Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    संस्कार… माणुसकी आणि सहिष्णुतेचे!

    March 24, 2026

    Dnyaneshwari : देशकाळवर्तमान, आघवें मजसीं करूनि अभिन्न…

    March 24, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 मार्च 2026

    March 24, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Tuesday, March 24
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Unreasonable expectations : मुला-मुलींचे विवाह का रखडतात?
    अवांतर

    Unreasonable expectations : मुला-मुलींचे विवाह का रखडतात?

    Team AvaantarBy Team AvaantarJuly 21, 2025No Comments5 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    विवाह, अवांतर, मराठीकथा, मराठीसाहित्य, मराठीलेखक, मराठीमनोरंजन, मराठीआर्टिकल, मराठीस्टोरी, Reasons, DelayedMarriages, मुलाच्याअटी, मुलीच्याअटी, शुभेच्छा
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    मानसी देशपांडे

    आज अशा एका विषयावर लिहित आहे तो विषय म्हणजे विलंबाने होणारी मुला, मुलींचे विवाह. तसं पाहायला गेलं तर, विवाह हा सोळा संस्कारापैकी एक महत्वाचा आणि आयुष्याला कलाटणी देणारा संस्कार आहे. पण हल्ली याचं रुपांतर इव्हेंटमध्ये झाले आहे. प्रसिद्ध लेखक व. पु. काळे यांनी म्हटलं आहे, “विवाह हा अत्यंत वैयक्तिक सोहळा… आणि त्याहीपेक्षा जास्त तो संस्कार आहे. सोहळा डोळे दीपवण्यासाठी बारशापासून बाराव्यापर्यंत समारंभ आणि आपत्ती साजऱ्या करायच्या, ते दौलतीचं आणि प्रेमाचं दांभिक प्रदर्शन करण्यासाठी…” ही झाली विवाहाची सोपी व्याख्या. आता मूळ मुद्दा बघू…

    विवाहाचं योग्य वय नेमकं काय, हेच हल्ली समजत नाही. आपण लग्न का करतो? तर आयुष्याच्या एका नाजूक वळणावर तुम्हाला जोडीदाराची गरज असते आणि ही गरज एकालाच नसते तर दोघांनाही असते. मुलं, मुली हे हल्ली सक्षम झाले, स्वतःच्या पायावर उभे राहिले… पण शिक्षण पूर्ण करता करता आणि नोकरी-व्यवसायात स्थिरस्थावर होईस्तोवर लग्नाचं योग्य वय निसटून जातं.

    मला इथे एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं, जेव्हा वधू-वर सूचक मंडळात नाव नोंदवले जाते, तेव्हा पहिली नजर पडते ती अपेक्षांच्या रकान्यात. अनेकदा अवाजवी अपेक्षा ठेवल्यामुळे विवाहाला विलंब होतो. व.पु. म्हणतात, “एकत्र राहायला अक्षता लागत नाही तर, understanding लागतं…” तुम्ही संसारात पडणार आहात म्हणजे फक्त एकानेच समंजसपणा दाखवायचा का? लग्नविधीतील होमाचा धूर हा दोघांच्याही डोळ्यात जातो, पण मुलांच्या अपेक्षा पाहिल्या तर तिथे लिहिलेले असते, “मुलगी अनुरूप हवी…” अनुरूप म्हणजे कशी हो? उदाहरणार्थ, एखाद्या मुलाचं वय 30च्या वर आहे आणि सगळी परिस्थिती देखील चांगली आहे, पण बायोडेटामध्ये फक्त अनुरूप लिहिलं असेल तर, कोणी संपर्क साधावा? कारण, काही उदाहरणं मी अशी देखील पाहिली आहेत की, फक्त क्षुल्लक कारणावरून घटस्फोट झालेल्या मुलीच्या आई वडिलांनी फोन केला तर, उत्तरं अशी मिळतात की, आम्हाला अशी मुलगी नको. जोडीदाराची साथ ही तिला देखील हवी असतेच ना!! पण घटस्फोट झालेली नको, वयातील अंतर फक्त 0 ते 4 वर्ष हवं, त्याचं पॅकेज अमुक अमुक एवढं हवं, या अपेक्षांमुळे खरं तर वय वाढत जातं आणि परिणामी नंतर तडजोड करावीच लागते.

    हेही वाचा – Kavi Grace : ‘ती गेली तेव्हा…’च्या निमित्ताने

    मी म्हणते, वयातील अंतरामुळे देखील नकार का दिले जातात? पण अंतर जर थोडं जास्त असेल म्हणजे 5 ते 7 वर्षांपर्यंत, तर तो मुलगा देखील प्रगल्भ असतो. कारण, दोघेही जर एकाच वयाचे किंवा दोघांत दोन वर्षांचं अंतर असेल तर, तेवढी समज नसते. तो हुडपणा म्हणा किंवा निर्णय घाईत घेणं हे प्रमाण जास्त असते. आपण बघतो, आपल्या आई वडिलांच्या वयात देखील इतके कमी अंतर होते का? पण तरीही संसार होतातच! कारण, एकत्र राहायला अक्षता लागत नाही तर understanding लागतं… हे त्याचं उत्तर.

    एका गोष्टीचा विचार करायला हवा. ज्या मुलांचे किंवा मुलींचे आई वडील म्हणतात, आमच्या काहीच अपेक्षा नाही तरी, लग्न जमत नाही. याचं उत्तर आपण शोधतो का? कुठलातरी एक मुद्दा असा असेलच ज्यामुळे ठरत आलेली बोलणी फिसकटतात. काही वेळा दिवस मागून घेऊन देखील होकार किंवा नकार कळवले जात नाहीत, फोन उचलले जात नाहीत. तुम्ही मुलांचे आई, वडील आहात, त्यामुळे वेळेत सर्व गोष्टी व्हाव्यात ही तळमळ तुम्हाला असणं स्वाभाविक आहे. शेवटी, आपल्या डोळ्यासमोर मुलांचं सर्व व्यवस्थित होणं हीच आई-वडिलांची इच्छा असते ना!

    बऱ्याचदा, मुलं-मुली हे सतत नकार आल्यामुळे अबोल होतात, त्यांना देखील वाटते, कोणीतरी हक्काची व्यक्ती माझ्या आयुष्यात देखील यावी. पण हे सगळं ते आई-वडिलांशी बोलू शकत नाही. फोटोवरून पसंती आली तरी, नंतर काही गोष्टी गैरसमजाच्या छायेत अडकल्या तर ठरत आलेलं लग्न मोडतं आणि त्याचं दुःख या आई-वडिलांनाही होतं. पण चेहऱ्यावर ते दुःख दाखवता येत नाही. मग व.पु. म्हणतात ते पटतं, “आपली व्यथा इतरांना न समजणे हाच पोरकेपणा…”

    हेही वाचा – सुरेश भट… शब्द, स्वरांचा पारिजात

    माझं म्हणणं इतकंच आहे, अपेक्षा असाव्यात पण त्या अवाजवी असू नयेत. कुठेतरी तडजोड करावी लागत असेल, पण पुढचं सर्व आयुष्य हे आनंदात जाणार असेल तर, होकार का देऊ नये? एकदा तिशी ओलांडली की, पस्तीशी देखील लगेच येते. आपला जोडीदार हा आपल्याला शोभणारा आहे की, नाही हे बघावेच; पण बाह्य सौंदर्यापेक्षा आंतरिक सौंदर्य जास्त महत्वाचं. कारण, तुमच्या अडचणीच्या काळात त्याच्या आधाराच्या एका स्पर्शाने तुम्हाला दिलासा मिळणं, म्हणजे खरे वैवाहिक सुख. त्याचा रंग कसा आहे, याहीपेक्षा त्याच्या येण्यामुळे माझ्या आयुष्यात सुखाचे रंग भरले जातील ना, हा विचार केला तर अनेक प्रश्न सुटतील…

    काही वेळा मुलाच्या पगारापेक्षा मुलीचा पगार जास्त असतो, त्यामुळे देखील नकार कळवले जातात. पण, समजा मुलीचा पगार 50 हजार असेल आणि मुलाचा 40 हजार असेल तर, म्हणजेच सर्व चांगलं असताना थोड्यासाठी नकार देणं म्हणजे मूर्खपणा आहे. तसंच, अनेकदा पत्रिका जुळून देखील नकार कळवत राहणं, हे हल्ली नवीनच सुरू झालं आहे. अहो 18 गुण जरी जमले तरी यांना चालत नाही. असं म्हटलं तर लग्नाला विलंब होणारच ना!! सुवर्णमध्य कुठेतरी काढायला नको का?

    बघा, तडजोड ही काही प्रमाणात करावीच लागते. योग्य वयात लग्न ठरलं तर, पुढच्या गोष्टी देखील सुकर होतात. ज्या जोडीदाराला आपण निवडणार आहोत, त्याला मनापासून निवडले तर प्रेम निर्माण होते. फोटो जरी समजा पसंत नसला तरी, अजून एखादा फोटो मागवू शकतो. कारण, काही वेळा जुन्या फोटोंमुळे व्यक्तीचा अंदाज येत नाही. यामध्ये बघण्याचा कार्यक्रम झाला तर, मुलाला मुलगी आणि मुलीला मुलगा प्रत्यक्ष बघता येतो आणि नंतर होकार किंवा नकार देणं सोपं जातं.

    मुलं आणि मुली यांनी थोड्या तरी अपेक्षा मर्यादित ठेवल्या पाहिजेत. लग्न हा सोहळा आहे, इव्हेंट नाही. इथे नवीन नाती जुळतात, आयुष्यात एका नवीन व्यक्तीचे होणारे पदार्पण हे आनंद घेऊन येतं. प्रत्येक आई, वडिलांना वाटतं, आपल्या घरात देखील सनईचे सूर वाजले पाहिजेत, पण हे कधी? जेव्हा तुमच्या अवाजवी अपेक्षांना पूर्णविराम मिळेल. पदवीधर झालेली मुलगी देखील संसार करते तसंच डॉक्टर झालेली मुलगी देखील संसारच करते. फरक आपल्या दृष्टीचा असतो.

    अर्थात, ही मतं माझी आहेत पण समाजातील वास्तव हेच आहे आणि त्यामुळे वय उलटून गेलं तरी लग्न जमत नाही, ही काळजी संपत नाही. म्हणून, अपेक्षा लिहिताना मुला मुलींची वयं उलटून जातील अशा अपेक्षा देऊ नयेत…


    विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशीलतेला समर्पित असलेल्या avaantar.com/ या वेबपोर्टलवरील वैविध्यपूर्ण वाचनीय लेखाचा आनंद घ्यायचा असेल तर,

    IXZVpuvKFwKH6gb0NBN51t?mode=r_c

    या लिंकला क्लिक करून WhatsApp group जॉइन करा.

     

    अवांतर, मराठीकथा, मराठीसाहित्य, मराठीलेखक, मराठीमनोरंजन, मराठीआर्टिकल, मराठीस्टोरी, Reasons, DelayedMarriages, मुलाच्याअटी, मुलीच्याअटी, शुभेच्छा

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    संस्कार… माणुसकी आणि सहिष्णुतेचे!

    March 24, 2026 अवांतर

    आनंदी जगायला काय लागतं?

    March 23, 2026 अवांतर

    Harish Rana : अगतिक पितृत्व, असहाय्य मातृत्व…

    March 20, 2026 अवांतर
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    अवांतर

    संस्कार… माणुसकी आणि सहिष्णुतेचे!

    By Team AvaantarMarch 24, 2026

    संगीता भिडे ‘संस्कार’ ही संकल्पना प्रथम स्पष्ट होणे आवश्यक आहे. ‘सम्यक करोति इति संस्कारः।’ कोणतीही…

    आनंदी जगायला काय लागतं?

    March 23, 2026

    Harish Rana : अगतिक पितृत्व, असहाय्य मातृत्व…

    March 20, 2026

    Waterloo Teeth… मानवतेला एक तडा!

    March 11, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    संस्कार… माणुसकी आणि सहिष्णुतेचे!

    March 24, 2026

    Dnyaneshwari : देशकाळवर्तमान, आघवें मजसीं करूनि अभिन्न…

    March 24, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 मार्च 2026

    March 24, 2026

    सेटवरच मिळाली खूप मोठी कॉम्प्लिमेन्ट!

    March 24, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : खेळगटातील जीवनव्यवहार शिक्षण

    March 23, 2026

    आयुष्यात टवटवीतपणा आणणारा ‘तो’

    March 23, 2026

    POPULAR CATEGORY

    • अध्यात्म 246
    • अवांतर 174
    • आरोग्य 91
    • फिल्मी 44
    • फूड काॅर्नर 184
    • मैत्रीण 16
    • ललित 508
    • वास्तू आणि वेध 360
    • शैक्षणिक 73

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Advertise

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn