Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 17 एप्रिल 2026

    April 17, 2026

    Ayurveda : वसंताचे ‘ब्रह्मास्त्र’ – वासंतिक वमन पंचकर्म

    April 17, 2026

    पाप आणि पुण्य

    April 16, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Friday, April 17
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » करुणाष्टक… आई गेल्यावर बरंच काही जातं!
    ललित

    करुणाष्टक… आई गेल्यावर बरंच काही जातं!

    Team AvaantarBy Team AvaantarAugust 26, 2025No Comments5 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, करुणाष्टक, आई, वात्सल्य, गदिमा, व्यंकटेश माडगुळकर, माडगुळकर, आईची कथा, Karunashtak, Mother, Affection, Gadima, Venkatesh Madgulkar, Madgulkar, Mother's Story
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    अस्मिता हवालदार

    व्यंकटेश माडगूळकर यांची अनेक पुस्तके, कथासंग्रह, ललितलेखन, कादंबऱ्या प्रसिद्ध आहेत. ‘करुणाष्टक’ हे त्यांच्या आईचं चरित्र आहे. त्यांच्या कुटुंबाची कथा यात असली तरी सहा मुलगे आणि दोन मुलींच्या आईभोवतीच कथानक गुंफले आहे. आठ मुलांना वाढवणाऱ्या आईची ही कथा वाचताना अनेकदा डोळे पाणावतात. समर्थ रामदासांनी ‘करुणाष्टका’तून श्रीरामांची आर्त आळवणी केली आहे. ‘तुजवीण शीण होतो धाव रे धाव आता’ असे म्हणून रामाची प्रार्थना केली आहे. असाच धावा आईने मुले वाढवताना अनेकदा केला आहे. या पुस्तकात आलेला काळ दुसऱ्या महायुद्धानंतरचा आहे. भारताचे स्वातंत्र्य, गांधीहत्या हे प्रसंग यात येतात. पुस्तकातली रेखाटणे स्वतः लेखकाने केली आहेत. अत्यल्प रेषांतून काढलेल्या अर्थगर्भ आकृती, आपल्या मनात व्यक्तिरेखा स्पष्ट करतात.

    माहेरी संपन्नता पाहिलेली आई विवाह करून सासरी आली, त्यावेळी सासरही खाऊन-पिऊन सुखी होते. सासरे कर्तृत्ववान होते. नंतर पतीच्या नोकरीमुळे वेगवेगळ्या ठिकाणी फिरावे लागले. सासरे गेल्यावर लक्ष्मीने पाठ फिरवली. आर्थिक ओढाताण सुरू झाली.

    वडिलांना जेलरच्या पदावर बढती मिळाली, पण त्यांच्या साध्या स्वभावामुळे ते पद त्यांना झेपले नाही आणि त्यांनी सरकारला विनंती करून पुन्हा कारकुनाचे पद मागितले. यावर आई एवढेच म्हणाली, माझ्या नशिबी लक्ष्मी नाही.

    प्लेगची साथ आल्यावर रानात झोपडे बांधून राहायची वेळ आली. प्रशस्त झोपडी बांधण्याइतका पैसा नसल्याने लहानशी झोपडी बांधावी लागली. लेखकाची शाळा सुरू नसल्याने रानोमाळ भटकण्याची संधी मिळाली. त्यांनी निसर्गावर, प्राण्यांवर जी पुस्तके लिहिली आहेत, त्याचे मूळ इथे असू शकते. या पुस्तकातही सतत निसर्गाचे वर्णन येत राहते. उदा. मलूल झालेले आकाश, सुतक पाळणारा वारा…

    प्लेग संपल्यावर मिळालेल्या घरात आई खूश होती, कारण पहिल्या घरासारखी इथे नागाची, भूतांची भीती नव्हती… शेजार होता. मोठा भाऊ शिकायला बाहेर पडला तेव्हा आई म्हणाली, “लहान भावंडाना गरिबीच्या गाळातून बाहेर काढ. तुझ्यावर मोठे ओझे आहे.” आईने अविवाहित काकांच्या बरोबर दुसऱ्या मुलाची पाठवणी केली आणि म्हणाली की, तुम्हाला सोबत होईल आणि माझा भार हलका होईल. आता घरात लेखक आणि एक भाऊ उरले. आईने मुलांची इतकी दुखणी काढली जितकी क्वचित कुणी काढली असतील, असे लेखक म्हणतो. धाकट्या भावाच्या डोक्यात झालेल्या कृमी रात्ररात्र बसून वेचणाऱ्या आईचे दृश्य डोळ्यासमोर उभे राहते.

    “माझ्या आईचा जीवनप्रवास हा परिस्थितीच्या वाळवंटातून केलेला खडतर आणि लांबलचक प्रवास आहे. त्यात डोक्यावर आग ओतणारा सूर्य आहे. अचानक आडवं येऊन मार्ग खुंटविणारी वाळूची टेकाडं आहेत. धुळीची वादळं आहेत. तहानतहान आहे. हिरवळ आहे आणि पाणी आहे. पुष्कळ काहीबाही आहे…’’ अशा शब्दांत लेखकाने या कथनाचे सार सांगितले आहे.

    हेही वाचा – माचीवरला बुधा : एकटेपण हाच कादंबरीचा गाभा

    आजीचा मृत्यू आणि बहिणीच्या वेळचे आईचे गर्भारपण याबद्दल लेखक म्हणतो, एक जीर्ण पान गळून पडलं, एक नवा कोंब तत्काळ फुटला. जीवनाचा हा महानद केवढा विशाल आणि कसा घोंघावत वाहात असतो. एकदा ते विहिरीत पडले असताना त्यांना आई आठवली. आई असती तर, तिने उडी मारली असती आणि घोरपडीसारखी विहिरीच्या भिंतीना चिकटून वर चढून गेली असती… इतका विश्वास त्यांना तिच्या प्रेमावर होता.

    साखरगडच्या वाड्यात या कुटुंबाने चांगले दिवस पाहिले. देवीचे पन्ना रत्न शोधून देणारा लखोबा लक्षात राहतो तसेच मोठा भाऊ मॅट्रिकला नापास झाल्यावर आई त्याला नाही नाही ते बोलली आणि तो कायमचा घर सोडून गेला हेही! धाकट्या दीराचं लग्न करून देऊन जबाबदारी पूर्ण केली. नंतर गांधी हत्येनंतर गावकऱ्यांनीच त्यांचं घर जाळलं. तेव्हा माणसाच्या खऱ्या रूपाच दर्शन झालं. जमाव हा रामायणातल्या कबंध राक्षसासारखा असतो. डोकं नाही, छातीवर डोळा – तोही एकच… पाय नाहीत. दोन्ही हात मात्र सहस्र योजनं पोहोचू शकतील असे लांब… अशा शब्दांत या प्रसंगाचं वर्णन केलं आहे.

    वडील खचून गेले, पण आईने शून्यातून पुन्हा संसार उभा केला. तिला पहिल्या घराची आठवण यायची. लेखक लिहितात – तीळाभोवती साखरेचे कण जमा होऊन काटेरी हलवा होतो तसे घराच्या आठवणींचे आणि घराचे असते… आईचे सासरे नास्तिक होते, कर्मकांडांवर विश्वास नव्हता. देवीसाठी कर्मकांड फार होऊ लागली, तेव्हा त्यांनी तिला विहिरीत विसर्जित केली. त्या काळाचा विचार करता हे फार धाडसाचं कृत्य वाटतं.

    आईने आठ भावंडांची चिंता सतत वाहिली. अनेक भोग भोगले. स्वभावाने गरीब असलेल्या मोठ्या मुलीला क्रूरतेने छळणारे सासर, तिच्या पतीच्या मृत्यूपश्चात तिला करायला लागलेला सहा मुलांचा सांभाळ, धाकट्या मुलीच्या लग्नात आलेल्या अडचणी, तिचे अपत्यविहीन असणे, नवऱ्याचा मृत्यू झाल्यावर नैराश्यग्रस्त झालेली ती, तिने केलेली आत्महत्या… लेखकाने संयत भाषेत लिहिले आहे.

    मोठे भाऊ म्हणजे ग. दि. माडगुळकर यांचे नाव त्यांनी लिहिले नाही; पण वाचताना सहज समजून येते. त्यांच्यावर असलेले लेखकाचे प्रेम आणि गदिमांचे कुटुंबावरचे प्रेम फार सुंदर व्यक्त केले आहे. आईच्या एका मुलाचा दीड वर्षांचा असताना झालेला मृत्यू चटका लावतो. एका मुलाच्या शिक्षणासाठी तिचे स्त्रीधन असलेले घर ती विकते. एका मुलाच्या शेतीसाठी स्वतःची शेती मनावर दगड ठेवून विकते. शेवटचे आठ हजार रुपये त्याच्याच अडीअडचणीला खर्च झाल्यावर ती हळहळते… म्हणते, आता विठ्ठलाच्या दर्शनासाठी सुद्धा मुलांपुढे हात पसरावे लागतील. आदर्श माता पुरस्कार घेण्यासाठी ती व्यासपीठावर बसलेली असताना मोठ्या मुलाच्या मृत्यूची बातमी येते आणि पुरस्कार न घेताच उतरावे लागले. आईचे दुःख कुठेही बटबटीत होऊ न देता समर्पक शब्दात लिहिले आहे. कमी शब्दात सोप्या भाषेत प्रसंगाचे सार्थ वर्णन करणे, ही लेखकाची शैली आहे. आई गेल्यावर धावपळ करून सुद्धा अंतिम दर्शन झाले नाही, याची बोच त्यांनी व्यक्त केली आहे. आई गेल्यावर कुटुंबाचे बंध सैल होतील, असे वाटून लेखक लिहितात, ‘बांधल्या पेंढीचा आळा आता सुटला आहे.’

    हेही वाचा – मी, लेक, बायको आणि कुकर!

    आई गेल्यावर माणसाचं बरंच काही जातं…, इतक्या मोजक्या शब्दात त्यांनी कथन संपवले आहे. आपल्या मनात हे वाक्य रेंगाळत राहते. राख चावडताना मिळालेला अस्थीचा तुकडा आणि काचेच्या लाल बांगडीचा तुकडा एवढेच शिल्लक राहते.

    ‘चक्रवत परिवर्तन्ते सुखानि च दुखानि च’

    आयुष्य असेच आहे. आईवर कितीतरी लेखन आजवर झाले आहे, पण हे प्रांजळ, समर्थ लेखन वेगळेपणामुळे भावनिक आव्हान देऊन हळवे करते.

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    पाप आणि पुण्य

    April 16, 2026 ललित

    …तेच मातीने माखलेले पाय!

    April 15, 2026 ललित

    बरसणारा पाऊस अन् सासू-सुनेतील प्रेमाचा ओलावा…

    April 15, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    पाप आणि पुण्य

    By प्रदीप केळुस्करApril 16, 2026

    गाडी पुण्याच्या दिशेने धावत होती. ड्रायव्हर जयदेव सोडून बाकी तिघेजण भयंकर तणावाखाली होती. ड्रायव्हरच्या बाजूला…

    …तेच मातीने माखलेले पाय!

    April 15, 2026

    बरसणारा पाऊस अन् सासू-सुनेतील प्रेमाचा ओलावा…

    April 15, 2026

    आनंदी जीवनाचे रहस्य

    April 15, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 17 एप्रिल 2026

    April 17, 2026

    Ayurveda : वसंताचे ‘ब्रह्मास्त्र’ – वासंतिक वमन पंचकर्म

    April 17, 2026

    पाप आणि पुण्य

    April 16, 2026

    Kitchen Tips : दाल फ्राय, टेस्टी ताक, शिळ्या भाताचा नाश्ता करताना…

    April 16, 2026

    आधी महामूर्ख ठरला आणि नंतर सर्वोच्च पुरस्काराने गौरविला!

    April 16, 2026

    Dnyaneshwari : हें युगचि आघवें बुडावें, वरि आकाशहि तुटोनि पडावें…

    April 16, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 269
    • अवांतर 182
    • आरोग्य 102
    • थर्ड अंपायर 4
    • पंचांग आणि भविष्य 387
    • फिल्मी 44
    • फूड काॅर्नर 195
    • मैत्रीण 18
    • ललित 558
    • शैक्षणिक 77
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 17 एप्रिल 2026

    April 17, 2026

    Ayurveda : वसंताचे ‘ब्रह्मास्त्र’ – वासंतिक वमन पंचकर्म

    April 17, 2026

    पाप आणि पुण्य

    April 16, 2026
    Most Popular

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 17 एप्रिल 2026

    April 17, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.