“कंटाळले बाई मी! असं वाटतं हे सगळं सोडून कुठेतरी जंगलात निघून जावं…” आम्ही लहान असताना आई वैतागून अनेकदा हे वाक्य म्हणायची. तेव्हा आम्हीही निरागसपणे म्हणायचो, “आई, आम्ही पण येतो गं तुझ्यासोबत!” प्रत्यक्षात आई कधीच सगळं सोडून जंगलात गेली नाही; पण तेव्हा मात्र मला नवल वाटायचं की, हिला सारखं जंगलात का जायचं असतं? तिथे असं काय असेल?
पुढे काळ पुढे सरकला, आणि जेव्हा मी स्वतः ‘आई’ या भूमिकेत शिरले, तेव्हा मधे मधे मलाही जंगलात निघून जावसं वाटू लागलं. संसाराच्या जबाबदाऱ्या, रोजची धावपळ आणि अपेक्षांचं ओझं अंगावर पडलं की, आईकडून ऐकलेले ते शब्द मनात पुन्हा जिवंत व्हायचे. पण तरीही कित्येक वर्षं मला खरं ‘जंगल’ काय असतं, हे उमजलं नव्हतं.
नंतर बऱ्याचदा ‘जंगल सफारी’ करण्याचा योग आला, पण त्या सफारींनी माझ्या कल्पनेतल्या जंगलाला पूर्णपणे छेद दिला. हातात सँडविचचे पाकीट आणि कोल्ड्रिंकची बाटली, जिप्सीमध्ये बसलेले काही ओळखीचे – काही अनोळखी चेहरे आणि गळ्यात दुर्बिणी अडकवून व्याकुळतेने वाघाला शोधणारी पर्यटकांची गर्दी… हे सगळं बघितल्यावर जाणवलं की, इथे तर शहरातली गर्दी फक्त आपली जागा बदलून आली आहे.
हेही वाचा – ती अन् तिचं स्वतंत्र अस्तित्व!
खूप उशिरा मला कळलं की, जंगलात जाणं म्हणजे केवळ झाडाझुडपांत हरवणं नव्हे, तर तो एक ‘एकांतवास’ आहे. आपल्या इच्छा-आकांक्षेच्या या गजबजलेल्या बाजारात जेव्हा मनाला थकवा जाणवू लागतो. अशा वेळी वाटतं, या भरलेल्या बाजारातून लांब, खूप लांब निघून जावं. जिथे काही मिळवण्याची ओढ नसेल की, कुठे पोहोचण्याची घाई! रस्ते असे असावेत की, जे कुठे पोहोचवत नाहीत, तरीही आपण त्यात हरवून जाण्यातच धन्यता मानावी…
ना नात्यांची ओढ ना कुणाची सोबत…
अशा शांत वेळी, निळ्या आभाळाच्या कोऱ्या कागदावर मनातील भावनांची शाई सांडावी आणि मनात येईल तसे शब्द उमटत राहावेत. त्या शब्दांना काही अर्थ नसला तरी चालेल, पण त्या प्रक्रियेत एक कमालीची शांतता असावी.
हा जो ‘एकांत’ आहे, तो कायमचा संन्यास नाही. जेव्हा जगाच्या अपेक्षांचं ओझं मनावर जड होतं, तेव्हा या कोलाहलापासून दूर घेतलेली ही एक ‘पॉवर नॅप’ आहे. ही विश्रांती आपल्याला पुढच्या प्रवासासाठी नवी ऊर्जा देते. स्वतःच्या अंतरात्म्याचा आवाज ऐकण्यासाठी आणि पुन्हा एकदा आयुष्याला सामोरं जाण्यासाठी हा ‘सुकून’ शोधणं गरजेचं आहे!
हेही वाचा – ‘आदर्श’ बनण्याच्या ओझ्याखाली दबला आयुष्याचा आनंद!
सुकून
हसरतों के इस बाजार में
थका हुआ सा दिल ये मेरा
अब तो थैले का बोझ भी उठाना नहीं चाहता।
वह बस निकल जाना चाहता है
इस भरे बाजार से कहीं दूर
जहाँ कुछ पाने की चाह न हो
मंजिल तक जाने वाली कोई राह ना हो।
यूं ही गुम हो जाए रास्तों में
कहीं पहुँचने की परवाह न हो।
ना सूरज उगे न रात हो
बस सांज की धीमी रोशनी में
कहीं दूर से आने वाली बाँसुरी की आवाज हो।
जहां सूरज आँख मूँदें हो
खिलखिलाती ओस की बूँदें हो।
ना भूख लगे ना प्यास लगे
ना कोई भी एहसास जगे
ना कोई हमराही हो।
बस खाली बादलों की स्याही हो
और लिखते रहे आसमान के पन्नों पर
मनचाहे लफ्ज बिना मतलब के बेवजह
और सुकून ही सुकून हो हर जगह।


