Author: Team Avaantar

सतीश बर्वे ईमेलवर त्याने फायनल केलेलं त्याच्या नवीन व्यवसायाचे सचित्र ब्रोशर मला पाठवलं होतं वाचायला… त्यासोबत एक ओळ लिहिली होती त्याने ‘Without U  it was Impossible.’ ती ओळ वाचून मला हसायला आलं, कारण त्या दिवसापर्यंत आमच्यातील मैत्री तशीच होती, म्हणजे फक्त नावापुरती. त्यात संवाद नव्हता… विचार नव्हते… स्वतःहून भेटणं नव्हतं… बोलणं नव्हतं… मजा, मस्ती, भंकस असं काहीच नव्हतं… काही कारणाने झालेली ओळख मैत्रीचा मुखवटा धारण करून पुढे चालली होती इतकंच! बाकी काही नाही. त्याच्यात आणि माझ्यात खरंतर काहीच मिळतं-जुळतं नाही. ना स्वभाव, ना आवडीनिवडी, ना मतं! तरी सुद्धा आम्ही मित्र आहोत. ‘आपलंच म्हणणं खरं’ असणाऱ्या स्वभावाच्या माणसांपैकी हा एक अवलिया……

Read More

माधवी जोशी माहुलकर नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदीया, अकोला, अमरावती, बुलढाणा या विदर्भातील काही जिल्ह्यांमधील आपापल्या निरनिराळ्या खाद्यसंस्कृती आहेत. विदर्भाला लागून ज्या राज्यांच्या सीमारेषा आहेत तेथील लोक नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने स्थलांतरीत होऊन विदर्भातील मोठमोठ्या शहरांमध्ये रहायला आले आणि इथलेच होऊन गेलेत. याचमुळे इथे वेगवेगळ्या खाद्यसंस्कृतींची रेलचेल असावी, असे मला वाटतं. ‘तुरीच्या उसळीतील दिवसे’ हे मी नागपूरला रहायला आल्यानंतर प्रथमच ऐकले. यांचा आकार थोडा खोलगट दिव्यांसारखा आहे म्हणून कदाचित यांना ‘दिवसे’ म्हटलं जात असावं. उसळीसाठी साहित्य अख्खे तुरीचे वाळवलेले दाणे – दोन वाट्या मोठा कांदा – 1 लसूण – 5-6 पाकळ्या आले – अर्धा इंच टोमॅटो – 1 (आवडत असेल…

Read More

चंद्रकांत पाटील गेल्या महिन्यातली गोष्ट…. नेहमीप्रमाणे सायंकाळी मी आमच्या ‘मगरपट्टा मार्केट सेंटर’ ला गेलो होतो, तेथे म्हाताऱ्यांचा ग्रुप बसला होता. सगळे ओळखीचे लोक असल्याने त्याना ‘हाय’ करायचं आणि औषधे, भाजी घेऊन परत फिरायचं या उद्देशाने मी त्या ग्रुपकडे गेलो. कुणाला नमस्कार, तर कुणाशी  शेकहॅण्ड करताना लक्षात आले की, प्रभाकर काका जरा गंभीर होऊन बसलेले आहेत… म्हणून मी त्यांना म्हणालो, “काय काका, आज जोडीदार आलेले दिसत नाहीयेत?” “कोण जकाते म्हणताय का?” बाजूला बसलेल्या पवार सरांनी विचारले. “हो, हो…” मी म्हणालो. “अरे, ते जरा आजारी आहेत… त्यांना ‘प्रोस्टेट ग्रंथी’चा त्रास असल्याने त्याना ‘कॅथेटर’ लावला आहे, त्यामुळे ते घरीच आहेत…” “…आणि त्यांचे मित्र…

Read More

वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली. अध्याय तिसरा जैसें मातेचां ठायीं । अपत्या अनवसरु नाहीं । स्तन्यालागूनि पाहीं । जियापरी ॥29॥ तैसें देवा तूतें । पुसिजतसें आवडे तें । आपुलेनि आर्तें । कृपानिधि ॥30॥ तरी पारत्रिकीं हित । आणि आचरितां तरी उचित । तें सांगें एक निश्चित । पार्थु म्हणे ॥31॥ श्रीभगवानुवाच : लोकेऽस्मिन् द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मयाऽनघ । ज्ञानयोगेन सांख्यानां कर्मयोगेन योगिनाम् ॥3॥ या बोला अच्युतु । म्हणतसे विस्मितु । अर्जुना हा ध्वनितु । अभिप्रावो ॥32॥ जे…

Read More

दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 16 सप्टेंबर 2025; वार : मंगळवार भारतीय सौर : 25 भाद्रपद शके 1947; तिथि : दशमी 24:21; नक्षत्र : आर्द्रा 06:45, पुनर्वसू 30:25 योग : वरियान 24:33; करण : वणिज 12:53 सूर्य : कन्या; चंद्र : मिथुन 24:27; सूर्योदय : 06:26; सूर्यास्त : 18:40 पक्ष : कृष्ण; ऋतू : वर्षा; अयन : दक्षिणायन संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127 दशमी श्राद्ध वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस शुभ आणि फायदेशीर ठरेल. अनेक निर्णय तुमच्या बाजूने लागतील, ज्यामुळे आत्मविश्वास आणि उत्साह वाढेल. नोकरी करणाऱ्या…

Read More

दत्तात्रय पांडुरंग मानुगडे ग्रामीण भागामध्ये शाळा कमी शिकलेल्या मुलांची अवस्था मी डोळ्यांनी पाहत होतो. ही मुले सुद्धा रोजगाराचा काहीतरी मार्ग शोधत होते. पण काहींची स्वप्नंच वेगळी होती. त्यापैकीच नंदू, दिलीप, शिवा, एकनाथ! गावामध्ये या चार मुलांना शेती कामाला कोणी शेतकरी सांगत नव्हते. कारण ही मुले चांडाळ चौकडी आहे, हे गावातील लोकांच्या लक्षात आलं होतं. या मुलांचं असं होतं की, ‘थोडे काम करणे आणि टाइमपास जास्त करणे.’ घरातील ज्वारी विकून विड्या ओढणे, नशा करणे आणि गावभर फिरणे हाच यांचा मुख्य उद्योग होता. सकाळ झाली की, घरात चहा पिऊन लक्ष्मीच्या देवळाच्या कट्ट्यावर ही चौकडी येऊन बसत होती. दोन महिन्यांपूर्वी ही चार मुले…

Read More

रश्मी परांजपे मागील लेखात आपण विद्यार्थ्यांप्रती शाळेच्या जबाबदाऱ्यांबाबत प्राथमिक माहिती घेतली. या आणि पुढील काही लेखांत आपण शाळेच्या जबाबदाऱ्या टप्प्याटप्प्याने अभ्यासणार आहोत. शाळेच्या जबाबदाऱ्या म्हणजे पर्यायाने मुख्याध्यापिका, शिक्षिका आणि सेविका यांच्या जबाबदाऱ्या होत. विद्यार्थीकेंद्रित शिक्षणामध्ये या जबाबदाऱ्या जाणून घेताना आपण शालेय व्यवस्थापन, विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी नियोजित उपक्रम, विद्यार्थ्यांची सुरक्षा अशा अनेक बाबींचा विचार करणार आहोत. शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीचा महत्त्वाचा टप्पा म्हणजे विद्यार्थ्यांचा शालेय प्रवेश. आता आपण विद्यार्थ्यांच्या प्रवेशाबाबत शाळेची जबाबदारी या मुद्द्यापासून सुरुवात करूयात. शालेय वर्ष जूनमधे सुरू होते आणि प्रवेश प्रक्रिया साधारणतः जानेवारी / फेब्रुवारी महिन्यात सुरू होते. मुख्याध्यापिकेला प्रवेशाबाबतचे नियोजन एक महिना अगोदर सुरू करावे लागते. यातील काही ठळक…

Read More

आराधना जोशी साहित्य तांदूळ – 1 वाटी हरभरा डाळ – पाव‌ वाटी उडदाची डाळ – पाव‌ वाटी धणे – पाव‌ वाटी जिरे – 2 टेबलस्पून मेथी – अर्धा चमचा तिखट – 1 टेबलस्पून हळद – 1 टीस्पून मीठ – चवीनुसार हिंग – पाव टीस्पून तीळ – 3 टेबलस्पून कणीक – 2 टेबलस्पून तेल – 3 टेबलस्पून (मोहन म्हणून) तेल – वडे तळण्यासाठी कोथिंबीर – अर्धी वाटी (चिरलेली) पुरवठा संख्या : 7 ते 8 जणांसाठी तयारीस लागणारा वेळ : तांदूळ धुवून वाळवून घेण्यासाठी – अर्धा तास भाजून घेण्यासाठी – 10 मिनिटे भरडा काढण्यासाठी – 5 मिनिटे तळण्यासाठी लागणारा वेळ : 15…

Read More

पराग गोडबोले अगदी मागच्याच आठवड्यातली गोष्ट. ठाणे स्थानक ते ऑफिसचा प्रवास, नेहमीचाच… शिस्तीत पुढे सरकणाऱ्या रांगेचा मी एक भाग… पाऊस जास्त नव्हता, तरी सगळं ओलं-चिप्पं वातावरण. आजूबाजूला विविधरंगी छत्र्या आणि रेनकोटसचा कोलाहल… जवळजवळ दहा मिनिटांनी रिक्षा मिळाली. गांधी टोपी घातलेला पोरगेलेसा मराठी चालक होता. खूप बरं वाटलं. मीटर टाकून झोकात निघालो आम्ही ऑफिसच्या दिशेने, रस्त्यावरची पाण्याची थारोळी आणि खड्ड्यांची मालिका चुकवत… थोडं पुढे गेल्यावर चालकाचा फोन वाजला. त्याने रिक्षा रस्त्याच्या कडेला घेतली आणि फोन उचलून बोलू लागला… “आत्ता कसे पैसे पाठवू? पहिलंच भाडं मारतोय आजचं!… थोडा धंदा झाला की पाठवतो…” समोरची व्यक्ती बहुदा काकुळतीला आली असावी, असं एकंदर संभाषणावरून जाणवत होतं.…

Read More

वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली. अध्याय तिसरा ना तरी झकवीतु आहासी मातें । की तत्वचि कथिलें ध्वनितें । हे अवगमतां निरुतें । जाणवेना ॥16॥ म्हणोनि आइकें देवा । हा भावार्थु आतां न बोलावा । मज विवेकु सांगावा । मर्‍हाटा जी ॥17॥ मी अत्यंत जड असें । परी ऐसाही निकें परियसें । कृष्णा बोलावें तुवां तैसें । एकनिष्ठ ॥18॥ देखें रोगातें जिणावें । औषध तरी देयावें । परी तें अतिरुच्य व्हावें । मधुर जैसें ॥19॥ तैसें सकळार्थभरित । तत्व…

Read More