Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    रामनवमी विशेष… कौसल्येचा राम!

    March 26, 2026

    Dnyaneshwari : पैं गा भक्तासि माझें कोड….

    March 26, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 26 मार्च 2026

    March 26, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Thursday, March 26
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » शब्द शब्द जपून ठेव…
    फिल्मी

    शब्द शब्द जपून ठेव…

    Team AvaantarBy Team AvaantarJune 28, 2025No Comments4 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    शब्द
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    यश:श्री

    पूर्वीच्या काळी लता, किशोर, रफी, मन्ना डे, आशा, मुकेश, तलत अशा एकापेक्षा एक गायकांबरोबरच योग्य शब्द वापरणारे गीतकारही होते. त्यामुळे या गाण्यांचे गारुण आजही कायम आहे. आताही चांगली गाणी बनतात, पण त्यातही गुणगुणण्यासारखी किती आहेत? हा खरा प्रश्न आहे. कधी कधी तर केवळ शब्दछल असतो. अलीकडेच एक व्हिडीओ पाहण्यात आला होता. अनुपम खेर यांनी ऋषी कपूर यांच्या घेतलेल्या इंटरव्ह्यूची ही क्लिप आहे. एकाहून एक सरस हिट चित्रपट देणाऱ्या ऋषी कपूर यांना अनुपम खेर यांनी आजकालच्या नवीन गाण्याबद्दल विचारले असता, ते लगेच म्हणाले, ‘आताची गाणी कुठे आहेत, नुसता गोंगाट आहे. कोणीही उठते, गाणे म्हणते… गाणे लिहिते. माझा मुलगा रणबीर याचं काहीतरी एक गाणं आहे – बलम पिचकारी… काय गाणं आहे? काहीच समजत नाही. आजकालची गाणी गुणगुणताही येत नाहीत.’

    ऋषी कपूर यांनी व्यक्त केलेला हा संताप अगदी योग्य म्हणावा लागेल. अशी कितीतरी गाणी आहेत, त्याचे शब्द पटकन कळत नाहीत, त्या गाण्याचे नेमके शब्द काय आहेत, हे हातातल्या मोबाईलद्वारे गुगलमध्ये शोधावे लागतात. याचं उदाहरण द्यायचं झालं तर, ‘Ra.One’ सिनेमातील ‘छम्मक छल्लो…’ गाण्याचं देता येईल. या गाण्यातील पहिले दोन शब्द स्पष्टपणे ऐकायला येतात, पुढे काय आहे, हे मला तरी समजले नव्हते.  तर, ‘एजंट विनोद’ या चित्रपटातील

    ‘बंगले के पीछे है ताला, घुसूँ कहाँ से मैं साला
    लैला की खिड़की खुली है, खिड़की के नीचे है नाला..’

    या गाण्याची काही टोटलच लागत नाही. पण तरीही ती ऐकली जातात. ‘र’ला ‘र’ अन् ‘ट’ला ‘ट’ जोडून केलेली ही गाणी आहेत. ही गाणी शांतपणे ऐकण्यासाठी नसून पार्टी साँग म्हणता येतील.

    पण काही गाणी अशी आहेत की, ऐकताना पटकन लक्षात येत नाही. नंतर समजते. मागे एकदा ‘झी मराठी’वर ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमात अभिनेते संजय मोने आले होते. त्यात त्यांनी एक मजेशीर प्रश्न उपस्थित केला होता. ‘झुक झुक झुक आगीन गाडी..’ या गाण्यात ‘मामाची बायको सुगरण, रोज-रोज पोळी शिकरण..’ अशा ओळी आहेत. पण रोज शिकरण करणारी मामी, सुगरण कशी? असा सवाल संजय मोने यांनी केला होता. अर्थात, ते बालगीत असल्याने त्यात तर्क शोधण्यात काहीही अर्थ नाही… असंच सुरू आहे.

    काल बदलला, भावना बदलल्या

    अनेक वर्षापासून माझ्या मनात असलेल्या गाण्यासंदर्भातील काही गोष्टींनी पुन्हा एकदा डोकं वर काढले. ‘हिमालय की गोद में’ (1965) चित्रपटातील लता मंगेशकर यांनी गायलेले ‘एक तू ना मिला, सारी दुनिया मिली भी तो क्या है…’ हे गाणं कानावर पडलं तर, त्यातला गोडवा आजही मनाला भावून जातो. त्यावेळी सर्वोत्कृष्ट गीतकार आणि सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका हे दोन्ही फिल्मफेअर पुरस्कार या गाण्याने पटकावले होते. त्यानंतर 1980मध्ये झळकलेल्या ‘कुर्बानी’ चित्रपटातील नायिका म्हणते ‘आप जैसा कोई मेरे जिंदगी में आये, तो बात बन जाये…’! म्हणजेच, 15 वर्षांत ‘तूच माझे सर्वस्व’वरून ‘फक्त तूच नव्हे तर, तुझ्यासारखा कुणीही…’पर्यंत भावना पोहोचली होती.

    हेही वाचा – गुजरा हुआ जमाना…

    हीच गोष्ट अभिनेता शम्मी कपूरच्या ‘चायना टाऊन’ची (1962). त्यातील ‘बार बार देखो हजार बार देखो, देखने की चीज है हमारा दिलरुबा..’ हे गाणं सुपरहिट झालं. पण 1981मध्ये प्रदर्शित ‘कुदरत’ या चित्रपटातील ‘हमें तुमसे प्यार कितना..’ या गाण्यानं पिढीतील भावनिक बदल अधोरेखित केले आहेत. (आता ‘व्हॅलेंटाइन डे’ला ‘कुदरत’मधील गाणे जास्त सुपरहिट ठरते.) या गाण्यात ‘तुम्हें कोई और देखे तो, जलता है दिल..’ अशा ओळी आहेत. म्हणजेच आपली ‘दिलरुबा’ सर्वांनी पहावी, ही भावना 20 वर्षांत संकुचित होऊन ‘तिला’ कुणीही पाहू नये, अशी झाली आहे.

    सन 1969 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘दो रास्ते’ या चित्रपटातील ‘छुप गए सारे नजारे…’ या गाण्यात दोन ओळीतच ऋतू बदलल्याचे दिसते. त्या ओळी अशा आहेत –

    अम्बुआ की डाली पे गाए मतवाली
    कोयलिया काली निराली…
    सावन आने का कुछ, मतलब होगा
    बादल छाने का कोई, सबब होगा…

    दस्तुरखुद्द बिग बी अमिताभ बच्चन यांनी ‘अमर अकबर अँथनी’ चित्रपटातील शीर्षक गीताबद्दल सांगितलं होतं. या शीर्षक गीतात आम्ही तिघेही आम्ही कोण आहेत हे सांगतो, तरीही तिथे असलेल्या तमाम खलनायक मंडळींपैकी कोणाच्याही ते लक्षात येत नाही! हे कसे शक्य आहे? चित्रपटाचे निर्माते-दिग्दर्शक मनमनोहन देसाई यांना याबद्दल विचारले असता, त्यांनी अगदी छातीठोकपणे सांगितलं की, तरीही हे गाणं हिट होईल!

    एकूणच, हे शब्दांचे खेळ आहेत की, मनातील भावना किंवा गीतकाराची प्रतिभा… काहीही असू शकते. अर्थातच, शब्दच्छल असलेली गाणी फारच मोजकी आहेत. पण गीतकाराची प्रतिभा दर्शविणारी अनेक गाणी (बहुतांश जुनी) आहेत. एकच उदाहरण देता येईल, ‘तेरे घर के सामने’ या चित्रपटाच्या शीर्षक गीताचं. त्यातील अखेरच्या कडव्यातील ओळी आहेत –

    उल्फत में ताज़ छूटे, ये भी तुम्हें याद होगा
    उल्फत में ताज़ बने, ये भी तुम्हें याद होगा
    मैं भी कुछ बनाऊंगा, तेरे घर के सामने…

    वाचा – असंच काहीसं आवडलेलं…

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    सेटवरच मिळाली खूप मोठी कॉम्प्लिमेन्ट!

    March 24, 2026 फिल्मी

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026 फिल्मी

    माझं बालपण… गिरगाव ते बदलापूर व्हाया कॉटनग्रीन!

    March 3, 2026 फिल्मी
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    फिल्मी

    सेटवरच मिळाली खूप मोठी कॉम्प्लिमेन्ट!

    By हर्षा गुप्तेMarch 24, 2026

    नमस्कार, मी अभिनेत्री हर्षा गुप्ते पुन्हा एकदा तुमच्या भेटीला. ‘सावधान इंडिया’ ही जोरदार चाललेली सीरियल.…

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026

    माझं बालपण… गिरगाव ते बदलापूर व्हाया कॉटनग्रीन!

    March 3, 2026

    एक अकेला इस शहर में…

    February 27, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    रामनवमी विशेष… कौसल्येचा राम!

    March 26, 2026

    Dnyaneshwari : पैं गा भक्तासि माझें कोड….

    March 26, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 26 मार्च 2026

    March 26, 2026

    नीरजचा निर्णय ऐकून राजेश अन् जयूला धक्काच बसला!

    March 26, 2026

    …अन् यमुनाकाकीच्या लक्षात आले, ‘शेवटी आहे कोण?’

    March 25, 2026

    आयुष्यात संवादाचा सेतू खूपच महत्त्वाचा, अन्यथा…

    March 25, 2026

    POPULAR CATEGORY

    • अध्यात्म 248
    • अवांतर 175
    • आरोग्य 91
    • पंचांग आणि भविष्य 362
    • फिल्मी 44
    • फूड काॅर्नर 185
    • मैत्रीण 17
    • ललित 513
    • शैक्षणिक 73

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Advertise

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn