Author: Team Avaantar

स्वयंपाक बनवताना महिलांना नेहमीच कसरत करावी लागते. मग काहीतरी क्लृप्ती लढविली जाते. ‘फूड कॉर्नर’मध्ये वेगळ्या प्रकारची अळुवडी, फ्राय इडली अन् गुलबक्षीच्या कोवळ्या पानांची भजी बनविण्याच्या टिप्स पाहुयात. हेही वाचा – Kitchen Tips : स्वादिष्ट दहीवडे, हलका ढोकळा, कुरकुरीत कचोरी… हेही वाचा – Kitchen Tips : एकसारखी गोल आणि झटपट बटाटाभजी, लज्जतदार पराठे! (‘सुगरणीचा सल्ला’ पुस्तकातून साभार)

Read More

पराग गोडबोले ऋचा… छानशी, चुणचुणीत मुलगी. एकुलती एक. छान शिकली, सवरली आणि एका खासगी कंपनीत नोकरीही लागली तिला. यथावकाश नाव नोंदवलं एका संस्थेत आणि वर संशोधनाला सुरुवात झाली. फार काही अपेक्षा नव्हत्याच तिच्या! बऱ्याच मुलांमधून प्रथमेश आवडला तिला. त्याचे आईवडील चिपळूणजवळच्या एका छोट्याश्या गावात स्थायिक. तिथे स्वतःचं टुमदार घर, थोडी शेती आणि सासऱ्यांची शिक्षकाची नोकरी. खाऊनपिऊन सुखी कुटुंब. तो, चिंचवडला एका प्रसिद्ध कंपनीत नोकरीला. BE झालेला. भाड्याचा 1 BHK फ्लॅट, चिंचवडमध्येच… कार नव्हती, पण बाइक होती स्वतःची. ऋचाला पुरेसं होतं एवढं. एका शांत हॉटेलमध्ये दोन तास गप्पागोष्टी झाल्या आणि आपलं जमेल असं वाटून गेलं त्यांना. Vibes match झाल्या त्यांच्या… हल्ली…

Read More

वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात ज्ञानेश्वरी सांगितली. अध्याय सहावा ऐसी आधारीं मुद्रा पडे । आणि आधींचा मार्गु मोडे । तेथ अपानु आंतलीकडे । वोहोंटो लागे ॥200॥ समं कायशिरोग्रीवं धारयन्नचलं स्थिरः । संप्रेक्ष्य नासिकाग्रं स्वं दिशश्चानवलोकयन् ॥13॥ तंव करसंपुट आपैसें । वाम चरणीं बैसे । बाहुमूळीं दिसे । थोरीव आली ॥201॥ माजि उभारलेनि दंडें । शिरकमळ होय गाढें । नेत्रद्वारींचीं कवाडें । लागूं पाहती ॥202॥ वरचिलें पातीं ढळती । तळींची तळीं पुंजाळती । तेथ अर्धोन्मीलित स्थिती | उपजे तया ॥203॥ दिठी राहोनि आंतुलीकडे ।…

Read More

दर्शन कुलकर्णी विनायक चतुर्थी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – आर्थिक लाभाचे नवीन मार्ग उघडतील. कठोर परिश्रम करणाऱ्यांना सर्व प्रयत्नांमध्ये यश मिळेल. व्यवसाय चांगला होईल. नोकरीत प्रगतीची शक्यता आहे. जास्त कामामुळे थकवा येऊ शकतो. वरिष्ठांशी बोलताना संयम बाळगा. आर्थिक परिस्थिती मजबूत होईल. कुटुंब आणि मित्रांसह सहलीला जाऊ शकता. आरोग्य चांगले राहील. वृषभ – व्यवसायात आर्थिक फायदा आणि नोकरीत बढती मिळण्याची शक्यता आहे. दिवस कठोर परिश्रमांचा असेल. तरीही तुम्ही स्वतःसाठी वेळ काढू शकाल, कुटुंबासोबत वेळ घालवू शकाल. मुलांच्या करिअरबाबत कुटुंबातील ज्येष्ठांकडून सल्ला घ्याल. एखाद्या धार्मिक कार्यात सहभागी होऊ शकता. वैवाहिक जीवनात किरकोळ वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. मिथुन -…

Read More

डॉ. किशोर महाबळ सर्व शाळांमध्ये शिकणाऱ्या प्रत्येक मुलीला आणि मुलाला सर्वोत्तम शिक्षण मिळाले पाहिजे. प्रत्येक विद्यार्थ्याच्या गुणवत्तेची दखल घेऊन त्याला ती गुणवत्ता विकसित करण्याची पूर्ण संधी आणि प्रोत्साहन मिळालेच पाहिजे. विज्ञान आणि गणितात उत्तम गुणवत्ता असणाऱ्या विद्यार्थ्यांबरोबरच भाषा, नागरिकशास्त्र, इतिहास, भूगोल असे अन्य विषय तसेच चित्रकला, गायन, वादन, नृत्य अशा कलांमध्ये गती असलेल्या विद्यार्थ्यांनाही सारखेच महत्त्व दिले गेले पाहिजे. कोणीही विद्यार्थी प्रोत्साहनापासून वंचित राहायला नको, याचे आपण महत्त्व समजून घेत आहोत. आपल्या शाळेत आपण यासाठी काय करू शकतो, याचा विचार करूयात! दरवर्षी सर्व शाळांमध्ये कोणत्या ना कोणत्या निमित्ताने चित्रकला स्पर्धा घेतली जाते. त्यानंतर सहसा स्पर्धकांच्या चित्रांतील पारितोषिक प्राप्त चित्रेच विशेष…

Read More

शोभा भडके भाग – 2 “ए नकटेSS… उठ… घर आलं,” पवनने तिला आवाज दिला. राम आणि त्याने गाडीतून सामान खाली घेतलं. आरू आळस देत खाली उतरली आणि त्या दोघांच्या पाठोपाठ गेली. दारातच आत्या उभी होती. आत्याला पाहून आरूने पुढे होऊन पाया पडली, त्यावर ‘सुखी राहा’, असा आशीर्वाद देत आत्याने तिच्या गालावरून हात फिरवून, बोटे मोडून तिची दृष्ट काढली. “कसा झाला प्रवास?” आत आल्यावर आत्याने त्या दोघांना विचारलं. “छान झाला…” दोघांनी सोबतच सांगितलं. “बरं… थकला असाल तर जाऊन फ्रेश होऊन या, मी चहा टाकते दोघांसाठी.” “मला आत्ता नको आत्या… मी थोडावेळ झोपतो, प्रवासात नीट झोप झाली नाही,” राम म्हणाला. “बरं. तू…

Read More

माधवी जोशी माहुलकर खरंतर शेगाव कचोरीचे सारण हे इतर कचोऱ्यापेक्षा (जसे मूगडाळ कचोरी, प्याज कचोरी, मटर कचोरी) वेगळे असते. शेगावच्या तीरथराम शर्मांची जी कचोरी आहे, तिची बातच निराळी! त्यांचे जे वंशज आहेत भूपेश शर्मा त्यांच्याकडे रोजच्या सुमारे अडीच हजार कचोऱ्या तयार होतात… 20 किलो मैदा याकरिता वापरला जातो. काय खप असेल नाही या कचोरीचा!! तीरथराम शर्मांच्या या कचोरीच्या सारणात आणि मसाल्यात ते वारंवार बदल करत असतात; परंतु ते नेमके काय असतात, त्याबाबत शर्मा बंधू किंवा त्यांचे कामगार याबाबतीत ताकास तूर लागू देत नाही. आता मला माहीत असलेल्या शेगाव कचोरीची रेसीपी देते… साहित्य हेही वाचा – Recipe : विदर्भ स्पेशल… गोळाभात…

Read More

वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात ज्ञानेश्वरी सांगितली. अध्याय सहावा तत्रैकाग्रं मनः कृत्वा यतचित्तेन्द्रियक्रियः ।  उपविश्यासने युञ्ज्याद् योगमात्मविशुद्धये ॥12॥ मग तेथ आपण । एकाग्र अंतःकरण । करूनि सद्गुरुस्मरण । अनुभविजे ॥186॥ तैसें स्मरतेनि आदरें । सबाह्य सात्विकें भरे । जंव कठिणपण विरे । अहंभावाचें ॥187॥ विषयांचा विसरु पडे । इंद्रियांची कसमस मोडे । मनाची घडी घडे । हृदयामाजीं ॥188॥ ऐसें ऐक्य हें सहजें । फावे तंव राहिजे । मग तेणेंचि बोधें बैसिजे । आसनावरी ॥189॥ आतां आंगाते आंग करी । पवनातें पवनुचि वरी । ऐसी…

Read More

दर्शन कुलकर्णी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 हेही वाचा – थंडी अन् विदर्भातील रोडगे पार्टी! दिनविशेष ख्यातनाम चित्रकार बाबूराव सडवेलकर टीम अवांतर आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार बाबूराव नारायण सडवेलकर यांचा जन्म 28 जून 1928 रोजी वेंगुर्ले (सिंधुदुर्ग जिल्हा) येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण कोल्हापूर येथील राजाराम हायस्कूलमध्ये तर, महाविद्यालयीन शिक्षण राजाराम कॉलेजमध्ये झाले. शालेय जीवनातच चित्रकार होण्याची महत्त्वाकांक्षा त्यांच्या ठायी निर्माण झाली आणि त्याच प्रेरणेने त्यांनी 1950 साली मुंबईच्या सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट येथे उच्च कलाशिक्षणासाठी प्रवेश घेतला. 1952 मध्ये रंग आणि रेखाकला विषयाची जी. डी. आर्ट ही पदविका त्यांनी संपादन केली. त्यानंतर  1953 ते 1971 या काळात त्यांनी सर…

Read More

हर्षा गुप्ते आवळा हे अतिशय गुणकारी फळ मानले जाते. आवळ्यात पाणी (81%), प्रथिने (0.5%), स्निग्ध पदार्थ (0.1%), क्षार (0.5%), कर्बोदके (13-14%) आणि तंतू असतात. आवळ्यात ‘क’ जीवनसत्त्व भरपूर असते. तसेच त्यामध्ये अ, ब जीवनसत्त्वे आणि लोह, कॅल्शियम, फॉस्फरस इत्यादींची संयुगेही असतात. मधुमेह, खोकला, श्वासनलिकादाह, दमा, कावीळ, त्वचारोग, केस अकाली पांढरे होणे आणि इतर अनेक रोगांवर आवळा गुणकारी ठरतो. हिरडा आणि बेहडा या फळांच्या सालीबरोबर आवळकाठीची पूड मिसळून ‘त्रिफळा चूर्ण’ तयार करतात. या आवळ्यापासून त्यापासून लोणचे, मुरांबा (मोरावळा), सुपारी इत्यादी पदार्थ करतात. आपण आज आवळा कँडीची रेसिपी पाहणार आहोत. एकूण कालावधी – अर्धा तास साहित्य हेही वाचा – Recipe : स्वादिष्ट…

Read More