Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Team Avaantar
डॉ. किशोर महाबळ नव्या पिढीतील लक्षावधी विद्यार्थिनी आणि विद्यार्थी दरवर्षी शाळेत मोठ्या उत्साहाने तसेच उमेदीने येतात. हे सर्वचजण कोणत्याना कोणत्या असामान्य अशा निसर्गदत्त क्षमतेने संपन्न असतात. बुद्धिमत्ता, क्षमता, कला, कौशल्ये, अनुभव, आकलन, समजूतदारपणा, शहाणपण याबाबतीत सर्वचजण वेगळे आहेत. प्रतिकूल आर्थिक आणि सामाजिक वातावरणातून येणाऱ्या विद्यार्थिनी आणि विद्यार्थ्यांमध्ये तर काही वेगळेच असामान्य गुण असतात आणि म्हणूनच तर, ते सर्व समस्यांचा सामना करीत शिकण्यासाठी शाळेत येतात. या सर्वांच्यात प्रकर्षाने कोणता ना कोणता तरी एक किंवा अनेक गुणही असतात. मुख्य म्हणजे, या साऱ्याजणांना आपल्यातील या सर्व गुणांपैकी, क्षमतांपैकी कोणत्यातरी एका गुणाचे, क्षमतेचे वर्गात आणि शक्य झाले तर, शाळेतील सर्वांसमोर वर्षांत एकदातरी कौतुक होईल,…
यश:श्री मनुष्य हा सुरुवातीपासूनच प्राणीमित्र. मंदिराच्या कोरीव कामात, विविध उत्खननात तसेच विविध लेण्यांमधील चित्रांमध्ये याचा प्रत्यय येतो. आजही कुत्रे, मांजरी, पक्षी, मांजरे पाळणाऱ्यांची संख्या मोठी आहे. पण लहानापासून थोरांपर्यंत सर्वांना आकर्षण असते ते हत्तीचे! या अजस्त्र प्राण्यालाही मानवाने अंकित केले आहे. या हत्तींचे पालन राजेमहाराजांच्या काळात तर मोठ्या प्रमाणात होत असे. हत्तीवरील अंबारीतून राजेमहाराजे फिरत असत. त्याचप्रमाणे युद्धातही याचा वापर केला जात असे. थोर विदुषी दुर्गा भागवत यांचा हत्तीसंदर्भातील एक लेख अलीकडेच वाचनात आला. त्यात त्या म्हणतात, हत्तीचा मोठा आकार, युद्धातील त्याचे शौर्य आणि त्याच्या देखभालीसाठी येणारा प्रचंड खर्च पाहता, त्याकाळी ते केवळ सरदार आणि राजेमहाराजांच्या अखत्यारित असत. त्यातही पांढरा…
माधवी जोशी माहुलकर नागपूरचा तर्री पोहा हा आता इतका प्रसिद्ध झाला आहे की भल्या भल्या शेफ मंडळींचे कुतुहल या डीशने वाढवले आहे. सुप्रसिद्ध शेफ रणजित ब्रार हे नागपूरात येऊन गेले तेव्हा त्यांनाही या तर्री पोह्याने भुरळ घातली. त्यांनी याची चव चाखली आणि ते या तर्री पोह्याच्या प्रेमातचं पडले व लगेचचं आपल्या किचनमधे त्यांनी या तर्री पोह्याचा सफल प्रयोग केला. नागपूर, चंद्रपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये तर्रीपोहा जास्त प्रसिद्ध आहे. तर्री पोहे करताना पोहे नेहमीप्रमाणेच करायचे, पण तर्रीवर विशेष लक्ष द्यायचे. यामध्ये तर्री महत्त्वाचा घटक आहे. तर्रीसाठी साहित्य गावरान चणे / हरभरे – 1 वाटी (रात्रभर भिजवलेले) मोठा कांदा –…
प्राजक्ता अनंत काथे (ज्योतिष शास्त्री आणि होरा मार्तंड) मेष हा आठवडा तुमचा आत्मविश्वास आणि उत्साह वाढवणारा आहे. आर्थिक प्रगती होईल. वरिष्ठांचे सहकार्य मिळू शकेल. कुटुंबातील सगळ्यांबरोबर वेळ घालवू शकाल. तब्येतीची काळजी घ्या, पथ्य पाळा. महिलांनी मुलांना समजून घ्यावे, त्यांच्या प्रश्नांना प्राधान्य द्यावे. विद्यार्थ्यांच्या मनाप्रमाणे गोष्टी घडतील, प्रामाणिक प्रयत्न करा. वृषभ या आठवड्यात आर्थिक लाभ आणि मानसिक समाधान मिळू शकेल. व्यवसायात प्रगती होईल. नवीन मित्र आणि ओळखीने फायदा होण्याची शक्यता आहे. आरोग्य उत्तम राहील. प्रवास करावा लागेल. संयम आणि सकारात्मक धोरण ठेवावे लागेल. या राशीच्या महिलांच्या मैत्रिणींबरोबर भेटीगाठी होतील. विद्यार्थ्यांनी अभ्यासात शिस्त बाळगावी, यश नक्की मिळेल. मिथुन या आठवड्यात उत्तम घडामोडी…
वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली. अध्याय तिसरा देवान् भावयतानेन ते देवाः भावयन्तु वः । परस्परं भावयन्तः श्रेयः परमवाप्स्यय ॥11॥ जें येणेंकरूनि समस्तां । परितोषु होईल देवतां । मग ते तुम्हां ईप्सिता । अर्थांतें देती ॥95॥ या स्वधर्मपूजा पूजितां । देवतागणां समस्तां । योगक्षेमु निश्चिता । करिती तुमचा ॥96॥ तुम्हीं देवतांतें भजाल । देव तुम्हां तुष्टतील । ऐसी परस्परें घडेल । प्रीति जेथ ॥97॥ तेथ तुम्हीं जें करूं म्हणाल । तें आपैसें सिद्धी जाईल । वांछितही पुरेल । मानसींचें…
दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 21 सप्टेंबर 2025; वार : रविवार भारतीय सौर : 30 भाद्रपद शके 1947; तिथि : अमावास्या 25:23; नक्षत्र : पूर्वा फाल्गुनी 09:31 योग : शुभ 19:52; करण : चतुष्पाद 12:46 सूर्य : कन्या; चंद्र : सिंह 15:57; सूर्योदय : 06:27; सूर्यास्त : 18:36 पक्ष : कृष्ण; ऋतू : वर्षा; अयन : दक्षिणायन संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127 सर्वपित्री दर्श अमावास्या अमावास्या श्राद्ध वेद कन्सल्टन्सी / 9987433660 हेही वाचा – दांडूमारम्मा मंदिर… वर्षातून फक्त नवरात्रीतच होते देवीची पूजा! दिनविशेष चतुरस्त्र गायक, संगीतकार पंडित जितेंद्र अभिषेकी टीम अवांतर चतुरस्त्र…
प्रदीप केळुस्कर जनाबाईला सतीश सांगत होता, “सुरेशचो फोन इल्लो… दहा तारखेक तो मुंबईत उतारतलो, दोन दिवस तेची मुंबईत कामा करून बारा तारखेक चिपी विमानतळावर उतरून हय येतलो, मग परत पंधरा तारखेक तुका घेऊन चिपीवरून मुंबई आणि त्याच रात्री अमेरिकेक जाऊची तिकिटा काढल्यानं तेनी…” जनाबाईने डोक्याला हात लावला. “आता या वयात माका अमेरिकेक न्हेता, माका प्रवास जमतलो रे… माजी ऐंशी सरली…” “पण तू हय एकटी रावतास, तेची काळजी वाटता तेका, आते…” “अरे, पण मी तुज्याकडे रवलंय असतंय, तुजा घर म्हणजे माजा माहेर न्हय! …आणि माजो भाऊस म्हणजे तुजो बापूस अजून हयात आसा ना!!” “होय गे आते, पण सुरेश ऐकणा नाय… मी…
रविंद्र परांजपे मागील तीन लेखात आपण आरोग्य हीच खरी धनसंपदा होय आणि निरामय आरोग्य प्राप्तीसाठी मनापासून इच्छा तसेच वेळ काढण्याची नितांत गरज आहे, हे ध्यानात घेतले. या लेखात आपण ‘निरामय आरोग्यासाठी पैशाचा यथायोग्य विनियोग आवश्यक’ या मुद्द्याविषयी जाणून घेणार आहोत. वास्तविक आपण सर्व जण अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा तसेच शिक्षण, मनोरंजन आणि इतर अनेक बाबींवर पैसे खर्च करत असतो. परंतु याबरोबरच आपण आरोग्य या जीवनावश्यक बाबीवर खर्च करत नाही. या विधानाला काही अपवाद असतील, पण ते तुलनेने कमी आढळतील. शिवाय, आरोग्यावरील खर्च एकूण खर्चाच्या तुलनेत देखील नक्कीच कमी प्रमाणात दिसून येतो. हे वाचल्यावर आपल्याला जरा विचित्र वाटेलही कारण…
हर्षा गुप्ते झिरकसाठी साहित्य भाजून सोललेले शेंगदाणे – अर्धी वाटी भाजलेल सूके खोबर – 2 टेबलस्पून तीळ – 1 चमचा हिरव्या मिरच्या – 4 लसूण – 15 पाकळ्या कढीपत्ता – 10 पाने कोथिंबीर – 1 वाटी हिंग – चिमुटभर मोहरी – 1 लहान चमचा जिरे – 1 लहान चमचा तेल – फोडणीसाठी मीठ – चवीनुसार पुरवठा संख्या – 4 व्यक्तींसाठी एकूण वेळ – 15 मिनिटे कृती शेंगदाणे, सुक खोबरं आणि तीळ पाणी न घालता वाटून घ्यावे आणि ते बाजूला ठेवावे. मिरच्या, कोथिंबीर, लसूण, कढीपत्ता, थोडे मीठ आणि पाणी घालून वाटून घ्या. पॅनमध्ये थोडे तेल घेऊन त्यात मोहरी, जिरे यांची फोडणी…
शशी सामंत फार फार वर्षांपूर्वी एका नवीनच ओळख झालेला मित्राच्या गिरगावातल्या घरी गेलो होतो. थोड़ी ओळख झाल्यावर त्याच्या आईने विचारले, “काय रे, चहा घेतोस ना?” मी चटकन ‘नाही’ म्हणालो. तर ती म्हणाली, “घरी तरी नेहमी घेतोस ना! आमच्याकडे का नको?… घे आता, मी आणते…” या आग्रहाला माझ्याकडे काही उत्तर नव्हते. आमच्यासारख्या मध्यमवर्गीयांकडे वेगळे द्यायला आणखी काय असणार? चहाच! घरी दिवसाला दोन वेळा चहा पिणे, हे आमच्या घरातले आद्य कर्तव्य होते. सकाळच्या चहाबरोबर खारी-बिस्कीट, लोणी लावलेला बुरूनपाव चहात बुडवून खाल्ला तर, तो नाश्ता म्हणून ओळखायला हरकत नव्हता. दुपारच्या चहामध्ये पण काही तरी बुडवायला असायचे, निदान पुढील दोन तास तरी पोटात काही…

