Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    अहंकाराचे समूळ उच्चाटन करणारे सत्यज्ञान

    September 10, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : एक क्षेत्र एक ज्ञान, एक ज्ञेय एक अज्ञान

    September 10, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 10 सप्टेंबर 2026

    September 10, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Thursday, September 10
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » अहंकाराचे समूळ उच्चाटन करणारे सत्यज्ञान
    Blogs

    अहंकाराचे समूळ उच्चाटन करणारे सत्यज्ञान

    डॉ. शिरीष कुलकर्णीBy डॉ. शिरीष कुलकर्णीSeptember 10, 2026No Comments6 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठी साहित्य, मराठी आर्टिकल, मी मराठी, अभिजात मराठी, मराठी कथा, मराठी लेख, अध्यात्म साहित्य, शिरीष कुलकर्णी, अध्यात्मिक शिरीष कुलकर्णी, माया, द्वैत अद्वैत, आद्य शंकराचार्य माया, ज्ञानाचा प्रकाश, आत्मानंदाचा शोध, अहंकाराचे समूळ उच्चाटन, अहंकाराचे उच्चाटन करणारे सत्यज्ञान, सत्यज्ञान
    फोटो सौजन्य - गूगल जेमिनी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    माया / भाग – 3

    अहंकारविनाशेन

    कर्मराशिश्च दह्यते।

    न कर्ता न च भोक्ता च

    परज्ञानं हि बुध्यते॥

    – गीताव्रत

    खरे आणि परिपूर्ण ज्ञान माणसाच्या जीवनात नक्की काय करते, हा आपल्यासाठी आणि अध्यात्मामधला एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. या प्रश्नाचे अचूक उत्तर देताना आद्य शंकराचार्य सांगतात की, सत्यज्ञान माणसाच्या अहंकाराचे समूळ उच्चाटन करते. आपण आयुष्यभर जे काही करत असतो, त्यामागे ‘मी करतो’ हा एक अत्यंत प्रबळ भाव लपलेला असतो. या ‘मी करतो’ या भावनेलाच वेदांतामध्ये ‘अहंकार’ असे म्हटले आहे. जोपर्यंत हा अहंकार जिवंत आहे, तोपर्यंत माणसाने कितीही चांगली किंवा वाईट कर्मे केली तरी त्या कर्मांचे फळ त्याला भोगावेच लागते आणि हेच जन्ममृत्यूच्या फेऱ्याचे मुख्य कारण बनते. पण जेव्हा खऱ्या ज्ञानाचा उदय होतो, तेव्हा तो ‘मी करतो’ हा भावच पूर्णपणे जळून जातो. कर्तेपणाचा अहंकार एकदा का नष्ट झाला की मग अनेक जन्मजन्मांतरापासून साचलेल्या संचित कर्मांच्या प्रचंड राशी एका क्षणात जळून खाक होतात.

    जसे एखाद्या गोदामात वर्षानुवर्षे साठवलेल्या कापसाच्या मोठ्या ढिगाऱ्याला आगीची छोटीशी ठिणगी लागली की, तो संपूर्ण ढिगारा भस्मसात होतो, अगदी तसेच ज्ञानाग्नी कर्मांच्या राशींना जाळून टाकतो. मग तिथे कर्म करणारा असा कोणी कर्ता उरत नाही आणि त्या कर्मांच्या फळांचा उपभोग घेणारा असा कोणी भोक्ताही उरत नाही. असा ज्ञानी मनुष्य बाह्य जगासाठी सर्व कर्मे करत असलेला दिसतो, पण तो आतून पूर्णपणे अलिप्त असतो. जसे कमळाचे पान चिखलात आणि पाण्यात राहूनही कधीच ओले होत नाही, तसा तो संसारात राहूनही पूर्णपणे मुक्त असतो. हेच ते परमज्ञान ज्याची आस प्रत्येक साधकाला असते.

    तीर्थाटनादिभिर्दानैः

    व्रतैर्वापि न शुध्यति।

    विना ज्ञानं कुतो मुक्ति:

    अज्ञानान्नैव बुध्यति॥

    – गीताव्रत

    सामान्य माणूस मुक्ती मिळवण्यासाठी किंवा पुण्य, मोक्ष मिळवण्यासाठी आयुष्यभर अनेक प्रकारचे बाह्य उपाय करत असतो. तो गंगासागरसारख्या पवित्र ठिकाणांची अत्यंत खडतर यात्रा करतो. शरीराला कष्ट देणारी कडक व्रते पाळतो किंवा आपल्या संपत्तीतील मोठा वाटा दानधर्म म्हणून अर्पण करतो. या सर्व गोष्टी नक्कीच चांगल्या आणि पवित्र आहेत, यात शंका नाही; पण शंकराचार्यांनी इथे अगदी स्पष्ट शब्दांत बजावले आहे की, “बाह्य उपायांनी कायमस्वरूपी मुक्ती मिळण्याची कोणतीही शाश्वती नाही. कारण माणसाचे मूळ बंधन हे बाहेर नसून त्याच्या आत असलेल्या अज्ञानात आहे.”

    हेही वाचा – मृत्यूच्या भयापासून कायमचे मुक्त करणारे सत्यज्ञान!

    जर एखाद्या व्यक्तीला अंधारात दिसणाऱ्या आकाराला भूत मानून प्रचंड भीती वाटत असेल आणि ती व्यक्ती त्या भीतीपोटी पळत सुटली तर, ती जगाच्या पाठीवर कुठेही गेली तरी तिची ती भीती कधीच संपणार नाही. ती व्यक्ती तीर्थक्षेत्री गेली तरी, तिथेही तिला ते काल्पनिक भूत सतावेलच. ही भीती तेव्हाच कायमची संपेल, जेव्हा ती व्यक्ती सत्यापासून दूर पळणे थांबवेल, जिथे भास होतो, तिथे थोडा वेळ थांबून लख्ख प्रकाश आणेल आणि स्वतःच्या डोळ्यांनी पाहेल की, ते भूत नसून केवळ एक भास आहे. हे सत्य स्वतः जाणणे, वास्तव समजणे म्हणजेच ज्ञान होय. अध्यात्म सांगते, ज्ञानाशिवाय मुक्ती कधीच आणि कोणत्याही उपायाने मिळू शकणार नाही. जोपर्यंत अज्ञानाचा अंधार आहे, तोपर्यंत जन्ममरणाचे फेरे चुकत नाहीत हे त्रिकालबाधित सत्य आहे.

    ज्ञानोदयक्षणे मुक्तिः

    इहैव न हि संशयः।

    उपनिषदां महाघोषो

    ह्यज्ञानस्य हि संक्षयः॥

    – गीताव्रत

    सत्य आणि ज्ञानाचे सर्वात मोठे आणि विलोभनीय वैशिष्ट्य कोणते असेल तर ते हे आहे की, त्याचे फळ मिळण्यासाठी माणसाला मृत्यूची किंवा पुढच्या जन्माची वाट पाहावी लागत नाही.

    मुक्ती म्हणजे मरणोत्तर मिळणारी कोणती अवस्था नाही. आद्य शंकराचार्य अतिशय ठामपणे सांगतात की, “ज्या अत्यंत पवित्र क्षणी माणसाच्या अंतःकरणात आत्मज्ञानाचा उदय पावतो, अगदी त्याच क्षणी त्याला मुक्ती प्राप्त होते.” मुक्ती कुठलीही वाट पाहायला लावत नाही.‌ मुक्तीसाठी भटकावे लागत नाही. आपण आता जिथे आहोत, तिथेच आणि लगेचच मुक्तीचा अनुभव प्राप्त होतो, यात कोणताही संशय ठेवू नये. वेदांतात याला ‘जीवन्मुक्ती’ असे अत्यंत सुंदर नाव दिले आहे.

    जसे एखादा मनुष्य गाढ झोपेतून अचानक जागा होतो. त्याला जागे होण्यासाठी काही तास प्रयत्न करावे लागत नाहीत, तो क्षणात जागा होतो आणि सुरू असलेल्या स्वप्नातून बाहेर येतो. त्याचप्रमाणे अज्ञानाची झोप उडाल्यावर साधक याच देहात राहून सर्व प्रकारच्या दुःखांतून आणि बंधनांतून एका क्षणात मुक्त होतो.

    उपनिषदांसारख्या महान ग्रंथांनी एका सुरात अतिशय गर्जून महाघोष केला आहे की, “केवळ ज्ञानानेच अज्ञानाचा संक्षय होतो, संक्षय म्हणजे समूळ नाश होतो आणि मुक्ती मिळते.”

    ज्ञान म्हणजे मेंदूत साठवलेली माहिती नव्हे. ज्ञान ही अत्यंत सखोल आणि प्रखर आंतरिक अनुभूती आहे, जी आपले संपूर्ण जीवन पारदर्शी आणि आनंदमय करून टाकते.

    वेदान्तसारं सत्यं हि

    जीवात्मब्रह्मणोर्मतम्।

    तत्प्राप्तौ भवबन्धात्तु

    ज्ञानं भवति शाश्वतम्॥

    – गीताव्रत

    संपूर्ण वेदान्त तत्त्वज्ञानाचा मुख्य विषय म्हणजे हे सत्यज्ञान! वेदान्ताचा मूळ गाभाच हा आहे की, ज्याला आपण आपला छोटासा आणि मर्यादित जीवात्मा मानत आलो आहोत, तो जीवात्मा हा साक्षात ते अनंत आणि अथांग ब्रह्मच आहे. मी आणि परब्रह्म एकच आहोत, ही अत्यंत ठाम खात्री पटणे आणि तसा प्रत्यक्ष अनुभव येणे म्हणजेच खऱ्या अर्थाने वेदान्तज्ञान मिळवणे होय.

    हे ज्ञान एकदा प्राप्त झाले की, मग जन्म आणि मृत्यूच्या या अखंड चालणाऱ्या भवचक्रातून माणूस कायमचा मुक्त होतो. त्याच्याभोवती असलेले अज्ञानाचे आणि कर्मांचे जाळे कायमचे तुटून पडते. ज्याप्रमाणे दोरीचे खरे ज्ञान झाले की, सापाचा भास कायमचा आणि समूळ संपतो आणि प्रकाशात आपण दोरीला दोरीच समजू. दोरी पाहून सापाची भीती वाटणार नाही, तसेच स्वतःच्या खऱ्या स्वरूपाचे ज्ञान झाले की, या मिथ्या संसाराचे बंधन कायमचे तुटते. तो ज्ञानी पुरुष जगातील सर्व व्यवहारात भाग घेतो, हसतो, बोलतो; पण आतून त्याला पक्के माहीत असते की, हे सर्व केवळ एक नाटक आहे आणि तो त्या नाटकाचा केवळ एक साक्षीदार आहे. हे शाश्वत ज्ञान मिळवणे, हेच मानवी जीवनाचे एकमेव आणि अंतिम ध्येय आहे.

    आत्मानुभूतये ज्ञानं

    श्रेष्ठं नास्ति हि साधनम्।

    शिष्यलक्षणसंपन्नः

    प्राप्नोति पदमव्ययम्॥

    – गीताव्रत

    जीवनात स्वतःची खरी ओळख करून घेण्यासाठी म्हणजेच आत्मानुभूतीसाठी ज्ञानासारखे दुसरे कोणतेही श्रेष्ठ साधन आजवर निर्माण झालेले नाही आणि पुढेही होणार नाही. म्हणूनच ज्या साधकाला हे ज्ञान मिळवायचे आहे, त्याने प्रथम स्वतःच्या अंतःकरणात एका खऱ्या आणि उत्तम शिष्याची सर्व लक्षणे अत्यंत जाणीवपूर्वक बाणवून घेतली पाहिजेत. ही लक्षणे कोणती? तर, सर्वप्रथम अत्यंत टोकाची विनम्रता, त्यानंतर इंद्रियांवर आणि मनावर असलेला पूर्ण संयम आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुमुक्षुत्व. मुमुक्षुत्व म्हणजे या भवबंधनातून मुक्त होण्याची अत्यंत तीव्र आणि उत्कट इच्छा. जसे एखाद्या बुडणाऱ्या माणसाला जगण्यासाठी आणि पुन्हा शक्तीनिशी प्रयत्न करण्यासाठी केवळ एक श्वास हवा असतो, तशीच मुक्तीची ओढ साधकाला हवी. ज्याच्या अंगी ही सर्व सद्गुणरूपी लक्षणे आहेत, तोच साधक खऱ्या ज्ञानाचा अधिकारी ठरतो. असे शुद्ध ज्ञान एकदा का प्राप्त झाले की, हा अनंत वाटणारा भवसागर अगदी सहजपणे आणि हसत खेळत पार करणे कठीण राहत नाही.

    जो स्वतःच्या अंतर्यामी दडलेल्या आत्मा आणि परमात्म्याला ओळखतो तोच काळ आणि वेळ यांच्या मर्यादांच्या पलीकडे जाऊन त्या अव्यय म्हणजेच कधीही नष्ट न होणाऱ्या परम पदाला प्राप्त करतो.

    नमामि सद्गुरुं पूज्यं

    सर्वज्ञं ज्ञानभास्करम्।

    अज्ञानसागरे मग्नं

    येनाहं तारितः परम्॥

    – गीताव्रत

    हे सगळे अथांग ज्ञान शिष्याला कोणामुळे प्राप्त होते तर ते कृपाळू सद्गुरूंमुळेच प्राप्त होते. जे स्वतः सर्वज्ञ आहेत आणि जे ज्ञानाचे प्रत्यक्ष सूर्यच आहेत, अशा परमपूज्य गुरुवर्यांच्या चरणी आचार्यांनी अत्यंत विनम्र भावाने प्रणाम केला आहे.

    हेही वाचा – स्वयंपूर्ण आत्मानंदाची प्राप्ती

    गुरू हा असा एक अलौकिक प्रकाश आहे, जो अज्ञानाच्या गडद अंधारात आणि मोहाच्या सागरात पूर्णपणे बुडत चाललेल्या शिष्याला ज्ञानाचा भक्कम हात देऊन सुरक्षितपणे बाहेर काढतो. जसा सूर्य उगवल्यावर अंधाराला निघून जाण्याशिवाय दुसरा कोणताही मार्ग उरत नाही, तसे सद्गुरूंच्या केवळ एका कृपाकटाक्षाने शिष्याच्या जन्मांतरीच्या अज्ञानाचा नाश होतो. सूर्यप्रकाशात जसे काहीही लपून राहत नाही, तसे ज्ञानसूर्याचा उदय झाल्यावर हा सर्व मिथ्या आणि फसवणारा संसार पूर्णपणे निस्तेज आणि अर्थहीन होतो. त्यानंतर मागे उरते ते केवळ अद्वैत! तोच तो निखळ आनंद आणि कधीही न भंग पावणारी परम शांती.

    आद्य शंकराचार्यांनी भारतभ्रमण करून मानव जातीला दिलेला ज्ञानाचा अमूल्य वारसा प्रखर आणि मार्गदर्शक आहे.‌ तो आपल्या प्रत्येकाच्या अंतःकरणाला आत्मिक प्रगतीकडे घेऊन जाणारा आहे. आपणही आपल्या रोजच्या धावपळीच्या जीवनात या ज्ञानाचा छोटासा दिवा आपल्या मनात तेवत ठेवूया… ज्ञान आणि मुक्तीच्या त्या प्रकाशमान वाटेवरून अत्यंत आनंदाने आणि निर्भयपणे वाटचाल करूया!

    क्रमश:
    Avatar photo
    डॉ. शिरीष कुलकर्णी

    डॉ. शिरीष कुलकर्णी M.J. M.B.A.B.A. GDC&A., P.HD.... सहकार प्रशिक्षण केंद्रावर प्राचार्य म्हणून पाच वर्ष सेवा. कथा, कादंबरी, कविता, गझल, आध्यात्मिक चिंतन अशा विविध विषयावर 51 पुस्तके लिहिलेली आहे. कर्णधार हे व्यवस्थापनावरील पुस्तक, चौथा स्तंभ हे पत्रकारितेतील अभ्यासक्रमासाठी आवश्यक असलेले पुस्तक, यासोबत संतसम्राज्ञी, संत सत्संग, विश्वाराधन, सजल, गीताव्रत साधना - 3 भाग प्रसिद्ध, हिंदोळा, अमात्र, नामसाधना, नासदीय, ईशोवास्य, कबीराऽ रे, संपादकीय, माया, ब्रह्मजिज्ञासा, Editorials, luminous thoughts हे इंग्रजी संपादकीय लेखा़चे पुस्तक, किंचितरेषा, साधनारंभ, खराखुरा कर्मयोग, संत मीराबाईंच्या जीवनावर सखोल अभ्यास करून लिहिलेली संत मीराबाईंवरील पहिलीच कादंबरी 'संतसम्राज्ञी'. या कादंबरीचे हिंदी, इंग्रजीतून अनुवादही झालेले आहेत. स्वर्गोपनिषद, वीणा आणि वाणी, गीताव्रत साधना ही पुस्तके विशेष उल्लेखनीय ठरली. संशोधन हा त्यांच्या साहित्यनिर्मितीचा मुख्य आत्मा आहे. सजल या गझल संग्रहास अरुण दाते यांनी प्रस्तावना दिली. बायबल, कुराण आणि भगवद्गीता यावर अभ्यासपूर्ण लेखमाला आणि पुस्तके प्रकाशित झाली. ‘मुस्लिम धर्म आणि अहिंसा’, ‘संत कबीर’, ‘येशू ख्रिस्त आणि अहिंसा’, ‘रूमी आणि अद्वैत सिद्धांत’ या विषयावर लेखन आणि व्याख्याने. 2016नंतर सार्वजनिक जीवनातून निवृत्ती घेऊन साहित्यिक आणि अध्यात्मिक संशोधनासाठी पूर्ण आयुष्य अर्पण करण्याचा निर्णय. महाराष्ट्र पत्रकार संघाचे, मुख्य राज्य संघटक म्हणून सलग पंधरा वर्षं सेवा. चित्रपट कथा-पटकथा, संवाद आणि गीतलेखन. काही चित्रपटासाठी त्यांची गाणी रवींद्र साठे, वैशाली माडे, स्वप्निल बांदोडकर, अभिजीत कोसंबी, वैशाली चितळे, यांनी गायलेली आहेत. 14 चित्रपटांमधून छोट्या-मोठ्या भूमिका. ब्रह्मचैतन्यसाठी कथा-पटकथा आणि संवाद लेखन. कथालेखन, कादंबरी लेखन, कविता लेखनाच्या 40पेक्षा जास्त विनामूल्य कार्यशाळा घेतलेल्या आहेत. अथलेटिक्स असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून वीस वर्षं अविरोध सेवारत. लायन्स क्लब योगा आणि मेडिटेशन टेरिटरी चीफ म्हणून सेवा. दोन मंदिरे, अनाथ आश्रम, शाळा, ग्रंथालये, टेक्सटाइल मिलची उभारणी निरपेक्ष भावनेने विनामूल्य केली. लोकव्रत प्रकाशनाचे मानद सचिव म्हणून वीस वर्षे विनामूल्य सेवा. त्या माध्यमातून आजवर हजारो पुस्तके प्रसिद्ध केली. आजवर 1600हून अधिक मुखपृष्ठे तयार केली आहेत. 1500पेक्षा जास्त संपादकीय लेख आणि वृत्तपत्रासाठी तितकेच लेख लिहिलेले आहेत. अनेक वृत्तपत्रांतून स्तंभ लेखन केलेले आहे. स्त्री मुक्ती, समस्या निवारण केंद्र आणि कामगार चळवळीच्या निमित्ताने यशवंतराव चव्हाण, भाऊ फाटक आणि सर्वोदय चळवळीचा प्रदीर्घ सहवास. भारतातील पहिल्या शासकीय पोलीस ठाण्यातील समस्या निवारण केंद्राचा सेक्रेटरी म्हणून सलग पंधरा वर्षे सेवा. अनेक साहित्य संमेलने, आणि ग्रामीण साहित्य संमेलनाची संकल्पना मांडून ती साहित्य संमेलने यशस्वीपणे पार पाडली. स्त्रीभ्रूण हत्या, नकूसा नामबदल चळवळ, स्वयंसहायता बचत गट चळवळ यासाठी पाचशेहून अधिक बचत गट स्थापनेच्या कार्यक्रमांमध्ये मार्गदर्शन आणि व्याख्याने. पन्नासहून अधिक सामाजिक आणि साहित्यिक पुरस्कार. न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड, दिल्ली यांच्या शुभहस्ते आणि पू. विष्णू महाराज पारनेरकर यांच्या उपस्थितीत 'अक्षर वाड्.मय' पुरस्कार. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे अनुग्रहीत. त्यांच्या सजल या पेजला 75 हजारपेक्षा जास्त फॉलोवर्स आहेत.

    Related Posts

    गुरुजी आराध्याला म्हणाले, “सावध रहा”; कारण…

    April 3, 2026 Blogs
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    Blogs

    गुरुजी आराध्याला म्हणाले, “सावध रहा”; कारण…

    By प्रणाली वैद्यApril 3, 2026

    भाग – 19 निशा हळूवारपणे आराध्याच्या उशाखाली हात घालण्याचा प्रयत्न करत होती… तेवढ्यात एक विचित्र…

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    अहंकाराचे समूळ उच्चाटन करणारे सत्यज्ञान

    September 10, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : एक क्षेत्र एक ज्ञान, एक ज्ञेय एक अज्ञान

    September 10, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 10 सप्टेंबर 2026

    September 10, 2026

    जीवनसंग्राम

    September 9, 2026

    चहाचा कप अन् आठवणी!

    September 9, 2026

    वास्तुशास्त्र आणि नातेसंबंध, पैसा, प्रगती

    September 9, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 2
    • अध्यात्म 428
    • अवांतर 207
    • आरोग्य 145
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 574
    • फिल्मी 66
    • फूड काॅर्नर 255
    • मैत्रीण 28
    • ललित 907
    • शैक्षणिक 87
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    अहंकाराचे समूळ उच्चाटन करणारे सत्यज्ञान

    September 10, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : एक क्षेत्र एक ज्ञान, एक ज्ञेय एक अज्ञान

    September 10, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 10 सप्टेंबर 2026

    September 10, 2026
    Most Popular

    श्वासागणिक नामस्मरण हीच निष्काम साधना

    September 8, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.