Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Kitchen Tips : बाजरीची उसळ, रसम अन् मिक्स कडधान्यांची मिसळ करताना…

    March 24, 2026

    संस्कार… माणुसकी आणि सहिष्णुतेचे!

    March 24, 2026

    Dnyaneshwari : देशकाळवर्तमान, आघवें मजसीं करूनि अभिन्न…

    March 24, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Tuesday, March 24
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » रारंग ढांग… क्षणभंगूर जीवनाचे वास्तव
    ललित

    रारंग ढांग… क्षणभंगूर जीवनाचे वास्तव

    Team AvaantarBy Team AvaantarSeptember 2, 2025No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, Rarang Dhang, fleeting life, रारंग ढांग, क्षणभंगूर आयुष्य, बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन, Border Road Organization
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    अस्मिता हवालदार

    प्रभाकर पेंढारकर यांची ‘रारंग ढांग’ ही लहानशी कादंबरी मी बऱ्याच वर्षांपूर्वी वाचली होती. एका बैठकीत वाचता येईल अशी! याला दोन कारणं आहेत, एकतर ही कादंबरी लहान आहे आणि कादंबरीला खूप वेग आहे. हिमालयात बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनमध्ये रस्ते बांधण्याच्या लष्करी कामासाठी विश्वनाथ मेहेंदळेला नोकरी मिळते. इंजिनीअर झालेला हा तरुण मुंबईतील मोठ्या पगाराची नोकरी सोडून नव्या साहसिक नोकरीसाठी, कामासाठी उत्सुक असतो. त्याचे वडील खेड्यात शिक्षक असतात. ते विश्वनाथला लिहितात की, “हिमालयात तुला स्वतःशी बोलायला वेळ मिळेल. स्वतःचा शोध घेण्यासाठी वेळ वापर.”

    लष्करातली शिस्त, कायदे यांची ओळख हळूहळू विश्वनाथला होत असते. कधी मनावर ओरखडे उठत राहतात तर, कधी डोळ्यात कौतुक…! ही दुनिया विश्वनाथसाठी नवी असते. हिमालयात रस्ते बांधण्याचं काम जिकिरीचं आणि आव्हानाचं असते. मृत्यू हातात हात घालून चालत असतो. ढांग म्हणजे सरळसोट कडा. विश्वनाथ रस्ता बांधण्यासाठी मातीचा नमूना तपासतो, त्यावेळी ती जागा रस्त्यासाठी त्याला अयोग्य वाटते. तो वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवतो; पण आता काही होऊ शकत नाही, असे सांगून त्याला टाळले जाते.

    या कथानकात लेखक जीवन क्षणभंगूर आहे, हे पटवून देतो. इथे कोणाला एक दिवस सुट्टी द्यायची झाली तर, अशक्य! पण तोच माणूस मेला तरी पुन्हा सगळं सुरळीत सुरू रहातं, असं विश्वनाथ म्हणतो. माणूस मेल्यावर उरते काय? असा प्रश्न त्याचा ड्रायव्हर त्याला विचारतो. रस्ता बांधताना जवानांची स्मारके तो पाहतो आणि निश्चय करतो की, मी असे होऊ देणार नाही. लष्करातली शिस्त आणि माणसाचे जीवन यात श्रेष्ठ काय, असा प्रश्न विश्वनाथ वारंवार विचारतो; वाचकाला सुद्धा विचारतो. वरिष्ठांसमोर बोलायचे नाही, ही शिस्त तो मोडतो, ते केवळ सैनिकांचे जीव वाचवण्यासाठी!

    हेही वाचा – वेगवेगळया पातळ्यांवर लढणारी ‘केतकर वहिनी’

    कॅप्टन बहल, मेजर बंबा, ग्यानचंद, कॅप्टन नायर, लेफ्टनंट अमर, कॅप्टन मिनू खंबाटा, सर्जेराव गायकवाड अशी काही मुख्य पात्र कादंबरीत आहेत. विश्वनाथचे न ऐकता रस्ता बांधायचे काम सुरू राहते आणि रस्ता कोसळतो. त्यात सर्जेराव, बहादूर वगैरे साथी गाडले जातात. विश्वनाथ मनातून तुटून जातो. मेलेल्या साथीदारांच्या स्मृतीसाठी आठ खांब उभारतो. अर्थात, सैन्याची शिस्त मोडल्याने कोर्ट मार्शल होते.

    नोकरीसाठी जाण्यापूर्वी तो एक पेंटिंग प्रदर्शन पहायला जातो, तेव्हा उमा नावाच्या मुलीचं पेंटिंग तो विकत घेतो. त्यांची ओळख होते आणि पत्रव्यवहार सुरू होतो. एक वरिष्ठ अधिकारी त्याला ‘पुरणपोळी करून देतोस का?’ असे विचारतो तेव्हा विश्वनाथ म्हणतो, त्यापेक्षा या ढांगात रस्ता बांधणे सोपे आहे. विश्वनाथ म्हणतो, ‘आपल्याला देशात माणसाचा वेळ स्वस्त आहे आणि सर्वात स्वस्त माणसाचा जीव आहे.’ यातली अशी काही वाक्य मनात रुतून राहतात.

    हिमालयाचे सतत बदलणारे हवामान, दरड कोसळणे,  वादळ, पाऊस या परिस्थितही आनंदी राहण्याचा मार्ग काढणारे गुरखे, सैनिक, लष्कराचे जीवन, सिव्हिलियन्सकडे पाहण्याची उपहासात्मक दृष्टी, we are paid for it  हे वाक्य सतत कानावर पडल्यामुळे चिडलेला विश्वनाथ, त्यातच उमाबरोबर फुलणारे नाते… या सर्वांचा गोफ फार सुरेख विणला गेला आहे.

    हेही वाचा – माचीवरला बुधा : एकटेपण हाच कादंबरीचा गाभा

    पेंटिंगचे वर्णन वाचताना ते डोळ्यासमोर उभे राहते. कापूस बाहेर येणारे कार्डिगन घालणारे गुरखे, अहोरात्र कष्ट करून रस्ते बांधणारे जवान दिसू लागतात. कादंबरीचा विषय अगदी वेगळा असल्याने अधिक आकर्षक वाटतो. लेखकाची साधी सरळ सोपी भाषा आहे, त्यामुळे समजून उमजून घेता येते. कठीण शब्दांचा अडथळा नसल्यामुळे आशय मनापर्यंत पोहोचतो. शिस्त माणसासाठी असावी. त्या शिस्तीच्या नावाखाली माणूस भरडून त्याचे मशीन न व्हावे, अशी विचारसरणी असलेला विश्वनाथ सैन्यात टिकू शकणार नव्हताच. या जगात ‘सर्वसुखी माणसा’सारखा ‘स्वतंत्र माणूस’ दुर्मीळ आहे का? असा प्रश्न विश्वनाथने विचारला आहे. दुर्दैवाने याचे उत्तर आजही नकारात्मक आहे.

    कादंबरीचा विषय, प्रासादिक अभिजात भाषा आणि सशक्त कथानक हे तिन्ही गुण मला भावले. कादंबरी सर्वांना आवडेल अशी आहे.

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    आयुष्यात टवटवीतपणा आणणारा ‘तो’

    March 23, 2026 ललित

    एका केरसुणीची कहाणी…

    March 23, 2026 ललित

    रडणाऱ्या आरूला राम समजावत होता, तेवढ्यात सिया आली…

    March 22, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    आयुष्यात टवटवीतपणा आणणारा ‘तो’

    By सतीश बर्वेMarch 23, 2026

    खरंच काही व्यक्तींचा सहवास, अगदी थोडा वेळ का असेना, पण आपल्याला आपल्या नकळत आनंदी आणि…

    एका केरसुणीची कहाणी…

    March 23, 2026

    रडणाऱ्या आरूला राम समजावत होता, तेवढ्यात सिया आली…

    March 22, 2026

    भार्गवने रुंजीला लग्नासाठी प्रोपज केलं, पण…

    March 21, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    Kitchen Tips : बाजरीची उसळ, रसम अन् मिक्स कडधान्यांची मिसळ करताना…

    March 24, 2026

    संस्कार… माणुसकी आणि सहिष्णुतेचे!

    March 24, 2026

    Dnyaneshwari : देशकाळवर्तमान, आघवें मजसीं करूनि अभिन्न…

    March 24, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 मार्च 2026

    March 24, 2026

    सेटवरच मिळाली खूप मोठी कॉम्प्लिमेन्ट!

    March 24, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : खेळगटातील जीवनव्यवहार शिक्षण

    March 23, 2026

    POPULAR CATEGORY

    • अध्यात्म 246
    • अवांतर 174
    • आरोग्य 91
    • फिल्मी 44
    • फूड काॅर्नर 185
    • मैत्रीण 16
    • ललित 508
    • वास्तू आणि वेध 360
    • शैक्षणिक 73

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Advertise

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn