Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    संस्कार… माणुसकी आणि सहिष्णुतेचे!

    March 24, 2026

    Dnyaneshwari : देशकाळवर्तमान, आघवें मजसीं करूनि अभिन्न…

    March 24, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 मार्च 2026

    March 24, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Tuesday, March 24
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Awareness : सोशल मीडिया समजून घेताना…
    अवांतर

    Awareness : सोशल मीडिया समजून घेताना…

    Team AvaantarBy Team AvaantarAugust 8, 2025No Comments4 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेखक, मराठीसाहित्य, मराठीआर्टिकल, Awareness, socialmedia, Narada, Kirtan, Vasudev, Radio, जागरुकता, समाजमाध्यम, सोशल मीडिया, नारद, कीर्तन, वासूदेव, रेडिओ
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    शैलेश विजया सोमनाथ महाजन

    फार पूर्वीपासून सोशल मीडिया वापरला जात होता! पण त्याची साधने वेगवेगळी होती. चांगल्या पद्धतीले समाजाने कसे जगले पाहिजे? किंवा समाजप्रबोधन हे सोशल मीडियाचे प्रमुख अंग. पूर्वी आपला सोशल मीडिया कसा होता, हे समजून घेऊयात!

    जगातील सोशल मीडियाचे सर्वात प्रथम, उत्तम उदाहरण म्हणजे आपले, महर्षी ऋषी नारद मुनी. त्यांचा तिन्ही लोकी संचार! माहितीचे भांडार म्हणजे महर्षी नारद मुनी आणि विविध माहिती सगळ्यांना पोहोचविण्याचे कार्य ते करीत असत.

    हां, आता कधी कधी नको ती माहिती, नको त्या ठिकाणी देऊन, महर्षी नारद मुनी त्या काळी वेगळीच परिस्थिती निर्माण करत असत, ही बाब वेगळी. गंमत म्हणजे, आता सुद्धा सोशल मीडियावरून कळत-नकळत असेच काहीसे आपण करीत असतोच की!

    नंतरच्या काळात सोशल मrडियाचे स्वरूप बदलत गेले. आपले पहाटेचे वासुदेव, कीर्तनकार, प्रवचनकार, गोंधळी तसेच यात येतो तो भारुड, पोवाडे हा प्रकार, गावोगावी जाऊन नाटक करणारे कलाकार, डोंबारी, नंदीबैल घेऊन येणारे, बहुरूपी, त्यानंतर आले दवंडी पिटणारे, मग आले पथनाट्य करणारे, लावणी कार्यक्रमात बतावणी करणारे, कोकणातील खेळे… हे अनेक ‘सोशल मीडिया’ पूर्वी होते. हे सर्वजण समाजाभिमुखच होते, समाजप्रबोधन करत होते. यांची सगळ्यांची कार्य करण्याची पद्धती वेगळी होती. पण या सर्वां त्या काळातील एक प्रकारे ‘सोशल मीडिया’च म्हणता येईल. पण तांत्रिकदृष्ट्या त्यांना काही मर्यादा होत्या. किती गावे फिरणार? किती प्रवास करणार? त्या काळी प्रवासाची साधने पण मर्यादित होती. तसेच यांच्या क्रिया आणि समाजाच्या प्रतिक्रिया याला मर्यादा होत्या. प्रत्यक्ष समोरासमोर, फेस टू फेस, असा हा काहीसा सोशल मीडियाचा प्रकार होता. याचे उदाहरण म्हणजे जर एखाद्या मंदिरात कीर्तन असेल, तर प्रत्यक्ष कीर्तनकारांसमोर बसलेला समूहच कीर्तन ऐकू शकायचा. अशा प्रकारच्या खूप मर्यादा होत्या. त्या काळी जे होते ते योग्य होते, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

    हेही वाचा – Technology Vs Manpower : तंत्रज्ञानाचा भस्मासुर

    बदलत्या काळानुसार सोशल मीडियाचे स्वरूप बदलत गेले. लाऊड स्पीकर आला… रेडिओ आला… नंतर TV आला, विविध चॅनल्स आले… आणि सोशल मीडियाचे स्वरूप पूर्णपणे बदलून गेले. तरी या सर्व मीडियाला मर्यादा होत्याच. हा सर्व प्रकार एकतर्फी होता. जे प्रक्षेपित होईल, तेवढेच. त्यावर ताबडतोब प्रतिक्रिया देणे किंवा आपले मत व्यक्त करणे इथे शक्य नव्हते. त्यामुळे येथेही जी माहिती पोहोचलवली जात होती, ती दिशाभूल करणारी नसावी, याची प्रामुख्याने काळजी घेतली जायची. तथापि, काहीवेळेस या एकतर्फी सोशल मीडियाने चुकीची मते मांडून समाजाचे ब्रेनवॉश करण्याचे कामही केले आहे. याचे प्रत्यय दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी जर्मनीत पाहायला मिळाला.

    त्यानंतर सोशल मीडिया बाबत क्रांती घडली. स्मार्ट फोन आणि त्यातील ॲप आले. आजपर्यंत कधी झाला नव्हता इतका सोशल मीडियाचा वापर होऊ लागला आहे. त्याने जग बदलून गेले आहे. जवळ जवळ सर्वचजण सोशल किंवा अतिसोशल झाला आहे म्हणाना! या सोशल मीडियाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येकजण दोन्ही बाजूंनी आपली मते मांडू शकतो. यात कोणी एकच काहीतरी आपल्या बाजूने प्रक्षेपित करेल आणि बाकी सर्वजण ते फक्त ऐकून घेतील किंवा बघतील असे राहिलेले नाही. जगाच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक जण यावर ताबडतोब प्रतिक्रिया देऊ शकतो. यामुळे जग जवळ आले. या नवीन स्मार्ट मोबाइल आणि त्यातील ॲपमुळे सर्वांना समाजभिमुख होण्याचे समान हक्क प्राप्त झाले आहेत.

    पण याची दुसरी काळी बाजूही आहे. या सोशल मीडियाचा वापर करताना अतिरेकही होत असल्याचे दिसते. या सोशल मीडियाच्या मायाजालात अबालवृद्ध गुरफटले गेले आहेत. दिवस दिवस याचा वापर करत असल्याने ते बिनकामी होत चालले आहेत. या सोशल मीडियाचे व्यसन समाजाला लागले आहे आणि समाज पोखरला जात आहे. याचा वापर जसा चांगला आहे तसेच वाईटही होत आहे. या नवीन सोशल मीडियाचे परिणाम- दुष्परिणाम आपण सर्वजण पहात आहोत, भोगत आहोत. या नवीन सोशल मीडियाबाबत लिहावे तितके थोडेच आहे. एका वाक्यात सांगायचे झाले तर, ‘माकडाच्या हातात कोलीत’ असेचे काहीसे म्हणता येईल.

    हेही वाचा – Technology Vs Manpower : तंत्रज्ञान वापराबाबत स्वनियमनाची गरज

    सोशल मीडिया समजून घेताना आपण त्याचा वापर योग्य रीतीने आणि योग्य वेळी केला पाहिजे. सोशल मीडियावर प्रत्येकवेळी व्यक्त होणं गरजेचं आहे का? त्याचा अतिरेकी वापर केलाच पाहिजे का? समाजावर आणि आपल्यावर त्याचा काय बरा-वाईट परिणाम होत आहे? हे जाणून घेतले पाहिजे. सोशल मीडियाचा मूळ उद्देश समाजप्रबोधन हा आहे. सोशल मीडिया समजून घेताना याकडेच लक्ष देणे आवश्यक आहे.

    मोबाइल – 9322755462

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    संस्कार… माणुसकी आणि सहिष्णुतेचे!

    March 24, 2026 अवांतर

    आनंदी जगायला काय लागतं?

    March 23, 2026 अवांतर

    Harish Rana : अगतिक पितृत्व, असहाय्य मातृत्व…

    March 20, 2026 अवांतर
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    अवांतर

    संस्कार… माणुसकी आणि सहिष्णुतेचे!

    By Team AvaantarMarch 24, 2026

    संगीता भिडे ‘संस्कार’ ही संकल्पना प्रथम स्पष्ट होणे आवश्यक आहे. ‘सम्यक करोति इति संस्कारः।’ कोणतीही…

    आनंदी जगायला काय लागतं?

    March 23, 2026

    Harish Rana : अगतिक पितृत्व, असहाय्य मातृत्व…

    March 20, 2026

    Waterloo Teeth… मानवतेला एक तडा!

    March 11, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    संस्कार… माणुसकी आणि सहिष्णुतेचे!

    March 24, 2026

    Dnyaneshwari : देशकाळवर्तमान, आघवें मजसीं करूनि अभिन्न…

    March 24, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 मार्च 2026

    March 24, 2026

    सेटवरच मिळाली खूप मोठी कॉम्प्लिमेन्ट!

    March 24, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : खेळगटातील जीवनव्यवहार शिक्षण

    March 23, 2026

    आयुष्यात टवटवीतपणा आणणारा ‘तो’

    March 23, 2026

    POPULAR CATEGORY

    • अध्यात्म 246
    • अवांतर 174
    • आरोग्य 91
    • फिल्मी 44
    • फूड काॅर्नर 184
    • मैत्रीण 16
    • ललित 508
    • वास्तू आणि वेध 360
    • शैक्षणिक 73

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Advertise

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn