधुनिक राहणी, आवाजात माधुर्य, प्रसन्न आणि आकर्षक व्यक्तिमत्त्व असलेल्या तरुणीचे. मीच बोलत होतो; तिकडून फक्त “हो का”, “अरे वा”, “छानच”, “सुरेख” — आणि तरीही ती ऐकत आहे, याची खात्री देणारे प्रतिसाद. मी फोन नंबर मागितला, त्याला स्पष्ट पण गोड नकार. तरीही, मी कागदावर लिहून दिलेला माझा नंबर तिने पर्समध्ये हळूच ठेवला. तेही नसे थोडके! लगेज बेल्टवर आलेली तिची बॅग मी उचलून तिला सुपूर्द केली. ती — थँक्स, मी अबोली. मी — अगदी नावाप्रमाणे. अबोली लाजली. मी — मी प्रशांत. ती — नावाप्रमाणे अजिबात नाही. दोघेही खळखळून हसलो. ती —…
रोजच्या जेवणात वेगळेपणा आणण्याचा प्रयत्न गृहिणींचा असतो. यासाठी काही नवनवीन प्रयोग केले जातात… असेच काही प्रकार ‘फूड कॉर्नर’मध्ये देत आहोत. व्हेजिटेबल सूप, मेथीची उसळ, गाजराची कोशिंबीर बनविताना या टिप्स वापरून पाहा. हेही वाचा – Kitchen Tips : लाल भोपळ्याचे रायते, कोफ्ता करी, आलू-मटर करताना… हेही वाचा – Kitchen Tips : कोबीचे रायते, कांद्याची कोशिंबीर अन् टोमॅटोचे सूप तयार करताना… तुमच्याही ‘स्पेशल रेसिपी’ किंवा अशा काही ‘किचन टिप्स’ असतील तर, avaantar.recipe@gmail.com या ईमेलवर किंवा 9869975883 या व्हॉट्सॲप क्रमांकावर पाठवा. या वेबसाइटच्या ‘फूड कॉर्नर’ या कॅटेगरीत त्या प्रसिद्ध केल्या जातील. (‘सुगरणीचा सल्ला’ पुस्तकातून साभार)
डॉ. किशोर महाबळ स्नेहसंमेलनाचे दिवस आले की, शिक्षक सहसा शाळेतील नेहमीच नाटकात भाग घेणारे विद्यार्थी घेऊन दोन-चार नाटके बसविण्याची तयारी सुरू करतात. अगदीच नाईलाज झाला तर, काही नवे कलाकार शोधले जातात. बहुतांश विद्यार्थ्यांना नाटकात भाग घेताच येणार नाही, असा सहसा शिक्षकांचा समज असतो. खरेतर, अनेक वर्ग असलेल्या प्रत्येक शाळेत बरेच विद्यार्थी नाटकात भाग घेण्याच्या योग्यतेचे असतील, पण असा शोधच घेतला जात नसल्याने नवे कलाकार सापडत नाहीत आणि त्यामुळेच सर्व विद्यार्थ्याना नाटकात भाग घेण्याची कधीच संधी मिळत नाही. अशी संधी देण्याचा प्रयत्नही होत नाही. बहुतांश विद्यार्थी हे नाटकात भाग घेण्याच्या अनुभवाला मुकतात. काही विद्यार्थ्यांमध्ये उपजतच उत्तम नाट्यकलाकार होण्याचे गुण असतात, हे…
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय नववा अगा मी एकुलाणीचें खागें । मज येवों ये भलतेनि मार्गें । भक्ती कां विषयें विरागें । अथवा वैरें ॥470॥ म्हणोनि पार्था पाहीं । प्रवेशावया माझां ठायीं । उपायांची नाहीं । केणि एथ ॥471॥ आणि भलतिया जाती जन्मावें । मग भजिजे कां विरोधावें । परि भक्त कां वैरिया व्हावें । माझियाचि ॥472॥ अगा कवणें एकें बोलें । माझेपण जऱ्ही जाहालें । तरी मी होणें आलें । हाता निरुतें ।।473॥ यापरी पापयोनीही अर्जुना । कां वैश्य शूद्र अंगना । मातें भजतां सदना । माझिया येती ॥474॥ किं पुनर्ब्राह्मणा: पुण्या भक्ता राजर्षयस्तथा । अनित्यमसुखं लोकमिमं प्राप्य भजस्व माम् ॥33॥…
दर्शन कुलकर्णी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष समाजसुधारक अप्पासाहेब पटवर्धन टीम अवांतर कोकणचे गांधी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समाजसुधारक सीताराम पुरुषोत्तम तथा अप्पासाहेब पटवर्धन यांचा जन्म 4 नोव्हेंबर 1894 रोजी आगरगुळे, रत्नागिरी येथे झाला. अप्पासाहेब पटवर्धन यांचे प्राथमिक शिक्षण रत्नागिरीत झाले. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी ते पुण्यात आले. मुंबई विद्यापीठातून तत्त्वज्ञान विषयात एम.ए. केल्यावर त्यांनी फर्ग्युसन कॉलेजात 1917–18 या काळात एक वर्ष प्राध्यापकी केली. तत्पूर्वी, मुंबईत 1916 मध्ये झालेल्या काँग्रेसच्या अधिवेशनाच्या वेळी अप्पासाहेबांना गांधीचे पहिल्यांदा दर्शन झाले होते. 21 वर्षांचे अप्पासाहेब गांधींचे विचार ऐकून इतके भारावून गेले की, त्यांनी नोकरी सोडली आणि ते पूर्णकाळ समाजकार्य करण्यासाठी गांधींच्या आश्रमात दाखल झाले, आणि गांधीजींचा…
नमस्कार, मी अभिनेत्री हर्षा गुप्ते पुन्हा एकदा तुमच्या भेटीला. माझ्या आयुष्यातली हीरोइन म्हणजे माझी मोठी आई. म्हणजे आप्पांची (बाबा) आई. तशा मला दोन मोठी आई. एक आप्पांची आई आणि एक मामाची, म्हणजे आईची आई. आजची उत्सवमूर्ती आहे, आप्पांची मोठी आई, म्हणजे इंदिराबाई वसंतराव नाईक. तिच्याबद्दल नाईकांची ‘इंदिरा गांधी’ असे बरेच जण बोलायचे. आप्पाई असे माझा मुलगा तिला म्हणायचा. काळा नाही, पण गडद सावळा रंग. खूप देखणा चेहरा. अतिशय हुशार (फक्त प्राथमिक शिक्षण; लिहता-वाचता येईल एवढंच). रोज वर्तमानपत्र वाचलंच पाहिजे, हा दंडक. राजकारणावर अगदी हिरीरीने बोलायची. स्वातंत्र्यपूर्व काळात प्रभात फेरीमध्ये देशभक्तीपर गाणी गात फिरायची. न शिकता उत्तम हार्मोनियम वाजवायची… सकाळी उठल्यावर…
सतीश बर्वे मी नेहमीप्रमाणे हॉस्पिटलमध्ये पोहोचलो. दुसऱ्या मजल्यावरच्या नितीनच्या खोलीत प्रवेश केला. नितीन माझा जवळचा मित्र. जवळपास दीड महिन्यांपूर्वी याच हॉस्पिटलमध्ये जखमी अवस्थेत दाखल झाला होता. रात्रीच्या वेळी ऑफिसमधून घरी परतत असताना रस्त्यावरील खड्डे चुकवताना त्याच्या मोटरसायकलची एका ट्रकसोबत जोरदार टक्कर झाली. नशीब बलवत्तर म्हणून थोडक्यात बचावला होता तो. नितीन ॲडमिट झाल्यावर साधारण आठवडाभराने त्या खोलीत सहरुग्ण म्हणून 25 वर्षांचा अशोक दाखल झाला होता, अशाच काहीशा अपघाताचं निमित्त होऊन. पण नितीनच्या मानाने अशोक खूपच सुदैवी होता जखमांच्या बाबतीत. नितीनच्या बेडजवळच्या खुर्चीवर मी बसलो, इतक्यात नितीनने खुणेनेच मला अशोककडे बघायला सांगितले. एरवी मी खोलीत शिरता क्षणी ‘गुड मॉर्निंग चाचू’ असं माझं…
पराग गोडबोले “आई काय दिलंय आज डब्यात?” मी अगदी उत्सुकतेनं विचारलं आईला आणि आई म्हणाली, “अगं, आलू पराठे आणि दही दिलंय. सोबत एक केळं पण आहे. न विसरता खा.” “दादाला काय दिलंय?” “तुला जे दिलंय, तेच त्यालाही दिलंय. त्याला एक जास्त दिलाय पराठा, एवढंच.” “बरं” म्हणाले मी, पण आईच्या नकळत दोघांचे डबे उघडून बघण्याचा मोह मला आवरला नाही. दोघांच्याही डब्यात पराठेच होते, पण माझ्या डब्यातले दोन पराठे थोडेसे करपलेले होते. दादाचा डबा उघडला आणि त्यात डोकावून बघितल्यावर, सगळे पराठे अगदी छान, व्यवस्थित भाजलेले, सुबक दिसत होते. “आई, लगेच इकडे ये. काहीतरी विचारायचंय तुला…” मी आईला हाक मारली. “अगं, का एवढा…

