Author: Team Avaantar

वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ. स. 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी (Dnyaneshwari) सांगितली. भावार्थदीपिका, ज्ञानदेवी अशी ह्या ग्रंथाची पर्यायी नावे होत. स्वतः ज्ञानेश्वरांनी या ग्रंथाचे नामकरण केलेच नाही. ‘केले ज्ञानदेवें गीते । देशीकार लेणे’ एवढेच त्यांनी म्हटले आहे; तथापि संत नामदेवांनी या ग्रंथाचा उल्लेख ज्ञानदेवी, ज्ञानेश्वरी आणि गीताटीका अशा तीन नावांनी केलेला आहे. त्यामुळे ज्ञानदेवांची वा ज्ञानेश्वरांची ती ज्ञानेश्वरी वा ज्ञानदेवांची ती ज्ञानदेवी अशी नावे रूढ झाली असावीत. अध्याय पहिला मज अवगमलिया दोनी । मीमांसा श्रवणस्थानीं । बोधमदामृत मुनी । अली सोवती ||16|| प्रमेयप्रवाल सुप्रभ…

Read More

दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 26 जुलै 2025; वार : शनिवार भारतीय सौर : 04 श्रावण शके 1947; तिथि : द्वितीया 22:41; नक्षत्र : आश्लेषा 15:51 योग : व्यतिपात 28:05; करण : बालव 10:57 सूर्य : कर्क; चंद्र : कर्क 15:51; सूर्योदय : 06:12; सूर्यास्त : 19:16 पक्ष : शुक्ल; ऋतू : वर्षा; अयन : दक्षिणायन संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127 वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – व्यवसायात प्रगती होईल, ज्यामुळे मन आनंदी राहील. कामाशी संबंधित प्रवासात काही महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना बौद्धिक आणि मानसिक तणावापासून मुक्ती…

Read More

लीना जोशी परुळेकर मागच्या भागात आपण त्वचेचा pH आणि तेलकट त्वचेवर कुठल्या प्रकारची उत्पादने वापरावीत ते पाहिले. आता आपण कोरडी त्वचा आणि त्यासाठी कुठल्या प्रकारची उत्पादने वापरावीत, ते पाहू. कोरड्या त्वचेचा pH हा 5.5 या range च्या पुढे असतो, म्हणजेच त्वचेच्या नैसर्गिक pH range पेक्षा जास्त. थोडक्यात कोरडी त्वचा ही थोड्याफार प्रमाणात alkaline असण्याकडे झुकलेली असते. कोरड्या त्वचेत sebum Secretion चे प्रमाण कमी असते. म्हणजेच, त्वचेत नैसर्गिक तेल बनण्याचे प्रमाण कमी असते, ज्यामुळे त्वचा कोरडी पडते. त्यामुळेच या प्रकारच्या त्वचेवर अशी उत्पादने वापरली जातात, जी तेल आणि पाणी यांच्या मिश्रणातून बनवलेली असतात. ही उत्पादने, Cream base असतात आणि Cream base…

Read More

शैलेश विजया सोमनाथ महाजन मागील लेखात आपण पौराणिक काळातील भस्मासुर राक्षस आणि आधुनिक काळातील अद्यावत तंत्रज्ञान, टेक्नॉलॉजीचा भस्मासुर राक्षस म्हणजे काय, हे समजून घेण्याचा प्रयत्न केला. या लेखात थोडे पुढे जाऊयात. अद्ययावत भस्मासुर म्हणजे, कॅलक्युलेटर आल्यावर बेरीज आणि वजाबाकी करण्याची, पाढे पाठ करण्याची आपली बुद्धीची क्षमता भस्म झाली. अद्यावत तंत्रज्ञान आले आणि मानवाची शारीरिक कामे करण्याची क्षमता नष्ट होत चालली. त्यामुळे ब्लड प्रेशर, डायबिटीस यासारख्या असुरांची देखील संख्या वाढू लागली. त्यात मोबाईल हा एक मोठा भस्मासुर आला. त्याने तर जवळ जवळ एक पिढी भस्मसात केली आणि त्यातून पुढील पिढीचे तर काही खरे नाही, असे म्हणावे लागेल. जसे लिफ्टच्या अतिवापराने आपण…

Read More

आराधना जोशी मुंबई (Mumbai) ही देशाची आर्थिक राजधानी मानली जाते. स्वप्ननगरी किंवा मायानगरी म्हणून ओळख असणाऱ्या या शहराने आतापर्यंत अनेक नैसर्गिक आणि मानवनिर्मित आघात सहन केले आहेत. मग ते 1993 चे साखळी बॉम्बस्फोट असोत की 26/11 चा दहशतवादी हल्ला असो किंवा 11 जुलै 2006चे लोकल ट्रेनमधील स्फोट असोत. पण या आघातांनंतरही मुंबई सावरली, पुन्हा उभी राहिली. मात्र, 20 वर्षांपूर्वी 26 जुलैच्या पावसाने संपूर्ण मुंबईत जो काही धुमाकूळ घातला तो विसरणं कदापि शक्य नाही. त्यावेळी मी तेव्हाच्या अल्फा मराठी (आताच्या झी मराठी) चॅनेलवरील ‘नमस्कार अल्फा’ या live phone in कार्यक्रमाची संशोधक, समन्वयक म्हणून काम करत होते. दुपारी 12.30चा हा कार्यक्रम असायचा.…

Read More

वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ. स. 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी (Dnyaneshwari) सांगितली. भावार्थदीपिका, ज्ञानदेवी अशी ह्या ग्रंथाची पर्यायी नावे होत. स्वतः ज्ञानेश्वरांनी या ग्रंथाचे नामकरण केलेच नाही. ‘केले ज्ञानदेवें गीते । देशीकार लेणे’ एवढेच त्यांनी म्हटले आहे; तथापि संत नामदेवांनी या ग्रंथाचा उल्लेख ज्ञानदेवी, ज्ञानेश्वरी आणि गीताटीका अशा तीन नावांनी केलेला आहे. त्यामुळे ज्ञानदेवांची वा ज्ञानेश्वरांची ती ज्ञानेश्वरी वा ज्ञानदेवांची ती ज्ञानदेवी अशी नावे रूढ झाली असावीत. याच ज्ञानेश्वरीपासून ‘अवांतर’च्या वाचकांसाठी ‘अध्यात्म’ हे सदर सुरू करत आहे. अध्याय पहिला श्रीगणेशाय नमः । ॐ नमो…

Read More

नमस्कार, मी अभिनेत्री हर्षा गुप्ते पुन्हा एकदा तुमच्या भेटीला! एकेरात्री मी आणि राजेश म्हणजे माझा नवरा, पृथ्वी थिएटरला एक नाटक बघायला गेलो होतो. तिथे पोहोचायला जरा उशीरच झालेला, पण सुदैवानं नाटक सुरू झालं नव्हतं. तिथे गेल्यावर पाहिलं तर पार्किंग फुल्ल! मग काय गाडी जरा लांबच पार्क केली अन् नाटकाला जाऊन बसलो. खूप छान नाटक होतं. कॉमेडी नाटक आणि सर्व कलाकार उत्तम काम करणारे. मस्त एन्जॉय केलं. नाटक संपल्यावर बाहेर आलो. जरा लांबपर्यंत चालावं लागलं… बाकीचे लोक निघून गेले होते.  गाडीपर्यंत आलो आणि घात झाला… गाडीचा टायर पंक्चर झाला होता. खूप रात्र झाली होती, त्यामुळं आजूबाजूला कोणीही नव्हतं. बरं, गाडी नवीन…

Read More

दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 25 जुलै 2025; वार : शुक्रवार भारतीय सौर : 03 श्रावण शके 1947; तिथि : प्रतिपदा 23:22; नक्षत्र : पुष्य 16:00 योग : वज्र 07:27, सिद्धी 29:30; करण : किंस्तुघ्न 11:57 सूर्य : कर्क; चंद्र : कर्क; सूर्योदय : 06:12; सूर्यास्त : 19:17 पक्ष : शुक्ल; ऋतू : वर्षा; अयन : दक्षिणायन संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127 जरा जिवंतिका पूजन महालक्ष्मी स्थापना आणि पूजन वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस सामान्य असेल. नवीन आव्हानांचा सामना करावा लागेल, परंतु प्रत्येक अडचणीसह आयुष्यात काहीतरी…

Read More

चित्रा आचार्य भारतात पाऊल ठेवण्याआधी जवळपास दोन महिने डेबी ईमेलवर चॅटिंग करत होती. गप्पा कसल्या खरंतर शंका आणि विशेषकरून भारताविषयी कुशंकाच जास्त होत्या त्यात. मी जमेल तितकी तिच्या शंकांना उत्तरं देत होते. कुठला पोषाख करू… काय खाऊ, काय नको… एक ना अनेक! तशी आमची तीन दिवसांची सोबत राहणार होती. मजल दरमजल करत डेबी शेवटी एकदाची पोहोचली भारतात. महाकाय अमेरिकेच्या एका टोकापासून इथवर यायला तीस तास लागलेच तिला… भारतात फिरायला आलेल्या पर्यटकांना जेट लॅगचे कौतुक करत बसणे शक्य होत नाही, तितका वेळही नसतो. त्यामुळे पहिल्या दिवशी आम्ही दक्षिण मुंबईतील विविध इमारती त्यांच्या स्थापत्यशास्त्राचा आस्वाद घेत पालथ्या घातल्या… आमची सहल मस्त सुरू होती,…

Read More

ॲड. कृष्णा पाटील वायरच्या पिशवीतून भीमराव पाटलांनी कोर्टातून आलेली नोटीस काढली आणि शानबाग वकिलांच्या टेबलवर ठेवली. रिकामी पिशवी बाजूला ठेवून ते समोरच्या खुर्चीवर रेलून रुबाबात बसले. शानबाग वकिलांनी भीमराव पाटलांकडे निरखून पाहिले.‌ केसांना कलप केल्यामुळे डोक्यावरचे काळेभोर केस चकाकत होते. हातातल्या चारी बोटात सोन्याच्या अंगठ्या चमकत होत्या. पान खाल्ल्यामुळे तोंड लालभडक झालेलं होतं. त्यांचा चेहरा मात्र मग्रूर दिसत होता. जणू समोरचा माणूस आपल्यापुढे झुकण्यासाठी जन्माला आला आहे, असा आविर्भाव वाटत होता. शानबाग वकिलांनी नोटिशीवर नजर टाकली – “शुभांगी भयंकर तापट स्वभावाची आहे. माझं तेच खरं आणि सर्वांनी त्याप्रमाणेच वागलं पाहिजे, ही तिची धारणा आहे. थोडं जरी मनाविरुद्ध काही घडलं तर…

Read More