Sunday, October 26, 2025

banner 468x60

Homeवास्तू आणि वेधPanchang : आजचे पंचांग, राशीभविष्य आणि दिनविशेष, 23 सप्टेंबर 2025

Panchang : आजचे पंचांग, राशीभविष्य आणि दिनविशेष, 23 सप्टेंबर 2025

दर्शन कुलकर्णी

  • आज, दिनांक : 23 सप्टेंबर 2025; वार : मंगळवार
  • भारतीय सौर : 01 आश्विन शके 1947; तिथि : द्वितीया 28:51; नक्षत्र : हस्त 13:39
  • योग : ब्रह्मा 20:22; करण : बालव 15:50
  • सूर्य : कन्या; चंद्र : कन्या 26:55; सूर्योदय : 06:27; सूर्यास्त : 18:34
  • पक्ष : शुक्ल; ऋतू : शरद; अयन : दक्षिणायन
  • संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127

वेद कन्सल्टन्सी / 9987433660


आजचे राशीभविष्य

मेष – आज मिळणाऱ्या संधींमध्ये वाढ होईल. दिवसभर अनेक शुभ आणि सकारात्मक बातम्या मिळतील. आर्थिक परिस्थिती पूर्वीपेक्षा चांगली असेल. कामावर एखादी अशी नवीन जबाबदारी मिळेल, ज्यामुळे तुमच्या प्रतिष्ठेत आणि आर्थिक स्थितीत वाढ होऊ शकते. जे बेरोजगार आहेत त्यांना नोकरीच्या संधी मिळतील. जोडीदाराकडून पूर्ण पाठिंबा मिळेल.

वृषभ – कामाच्या ठिकाणी किंवा शेजाऱ्यांशी वाद होण्याची शक्यता आहे. जुने एखादे काम पूर्ण करू शकता. आर्थिक परिस्थिती सुधारू शकते. मात्र एखादा मित्र विश्वासघात करू शकतो, त्यादृष्टीने सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे. कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या वागण्याने नाराज देखील होऊ शकता.

मिथुन – मिथुन राशीच्या जातकांना आज नशिबाची साथ मिळेल. कामाच्या ठिकाणी पदोन्नती आणि पगारवाढ मिळू शकते. याव्यतिरिक्त, एखादे अतिरिक्त काम देखील मिळू शकते, ज्यामुळे तुम्हाला आर्थिक फायदा होईल. नवीन संपर्कांमुळे देखील फायदा होण्याची दाट शक्यता आहे. कौटुंबिक संबंध गोड राहतील.

कर्क – आजचा दिवस खूप चांगला असेल. तुमच्याबद्दलचा आदर आणि सन्मान वाढेल. आर्थिक परिस्थितीत सुधारणा होईल. आज कामावर अतिरिक्त जबाबदाऱ्या मिळू शकतात. याशिवाय, काही चांगल्या संधी देखील मिळतील. घरी किंवा कामाच्या ठिकाणी जोडीदार किंवा सहकाऱ्यांबरोबर वाद होऊ शकतो, त्यामुळे कोणतेही निर्णय काळजीपूर्वक घ्या.

सिंह – आजचा दिवस आनंदाचा असेल, मात्र काही नवीन चिंता देखील त्रास देऊ शकतात. एखादा मोठा व्यवसाय करार मिळू शकेल. कामाच्या ठिकाणी केलेल्या मेहनतीचे फळ मिळेल. नोकरदार जातकांना पगारवाढ आणि पदोन्नतीच्या संधीही चालून येतील. जमीन, इमारती आणि रिअल इस्टेटमध्ये गुंतलेल्यांना लक्षणीय फायदे मिळू शकतात.

कन्या – आज काही किरकोळ समस्यांना तोंड द्यावे लागेल, परंतु तुम्ही त्या प्रभावीपणे हाताळू शकाल. पैसे उधार देणे आणि इतरांच्या प्रभावाखाली येणे टाळा, कारण यामुळे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. आरोग्याबद्दलही सावधगिरी बाळगावी लागेल. नोकरदार जातकांना कामात यश मिळू शकते, ज्यामुळे  कारकिर्दीच्या दृष्टीने भविष्यात लाभ होईल.

हेही वाचा – हत्ती आणि युद्ध…

तुळ – काहीतरी नवीन करण्याची आणि काहीतरी नवीन मिळवण्याची संधी आज मिळेल. नोकरदार जातकांना पदोन्नती आणि त्याच्याशी निगडीत फायदे मिळण्याची शक्यता आहे.  जोडीदाराशी वाद, मतभेद होऊ शकतात. आर्थिक परिस्थितीत पूर्वीच्या तुलनेत लक्षणीय सुधारणा होईल. आज अनपेक्षितपणे नफा होण्याची शक्यता जास्त आहे.

वृश्चिक – आजचा दिवस अडचणींनी भरलेला असू शकतो. एखाद्या गोष्टीसाठी खूप पैसे खर्च करावे लागतील. कोणीतरी तुमच्याकडे कर्ज मागू शकते. नवीन करिअरच्या संधी मिळू शकतात. आर्थिक परिस्थिती सुधारेल. कौटुंबिक जीवनात आनंद, शांती आणि प्रेम यांचा प्रवेश होईल. आज नवीन संपर्कांमुळे खूप फायदा होईल.

धनु – या राशीच्या जातकांसाठी प्रवासाचा योग आहे. कामासाठी प्रवास करावा लागू शकतो. हा प्रवास आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरेल. त्यामुळे आर्थिक परिस्थिती मजबूत बनेल. कामाच्या ठिकाणी नवीन आव्हाने आणि जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागू शकतात. काही लाभदायक संधी चालून येतील.

मकर – दिवस धावपळीने भरलेला असेल. कठोर परिश्रमाचे फळ मिळेल. भागीदारीमध्ये व्यवसाय करणाऱ्यांना आज लक्षणीय फायदा होऊ शकतो. आज नफ्याच्या भरपूर संधी मिळतील. त्यामुळे आर्थिक परिस्थिती मजबूत बनेल. आरोग्य चांगले राहील आणि मन आनंदी असेल. कौटुंबिक जीवन शांती आणि आनंदाने भरलेले असेल.

कुंभ – आज काही योजना यशस्वी होतील. ज्यामुळे आर्थिक परिस्थिती सुधारेल. नोकरीच्या काही चांगल्या संधी चालून येतील. कुटुंबातील सदस्यांकडून कामात पूर्ण पाठिंबा मिळेल. कोणत्याही आव्हानांना संयम आणि चिकाटीने तोंड दिले तरच यश मिळेल. आज ऊर्जेने आणि आत्मविश्वासाने परिपूर्ण असाल.

हेही वाचा – आपली माती, आपली माणसं…

मीन – आजचा दिवस चढ-उतारांनी भरलेला असेल. काही गोष्टींमध्ये लक्षणीय यश मिळू शकते, तर काही बाबतीत अडचणींना तोंड द्यावे लागू शकते. आज काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करणे, ही आंतरिक इच्छा पूर्ण होईल. नवीन संधीमुळे आर्थिक परिस्थिती सुधारतील. जे बेरोजगार आहेत त्यांना नोकरीच्या संधी मिळू शकतात.


दिनविशेष

पुरोगामी नाटककार मामा वरेरकर

टीम अवांतर

मराठीतील पुरोगामी नाटककार, कादंबरीकार आणि ‘मामा वरेरकर’ या नावाने प्रसिद्ध असणाऱ्या भार्गवराम विठ्ठल वरेरकर यांचा जन्म 27 एप्रिल 1883 रोजी चिपळूण येथे झाला. 1898 साली त्यांच्या वडिलांनी त्यांना रत्नागिरीच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये डॉक्टरकीचे शिक्षण घेण्यासाठी ‘मेडिकल प्युपील’ म्हणून पाठविले. मात्र शारीरिक अशक्तपणामुळे त्यांना हे शिक्षण मधेच सोडून टपाल खात्यात नोकरी करावी लागली. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये असताना मराठी कवी डॉ. कान्होबा रणछोडदास कीर्तिकर यांची अध्यापक म्हणून भेट झाली. कीर्तिकरांच्या सहवासाचा आणि त्यांच्या दुर्मीळ ग्रंथसंग्रहाचा लाभ वरेरकरांनी घेतला. शेक्सपिअरची नाटके कीर्तिकरांनी त्यांच्याकडून अभ्यास म्हणून गिरवून घेतली. विख्यात नॉर्वेजिअन नाटककार हेन्रिक इब्सेन याच्या नाटकांचा परिचय कीर्तिकरांमुळेच वरेरकर यांना झाला. फ्रेंच नाटककार मोल्येर याची नाटकेही त्यांनी वाचली. कीर्तिकर हे प्रगतिक विचारांचे असल्यामुळे वरेरकरांच्या लेखणीला त्यामुळे पुरोगामीपणाचे विशिष्ट वळणही मिळाले. वरेरकरांनी नाट्यलेखनाच्या क्षेत्रात पदार्पण केले, ते ‘कुंजविहारी’ हे नाटक लिहून. त्यांच्या अन्य नाटकांत हाच मुलाचा बाप, संन्याशाचा संसार, सत्तेचे गुलाम, करीन ती पूर्व, सोन्याचा कळस, उडती पाखरे, सारस्वत, जिवा-शिवाची भेट, अ-पूर्व बंगाल आणि भूमिकन्या सीता यांचा विशेष उल्लेख करावा लागेल. रवींद्रनाथ टागोर, जेम्स बॅरी, हेन्रिक इब्सेन, विल्यम बॅरेट यांच्या नाटकांचे मराठी अनुवादही त्यांनी केले. मराठी रंगभूमीवरील संगीताचे प्रस्थ त्यांनी कमी केले. त्यांची दृष्टी आधुनिक व प्रयोगशील होती. तत्कालीन सामाजिक, राजकीय आंदोलनांचे प़डसाद त्यांच्या नाटकांत उमटले. वरेरकरांनी कादंबरी लेखनही विपुल केले. त्यांच्या कादंबऱ्यांमध्येही अनेक सामाजिक प्रश्न त्यांनी हाताळले. ‘संसार की संन्यास’ ही त्यांची पहिली कादंबरी. तर, ‘विधवाकुमारी’ ही त्यांची कादंबरी विशेष गाजली. याशिवाय धावता धोटा, फाटकी वाकळ, मी रामजोशी, लढाईनंतर या कादंबऱ्या वरेरकरांनी लिहिल्या. पुणे येथे 1938 साली भरलेल्या मराठी नाट्यसंमेलनाचे ते अध्यक्ष होते. धुळे येथे 1944 मध्ये भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमलनाचे ते अध्यक्ष होते. 1956 साली भारत सरकारकडून पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याच वर्षी ते राज्यसभेचे नियुक्त सदस्य झाले. 1962 पर्यंत ते राज्यसभेवर होते. याशिवाय 1959 साली त्यांना पद्मविभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. आकाशवाणीशी त्यांचे निकटचे नाते होते. या माध्यमासाठीही त्यांनी विपुल लेखन केले. 23 सप्टेंबर 1964 रोजी दिल्लीत त्यांचे निधन झाले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

स्मिता जोशी on Navratri : नवरात्रीचे रंग!
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!