Author: Team Avaantar

दीपक तांबोळी फाटकाचा आवाज आला, तसं मी दार उघडून बाहेर पाहिलं तर, एक म्हातारा माणूस बाहेर उभा होता… “फुलं घेऊ का?” मी काही बोलण्याआधीच त्यानं विचारलं. “हो घ्या ना…” तो फुलं तोडू लागला. तसा मी इतक्या सकाळी झोप मोडल्याबद्दल चरफडत घरात शिरलो. मला नुकतीच नाशिकमध्ये नोकरी मिळाली होती. नशिबाने मला रूमही चांगली आणि पटकन मिळाली. रूमच्या बाहेरच अंगणात चांदणीचं झाड होतं. कायम पांढऱ्या फुलांनी लगडलेलं… मला या फुलांचा काहीच उपयोग नव्हता, कारण माझ्याकडे देव नव्हते. गावाहून येताना आईने मला श्रीगुरुदत्तांचा फोटो घेऊन जायचा खूप आग्रह केला. सकाळी कामावर निघताना देवाला नमस्कार करून निघालं की, दिवस चांगला जातो, असं तिचं म्हणणं.…

Read More

प्रदीप केळुस्कर भाग – 1 अनंताने विलासच्या घरासमोर स्कूटर उभी केली आणि जोराने हॉर्न वाजवला. त्याचा हॉर्न ऐकून आतून विलासने ‘आलो.. आलो..’ म्हणत ओ दिली. अनंताचे लक्ष गॅलरीकडे गेले, तेथे विलासचे बाबा उभे होते. त्याने बाबांना हात दाखवला… बाबांनी त्याला हात दाखवला. “ये आत ये… दोन मिनिटे गप्पा मारू…” बाबा म्हणाले. “नाही ओ… आधीच उशीर झालाय, रविवारी येतो…” “दोघेही या, वाट पहातो…” “हो येतो…” तेवढ्यात विलास आतून आला आणि त्याच्या स्कूटरवर मागे बसला. गाडी चालवता चालवता अनंता बोलू लागला… “बाबा गप्पा मारायला बोलवत होते.” “त्त्यांचा वेळ जात नाही. सरोज शाळेत गेली म्हणजे घरी कोणी नसतं. पूर्वी आई होती तेव्हा दोघांचा…

Read More

रेवती निलेश पांडे आज खिडकीतून लहान मुलांना रंगात न्हाऊन निघताना पाहिलं आणि मन थेट बालपणातल्या त्या गल्लीत गेलं… खरंच, धुळवडीची खरी मजा त्या निरागस वयातच होती. ते वयच मुळी ‘फुलपाखरी’ असतं… मुक्त, स्वच्छंदी आणि रंगीबिरंगी… लहानपणी होळीची खूप मजा होती, धुळवड तर अगदी पहाटेपासूनच सुरू व्हायची प्रत्येकाच्या घरी जाऊन त्याला बाहेर ओढायचं आणि सगळेच आपला रंग त्याला लावण्यासाठी तुटून पडायचे… आमच्या गल्लीत एक छोटी टाकी होती धुळवडीच्या दिवशी त्यातही रंग टाकायचो आणि प्रत्येकाला त्या टाकीत ढकलून द्यायचं… सगळा नुसता धिंगाणा! जसं जसं वय वाढत गेलं, तसं धुळवडीचं स्वरूप जरा सोफिस्टिकेटेड व्हायला लागलं आणि आता हा रंगाचा खेळ फक्त एक ‘छोट्या…

Read More

डॉ. प्रज्ञावंत देवळेकर ओपीडीत आलेले एक काका तक्रारी सांगितल्यानंतर माझ्या बाजूच्या एक्झामिनेशन टेबलवर पडायचं सोडून पलीकडच्या टेबलकडं गेले, त्यामुळं मला उठून पलीकडं जावं लागलं… “काय काका तिकडं होती की, रिकामी जागा इकडं का आलात?” मी सहज त्यांना विचारलं. “नको.. छ्याऽऽ अजिबात नको!” असं म्हणत काकांनी आधी तोंडावर बोट ठेवत नंतर दोन्ही कानाच्या पाळ्या पकडल्या… “का ओ?” मी कुतूहलानं त्यांना विचारलं. “मागं एकदा तिकडं चेक केलं, तुम्ही ही एवढी लंबीचौडी तपासणीची यादी लिहून दिली. नंतर पुन्हा एकदा आलो होतो तेव्हा सलाइन लावावं लागलं होतं… इथं बरंय. इथं तपासलं की, दोन डोसमध्येच बरं वाटतंय…” काका उत्तरले आणि त्यांचं अजबगजब तर्कट ऐकून मला…

Read More

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय नववा पैं भक्ति एकी मी जाणें । तेथ सानें थोर न म्हणें । आम्ही भावाचे पाहुणे । भलतेया ॥395॥ येर पत्र पुष्प फळ । तें भजावया मिस केवळ । वांचूनि आमुचा लाग निष्कल । भक्तितत्त्व ॥396॥ म्हणोनि अर्जुना अवधारीं । तूं बुद्धि एकी सोपारी करीं । तरी सहजें आपुलां मनोमंदिरीं । न विसंबें मातें ॥397॥ यत् करोषि यदश्नासि यज् जुहोषि ददासि यत् । यत् तपस्यसि कौन्तेय तत् कुरुष्व मदर्पणम् ॥27॥ जे जे कांहीं व्यापार करिसी । कां भोग हन भोगिसी । अथवा यज्ञीं यजिसी । नानाविधीं ॥398॥ नातरी पात्रविशेषें दानें । कां सेवकां देसी जीवनें । तपादि साधनें…

Read More

दर्शन कुलकर्णी वसंतोत्सव आरंभ वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष बंगाली साहित्यिक आणि संगीतकार ज्योतिरिंद्रनाथ टागोर टीम अवांतर प्रसिद्ध बंगाली साहित्यिक आणि संगीतकार ज्योतिरिंद्रनाथ टागोर यांचा जन्म 4 मे 1849 रोजी जोरासाँको (कोलकाता) येथे झाले. ते देवेंद्रनाथ टागोर यांचे पुत्र आणि प्रसिद्ध टागोर कुटुंबातील एक महत्त्वाचे सदस्य होते. नोबेल पुरस्कार विजेते रवींद्रनाथ टागोर यांचे ते थोरले बंधू होते. रवींद्रनाथांच्या जडणघडणीत ज्योतिरिंद्रनाथ यांचा मोठा हातभार होता. सुरुवातीला त्यांनी ललित कलांचे शिक्षण घेतले पण नंतर ते नाट्यगृहाकडे आकर्षित झाले आणि घरीच नाटकांचा सराव तसेच रंगमंचीय सराव करण्यासाठी त्यांचे शिक्षण सोडून दिले. त्यांचे चुलत भाऊ गणेशनाथ यांनी 1865 मध्ये जोरासांको नाट्यशाळेची स्थापना केली होती.…

Read More

डॉ. अस्मिता हवालदार ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर लिखित या पुस्तकाचे पूर्ण शीर्षक ‘युद्ध जिवांचे : जैविक व रासायनिक संसर्गजन्य इतिहास’ असे आहे. ’संसर्गजन्य इतिहास’ का म्हटले असेल? कुतूहल वाटत होते. पुस्तक वाचू लागल्यावर मनुष्य जातीच्या क्रूरतेचा किती भयानक संसर्गजन्य रोग आहे, हे समजू लागते. माणसाचा इतिहास हा युद्धांचा इतिहास आहे. लेखक म्हणतो, “माणसांचे जीव वाचवायला शास्त्रज्ञ रोगप्रतिकारक औषधे बनवतात आणि तेच शास्त्रज्ञ माणसांचे जीव कसे घ्यायचे? यावर संशोधन करतात.” काही वर्षांपूर्वी स्वाइन फ्लूची साथ आली होती. पुण्यात जास्त पसरला होता. तेव्हा लसी पण टोचून घेतल्या होत्या. इथपासून पुस्तकाची सुरुवात होते. रोगजंतू पसरवायचे, भीती निर्माण करायची आणि मग लसी, औषधे विकायची…

Read More

दिलीप कजगांवकर “सर, ओळखलंत का मला?” सदानंद सरांच्या घरात शिरत राजने विचारले. “राज, अरे शाळेतला सर्वात हुशार विद्यार्थी ना तू, तुला कसे विसरणार मी! तू कसा आहेस? कुठे असतोस? काय करतोस? लग्न केलंस का? बायको कुठली? मुलं किती?” “अहो, किती प्रश्न विचारता? तुम्ही तोंडी परीक्षा घेताहेत का? राज तुमचा माजी विद्यार्थी आहे आणि तुम्ही देखील निवृत्त झाला आहात…” सावित्रीबाईंनी सरांना वास्तवाची जाणीव करून दिली. “सर, मी पुण्याला एका आयटी कंपनीत काम करतो. तीन वर्षे अमेरिकेत होतो. एका मित्राच्या लग्नासाठी काल इथे नाशिकला आलो. तुम्हाला भेटायची इच्छा होती म्हणून आज मुद्दाम थांबलो… सर, एक विचारू?” “विचार ना. प्रश्न विचारण्याची तुझी सवय…

Read More

रोजच्या जेवणात वेगळेपणा आणण्याचा प्रयत्न गृहिणींचा असतो. यासाठी काही नवनवीन प्रयोग केले जातात… असेच काही प्रकार ‘फूड कॉर्नर’मध्ये देत आहोत. जून भाज्यांचा वापर, भज्यांची भाजी आणि भरली कारली बनविण्याच्या या टिप्स वापरून पाहा. हेही वाचा – Kitchen Tips : लाल भोपळ्याचे रायते, कोफ्ता करी, आलू-मटर करताना… हेही वाचा – Kitchen Tips : फ्रोजन मटार, टोमॅटोचे सार, वांग्याचे काप बनविताना हे करू पाहा तुमच्याही ‘स्पेशल रेसिपी’ किंवा अशा काही ‘किचन टिप्स’ असतील तर, avaantar.recipe@gmail.com या ईमेलवर किंवा 9869975883 या व्हॉट्सॲप क्रमांकावर पाठवा. या वेबसाइटच्या ‘फूड कॉर्नर’ या कॅटेगरीत त्या प्रसिद्ध केल्या जातील. (‘सुगरणीचा सल्ला’ पुस्तकातून साभार)

Read More

डॉ. किशोर महाबळ गणित हा विषय बहुतांश विद्यार्थ्यांना नकोसा वाटतो. ज्या विद्यार्थ्यांना गणित चांगले येते त्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळते, मात्र ज्या विद्यार्थ्यांना गणित येत नाही, अशांना कायम कमी लेखले जाते. यामुळे त्यांच्यात न्यूनगंड निर्माण होतो आणि तो आयुष्यभर टिकून राहतो. त्याचे दूरगामी परिणाम त्यांच्या पुढील शिक्षणावर होतात. शिक्षणतज्ज्ञांच्या मते अभिनव आणि मनोरंजक पद्धतीने शिकविल्यास इयत्ता 10 वीपर्यंतचे गणित सर्व विद्यार्थी सहजगत्या शिकू शकतात. यासाठी शिक्षकांना विशेष प्रयत्न करावे लागतील. नव्या अभिनव पद्धती शिकाव्या लागतील. मात्र, असे न करता काही विद्यार्थ्यांना गणित येणारच नाही, असा शिक्षकांचा समज होतो आणि पालकांनाही तसेच वाटू लागते. परीक्षेत तर गणित विषय असतोच. मग विद्यार्थ्याला गणितात…

Read More