Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: रेवती निलेश पांडे
विज्ञान विषयाचे 12 वर्षांपासून अध्यापन करीत असून सोबतच विविध नाटकांच्या संहिता लिखाण, शॉर्ट फिल्म्ससाठी कथा लेखन केले आहे. 'आठवणींचं कपाट' हा काव्यसंग्रह प्रकाशित. विविध दिवाळी अंक आणि वर्तमानपत्रातून काव्यलेखन. अखिल भारतीय साहित्य संमेलन तसेच विदर्भ साहित्य संमेलनामध्ये सहभाग. पती गेल्या 25 वर्षांपासून गृहनिर्माण वित्त क्षेत्रात कार्यरत. मोबाइल - 8552893399
“कंटाळले बाई मी! असं वाटतं हे सगळं सोडून कुठेतरी जंगलात निघून जावं…” आम्ही लहान असताना आई वैतागून अनेकदा हे वाक्य म्हणायची. तेव्हा आम्हीही निरागसपणे म्हणायचो, “आई, आम्ही पण येतो गं तुझ्यासोबत!” प्रत्यक्षात आई कधीच सगळं सोडून जंगलात गेली नाही; पण तेव्हा मात्र मला नवल वाटायचं की, हिला सारखं जंगलात का जायचं असतं? तिथे असं काय असेल? पुढे काळ पुढे सरकला, आणि जेव्हा मी स्वतः ‘आई’ या भूमिकेत शिरले, तेव्हा मधे मधे मलाही जंगलात निघून जावसं वाटू लागलं. संसाराच्या जबाबदाऱ्या, रोजची धावपळ आणि अपेक्षांचं ओझं अंगावर पडलं की, आईकडून ऐकलेले ते शब्द मनात पुन्हा जिवंत व्हायचे. पण तरीही कित्येक वर्षं मला…
दोन महिन्यांपूर्वी एकटीने रेल्वेने प्रवास करण्याचा योग आला. प्रवास बराच लांबचा होता. मला ‘साइड अप्पर’ सीट मिळाली होती, त्यामुळे मी, हातातील पुस्तक आणि मधेच येणारा चहा अशी आमची तिघांची मस्त मैफल जमली होती… माझ्या समोरच्या उजवीकडच्या लोअर बर्थवर एक स्त्री आणि डावीकडच्या लोअर बर्थ वर एक पुरुष असे दोघं बसले होते. सुरुवातीला त्यांच्या नात्याचा अंदाज आला नाही, पण थोड्या वेळाने चित्र स्पष्ट झाले. तो माणूस एका स्टेशनवरून पेपर घेऊन चेहऱ्यासमोर धरून बसला होता. ती स्त्री मात्र घरच्या काही तक्रारी, जावेबद्दल किंवा नणंदेबद्दल काहीतरी सांगत होती. तिचे बोलणे अतिशय सौम्य शब्दांत होते, पण तो पुरुष साधं ‘हं’ म्हणण्याची तसदीही घेत नव्हता.…

