Saturday, March 7, 2026

banner 468x60

Homeललितआजींनी नव्या तरुणाईचे टोचले कान

आजींनी नव्या तरुणाईचे टोचले कान

प्रणाली मंगेश महाशब्दे

आज गावी एका लग्नाला जाण्याचा योग आला. खूप दिवसांनी असे लग्न होत होते… असे म्हणजे सर्व विधीपूर्वक!

तुम्ही म्हणाल की, सगळी लग्नं तशीच होतात की! पण खरंच गावाकडील हे लग्न अनेक गोष्टींनी लक्षात राहिले..

सगळे गाव एक होऊन लग्नाची तयारी करीत होते. घरचंच कार्य असल्यासारखे लहान-मोठे सर्वजण आपापला सहभाग देत होते. कोणताही बडेजाव तेथे नव्हता. कोणतेही प्री-वेडिंग कार्यक्रम तेथे नव्हते. पण सगळेजण खूपच आनंदात होते. मुलीकडील लग्न म्हणजे गावात वऱ्हाड येणार होते. वेशीपासून गावात दुतर्फा कमान घातली होती, रांगोळ्या काढल्या होत्या. गावातील सर्व पुरूष मंडळी ही सगळी बाहेरची कामे बघत होती तर महिला मंडळ सगळे लेकीचे कौतुक करण्यात मग्न होती. (गावात समानतेचे वारे जास्त वाहत नाहीत.)

नवऱ्या मुलीबरोबर तिच्या मैत्रिणी तसेच इतर मुलींना आजी सगळ्या विधींबद्दल माहिती देत, गप्पा मारत काम करत होत्या. नवरी मुलगी कॅालेजमध्ये शिकायला शहरात काही दिवस होती, त्यामुळे तिच्या तेथील मैत्रिणी पण लग्नाला आल्या होत्या. एकूणच तेथील सगळा कार्यक्रम त्यांना गोंधळच वाटत होता. त्यामुळे त्या सारख्याच त्या कार्यक्रमांना, दागिन्यांना, पेहेरावाला नावे ठेवत होत्या. गावातील सर्व आजी त्या मुलींसाठी फक्त हसण्याचा विषय होता…

हेही वाचा – मनाचे ऐश्वर्य संस्कार, मनाचे सौन्दर्य संस्कार

त्या मुली तर त्या आजींना म्हणाल्या पण की, बायका किती शिकत आहेत, मोठमोठ्या पदांवर काम करत आहेत आणि तुम्ही हे काय घालत आहात आणि सगळ्यांना तसे घालायला पण का सांगत आहात? त्या आजींनी काही वेळ सगळे ऐकून घेतले नंतर मात्र त्यांनी सगळ्या मुलींना एका ठिकाणी बसवून गप्पा मारायला सुरुवात केली.

“काय ग पोरींनो काय म्हणत व्हता तुम्ही की, मुली शिकून लय मोठ्या झाल्या मग आता हे असे सगळे दागिने, असे कपडे कशापायी? बरोबर ना?”

मुली – मग काय तर उगीचच हे एवढे जड-जड दागिने, अवघडल्यासारखे कपडे कशाला हवे? साधं सोपं रहावं…

आजी – अगं पोरींनो हे दागिनं म्हणजी कुठलेही अवघड काम कसं असेल?

मुली – मग काय तर कशाला घालायचे हे दागिने? कशाला एवढी खरेदी करायची दागिन्यांची?

आजी – अगदी बरोबर हाय बघा पोरींनो तुमचं. पण एक सांगा बरं ह्ये दागिनं, ह्यो गजरा, ह्ये कुकू कशापायी लावतो असं वाटतं तुम्हास्नी?

मुली – पहिल्यापासून करत आला आहात, तुमच्या आजी-पणजी हे करत होत्या म्हणून तुम्हीपण करत आहात. बाकी काय. तुम्हाला कधी हे नको, असे सांगताच आले नाही. आमच्या आई-आजी कशा या सगळ्या गोष्टींना विरोध करतात.

आजी – अस्सं हाय व्हय, मला सांगा तुम्ही समद्याजणींनी हे असे समदे दागिने तुमच्या आईने, आजीने घातलेले कधी बघितले आहे का?

मुली – नाही.

आजी – तुमच्या आई आणि आजीला सारखं काहीना काही दुखतं का?

मुली – कधी-कधी.

आजी – बरं मग, आता आम्ही काय सांगतो ते नीट ऐका आणि तुमच्या घरी बी सांगा. काय चालंल न्हवं? आता बघा, आम्ही हे सोन्याचे दागिने जे घातले हाय ते समदे शरीराच्या वरच्या भागात आणि चांदीचे दागिने शरीराच्या खालच्या भागात. बरोबर ना!

मुली – असं का?

दुसरी आजी – सोन्याचे दागिने उष्ण आणि चांदीचे दागिने थंड असतात. कंबरेच्या वरील भागात सोन्याचे दागिने आणि कंबरेच्या खालील भागात चांदीचे दागिने घातले पाहिजेत. हा नियम पाळल्याने शरीरातील उष्णता आणि थंडावा नीट राहतो.

हेही वाचा – अबोला… जास्त किंवा कमी दोन्ही घातकच!

तिसरी आजी – सोन्याच्या दागिन्यांमुळे शरीराचे तापमान आणि रक्ताभिसरण नियंत्रित रहाते, ताण आणि चिंता कमी करते. तर चांदीच्या दागिन्यांमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

दुसरी आजी – आता ही नथ. नाकात नथ घातल्याने मासिक पाळीच्या समस्या दूर होतात. शरीरातील अतिरिक्त उष्णता कमी होते.

तिसरी आजी – या बांगड्या घासल्या जातात त्यामुळे रक्ताभिसरण चांगले होते. तुमच्या भाषेत सांगायचे तर त्यामुळे तुमचे मानसिक आरोग्य चांगले राहते.

दुसरी आजी – पायांमध्ये ही जोडवी, त्यामुळे रक्तवाहिनीवर दाब निर्माण होतो. त्यामुळे गर्भाशयाला रक्तपुरवठा सुरळीतपणे सुरू राहतो. या प्रकारे, जोडवी स्त्रियांची गर्भधारणा क्षमता निरोगी ठेवते आणि मासिक पाळी ही नियमित होते. तर, चांदीच्या पैंजणांमुळे पायाचे घर्षण होऊन पायाची हाडं मजबूत होतात.”

पहिली आजी – हे आम्ही काहीच दागिन्याबद्दल सांगितले. बाकीची माहिती तुम्ही तुमच्या या मोबाइलमध्ये पण बघू शकाल. आता फक्त तुम्ही पोरी लग्न झाल्यावर हे सगळे घालायला लागा अन् मग बगा काय व्हते ते.

दुसरी आजी – तुमच्या मोबाईलवर 16 शृंगार लिहून बघा, मग समजेल काय महत्त्व आहे ते! तुम्हाला आमी सांगितले तर, ते पटत बी न्हायी की…”

मुली – खरंच की, हे सगळे आहे की मोबाइलमध्ये! बापरे, केवढ्या गोष्टी माहीत आहेत या सर्वांना!! आजी आम्हाला पण पटले हे सगळे आपल्या betterment साठीच आहे पण आम्हीच त्याला outdated म्हणत होतो. पण आता आम्हीपण हे सगळे घालणार आणि इतरांना पण घालायला सांगणार.

असे म्हणून सगळेच हसत हसत परत कामाला लागले.

मोबाइल – 9730020494

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

माधवी माहुलकर avaantar.com on Poetry : अपूर्ण अन् रातराणी…
डॉ सुधाकर संभाजीराव तहाडे on आशीर्वाद सर अन् Best Reader किताब
स्मिता जोशी on Navratri : नवरात्रीचे रंग!
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!