Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    दहावी नापास

    June 23, 2026

    संकर्षण… ‘त्या’ स्वप्नाने अनिकेतला दिलं बळ

    June 23, 2026

    असेच कानावर पडलेले संवाद…

    June 23, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Tuesday, June 23
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Mumbai flood : 26 जुलै 2005चा कहर
    अवांतर

    Mumbai flood : 26 जुलै 2005चा कहर

    Team AvaantarBy Team AvaantarJuly 25, 2025No Comments6 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    Mumbai, अवांतर, मराठीकथा, मराठीसाहित्य, मराठीलेखक, Mumbai_Flood, मुंबईपूर, मिठी नदी, पूर, मुंबई
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    आराधना जोशी

    मुंबई (Mumbai) ही देशाची आर्थिक राजधानी मानली जाते. स्वप्ननगरी किंवा मायानगरी म्हणून ओळख असणाऱ्या या शहराने आतापर्यंत अनेक नैसर्गिक आणि मानवनिर्मित आघात सहन केले आहेत. मग ते 1993 चे साखळी बॉम्बस्फोट असोत की 26/11 चा दहशतवादी हल्ला असो किंवा 11 जुलै 2006चे लोकल ट्रेनमधील स्फोट असोत. पण या आघातांनंतरही मुंबई सावरली, पुन्हा उभी राहिली. मात्र, 20 वर्षांपूर्वी 26 जुलैच्या पावसाने संपूर्ण मुंबईत जो काही धुमाकूळ घातला तो विसरणं कदापि शक्य नाही.

    त्यावेळी मी तेव्हाच्या अल्फा मराठी (आताच्या झी मराठी) चॅनेलवरील ‘नमस्कार अल्फा’ या live phone in कार्यक्रमाची संशोधक, समन्वयक म्हणून काम करत होते. दुपारी 12.30चा हा कार्यक्रम असायचा. मात्र त्याची तयारी सकाळी 10 वाजल्यापासून सुरू होत असे. 26 जुलै 2005 या दिवशी देखील अशीच कार्यक्रमाची गडबड होती. त्यामुळे बाहेर किती पाऊस आहे, काय परिस्थिती आहे याचा काहीच अंदाज नव्हता. खरं सांगायचं तर, मुंबईकरांना पावसामुळे जनजीवन ठप्प होणं, पाणी तुंबणं, लोकल ट्रेन बंद पडणं हे प्रकार नवीन नाहीत. पण 26 जुलैच्या पावसाने मुंबईकरांच्या तोंडचे पाणी पळवले होते.

    आमचा त्या दिवशीचा भाग प्रसारित झाला. कार्यक्रम संपल्यानंतरची गडबड सुरू होती आणि त्या दिवशी कार्यक्रमाची निवेदिका संपदा जोगळेकर – कुलकर्णी हिच्या नवऱ्याचा तिला फोन आला की, “मुंबईत तुफान पाऊस सुरू आहे, पाणी साठायला सुरूवात झाली आहे, त्यामुळे मी तुला घ्यायला येतो.” हा फोन झाल्यावर आम्ही सगळेच बातम्यांचा अंदाज घ्यायला लागलो. ‘अभूतपूर्व पाऊस’ असंच सगळीकडे सांगण्यात येतं होतं. त्यामुळे माझी दुसरी सहकारी शिल्पा देशपांडे हिने संपदा कुलकर्णीच्या सोबतीने घरी जाण्याचा निर्णय घेतला आणि त्या दोघीही साधारणपणे दोनच्या सुमारास ऑफिसमधून बाहेर पडल्या.

    नशिबाने त्यावेळी चर्चगेट-विरार ट्रेन सुरू असल्यामुळे मी ‘जरा मागची बाकीची आवराआवर करून निघू म्हणजे उद्या सकाळी आल्यावर गडबड उडणार नाही,’ अशा विचाराने ऑफिसमध्ये थांबले होते. शेवटी एकदाची साडेतीन वाजता निघाले. लोअर परळ स्टेशनला आले तेव्हाही तुफान पाऊस होता. लोकलने दादरला आले दादरला विरार फास्ट ट्रेन पकडण्यासाठी प्लॅटफॉर्म बदलत असताना announcement झाली की, चर्चगेट विरार दरम्यान सगळीकडे पाणी भरल्याने पुढील सूचना मिळेपर्यंत ट्रेन्स बंद‌ राहतील. हे ऐकलं आणि डोळ्यासमोर माझी तीन वर्षांची मुलगी आली. ती माझ्या आईकडेच होती त्यामुळे तशी खूप काळजी वाटत नव्हती. पण माझे बाबा, धाकटा भाऊ हे देखील मुंबईतच अडकले होते.

    हेही वाचा – लोकल ट्रेन आणि मोबाइल एटिकेट्स

    नवरा दुपारी 2 वाजता ऑफिसला जायला निघाला तेव्हा गुडघाभर पाण्यातून चालत स्टेशनवर आला. विरारला ट्रेनमध्ये बसला, ट्रेन वेळेत सुटली… नालासोपारा, वसई प्रवासही व्यवस्थित झाला आणि वसईला येऊन ट्रेन थांबली ती थांबलीच. तासभर वाट बघून नवरा त्याच्या वसई ऑफिसला गेला. तिथे तासभर थांबला पण लक्षात आलं की, आज काही आपण मुंबई ऑफिसला पोहोचत नाही. त्यामुळे घरी परतण्याचा त्याने निर्णय घेतला. मात्र तोपर्यंत ट्रेन्स पूर्णपणे बंद झाल्या होत्या, By road विरारला येण्यासारखीही परिस्थिती नव्हती. शेवटी रेल्वे ट्रॅकवरून चालत विरारला घरी जाण्याचा त्याने निर्णय घेतला. दीड तास चालून तो विरारला पोहोचला, येताना गुडघाभर असणारं पाणी आता कमरेच्यावर साठलं होतं. तरी त्यातून कशीबशी वाट काढत तो परत घरी पोहोचला.

    इथे मी दादरला माझी नणंद राहते तिच्याकडे जाण्याचा निर्णय घेतला आणि दादर वेस्टला बाहेर आले. तिथेही गुडघाभर पाणी साचलेलं. त्या पाण्यातून चालायला सुरूवात केली आणि लक्षात आलं पाण्याला प्रचंड ओढ आहे. एकेक पाऊल पुढे टाकताना नाकी नऊ येत होते. पाण्यात दादरच्या भाजी मार्केटमधली सगळी भाजी तरंगत होती, चालताना पायात येत होती, प्रचंड घाण वाटत होती. पण तरी चालत पुढे जात होते. जवळपास सव्वा तासाने पोर्तुगीज चर्चजवळ आले आणि आपल्यात आता पुढे जाण्याची फार ताकद नाही, हे लक्षात आलं. नशीबाने समोरच ऑफिसच्या दिशेने जाणारी बस येऊन उभी राहिली आणि मी परत ऑफिसला जाण्याचा निर्णय घेतला. जवळपास अडीच तासांनी बस ऑफिससमोरच्या स्टॉपवर थांबली आणि इतका वेळ बसमध्ये उभीच असलेली मी अंगात होती नव्हती, ती ताकद लावून खाली उतरले. पाण्यातून चालल्याने आणि नंतर ओल्या कपड्यात अडीच तास उभ्याने प्रवास केल्यामुळे पाय अक्षरशः कापत होते, त्यात काही शक्तीच नाही, असा भास होत होता. कशीबशी ऑफिसला पोहोचले. Facility department ने लगेच मला guest room उघडून इथे रहा असं सांगितलं. गरमागरम चहा आणि सॅण्डविच आणून देण्याची कॅन्टीनला ऑर्डर दिली. रात्रीही जेवणाची व्यवस्था करण्यात आली.

    एकीकडे हा सगळा प्रकार सुरू असताना माझे बाबा मुंबई सेंट्रलच्या ऑफिसमधून चर्चगेटला त्यांच्या गेस्ट हाऊसवर गेले. धाकटा भाऊ गोरेगाव स्टेशनवर अडकला होता. आधी तिथेच थांबण्याचा त्याचा विचार होता. मात्र स्टेशनवरची वाढणारी गर्दी आणि बाहेर साचणाऱ्या पाण्याची पातळी लक्षात घेऊन‌ त्याने गोरेगावलाच रहाणाऱ्या मामेबहिणीकडे जाण्याचा निर्णय घेतला आणि तो तिच्याकडे गेला.

    विरारला माझी मुलगी आणि आई अशा दोघीचजणी. मजल्यावरही सगळ्या घरांमध्ये फक्त बायकांचेच राज्य, कारण पुरुष मंडळी पावसामुळे अडकलेली… अशी परिस्थिती होती. त्यात जरा पाऊस झाला की, वीजपुरवठा लगेच बंद करायचा ही MSEBची पद्धत (आजही त्यात काहीही बदल झालेला नाही). त्यामुळे लाइट नाहीत. तीन वर्षांच्या मुलीची समजूत घालून, बाबापुता करून तिचं मन तरी कसं आणि कुठे रमवणार? हाकेच्या अंतरावर तिचा बाबा होता, पण आधीच वसईहून चालत आल्याने त्याच्याही पायात गोळे आले होते आणि आता गळ्यापर्यंत साचलेल्या पाण्यातून परत चालत जाऊन लेकीला भेटण्याइतकी ताकदही त्याच्याकडे नव्हती.

    दुसऱ्या दिवशी दुपारी पावसाचा जोर कमी झाला, पाणी ओसरायला सुरूवात झाली, मुख्य म्हणजे वांद्रे ते विरार ट्रेन्स सुरू झाल्या. मात्र टेलिफोन लाइन्समध्ये पाणी गेल्याने पुढचे काही दिवस ‘नमस्कार अल्फा’ कार्यक्रमाचं live telecast होणार नाही, हे लक्षात आलं. त्यामुळे दुसऱ्या दिवशी संध्याकाळी घरी परतण्याचा निर्णय घेतला. बाबाही चर्चगेटहून टॅक्सीने लोअर परळला माझ्या ऑफिसला पोहोचले. तिथून आम्ही दोघंजण ऑफिसच्या गाडीने वांद्रे फ्लायओव्हरवर उतरलो. तिथून रेल्वेलाइनच्या बाजूने उतरत जाणाऱ्या एका निसरड्या वाटेवरून खाली ट्रॅकमध्ये उतरलो, तिथून चालत स्टेशनवर आलो. स्टेशनवर घरी परत जाणाऱ्यांची तुफान गर्दी उसळली होती. त्यामुळे मी लेडीज आणि बाबा जेन्टस फर्स्ट क्लासमध्ये चढायचं ठरवलं. वांद्रे स्टेशनमध्ये गाडी शिरत होती, जम्प करून जागा पकडण्याशिवाय पर्याय नव्हता. पण प्लॅटफॉर्मवरच्या चिखलामुळे उडी मारून चढणंही धोक्याचं होतं. कसं काय माहिती नाही, पण आलेल्या ट्रेनमध्ये चढून बसायला आम्हाला दोघांनाही व्यवस्थित जागा मिळाली. विरारपर्यंतचा प्रवासही कोणताही अडथळा न येता पार पडला. बाबा, मी घरी पोहोचलो आणि लेकीने धावत येऊन घट्ट मिठी मारली आणि कानात हळूच कुजबुजली, “आजीचा चेहरा बघून जाम कंटाळा आला आहे, आता पुढचे आठ दिवस मला आजीकडे रहायला सांगू नकोस.” हे ऐकून सगळ्यांनाच हसू आलं. आईच्या हातचा गरमागरम चहा पिऊन लेकीला घेऊन घरी परत आले.

    हेही वाचा – आयुष्यातले सुगंध… सुगंधी आयुष्य

    नशीबाने ऑफिसमध्येही टेलिफोन लाइन्स बंद असल्याने आठ दिवस मलाही सुट्टी मिळाली होती. त्यामुळे लेकीची आजीकडे न जाण्याची इच्छाही पूर्ण झाली. आताच्या सारखं एक्स (पूर्वीचं ट्विटर), फेसबुक असे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म नसल्याने एकंदर काय नुकसान झाले, याचा अंदाज यायला एक दोन दिवस लागले. माध्यमांच्या बातम्यांनुसार मुंबईत 24 तासांत तब्बल 944 मिली पाऊस पडला होता, जो गेल्या 100 वर्षांतला सर्वाधिक पाऊस होता. 37 हजार रिक्षा, 4 हजार टॅक्सी आणि 900 बेस्ट बसेसचं नुकसान झालं होतं, हजारो मोठी खासगी, सार्वजनिक वाहनं पाण्यात अडकली होती. 5.5 अब्ज रुपयांचं नुकसान झालं, शेकडो लोकांचा मदतीअभावी जीव गेला होता. बोरिवली आणि दहिसरच्या मधे लागणारा नालाही प्रत्यक्षात मिठी नदी आहे, याचा साक्षात्कार अनेक मुंबईकरांना झाला. ‘मिठी’ या शब्दातली नजाकत जाऊन मुंबईकरांसाठी ती ‘मगरमिठी’ ठरली. त्यामुळेच 20 वर्षांनंतरही अनेक मुंबईकरांसाठी 26 जुलैच्या आठवणी अंगावर काटा आणणाऱ्याच आहेत.

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    पितृदिन विशेष… ज्यांच्या आधारावर आपण उभे राहतो!

    June 21, 2026 अवांतर

    निसर्गाचा संयम आणि आपली जबाबदारी

    June 7, 2026 अवांतर

    संस्कार… मुलांना विश्वास द्यायची गरज

    June 2, 2026 अवांतर
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    अवांतर

    पितृदिन विशेष… ज्यांच्या आधारावर आपण उभे राहतो!

    By Team AvaantarJune 21, 2026

    सिद्धांत सावंत आईवर हजारो कविता लिहिल्या गेल्या. आईवर गाणी लिहिली गेली. कथा, चित्रपट, लेख, भाषणं……

    निसर्गाचा संयम आणि आपली जबाबदारी

    June 7, 2026

    संस्कार… मुलांना विश्वास द्यायची गरज

    June 2, 2026

    बटाटा वडा ते फ्रेंच फ्राइज… ‘किमयागार’ बटाट्याची गोष्ट!

    May 30, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    दहावी नापास

    June 23, 2026

    संकर्षण… ‘त्या’ स्वप्नाने अनिकेतला दिलं बळ

    June 23, 2026

    असेच कानावर पडलेले संवाद…

    June 23, 2026

    आजची ती…

    June 23, 2026

    Dnyaneshwari : आम्हीं तयांचें करूं ध्यान, ते आमुचें देवतार्चन

    June 23, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 23 जून 2026

    June 23, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 337
    • अवांतर 191
    • आरोग्य 122
    • थर्ड अंपायर 5
    • पंचांग आणि भविष्य 464
    • फिल्मी 53
    • फूड काॅर्नर 226
    • मैत्रीण 23
    • ललित 728
    • शैक्षणिक 81
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    दहावी नापास

    June 23, 2026

    संकर्षण… ‘त्या’ स्वप्नाने अनिकेतला दिलं बळ

    June 23, 2026

    असेच कानावर पडलेले संवाद…

    June 23, 2026
    Most Popular

    असेच कानावर पडलेले संवाद…

    June 23, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.