Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Team Avaantar
सतीश बर्वे खरंतर, आजकाल अनोळखी क्रमांकावरून आलेले फोन उचलण्याचे मी कटाक्षाने टाळतो. पण का कोण जाणे, गेल्या आठवड्यात असाच अवेळी आलेला एक फोन मी उचलला आणि आजवर मनाच्या गाभाऱ्यात खोलवर दडलेल्या एका गोष्टीचा शेवट गोड झाला. त्याचं असं झालं… समोरून आवाज आला… “मी कौस्तुभ सावरकर बोलतोय. महत्प्रयासाने तुमचा नंबर मिळाला काल रात्री उशिराने. म्हणून आज सकाळी जरा लवकरच फोन केला आहे मी…” पुढे कौस्तुभने जे सांगितले ते सगळं अविश्वसनीय होते… त्याचा सासरा निनाद अभ्यंकर आणि मी बऱ्याच वर्षांपूर्वी मुंबईला एका नामांकित औषधी कंपनीत नोकरी करत होतो, जी नोकरी निनादला काही वर्षांनी नाईलाजाने सोडायला लागली होती. निनादला कॅन्सर झाला होता. तो…
सुधीर करंदीकर मी राहतो पुण्याला कर्वेनगर या भागात. आम्ही रोजच दुपारी बावधन या भागात मुलीकडे जातो. नातवंडं दुपारी शाळेतून घरी येतात. त्यावेळेला आम्ही घरी असल्यामुळे त्यांचे दुपारचे खाणे – पिणे, अभ्यास, क्लासला सोडणे / आणणे वगैरे याची काळजी रहात नाही. संध्याकाळी मुलगी किंवा जावई ऑफिसमधून घरी आले की, थोड्या गप्पा मारून, आम्ही साधारण 6 – 6.30 ला तिथून निघून कर्वे नगरला, आमच्या घरी येतो. आमचे जाणे येणे स्कूटरने असते. कधी-कधी बायको बावधनहून स्कूटर घेऊन आधी निघून जाते, अशावेळेस मी घरापर्यंत कधी पायी जातो, कधी अर्धे अंतर बसने आणि पुढचे पायी जातो. एक दिवस बायको स्कूटर घेऊन लवकर घरी गेली म्हणून…
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय नववा पैं अर्जुना माझां ठायीं । आपणपेनवीण सौरसु नाहीं । मी उपचारीं कवणाही । नाकळें गा ॥367॥ एथ जाणीव करी तोचि नेणे । आथिलेपण मिरवी तेंचि उणें । आम्ही जाहलों ऐसें जो म्हणे । तो कांहींचि नव्हे ॥368॥ अथवा यज्ञदानादि किरीटी । कां तपें हन जे हुटहुटी । ते तृणा एकासाठीं । न सरे एथ ॥369॥ पाहें पां जाणिवेचेनि बळें । कोण्ही वेदापासूनि असे आगळे । कीं शेषाहूनि तोंडागळें । बोलकें आथी ॥370॥ तोही आंथरुणातळवटीं दडे । येरु नेति नेति म्हणोनि बहुडे । एथ सनकादिक वेडे । पिसे जाहले ॥371॥ करितां तापसांची कडसणी । कवणु जवळां ठेविजैल…
दर्शन कुलकर्णी होळी हुताशनी पौर्णिमा / पौर्णिमा प्रारंभ सायंकाळी 05:55 वाजता वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष सुप्रसिद्ध मराठी साहित्यिक आणि प्रभावी वक्ते राम शेवाळकर टीम अवांतर सुप्रसिद्घ मराठी साहित्यिक, उत्तम कीर्तनकार आणि प्रभावी वक्ते राम शेवाळकर यांचा जन्म 2 मार्च 1931 रोजी विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील अचलपूर येथे झाला. त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी वेदशास्त्रसंपन्नतेची होती. राम शेवाळकर हे आपल्या वडिलांच्या अनुकरणातून, लहान वयातच कीर्तने पाठ करून ती सादर करीत. महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेरही त्यांनी कित्येक व्याख्याने दिली आणि ‘वक्ता दशसहस्त्रेषु’ अशी ख्याती त्यांना मिळाली. स्वामी विवेकानंद, छत्रपती शिवाजी महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर, महात्मा गांधी, साने गुरूजी यांचे विचार त्यांनी श्रोत्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविले. त्याचबरोबर आपल्या…
शोभा भडके भाग – 16 आरू आणि शिव एकमेकांच्या इतके जवळ होते… शिव अजूनही तिच्यावर झुकून तोंडावर हात ठेऊन, तिच्या डोळ्यांत हरवला होता. त्याला भानच राहिलं नव्हतं… आरुची अवस्था तर तिच्या समजण्यापलीकडे होती… त्याचा स्पर्श तिला रोमांचित करत होता… तिचं हृदय जोरजोरात धडधडत होत… जे होतंय ते सहन न होऊन, ती आता रडायच्या तयारीत होती. तिच्या त्या टपोऱ्या डोळ्यांत पाणी जमा झालं होतं… पण शिवला याचं भानच नव्हतं… तिच्या त्या गहिऱ्या डोळ्यांत हरवला होता तो! त्याची ती रोखलेली नजर आणि त्याचा होणारा स्पर्श सहन न होऊन तिने एक दीर्घ श्वास घेत, डोळे मिटून, दोन्ही हात त्याच्या छातीवर दाबत, जोरात त्याला…
माधवी जोशी माहुलकर वांगे बुरानी हा एक विस्मृतीत चाललेला पदार्थ आहे. बुरानी हा पदार्थ बहुतेक बिर्याणी या शब्दाचा अपभ्रंश असावा. कुठून कसा काय आला माहीत नाही, परंतु वांगे बुरानी हा एक अत्यंत चविष्ट असा भाताचा प्रकार आहे. फार कमी सामानामध्ये वांगे बुरानी तयार होते. आमच्या नागपुरच्या सरहद्दीवर लागून जी राज्यं आहेत, त्या प्रांतातील खूप लोक व्यवसाय आणि कामाच्या निमित्ताने नागपुरात येऊन स्थायिक झाले आहेत. वांगे बुरानी हा पदार्थ त्याच लोकांनी आपल्या खानपानातून लोकाांपर्यंत पोहोचवला असावा. बांधकाम व्यावसायाकरिता जे मजूर बालाघाट, मध्य प्रदेश, छिंदवाडा, गोंदिया अशा प्रांतातून येतात ते भाजी आणि भात खाऊन सकाळी कामावर जातात. करायला सोपा आणि कमी वेळात…
मेष हा आठवडा सर्वसाधारण आहे. छोट्या कामांमध्ये नोकरदारांचा भरपूर वेळ वाया जाईल. परिस्थितीशी समझोता करावा लागेल. पैशांच्या व्यवहारात गाफील राहू नका. व्यवसायात तडजोड केली तर फायदा होईल. अडचणी दूर होतील. जोडधंद्यातून फायदा होईल. महिलांना विश्रांतीची गरज भासेल. मुलांकडून चांगली बातमी समजेल. विद्यार्थ्यांनी वेळ वाया घालवू नये, अन्यथा नंतर पश्चाताप करावा लागू शकतो. वृषभ या आठवड्यातील सुट्टीचे दिवस मित्र-मैत्रिणींबरोबर घालवाल. नोकरदारांना सहकारी तसेच वरिष्ठांशी जुळवून घ्यावे लागेल. कामाच्या पद्धतीत बदल करून व्यावसायिक वर्ग उलाढाल वाढवू शकतो. कामानिमित्त परदेश प्रवास करू शकाल. घरात नातेवाईक, पाहुणे येतील आणि त्यांच्या स्वागतात महिलांचा वेळ जाईल. विद्यार्थ्यांनी वाहन जपून चालवावे. तसेच, कोणाचीही मस्करी करू नये, परिस्थिती…
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय नववा यान्ति देवव्रता देवान् पितृन् यान्ति पितृव्रता: । भूतानि यान्ति भूतेज्या यान्ति मद्याजिनोऽपि माम् ॥25॥ मनें वाचा करणीं । जयांचीं भजनें देवांचिया वाहणी । ते शरीर जातियेक्षणीं । देवचि जाले ॥355॥ अथवा पितरांचीं व्रतें । वाहती जयांचीं चित्तें । जीवित सरलिया तयांतें । पितृत्व वरी ॥356॥ कां क्षुद्रदेवतादि भूतें । तियेचि जयांचीं परमदैवतें । जिहीं अभिचारिकीं तयांतें । उपासिलें ॥357॥ तयां देहाची जवनिक फिटली । आणि भूतत्वाची प्राप्ती जाहली । एवं संकल्पवशें फळलीं । कर्में तयां ॥358॥ मग मीचि डोळां देखिला । जिहीं कानीं मीचि ऐकिला । मनीं मी भाविला । वानिला वाचा ॥359॥ सर्वांगीं सर्वाठायीं ।…
दर्शन कुलकर्णी प्रदोष वेद कन्सल्टन्सी / 9987433660 हेही वाचा – दीर्घ श्वसन अभ्यासातून निरामय मानसिक आरोग्य दिनविशेष श्रेष्ठ संस्कृत पंडित केवलानंद सरस्वती टीम अवांतर महाराष्ट्रातील धर्मसुधारणावादी, श्रेष्ठ संस्कृत पंडित केवलानंद सरस्वती यांचा जन्म 8 डिसेंबर 1877 रोजी तत्कालीन कुलाबा जिल्ह्यातील सुडकोली गावी झाली. त्यांचे मूळ नाव नारायण सदाशिव मराठे. त्यांचे शिक्षण प्राचीन पद्धतीने गुरूगृही झाले. 1895 मध्ये वाई येथे आल्यावर नव्य-न्यायाचे आणि शांकर अद्वैत वेदान्ताचे अध्ययन झाले. अध्यात्मविद्येचे अध्ययन त्यांनी प्रज्ञानंदसरस्वती यांच्यापाशी केले. हेही वाचा – नेने सरांचा क्लास अन् कुंभकर्णी झोप! ऋग्वेद, संस्कृत काव्यवाङ्मय आणि व्याकरण, न्याय, वेदान्त, मीमांसा इत्यादींत पारंगत झाल्यानंतर 1901 मध्ये त्यांनी वाई येथे स्वतःची पाठशाळा…
प्रदीप केळुस्कर भाग – 4 विजयाने माझ्याकडे पाहिलं मात्र… क्षणात ओळख पटली आणि ती जवळ जवळ ओरडलीच… “मनीष!” हॉटेलमधले गिऱ्हाईक एकदा माझ्याकडे आणि एकदा तिच्याकडे पाहात होते. मी मंद स्मित करत मान हलवली. “ये रे आत ये,” तिने वडे तळणाऱ्या बाईला गिऱ्हाईकाकडे लक्ष द्यायला सांगितले. मी आत गेलो. 28 वर्षांपूर्वी होतं तसंच घर होतं. ‘‘कधी इलस? माका ठावंक होता, एक ना एक दिवस तू माका शोधत येतलंसच, माझा मन माका सांगत होता.’’ ‘‘परवा आलो. आज या गावची जत्रा हे लक्षात होती. 28 वर्षांपूर्वी मी जत्रेला आलो होतो. पण तू इथे असशील असे वाटले नव्हते.’’ ‘‘अरे, मी गेली 10 वर्षा हयच…

