दर्शन कुलकर्णी
- आज, दिनांक : 27 फेब्रुवारी 2026; वार : शुक्रवार
- भारतीय सौर : 08 फाल्गुन शके 1947; तिथि : एकादशी 22:33; नक्षत्र : आर्द्रा 10:48
- योग : आयुष्मान 19:43; करण : वणिज 11:32
- सूर्य : कुंभ; चंद्र : मिथुन 27:52; सूर्योदय : 07:01; सूर्यास्त : 18:42
- पक्ष : शुक्ल; ऋतू : शिशिर; अयन : उत्तरायण
- संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5127
आमलकी एकादशी
मराठी भाषा गौरव दिन
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
आजचे राशीभविष्य
मेष – आजचा दिवस व्यावसायिकांसाठी शुभ असेल, एखादा महत्त्वाचा करार होऊ शकतो. नोकरीच्या क्षेत्रात काही अडचणी येण्याची शक्यता आहे. घराच्या देखभालीसाठी किंवा दुरुस्तीसाठी मोठा खर्च होऊ शकतो. कौटुंबिक जीवनात तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. आज सरकारकडून विशेष सन्मान मिळू शकेल. तुमच्या सामाजिक कार्यामुळे तुमच्याबद्दलचा आदर वाढेल.
वृषभ – कामाच्या ठिकाणी अनुकूल वातावरण तयार होत आहे, ज्यामुळे सहजतेने काम करू शकाल. व्यवसायात सकारात्मक परिणाम दिसून येतील, ज्यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होईल. कुटुंबासह धार्मिक सहलीला जाऊ शकता. न्यायालयीन प्रकरणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्याकडून एखादी चांगली बातमी ऐकू येईल.
मिथुन – कामाच्या ठिकाणी अनेक प्रकल्पांवर लक्ष केंद्रित कराल, ज्यामध्ये वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. परदेशात काम करण्याची संधी मिळू शकते. कौटुंबिक व्यवसाय पुढे नेण्यासाठी वडिलांचे सहकार्य आणि मार्गदर्शन मिळेल. जोखीमेचे आर्थिक व्यवहार टाळावेत, अन्यथा तुमचे नुकसान होऊ शकते. आज सर्जनशील काम करण्याची संधी देखील मिळेल. काही खास लोकांची भेट होऊ शकते.
कर्क – दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण करण्याची संधी मिळेल. कुटुंबात जमिनीच्या प्रकरणाबाबत महत्त्वाची चर्चा होईल. जोडीदाराचा सल्ला उपयुक्त ठरेल. नोकरी करणाऱ्यांना कामाच्या ठिकाणी अनुकूल वातावरण अनुभवायला मिळेल. सहकारी पूर्णपणे सहकार्य करतील. मित्रांकडूनही पाठिंबा मिळेल. लग्नासाठी प्रयत्न सुरू असलेल्या जातकांना चांगली बातमी मिळू शकते.
सिंह – कामाचा ताण खूप वाढेल. नोकरी करणाऱ्या जातकांनी बोलण्यावर नियंत्रण ठेवावे आणि वादविवाद टाळावेत, कारण यामुळे तुमचेच नुकसान होऊ शकते. कामाच्या ठिकाणी वरिष्ठ कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न करू शकतात, परंतु हुशारीमुळे तुम्ही सर्वकाही वेळेवर पूर्ण कराल. कौटुंबिक जीवन आनंददायी राहील. खर्चावर नियंत्रण ठेवा, अन्यथा आर्थिक स्थितीवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.
कन्या – इतरांशी भांडण होणार नाही याची काळजी घ्या. कामाच्या ठिकाणी नशीब तुमच्या बाजूने असल्याने, सर्व कामे विनाअडथळा पूर्ण कराल, ज्यामुळे उत्पन्न वाढेल आणि आर्थिक परिस्थिती मजबूत होईल. व्यावसायिकांना ग्राहकांशी किंवा इतर व्यावसायिक पक्षांशी आर्थिक व्यवहारात काही अडचणी येऊ शकतात. कामाच्या धावपळीत आरोग्याची काळजी घ्या.
तुळ – व्यवसाय करणाऱ्यांसाठी उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकते. नोकरी करणाऱ्या जातकांच्या कामाची प्रशंसा होईल, सहकाऱ्यांच्या मदतीने कामाशी संबंधित कोणतेही वाद सोडवले जातील. जमिनीशी संबंधित बाबींमध्ये काही अडचणी येऊ शकतात, मात्र वडिलांच्या मार्गदर्शनाने यश मिळेल. विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षकांचे आशीर्वाद मिळतील. कुटुंबात शांती आणि आनंद राहील.
हेही वाचा – आई-वडिलांचे कष्ट अन् मुलांची संवेदनशीलता
वृश्चिक – नोकरी किंवा व्यवसायात नावीन्य आणण्यासाठी कठोर परिश्रम कराल, ज्यामुळे भविष्यात भरपूर फायदे मिळतील. गुंतवणुकीसाठी हा चांगला काळ आहे, जो आर्थिक स्थिती मजबूत करेल. आज संततीकडून काही चांगली बातमी मिळेल. कौटुंबिक मालमत्ता वारसाहक्काने मिळण्याची शक्यता आहे. कौटुंबिक जीवनात आनंद, शांती आणि स्थिरता मिळेल. जोडीदारासोबत तुमचे नाते सौहार्दपूर्ण असेल.
धनु – व्यवसायात छोटीशी जोखीम घेतल्यास लक्षणीय नफा मिळण्याची अपेक्षा आहे. एखाद्या प्रोजेक्टसाठी मित्रांकडून पूर्ण पाठिंबा मिळेल. गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे योग्य ठरेल. जवळच्या व्यक्तीला मदत करण्यासाठी अचानकपणे पैशाची व्यवस्था करावी लागू शकते. यश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना अधिक मेहनत करावी लागेल. पालकांशी कौटुंबिक मुद्द्यावर चर्चा होईल.
मकर – भागीदारीत कोणताही व्यवसाय केलात तरी, तो फायदेशीर ठरेल. उत्पन्नाचे नवीन स्रोत विकसित करण्याचे प्रयत्न यशस्वी होतील. परंतु एकाच वेळी अनेक कामे केल्याने कामाची लय बिघडू शकते. कोणतेही सरकारी काम असेल तर, त्यासाठी आवश्यक नियमांचे पालन केले पाहिजे. आज संततीच्या भविष्याबाबत एक मोठा निर्णय घेऊ शकता. विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाचा मार्ग मोकळा होईल.
कुंभ – व्यवसायात काही समस्या येत असतील, तर आज त्यातून मुक्तता मिळेल. संततीकडून एखादी चांगली बातमी ऐकायला मिळेल. व्यवसायाच्या दृष्टीने दिवस आनंददायी जाईल. कोणत्याही गोष्टीत घाई करू नका, अन्यथा तुमचे नुकसान होऊ शकते. खाण्यापिण्याच्या बाबतीत निष्काळजीपणा टाळा. तुमच्या कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याची पूर्ण काळजी घ्या.
मीन – व्यवसायात जोखीम पत्करणे फायदेशीर ठरेल. नोकरीशी संबंधित काही चांगल्या बातम्या ऐकायला मिळतील. व्यावसायिक सहली फलदायी ठरतील. विवाहोत्सुक जातकांना चांगले प्रस्ताव मिळतील. संततीशी संबंधित चांगल्या बातमीने कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. एखाद्या धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. गरजू व्यक्तीला मदत केली तर दिवस चांगला जाईल.
दिनविशेष
मराठीतील अग्रगण्य साहित्यिक आणि समीक्षक वि. वा. शिरवाडकर
टीम अवांतर
मराठीतील अग्रगण्य कवी, लेखक, नाटककार, कथाकार आणि समीक्षक वि. वा. शिरवाडकर तथा तात्यासाहेब शिरवाडकर यांचा जन्म 27 फेब्रुवारी 1912 रोजी पुणे येथे झाला. कुसुमाग्रजांना सहा भाऊ आणि कुसुम नावाची एक लहान बहीण होती, एकुलती एक बहीण सर्वांची लाडकी म्हणून कुसुमचे अग्रज असं म्हणत त्यांनी ‘कुसुमाग्रज’ असे नाव त्यांनी धारण केले. तेव्हापासून शिरवाडकर कवी ‘कुसुमाग्रज’ या टोपण नावाने ओळखले जाऊ लागले.
नाशिक येथे त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. बी.ए.ची पदवी मिळाल्यानंतर काही काळ त्यांनी चित्रपट व्यवसायात पटकथा लिहिणे, चित्रपटात छोट्या भूमिका करणे अशी कामे केली. यानंतर सोबत, स्वराज्य, प्रभात, नवयुग, धनुर्धारी, अशा विविध नियतकालिकांचे, वृत्तपत्रांचे संपादक म्हणून त्यांनी काम केले. 1930 मध्ये झालेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील काळाराम मंदिराच्या सत्याग्रहात कुसुमाग्रज यांचाही सहभाग होता. त्यांच्या क्रांतिकारी कवितांची सुरुवात याच लढ्यापासून झाली आहे. 1933 साली त्यांनी ‘ध्रुव मंडळा’ची स्थापना केली.
हेही वाचा – करिअर हा शब्द अफूसारखा बनलाय!
पत्रकारितेच्या निमित्ताने मुंबईत आल्यावर शिरवाडकरांना मुंबई मराठी साहित्य संघाचे डॉ. अ.ना. भालेराव भेटले. मराठी रंगभूमीचा सुवर्णकाळ संपून ती मृतप्राय होऊ नये म्हणून झटणारे भालेराव यांनी कवी शिरवाडकरांना नाटके लिहिण्यास प्रवृत्त केले, केवळ कवी असलेले वि.वा. शिरवाडकर बघता बघता एक यशस्वी नाटककार झाले. दुसरा पेशवा , कौंतेय , आमचं नाव बाबुराव, ययाति आणि देवयानी, वीज म्हणाली धरतीला, नटसम्राट या नाटकांचा उल्लेख करावा लागेल.
आत्मनिष्ठ आणि समाजनिष्ठ जाणीव असणारे मराठीतले महत्त्वाचे लेखक म्हणून शिरवाडकरांचे नाव घेतले जाते. शिरवाडकरांचे वर्णन सरस्वतीच्या मंदिरातील देदीप्यमान रत्न असे करतात. वि.स. खांडेकर यांच्यानंतर मराठी साहित्यात ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे (1987) ते दुसरे साहित्यिक ठरले. कुसुमाग्रजांच्या कविता तरुणांना प्रेरणा देणाऱ्या आहेत. ‘जीवनलहरी’ हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह. परंतु अवघ्या मराठी रसिकांनी त्यांना मानाने अभिवादन केले ते ‘विशाखा’ या संग्रहापासून. 1942 साली म्हणजेच स्वातंत्र्यपूर्व काळात आणि ‘चले जाव!’ सारख्या स्वातंत्र्य-चळवळीच्या झंझावाताच्या प्रहरात ‘विशाखा’ एखाद्या पलित्यासारखी हाती आली. अवघ्या समाजावर या कवितांनी अक्षरशः गारुड केले.
1974 मध्ये साहित्य अकादमी पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आले. 1985 मध्ये भारतीय नाट्य परिषदद्वारे त्यांना राम गणेश गडकरी पुरस्कार प्रदान करण्यात आला. 1986 मध्ये त्यांना पुणे युनिव्हर्सिटी द्वारे डि. लिट. पदवी देण्यात आली तर 1988 झाली त्यांना संगीत नाट्य लेखन पुरस्कार देण्यात आला. कुसुमाग्रजांच्या मराठी भाषेतील कार्यामुळे त्यांचा जन्मदिवस 27 फेब्रुवारी दरवर्षी ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा केला जातो. 10 मार्च 1999 रोजी वयाच्या 87 व्या वर्षी नाशिक येथे त्यांचे निधन झाले.


