Author: Team Avaantar

वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली. अध्याय तिसरा प्रकृतेर्गुणसंमूढाः सज्जन्ते गुणकर्मसु । तानकृत्स्नविदो मन्दान् कृत्स्नविन् न विचालयेत् ॥29॥ एथ कर्मी तोच लिंपे । जो गुणसंभ्रमें घेपे । प्रकृतीचेनि आटोपें । वर्ततु असे ॥184॥ इंद्रियें गुणाधारें । राहाटती निजव्यापारें । तें परकर्म बलात्कारें । आपादी जो ॥185॥ मयि सर्वाणि कर्माणि संन्यस्याध्यात्मचेतसा । निराशीर्निर्ममो भूत्वा युध्यस्व विगतज्वरः ॥30॥ तरी उचितें कर्में आघवीं । तुवां आचरोनि मज अर्पावीं । परी चित्तवृत्ति न्यासावी । आत्मरूपीं ॥186॥ हें कर्म मी कर्ता । कां आचरेन…

Read More

दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 28 सप्टेंबर 2025; वार : रविवार भारतीय सौर : 06 आश्विन शके 1947; तिथि : षष्ठी 14:26; नक्षत्र : ज्येष्ठा 27:53 योग : आयुष्मान 24:30; करण : गरज 27:31 सूर्य : कन्या; चंद्र : वृश्चिक 27:53; सूर्योदय : 06:28; सूर्यास्त : 18:29 पक्ष : शुक्ल; ऋतू : शरद; अयन : दक्षिणायन संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127 वेद कन्सल्टन्सी / 9987433660 हेही वाचा – निरामय आरोग्यासाठी मानसिकता बदलणे आवश्यक… दिनविशेष विश्वविख्यात गायिका लता मंगेशकर टीम अवांतर अत्यंत सुरेल आवाजाची देणगी लाभलेल्या, विश्वविख्यात, प्रतिभावंत गायिका लता मंगेशकर यांचा जन्म…

Read More

डॉ. सारिका जोगळेकर होमिओपॅथिक तज्ज्ञ मासिक पाळी हा स्त्रीच्या आयुष्यातला अविभाज्य भाग आहे. स्त्रीच्या गर्भाशयात गर्भधारणेसाठी दर महिन्याला एक नवीन थर तयार होतो. जर गर्भधारणा झाली नाही, तर हा थर रक्तासह शरीराबाहेर टाकला जातो. ही प्रक्रिया दर 28 दिवसांनी (कधी 21 ते 35 दिवसांत) नियमितपणे घडते. यालाच मासिक पाळी किंवा मासिक ऋतू म्हणतात. ही प्रक्रिया साधारणपणे वयाच्या 12-13 वर्षांपासून सुरू होते (Menarche) आणि 45-50 वर्षांपर्यंत (रजोनिवृत्ती येईपर्यंत – Menopause) चालते. मासिक पाळीची सायकल ही हार्मोन्सद्वारे नियंत्रित केली जाते. इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन असे दोन मुख्य हार्मोन्स मासिक पाळी नियमित ठेवण्याचे काम करते. प्रत्येक महिन्यात होणारा हा शारीरिक बदल नैसर्गिक असला तरीही…

Read More

रविंद्र परांजपे मागील तीन लेखांत आपण निरामय आरोग्य प्राप्तीसाठी मनापासून प्रबल इच्छा असणे, पुरेसा वेळ काढणे तसेच पैशांचा यथायोग्य विनियोग करणे या तीनही बाबींची नितांत आवश्यक आहे, हे ध्यानात घेतले. या लेखात आपण ‘निरामय आरोग्यासाठी मानसिकता बदलणे आवश्यक’ या मुलभूत मुद्द्याविषयी जाणून घेणार आहोत. मानसिकता म्हणजे काय? सोप्या भाषेत मानसिकता म्हणजे मनोवृत्ती. एखाद्या व्यक्तीच्या मनातील विचार, भावना, एखाद्या गोष्टीकडे अथवा प्रसंगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन तसेच व्यक्तीचे प्रत्यक्ष वर्तन आणि कृती या सर्व बाबींचा समावेश मानसिकता या संज्ञेत करता येईल. मानसिकता बदलणे का आवश्यक आहे? मानसिकता बदलण्याची गरज समजून घेण्यासाठी आपण सद्यमानसिकता काय आहे, हे लक्षात घेणे आवश्यक आहे. सर्वसाधारणपणे आरोग्यासंबंधित…

Read More

माधवी जोशी माहुलकर नवरात्रीच्या निमित्त ‘साबुदाणा बर्फी’ या रेसिपीची माहिती पाहुयात. साबुदाणा बर्फी हा एक पारंपरिक भारतीय मिठाईचा प्रकार आहे. यामध्ये साबुदाणा, तूप, नारळाचा किंवा सुक्या खोबऱ्याचा किस, साखर, दूध तसेच काजू, बदाम, पिस्ता या सुक्यामेव्यांचा उपयोग केला जातो. साहित्य साबुदाणा – 1 वाटी मलाईसह दूध – 1 कप सुक्या किंवा ओल्या नारळाचा किस – अर्धी वाटी साखर – 3-4 कप (किंवा चवीनुसार अंदाजे घ्यावी) तूप – 2 ते 3 चमचे वेलची पावडर – 1 चमचा केसराच्या – काड्या (आवडीनुसार) एकूण कालवाधी – साधारण पाऊण तास हेही वाचा – Recipe : विदर्भ स्पेशल… तुरीच्या उसळीतील दिवसे! कृती प्रथम साबुदाणा कोरडाच सोनेरी…

Read More

हिमाली मुदखेडकर पुणेकरांचे ग्रामदैवत म्हणा किंवा श्रद्धास्थान म्हणा, पण चतुःशृंगी देवी मंदिराचे पुण्यात अनन्यसाधारण महत्त्व आहे. विस्तारित पुण्याच्या मध्यवर्ती भागात येणारे हे मंदिर सेनापती बापट रोडवर आहे. मुख्य मंदिर हे नव्वद फूट उंच आणि एकशेवीस फूट रुंद असे टेकडीवर वसलेले असून आजूबाजूच्या परिसरातील अनेक मंदिरांनी वेढलेले आहे. पुणे विद्यापीठापासून गणेश खिंड रोडकडून प्रवेश केला असता सुरुवातीसच पार्वतीनंदन गणपती मंदिर लागते. हे जुने मंदिर असून याला स्वतःचे असे ऐतिहासिक महत्त्व आहे. चतुःश्रृंगी मंदिर परिसरातील या पार्वतीनंदन गणपती मंदिरातच चाफेकर बंधूंनी सहकार्‍यांसह रॅंडच्या वधाचा कट रचला होता. ‘गोंद्या आला रे’ हा परवलीचा शब्द म्हणजे आजच्या भाषेतील ‘कोड वर्ड’ इथेच ठरला होता! अतिशय…

Read More

वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली. अध्याय तिसरा जें सायासें स्तन्य सेवी । तें पक्वान्नें केवीं जेवी । म्हणोनि बाळका जैशीं नेदावीं । धनुर्धरा ॥172॥ तैशी कर्मीं जया अयोग्यता । तयाप्रति नैष्कर्म्यता । न प्रगटावी खेळतां । आदिकरूनी ॥173॥ तेथें सत्क्रियाचि लावावी । तेचि एकी प्रशंसावी । नैष्कर्मींही दावावी । आचरोनि ॥174॥ तया लोकसंग्रहालागीं । वर्ततां कर्मसंगीं । तो कर्मबंधु आंगीं । वाजेलना ॥175॥ जैसी बहुरूपियाची रावो राणी । स्त्रीपुरुषभावो नाहीं मनीं । परी लोकसंपादणी । तैशीच करिती ॥176॥…

Read More

दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 27 सप्टेंबर 2025; वार : शनिवार भारतीय सौर : 05 आश्विन शके 1947; तिथि : पंचमी 12.03; नक्षत्र : अनुराधा 25:07 योग : प्रीति 23:44; करण : कौलव 25:16 सूर्य : कन्या; चंद्र : वृश्चिक; सूर्योदय : 06:28; सूर्यास्त : 18:30 पक्ष : शुक्ल; ऋतू : शरद; अयन : दक्षिणायन संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127 सूर्याचा हस्त नक्षत्र प्रवेश वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – आज शुभ संयोग घडून येतील. मध्यरात्रीनंतर होणारा चंद्राचा वृश्चिक राशीतला प्रवेश तुमच्या सामाजिक प्रतिष्ठेला बळकटी देईल, तसेच एखाद्या शुभ…

Read More

लीना जोशी परुळेकर मागच्या लेखात आपण make-up बद्दल आणि make-up उत्पादनांबद्दल माहिती घेतली. आता या भागात सुद्धा आपण Make-Up बद्दल माहिती घेऊ. Make-up ही अशी गोष्ट आहे, जी प्रत्येक व्यक्तीनुसार बदलते. प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्याचे structure हे समान असते, पण shape वेगवेगळा असतो. त्यामुळेच Make-up करायचे technique सारखे असते म्हणजेच कुठले उत्पादन चेहऱ्याच्या कुठल्या भागात लावायचे, हे ठरलेले असते. उदा. Eyeliner पापण्यांच्या केसांना, blusher हे cheek bone वर, lipstick ओठांना इत्यादी. Make-up उत्पादने ही सर्व त्वचा प्रकारांसाठी उपलब्ध असतात. Make-up उत्पादने घेताना ती चांगल्या Brand ची घ्यावीत. एकतर ही उत्पादने व्यवस्थित test करूनच बाजारात उपलब्ध होतात. या उत्पादनांमध्ये जे colour pigment…

Read More

प्रणाली वैद्य भाग – 6 रॉकर्स चंदन नगरला ट्रेक करून काय गेले, काही दिवसांतच गावातल्या लोकांना वेगवेगळ्या अनुभवांना सामोरं जावं लागलं… कधी नव्हे ते काही दिवसांच्या अंतराने सौम्य भूकंपाचे धक्के जाणवायला लागले… पूर्वी कधी असं अनुभवलं नव्हतं, असच वडीलधाऱ्यांचं मत होतं. संपूर्ण गाव अस्वस्थ झालं होतं… असं होण्यामागे नक्की कारण काय? कोणालाच कळत नव्हतं… बऱ्याच तज्ज्ञ मंडळींनी तेथे येऊन तपास केला, मात्र हाती काही लागले नाही. सर्वात वयोवृद्ध आजोबांनी न राहून चावडीवर आपलं मत मांडलं… “आजवर गावात कधीच कुठला त्रास नव्हता, पण गेल्या काही दिवसांपासून मात्र गाव भीतीच्या सावटाखाली जगतोय. काही दिवसांपूर्वी आपल्या गावात मुंबईकडून काही मुलं येऊन गेली आणि…

Read More