Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
What's Hot
Author: Team Avaantar
वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली. अध्याय चौथा आजि श्रवणेंद्रिया पिकलें । जे येणें गीतानिधान देखिलें । आता स्वप्नचि हें तुकलें । साचासरिसें ॥1॥ आधींचि विवेकाची गोठी । वरी प्रतिपादी कृष्ण जगजेठी । आणि भक्तराजु किरीटी । परिसत असे ॥2॥ जैसा पंचमालापु सुगंधु । कीं परिमळु आणि सुस्वादु । तैं भला जाहला विनोदु । कथेचा इये ॥3॥ कैसी आगळिक दैवाची । जे गंगा वोळली अमृताची । हो कां जपतपें श्रोतयांची । फळा आली ॥4॥ आतां इंद्रियजात आघवें । तिहीं…
दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 05 ऑक्टोबर 2025; वार : रविवार भारतीय सौर : 13 आश्विन शके 1947; तिथि : त्रयोदशी 15:03; नक्षत्र : शततारका 08:00, पूर्वा भाद्रपदा 30:15 योग : गंड 16:33; करण : गरज 25:47 सूर्य : कन्या; चंद्र : कुंभ 24:45; सूर्योदय : 06:29; सूर्यास्त : 18:25 पक्ष : शुक्ल; ऋतू : शरद; अयन : दक्षिणायन संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127 वेद कन्सल्टन्सी / 9987433660 हेही वाचा – …अन् एक वर्तुळ पूर्ण झाल्याचा आनंद! दिनविशेष माजी कसोटीपटू माधव आपटे टीम अवांतर माजी कसोटीपटू माधव लक्ष्मणराव आपटे यांचा जन्म 5…
डॉ. प्रिया गुमास्ते आयुर्वेदिक फिजिशियन आणि कॅन्सर कन्सलटन्ट वर्षा हा मोहक पावसाचा ऋतू श्रावण आणि भाद्रपद महिन्यांत भारतीय उपखंडात पसरतो. (Mid-June to Mid-September). वर्षा ऋतू हा जलतत्वाशी संबंधित आहे. हा पोषण, पुनरुज्जीवन आणि परिवर्तनाचा काळ आहे. या ऋतूमध्ये वातावरण आणि पर्यावरणाच्या गुणांमध्ये लक्षणीय बदल होतात, ज्याचा आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. पाऊस हा एक नैसर्गिक शुद्धीकरण करणारा आहे, म्हणून हा ऋतू शुद्धीकरण आणि विषमुक्तीचा काळ मानला जातो. तो वातावरण आणि पृथ्वीवरील विषारी पदार्थ आणि अशुद्धता धुऊन टाकतो. या ऋतूत अनेक औषधी वनस्पतींची लागवड केली जाते. दोष आणि ऋतू वर्षा ऋतू हा काळ वात दोषाच्या प्रकोपाचा असून या…
रविंद्र परांजपे आत्तापर्यंतच्या सर्व लेखांमध्ये आपण निरामय आरोग्य या संकल्पनेबद्दल सविस्तर माहिती घेतली. आता आपण निरामय आरोग्याची वाटचाल आरंभ करणार आहोत… आणि या वाटचालीत आपण निरामय आरोग्याचे विविध पैलू जाणून घेणार आहोत. थोडक्यात, निरामय आरोग्य प्राप्तीसाठी तसेच संवर्धनासाठी आपण काय करावे, तसेच आपण काय करू नये, याबाबत सविस्तर आणि सखोल मार्गदर्शन घेणार आहोत. मार्गदर्शनाचा श्रीगणेशा आपण दिनचर्येपासून करूयात. दिनचर्या म्हणजे काय? दिन म्हणजे दिवस आणि चर्या म्हणजे पथ्ये. सोप्या भाषेत दिनचर्या म्हणजे विहार. थोडक्यात, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण करत असलेल्या सर्व कामांचा समावेश दिनचर्येत होतो. आता आपण ‘सकाळी लवकर उठावे’ या लेखाच्या मूळ विषयाकडे वळूयात. हेही वाचा – निरामय आरोग्यासाठी…
स्वयंपाक बनवताना महिलांना नेहमीच कसरत करावी लागते. अशा परिस्थितीत याच महिला काही नवनवीन क्लृप्त्या वापरतात… याच आहेत. किचन टीप्स. जाणून घेऊयात काही टीप्स – गृहिणींना नॉनव्हेज किंवा रसभाजीसाठी कांद्याची पेस्ट लागते. त्यासाठी तीन-चार कांदे चिरून नंतर ते कढईत भाजून घ्यावे लागतात. भाजल्याने कांद्यातील रस आटतो आणि जीवनसत्त्वे नष्ट पावतात. तसेच चिरणे, भाजणे यात वेळ जातो आणि गॅसही वाया जातो. त्याऐवजी, आपण जेव्हा भातासाठी कूकर लावतो, तेव्हा भाताच्या ताटलीवर कांदे ठेवून द्यावेत. व्यवस्थित उकडले जातात. थंड झाल्यावर त्यांची मिक्सरमध्ये छान पेस्ट होते आणि जीवनसत्त्वेही टिकून राहतात. वेळेची, गॅसची बचत होते आणि रसभाजीला छान चवही येते. मीठ, ओला नारळ, हिरवी मिरची, कोथिंबीर,…
हिमाली मुदखेडकर “आई, माझ्या फिजिक्सच्या सरांनी तुला भेटायला बोलावले आहे…” चिरंजीव घरात येता येता सांगते झाले… “का रे बाबा? काय प्रताप करून ठेवलायस? कालच तर त्यांच्या नावे ॲप्लिकेशन नेलेस ना, माझ्या सहीने… मग आता काय?” “माहिती नाही यार… सगळ्यांनीच दिलं ॲप्लिकेशन…” मला वाटलं, याने केलं असणार काहीतरी किंवा मागच्या पालक सभेत आम्ही हजर नव्हतो म्हणून कदाचित असेल बोलावले! जाऊन तर पाहू, उद्या कळलेच काय प्रगती आहे ते… आधी फोन करून दुसर्या दिवशी सकाळी अकरा वाजताची वेळ ठरवून घेतली.. आणि ठरलेल्या वेळेत पोहोचले… दारावर टकटक करून ‘आत येऊ का,’ असे विचारले… समोरची व्यक्ती साधारण माझ्याच वयाची… रंग सावळा, शिडशिडीत बांधा, उंची…
वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली. अध्याय तिसरा इंद्रियाणि मनो बुद्धिरस्याधिष्ठानमुच्यते । एतैर्विमोहयत्येष ज्ञानमावृत्य देहिनम् ॥40॥ तैसे उपाय कीजती जे जे । ते यांसीचि होती विरजे । म्हणोनि हटियांतें जिणिजे । इहींचि जगीं ॥266॥ ऐसियांही सांकडां बोला । एक उपायो आहे आहे भला । तो करितां जरी आंगवला । तरी सांगेन तुज ॥267॥ तस्मात् त्वमिन्द्रियाण्यादौ नियम्य भरतर्षभ । पाप्मानं प्रजहि ह्येनं ज्ञानविज्ञाननाशनम् ॥41॥ यांचा पहिला कुरुठा इंद्रियें । एथूनि प्रवृत्ति कर्मातें वियें । आधी निर्दळूनि घालीं तियें । सर्वथैव…
दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 04 ऑक्टोबर 2025; वार : शनिवार भारतीय सौर : 12 आश्विन शके 1947; तिथि : द्वादशी 17.09; नक्षत्र : धनिष्ठा 09:08 योग : शूल 19:26; करण : कौलव 28:11 सूर्य : कन्या; चंद्र : कुंभ; सूर्योदय : 06:29; सूर्यास्त : 18:26 पक्ष : शुक्ल; ऋतू : शरद; अयन : दक्षिणायन संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127 शनिप्रदोष वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – दीर्घकाळाच्या त्रासानंतर आता शांती अनुभवता येणार आहे. महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्याची संधी मिळेल. प्रयत्न सुरू ठेवा, तेच आर्थिक अडचणींपासून मुक्तता देतील. अर्धवेळ नोकरीतूनही…
लीना जोशी परुळेकर Hair removal (अनावश्यक केस काढून टाकणे) बद्दल माहिती असणे गरजेचे आहे. कारण, आजकाल बाजारात खूप प्रकार उपलब्ध आहेत आणि कुठला प्रकार आपल्यासाठी उत्तम आहे, हे त्याची माहिती असेल तर ठरवणे सोपे जाते. सगळ्यात प्रसिद्ध असलेला Hair removal चा प्रकार म्हणजे waxing. Waxing हे Painful असले तरी त्याचा परिणाम हा जास्त वेळ राहाणारा असतो. कारण, त्यात केस हे मूळापासून निघतात. ज्यामुळे नवीन केस येण्यास वेळ लागतो. Waxing केल्यावर घ्यायची काळजी म्हणजे, जर waxing केल्यावर लालसरपणा येत असेल तर, बाजारात Aleo Vera Gel मिळते ते सर्वप्रथम लावावे, बर्फ फिरवावा. त्वचा नॉर्मल झाल्यावर त्यावर Astringent वापरावे, कारण त्यात antiseptic property…
प्रणाली वैद्य भाग – 7 रात्रीच्या स्वप्नांमुळे तिघे मात्र विचारात पडले… श्लोक मनातून घाबरलाच होता… पुन्हा असं का दिसावं, असा प्रश्न शौनकला पडला… तर शाल्मली विचारात पडली की, तो राजवाडा, ती खोली अन् त्या लाल वस्त्रात असं काय असावं, जे आपल्यासमोर स्वप्नातून दाखवलं गेलं… शाल्मलीने आपलं स्वप्न बाबांना सांगितलं. ते ही विचारात पडले. “आज जेव्हा देवदत्तला भेटू, तेव्हा मात्र तू हे सर्व त्याच्या कानावर घाल,” असे ते म्हणाले. शाल्मली आणि विश्वासराव वेळेतच घरातून निघाले. निघण्यापूर्वी शाल्मलीने शौनकला कॉल केला, तेव्हा तो आणि श्लोक त्याच्या घरातून निघतच होते… “आम्ही वेळेच्या आतच पोहचतो तेथे…,” असं म्हणून शौनकने फोन ठेवला. डॉक्टर देवदत्त यांनी…

