सत्य घटनेवर आधारित भयकथा… सन 2018. महाराष्ट्रातील एका छोट्या गावात ही घटना घडली होती. गावाचं नाव आजही अनेक लोक उघडपणे घेत नाहीत. गावाच्या बाहेर एक जुना वाडा होता. त्या वाड्याच्या मागे दगडी बांधकामाची एक खोल विहीर होती. लोक म्हणायचे, तिथे रात्री गेलं की, कुणीतरी हाक मारतं. पण गावकरी ते फक्त अफवा समजून दुर्लक्ष करायचे.
त्या गावात रोहित नावाचा 22 वर्षांचा मुलगा राहत होता. फेसबुकवर horror reels आणि ghost hunting videos बनवणं हा त्याचा छंद होता. एकदा त्याने मित्रांसोबत ठरवलं —
“आज त्या विहिरीजवळ जाऊन live video करूया.”
रात्री साडेअकरा वाजता तो दोन मित्रांसह बाइकवरून वाड्याकडे गेला. मोबाइलचा फ्लॅशलाइट आणि एक छोटा कॅमेरा एवढंच सामान बरोबर होतं.
वाड्याजवळ पोहोचताच वातावरण बदललं.
पूर्ण शांतता… ना कुत्र्यांचा आवाज… ना वाऱ्याने पानांची सळसळ…
फक्त दूर कुठेतरी पाण्याचे थेंब पडण्याचा आवाज!
हेही वाचा – संकर्षण… राखेतून उरलेला श्वास
रोहितने कॅमेरा सुरू केला.
“Guys, आम्ही आत्ता त्या haunted विहिरीजवळ आलोय…”
तो बोलत असतानाच त्याच्या मित्राने अचानक कुजबुजत विचारलं, “तुला ऐकू आलं का?”
“काय?”
“कोणी तरी खाली रडतंय…”
तिघांनी फ्लॅशलाइट विहिरीत टाकला… खाली फक्त काळोख दिसत होता. पण काही सेकंदांनी स्पष्ट आवाज आला —
“मला बाहेर काढा…”
रोहितला वाटलं कुणीतरी प्रँक करत असेल…. तो अजून पुढे गेला आणि विहिरीच्या काठावरून खाली पाहू लागला.
तेवढ्यात त्याचा कॅमेरा अचानक बंद झाला… मोबाइलचा स्क्रीन ब्लॅंक! पण रेकॉर्डिंग सुरू होतं. नंतर जेव्हा त्यांनी ते रेकॉर्डिंग पाहिलं… तेव्हा त्यांचे अंग थरथरले.
व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत होतं —
रोहित विहिरीत बघत उभा आहे… आणि त्याच्या मागे पांढऱ्या साडीतील एक बाई शांतपणे उभी आहे.
सगळ्यात भयानक गोष्ट म्हणजे… त्यावेळी तिथे रोहितचे फक्त दोन मित्र होते. ती बाई कोणालाच दिसली नव्हती.
त्या रात्रीनंतर रोहित पूर्ण बदलला. तो एकटाच बसून स्वतःशी बोलायचा. रात्री 3 वाजता घराबाहेर जाऊन विहिरीच्या दिशेने पाहात उभा राहायचा.
हेही वाचा – संकर्षण… आशेची पहिली परीक्षा
एक आठवड्यानंतर…
रोहित अचानक गायब झाला.
दोन दिवसांनी गावकऱ्यांना त्याचा मोबाइल त्या विहिरीजवळ सापडला. मोबाईलमध्ये शेवटचे audio recording होते. त्यात फक्त दोन आवाज ऐकू येत होते —
रोहितचा थरथरता आवाज : “तू कोण आहेस…?”
आणि एका बाईचा मंद आवाज :
“आता तू इथून जाऊ शकत नाहीस…”
त्या घटनेनंतर गावकऱ्यांनी ती विहीर कायमची बंद केली.


