Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Dnyaneshwari : देशकाळवर्तमान, आघवें मजसीं करूनि अभिन्न…

    March 24, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 मार्च 2026

    March 24, 2026

    सेटवरच मिळाली खूप मोठी कॉम्प्लिमेन्ट!

    March 24, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Tuesday, March 24
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Technology Vs Manpower : तंत्रज्ञानाचा भस्मासुर
    अवांतर

    Technology Vs Manpower : तंत्रज्ञानाचा भस्मासुर

    Team AvaantarBy Team AvaantarJuly 17, 2025No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीसाहित्य, मराठीआर्टिकल, तंत्रज्ञान, भस्मासुर, कॉम्प्युटर, एआय, Technology, Bhasmasur, Computer, AI
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    शैलेश विजया सोमनाथ महाजन

    ‘भस्मासुर राक्षस’ हा काय पुराणकाळातच होता का? आजच्या अद्यावत काळात सुद्धा भस्मासुर राक्षस आहे. तो कोणता? सर्वात प्रथम, हे भस्मासुर प्रकरण म्हणजे काय? हे थोडक्यात समजणे गरजेचे आहे. मला खात्री आहे, कित्येकांना हे भस्मासुर प्रकरण माहीत नसणार.

    पूर्वी एक राक्षस होता. त्याने भगवान श्री शंकरांची खूप तपश्चर्या केली आणि भगवान श्री शंकरदेव त्याला प्रसन्न झाले आणि म्हणाले, “काय मागायचे ते वरदान माग?”

    “मी ज्याच्या डोक्यावर हात ठेवीन, तो जळून भस्मसात झाला पाहिजे,” असे वरदान त्या राक्षसाने मागितले. भगवान श्री शंकर म्हणजे भोलेबाबाच ते, ‘तथास्तु’ म्हणाले. म्हणून त्याचे नाव भस्मासुर राक्षस असे झाले.

    हे असे वरदान मिळाल्यावर भस्मासुर राक्षस इतका माजला की, त्याने तिन्ही लोकांत हाहाकार माजवला. बरेच काही भस्म करून झाल्यावर, भस्मासुर राक्षस प्रत्यक्ष श्री भगवान शंकरांच्या डोक्यावर हात ठेवण्यासाठी त्यांच्या मागे लागला. मग भगवान श्री विष्णूंनी मोहिनीचे रूप धारण करून भस्मासुराला मोहित केले आणि त्याचाच हात, त्याच्याच डोक्यावर ठेण्यास भाग पाडले. अशा प्रकारे भस्मासुर राक्षस भस्म होऊन मरण पावला.

    हेही वाचा – या ‘तरुणां’च्या कार्यशक्तीचा देखील विचार व्हावा!

    ही झाली पौराणिक कथा. पण ती आजच्या युगात सुद्धा लागू होते. आजच्या आधुनिक युगातील भस्मासुर राक्षस म्हणजे आधुनिक तंत्रज्ञान, टेक्नॉलॉजी!

    पूर्वी एक विहीर खोदायची, टेकडी फोडायची किंवा इमारतीचा पाया खोदायचा तर अक्षरशः 70 ते 80 जण लागायचे आणि साधारण या कामाला 15 ते 20 दिवस लागायचे. (ही तेव्हाची कामाची पद्धत बऱ्याच जणांना माहीत नसेल.) म्हणजे, या कामासाठी जो काही खर्च येत असे, तो आर्थिकदृष्ट्या तळागाळातील लोकांपर्यंत विभागला जात असे. तसेच गरीब लोकांना रोजंदारी मिळत असे.

    आता आधुनिक काळात, एक राक्षस येतो (JCB सारखा) आणि एक-दोन दिवसात विहीर खोदून जातो, टेकडी फोडून जातो किंवा इमारतीचा पाया खोदून जातो. या कामासाठी मिळणाऱ्या एकूण पैशातील अत्यल्प मोबदला JCB ड्रायव्हरला आणि मिळाला तर एखाद्या मजुराला मिळतो आणि उरलेली मोठी रक्कम JCB मालकाला मिळते.

    येथे आपण JCB तसेच कामगार आणि मालक हे प्रतिकात्मक घेतले आहेत. (कोणत्याही अद्ययावत किंवा पारंपरिक व्यवसायास माझा विरोध नाही.) JCB म्हणजे मोठ्या कंपन्या किंवा आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रतिक. ड्रायव्हर म्हणजे साधारण कायमस्वरूपी (पर्मनंट) कामगारांचे प्रतीक. म्हणजे मध्यमवर्गीय किंवा उच्चभ्रू मध्यमवर्गीय नोकरदार. मजूर म्हणजे कंत्राटावरील (कॉन्ट्रॅक्ट) व्यक्ती. जी नोकरीत आहे पण ‘ना घर का, ना घाट का’… अतिशय कठीण परिस्थिती! JCB मालक म्हणजे कोणता वर्ग हे आपल्याला माहीत आहे. ज्यांच्या खिशात एकगठ्ठा रक्कम जाते. जो आधी काही रक्कम ओतून दुपटीने कमावतो.

    हीच परिस्थिती इतर बाबतीत झाली आहे. कॉम्प्युटर नव्हते तेव्हा, कार्यालयीन कामासाठी मोठ्या संख्येने कर्मचारी लागत होते आणि आता, कॉम्प्युटर आले तर, किती कमी कार्यालयीन कर्मचारी लागतात! तसे पहिले तर साधारण जिथे 100 कर्मचाऱ्यांची गरज लागत होती, तिथे आता फक्त 5 ते 10 कर्मचारीच लागतात.

    हेही वाचा – Good Vs Bad : राष्ट्र उभारणीसाठी विरोध कोणाचा?

    अद्यावत तंत्रज्ञानाने, कॉम्प्युटरने किंवा यांत्रिकीकरणाने मनुष्यबळ (मॅनपॉवर) आणि बुद्धी खूपच कमी वापरली जाऊ लागली आहे. लोकसंख्या प्रचंड वेगाने वाढत आहे आणि मॅन पॉवरची गरज जवळजवळ संपली आहे तसेच कॉम्प्युटरसारख्या तंत्रज्ञानाने बौद्धिक क्षेत्रातील माणसांची गरज पण कमी लागत आहे. बेरोजगारी वाढण्याचे, हेही एक कारण आहे.

    त्यात मधल्या काळात आला तो मोबाइल, बापरे! मोबाइलने किती गोष्टी संपविल्या, नष्ट केल्या हा एक वेगळाच विषय आहे. पण मोबाइलसारख्या भस्मासुराने माणुसकी भस्मसात करायला घेतली आहे, हे मात्र तितकेच खरे. आता त्यात भर पडली आहे ती AI (Artificial intelligence) तंत्रज्ञानाची. तरी अजून AI हे प्रकरण कित्येक जणांना फारसे माहीत नाही किंवा याचा वापर म्हणावा तेवढ्या प्रमाणात होत नाही.

    म्हणजे, अजून नवीन क्रांतिकारक असे भस्मासुर तयार होत आहेत… पण या अद्ययावत भस्मासुरांच्या तपश्चर्येची आपल्याला जाणीवच नाही. आधुनिकतेशी फारकत घेणे योग्य नाहीच, पण वाया जाणाऱ्या मनुष्यबळाचा वापर कसा करणार? हा खरा प्रश्न आहे. कधीतरी वाटते, या आधुनिक तंत्रज्ञानाचा (आधुनिक भस्मासुर) अतिवापर मानवाला आणि निसर्गाला तसेच मानवातल्या कार्यशक्तीला, आपल्या बुद्धीला भस्मसात तर करून टाकणार नाही ना?

    क्रमश:

    (मोबाइल नंबर – 9322755462)

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    आनंदी जगायला काय लागतं?

    March 23, 2026 अवांतर

    Harish Rana : अगतिक पितृत्व, असहाय्य मातृत्व…

    March 20, 2026 अवांतर

    Waterloo Teeth… मानवतेला एक तडा!

    March 11, 2026 अवांतर
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    अवांतर

    आनंदी जगायला काय लागतं?

    By सुधीर करंदीकरMarch 23, 2026

    जागतिक आनंद दिन (International Day of Happiness) दरवर्षी 20 मार्चला जगभर साजरा केला जातो. लोकांना…

    Harish Rana : अगतिक पितृत्व, असहाय्य मातृत्व…

    March 20, 2026

    Waterloo Teeth… मानवतेला एक तडा!

    March 11, 2026

    डॉक्टर लिऑन रोशे अन् शापित सुरी!

    March 4, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    Dnyaneshwari : देशकाळवर्तमान, आघवें मजसीं करूनि अभिन्न…

    March 24, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 मार्च 2026

    March 24, 2026

    सेटवरच मिळाली खूप मोठी कॉम्प्लिमेन्ट!

    March 24, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : खेळगटातील जीवनव्यवहार शिक्षण

    March 23, 2026

    आयुष्यात टवटवीतपणा आणणारा ‘तो’

    March 23, 2026

    एका केरसुणीची कहाणी…

    March 23, 2026

    POPULAR CATEGORY

    • अध्यात्म 246
    • अवांतर 173
    • आरोग्य 91
    • फिल्मी 44
    • फूड काॅर्नर 184
    • मैत्रीण 16
    • ललित 508
    • वास्तू आणि वेध 360
    • शैक्षणिक 73

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Advertise

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn