Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Team Avaantar
डॉ. विवेक वैद्य दुपारीच जड जेवण झाले होते… पुरणपोळी, आंब्याचा रस! त्यामुळे रात्री जेवणाची इच्छा नव्हती. तरीपण फ्रीजमध्ये ठेवलेला वाटीभर आंब्याचा रस घेतला, त्याची मधुर चव जिभेवर राहिली. घड्याळाचा काटा अकराच्या पुढे गेला आणि डोळे जड होऊ लागले. अंथरुणावर पाठ टाकली तेवढयात… “डॉक्टरसाब… डॉक्टरसाब” अशा हाका ऐकू आल्या. येणारी गुंगी झटकून उठलो. आजकाल पूर्वीसारखे रात्री येणार पेशंट खूप कमी झाले आहेत, (Thanks to Multispeciality Hospitals) तरीही कुणीतरी कधीतरी येत… खिडकी उघडून विचारले, “कोण?” “दादा, मैं सत्तार…” सत्तार माझा जुना पेशंट. गोरा, हसमुख, सुदृढ…. सफाचट दाढी असलेला… त्याच्या वडिलांपासून ओळख. माझ्या वडिलांशीही त्यांची ओळख असल्याने मी सत्तारच्या वडिलांना चाचा म्हणायचो. “क्या…
अध्याय आठवा वेदेषु यज्ञेषु तपःसु चैव दानेषु यत् पुण्यफलं प्रदिष्टम् । अत्येति तत् सर्वमिदं विदित्वा योगी परं स्थानमुपैति चाद्यम् ॥28॥ जरी वेदाध्ययनाचें जालें । अथवा यज्ञाचें शेतचि पिकलें । कां तपोदानांचें जोडलें । सर्वस्व हन जें ॥261॥तया आघवियांचि पुण्याचा मळा । भारु आंतौनि जया ये फळा । जें परब्रह्मा निर्मळा । सांठी न सरे ॥262॥ जें नित्यानंदाचेनि मानें । उपमेचां कांटाळां न दिसे सानें । पाहा पां वेदयज्ञादि साधनें । जया सुखा ॥263॥ जें विटे ना सरे । भोगितयाचेनि पवाडें पुरे । पुढती महासुखाचें सोयरें । भावंडचि ॥264॥ ऐसें दृष्टीचेनि सुखपणें । जयासी अदृष्टाचें बैसणें । जें शतमखींहि आंगवणें ।…
दर्शन कुलकर्णी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – दिवसभर उत्साही राहाल. आर्थिक व्यवस्थापन सुज्ञपणे करा. आवश्यकता असल्यास, तज्ज्ञांचा सल्ला घ्या. तुमच्या व्यावसायिक जीवनात सर्व काही ठीक होईल. दिवसभर ध्येयांनी प्रेरित राहाल. तब्येतीकडे लक्ष द्या, पथ्यपाण्याकडे दुर्लक्ष करू नका. घरातील सदस्यांशी संवाद साधताना शब्द जपून वापरा. वृषभ – आजचा दिवस खूप छान जाईल. आयुष्यात सकारात्मक ऊर्जा राहील. तुमचे मन आनंदी असेल. सर्व कामे उत्साहाने आणि नाविन्यपूर्ण कल्पनांनी पूर्ण करा. कामानिमित्त प्रवास घडणे शक्य आहे. आज कुटुंबासह एखाद्या धार्मिक स्थळाला भेट देऊ शकता. मिथुन – तुम्ही केलेल्या गुंतवणुकीमधून अपेक्षित परतावा मिळणार नाही. यश मिळविण्यासाठी व्यावसायिक जीवनात सातत्याने प्रयत्न करणे आवश्यक…
यश:श्री जंगली हत्ती माणसाळवण्याचे काम हुशार आणि तज्ज्ञ माहुतांवर सोपविले जाते. कळप सुटलेल्या हत्तीला प्रथम शांतं करावे लागते. यासाठी बरेच प्रयत्न करावे लागतात. हे हत्ती एकदा माणसाळले की, ते त्या माहुताच्या सर्व आज्ञा पाळतात. हळूहळू माहुतही त्याला पोटच्या पोराप्रमाणे जपतो. अनेक वर्षे पालनपोषण केलेला, प्रेमाने खाऊ घातलेला हत्ती हरवला किंवा मृत झाला, तर त्याच्या माहुताला खूप दुःख होते. पण याउलट, अनेकदा माहुताला वाचविणारा हत्तीच त्याच्यासाठी यम बनून येतो आणि त्याचा जीव घेतो. वास्तविक, हत्तीला प्रशिक्षित करण्याची जशी कला आहे, तशीच त्याला पकडण्याचीही एक कलाच आहे. प्रसिद्ध लेखिका दुर्गा भागवत यांनी काही वर्षांपूर्वी लिहिलेल्या एका लेखात याचा उल्लेख केला आहे. यासाठी…
अध्याय आठवा नैते सृती पार्थ जानन् योगी मुह्याति कश्चन । तस्मात् सर्वेषु कालेषु योगयुक्तो भवार्जुन ॥27॥ ते वेळीं म्हणितलें हें नव्हे । वायां अवचटें काय पावे । देह जाऊनि वस्तु होआवे । मार्गेचि कीं ॥247॥ तरी आतां देह असो अथवा जावो । आम्ही तों केवळ वस्तूचि आहों । कां जे दोरीं सर्पत्व वावो । दोराचिकडुनि ॥248॥ मज तरंगपण असे का नसे । ऐसें हें उदकासी कहीं प्रतिभासे । तें भलतेव्हां जैसें तैसें । उदकचि कीं ॥249॥ तरंगाकारें न जन्मेचि । ना तरंगलोपें न निमेचि । तेविं देहीं जे देहेंचि । वस्तु जाहले ॥250॥ आतां शरीराचें तयाचिया ठाईं । आडनांवही उरलें…
दर्शन कुलकर्णी प्रदोष वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – नवीन सकारात्मक बदलांसाठी तयार रहा. उत्पन्नाचे नवीन स्रोत उदयास येतील. आर्थिक परिस्थितीत सुधारणा होईल. कामाच्या ठिकाणी विरोधक सक्रिय असतील. रागावर नियंत्रण ठेवा, वादविवाद टाळा. कौटुंबिक जीवन आनंदी असेल. आज परिवारातील सदस्यांकडून प्रेम आणि आपुलकी मिळेल. वृषभ – कौटुंबिक जीवनात उत्साहाचे वातावरण निर्माण होईल. अतिशय प्रभावी व्यक्तींच्या पाठिंब्यामुळे तुमचे मनोधैर्य उंचावेल. कलात्मक क्षमतेमुळे अनेकांकडून कौतुकाची थाप मिळेल आणि अनपेक्षित बक्षीसही मिळेल. कामाचा जास्त ताण घेणे टाळा. वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात संतुलन राखा. सर्वाधिक गरज असेल तेव्हा मित्र मदतीला धावून येणार नाहीत. मिथुन – सामाजिक कार्यातील तुमची आवड वाढेल. जुन्या मित्रांच्या भेटी…
मयुरेश गोखले नवरा ऑफिसला गेल्यावर ती घरची कामं करत होती. बाहेर रिमझिम पाऊस पडत होता आणि रेडिओवर गाणं लागलं होतं, “तेरे बिना जिया जाए ना, बिन तेरे… तेरे बिन साजना, साँस में साँस आए ना…” पावसामुळे वातावरण धुंद झालं होतं आणि बायकोची अवस्था त्या गाण्यासारखीच झाली होती. तेरे बिना जिया जाए ना… गॅलरीत येऊन तिने पावसाचे थेंब अंगावर झेलले. समोरच्या झाडाच्या हिरव्यागार पानांवरून पाण्याचे थेंब ओघळत होते… ती त्या थेंबांकडे पाहात बसली. त्या पानासारखे तिचे मनही ओले चिंब झाले होते… नवऱ्याची प्रचंड डोंगराएवढी आठवण तिला येत होती…. तेवढ्यात एक थंड वाऱ्याची झुळूक आली आणि तिने दीर्घ श्वास घेतला. या श्वासातही…
राजू पाटील लच्छनकर मानवी जीवन सुख, दुःख, आनंद अशा वेगवेगळ्या भावनांनी भरलेलं आहे. जीवन जगत असताना बरेचशा इच्छा मनात राहतात, कधी त्या पूर्ण होतात तर, कधी नाही! फार कमी लोक असतात त्यांच्या इच्छा पूर्ण होतात आणि त्यामुळे त्यांचे जीवनच बदलून जाते. आमच्या भागात अशीच एक परंपरा आहे… तुमच्या मनातली एखादी इच्छा पूर्ण झाली की, एक-दोन बकऱ्याची, पाच बकऱ्यांची, 11 बकऱ्यांची, 21 बकऱ्यांची दावत दिली जाते आणि त्या दावतला जेव्हा अन्य एखादा नवस करतो किंवा नवस बोलतो तो नवस फक्त त्यालाच माहीत राहावा लागतो आणि ज्या दिवशी मग ती नवसाची कंदुरी (मटण) होते, त्या दिवशी तो त्या नवसाच्या कंदुरीचे कारण सगळ्यांना…
काही वेळेस पदार्थ बिघडतो, काहीतरी कमी जास्त होते किंवा खाद्यपदार्थांमध्ये काहीतरी वेगळेपण आणण्यासाठी नवनवीन प्रयोग केले जातात. अशाच काही टिप्स आपण आज पाहुयात – हेही वाचा – Kitchen Tips : मसाला वांगी, फ्लॉवरची भाजी, पातळ पालेभाजी बनवताना… हेही वाचा – Kitchen Tips : पापड-कुरडयांची कोशिंबीर, कच्च्या केळ्यांची भाजी अन् उरलेल्या भाजीचे कटलेट्स तुमच्याही ‘स्पेशल रेसिपी’ किंवा अशा काही ‘किचन टिप्स’ असतील तर, avaantar.recipe@gmail.com या ईमेलवर किंवा 9869975883 या व्हॉट्सॲप क्रमांकावर पाठवा. या वेबसाइटच्या ‘फूड कॉर्नर’ या कॅटेगरीत त्या प्रसिद्ध केल्या जातील. (‘सुगरणीचा सल्ला’ पुस्तकातून साभार)
मानसी देशपांडे आजचा विषय थोडा वेगळा आहे, तो आहे ‘मुंबई’! मला कल्पना आहे, हा लेख वाचणारे सगळेच मुंबईकर नाहीत, पण मी स्वतः मुंबईची असल्यामुळे थोडा हळवेपणा आहे. मुंबई ही काहीजणांसाठी मायानगरी आहे. पण ही कधीच झोपत नाही. आजच्या तारखेला सुद्धा नोकरीनिमित्ताने अनेक लोक येथे येतात, ज्यांना ही मुंबई आपल्यात सामावून घेते. बघा, काहींना नाईलाजास्तव देखील इथे यावं लागतं. कारण, उदरनिर्वाहाला इथे कमी नाही. जसं व.पु. म्हणतात, ” प्रवासाला निघालेल्या माणसाला आपण केवळ स्टेशनपर्यंत पोहोचवतो, पुढचा प्रवास तो स्वतःच्या हिमतीवर करतो…” अगदी काहीसं असंच आहे. मुंबई ही अतिशय वेगवान आहे. इथे तुम्हाला आणून जरी ठेवलं तरी वेळ पाळणं आणि मेहनत करून…

