Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Team Avaantar
डॉक्टर सारिका जोगळेकर होमिओपॅथीचा (Homeopathy) शोध डॉक्टर Samuel Hahnemann यांनी जर्मनीमध्ये 1796 साली लावला. होमिओपॅथी हा शब्द दोन ग्रीक शब्दांमधून तयार झाला आहे. ‘Homois’ म्हणजे समान आणि ‘pathos’ म्हणजे दुःख. त्या काळातील सर्व वैद्यकीय पद्धती फार वेदनादायक आणि हानिकारक, अशा होत्या. (उदा. गरम लोखंडाचा वापर, अतिरक्तस्त्राव). Dr. Samuel Hahnemann यांचा घातक परिणाम होणाऱ्या प्रक्रियेवरील विश्वास उडाला होता. त्यांनी या पद्धतींचा विरोध केला आणि एका सौम्य उपचार पद्धतीचा शोध सुरू केला. Dr. Hahnemann यांनी सर्व वैद्यकीय ग्रंथ वाचून पाहिले, पण त्यात त्यांना समाधानकारक योग्य तत्वे दिसली नाहीत. प्रयोग करताना cinchona bark नावाच्या वनस्पतीचा रस प्यायल्यावर स्वतःमध्ये मलेरियाची लक्षणे त्यांना दिसली होती.…
रविंद्र परांजपे मनाचे आरोग्य (Mental Health) चांगले असेल तर, शरीराचे आरोग्य चांगले राहते. तथापि, दैनंदिन जीवनात आपण नेहमी शरीराचे आजार, व्याधी-विकार, तक्रारी इत्यादींबद्दल म्हणजेच शारीरिक आरोग्याबाबत बोलत असतो. जसे आपले शरीर आजारी पडते तसे मनही आजारी पडू शकते आणि प्रत्यक्षात मन आजारी पडते देखील, पण शरीराप्रमाणे आपल्याला मन दिसत नसल्याने मनाचे आजारपण आपल्या लक्षातच येत नाही. यदाकदाचित मनाचे आजारपण लक्षात आले तरी, ते दडपण्यात अथवा लपविण्याकडे अधिक भर असतो. असे केल्यास साहजिकच मानसिक समस्या बळावतात आणि परिणामी मानसिक व्याधी, विकार उद्भवतात. मनाचे आरोग्य बिघडले की, त्याचा थेट दुष्परिणाम म्हणजे शरीराचे आरोग्य देखील बिघडते. ही बाब ध्यानात घेऊन आपण मनाचे आरोग्य…
परिणिता रिसबूड हाऊस वाइफ कधी कधी जाताना रस्त्यांनी विचारते असेच कोणी कॅज्युअली मग! काय करता तुम्ही? मी मग होऊन ओशाळी चेहरा पाडते साफ काही नाही हो, घरीच असते हाऊस वाइफ पण मनात असतात उत्तरे सांगावे का ह्यांना खरे मी तसे बरेच करते उघड्या डोळ्यांनी जग बघते रोज पेपर वाचून हळहळते अन्यायाबद्दल चडफडते विचार करते,विचार करते खरेच आपण चाललो आहोत कुठे आपली संस्कृती, नीतीमूल्ये ह्या सगळ्याचे काय झाले ही काय प्रगती झाली आपली या मातीपासून नाळच तुटली कशाच्या मागे सगळे धावतायत कशाला हा जीव आटवतायत बायकांना म्हणे मिळाले आहे स्वातंत्र्य आता नाही म्हणे कसलेच बंधन मग, परवा कोणती भाजून मेली आणि…
वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ. स. 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी (Dnyaneshwari) सांगितली. भावार्थदीपिका, ज्ञानदेवी अशी ह्या ग्रंथाची पर्यायी नावे होत. स्वतः ज्ञानेश्वरांनी या ग्रंथाचे नामकरण केलेच नाही. ‘केले ज्ञानदेवें गीते । देशीकार लेणे’ एवढेच त्यांनी म्हटले आहे; तथापि संत नामदेवांनी या ग्रंथाचा उल्लेख ज्ञानदेवी, ज्ञानेश्वरी आणि गीताटीका अशा तीन नावांनी केलेला आहे. त्यामुळे ज्ञानदेवांची वा ज्ञानेश्वरांची ती ज्ञानेश्वरी वा ज्ञानदेवांची ती ज्ञानदेवी अशी नावे रूढ झाली असावीत. अध्याय पहिला मज अवगमलिया दोनी । मीमांसा श्रवणस्थानीं । बोधमदामृत मुनी । अली सोवती ||16|| प्रमेयप्रवाल सुप्रभ…
दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 26 जुलै 2025; वार : शनिवार भारतीय सौर : 04 श्रावण शके 1947; तिथि : द्वितीया 22:41; नक्षत्र : आश्लेषा 15:51 योग : व्यतिपात 28:05; करण : बालव 10:57 सूर्य : कर्क; चंद्र : कर्क 15:51; सूर्योदय : 06:12; सूर्यास्त : 19:16 पक्ष : शुक्ल; ऋतू : वर्षा; अयन : दक्षिणायन संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127 वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – व्यवसायात प्रगती होईल, ज्यामुळे मन आनंदी राहील. कामाशी संबंधित प्रवासात काही महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना बौद्धिक आणि मानसिक तणावापासून मुक्ती…
लीना जोशी परुळेकर मागच्या भागात आपण त्वचेचा pH आणि तेलकट त्वचेवर कुठल्या प्रकारची उत्पादने वापरावीत ते पाहिले. आता आपण कोरडी त्वचा आणि त्यासाठी कुठल्या प्रकारची उत्पादने वापरावीत, ते पाहू. कोरड्या त्वचेचा pH हा 5.5 या range च्या पुढे असतो, म्हणजेच त्वचेच्या नैसर्गिक pH range पेक्षा जास्त. थोडक्यात कोरडी त्वचा ही थोड्याफार प्रमाणात alkaline असण्याकडे झुकलेली असते. कोरड्या त्वचेत sebum Secretion चे प्रमाण कमी असते. म्हणजेच, त्वचेत नैसर्गिक तेल बनण्याचे प्रमाण कमी असते, ज्यामुळे त्वचा कोरडी पडते. त्यामुळेच या प्रकारच्या त्वचेवर अशी उत्पादने वापरली जातात, जी तेल आणि पाणी यांच्या मिश्रणातून बनवलेली असतात. ही उत्पादने, Cream base असतात आणि Cream base…
शैलेश विजया सोमनाथ महाजन मागील लेखात आपण पौराणिक काळातील भस्मासुर राक्षस आणि आधुनिक काळातील अद्यावत तंत्रज्ञान, टेक्नॉलॉजीचा भस्मासुर राक्षस म्हणजे काय, हे समजून घेण्याचा प्रयत्न केला. या लेखात थोडे पुढे जाऊयात. अद्ययावत भस्मासुर म्हणजे, कॅलक्युलेटर आल्यावर बेरीज आणि वजाबाकी करण्याची, पाढे पाठ करण्याची आपली बुद्धीची क्षमता भस्म झाली. अद्यावत तंत्रज्ञान आले आणि मानवाची शारीरिक कामे करण्याची क्षमता नष्ट होत चालली. त्यामुळे ब्लड प्रेशर, डायबिटीस यासारख्या असुरांची देखील संख्या वाढू लागली. त्यात मोबाईल हा एक मोठा भस्मासुर आला. त्याने तर जवळ जवळ एक पिढी भस्मसात केली आणि त्यातून पुढील पिढीचे तर काही खरे नाही, असे म्हणावे लागेल. जसे लिफ्टच्या अतिवापराने आपण…
आराधना जोशी मुंबई (Mumbai) ही देशाची आर्थिक राजधानी मानली जाते. स्वप्ननगरी किंवा मायानगरी म्हणून ओळख असणाऱ्या या शहराने आतापर्यंत अनेक नैसर्गिक आणि मानवनिर्मित आघात सहन केले आहेत. मग ते 1993 चे साखळी बॉम्बस्फोट असोत की 26/11 चा दहशतवादी हल्ला असो किंवा 11 जुलै 2006चे लोकल ट्रेनमधील स्फोट असोत. पण या आघातांनंतरही मुंबई सावरली, पुन्हा उभी राहिली. मात्र, 20 वर्षांपूर्वी 26 जुलैच्या पावसाने संपूर्ण मुंबईत जो काही धुमाकूळ घातला तो विसरणं कदापि शक्य नाही. त्यावेळी मी तेव्हाच्या अल्फा मराठी (आताच्या झी मराठी) चॅनेलवरील ‘नमस्कार अल्फा’ या live phone in कार्यक्रमाची संशोधक, समन्वयक म्हणून काम करत होते. दुपारी 12.30चा हा कार्यक्रम असायचा.…
वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ. स. 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी (Dnyaneshwari) सांगितली. भावार्थदीपिका, ज्ञानदेवी अशी ह्या ग्रंथाची पर्यायी नावे होत. स्वतः ज्ञानेश्वरांनी या ग्रंथाचे नामकरण केलेच नाही. ‘केले ज्ञानदेवें गीते । देशीकार लेणे’ एवढेच त्यांनी म्हटले आहे; तथापि संत नामदेवांनी या ग्रंथाचा उल्लेख ज्ञानदेवी, ज्ञानेश्वरी आणि गीताटीका अशा तीन नावांनी केलेला आहे. त्यामुळे ज्ञानदेवांची वा ज्ञानेश्वरांची ती ज्ञानेश्वरी वा ज्ञानदेवांची ती ज्ञानदेवी अशी नावे रूढ झाली असावीत. याच ज्ञानेश्वरीपासून ‘अवांतर’च्या वाचकांसाठी ‘अध्यात्म’ हे सदर सुरू करत आहे. अध्याय पहिला श्रीगणेशाय नमः । ॐ नमो…
नमस्कार, मी अभिनेत्री हर्षा गुप्ते पुन्हा एकदा तुमच्या भेटीला! एकेरात्री मी आणि राजेश म्हणजे माझा नवरा, पृथ्वी थिएटरला एक नाटक बघायला गेलो होतो. तिथे पोहोचायला जरा उशीरच झालेला, पण सुदैवानं नाटक सुरू झालं नव्हतं. तिथे गेल्यावर पाहिलं तर पार्किंग फुल्ल! मग काय गाडी जरा लांबच पार्क केली अन् नाटकाला जाऊन बसलो. खूप छान नाटक होतं. कॉमेडी नाटक आणि सर्व कलाकार उत्तम काम करणारे. मस्त एन्जॉय केलं. नाटक संपल्यावर बाहेर आलो. जरा लांबपर्यंत चालावं लागलं… बाकीचे लोक निघून गेले होते. गाडीपर्यंत आलो आणि घात झाला… गाडीचा टायर पंक्चर झाला होता. खूप रात्र झाली होती, त्यामुळं आजूबाजूला कोणीही नव्हतं. बरं, गाडी नवीन…

