Author: Team Avaantar

वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ. स. 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली. स्वतः ज्ञानेश्वरांनी या ग्रंथाचे नामकरण केलेच नाही. ‘केले ज्ञानदेवें गीते । देशीकार लेणे’ एवढेच त्यांनी म्हटले आहे; तथापि संत नामदेवांनी या ग्रंथाचा उल्लेख ज्ञानदेवी, ज्ञानेश्वरी आणि गीताटीका अशा तीन नावांनी केलेला आहे. अध्याय पहिला तस्य संजनयन् हर्षं कुरुवृद्धः पितामहः । सिंहनादं विनद्योच्चैः शङ्खं दध्मौ प्रतापवान् ॥12॥ या राजाचिया बोला । सेनापति संतोषला । मग तेणें केला । सिंहनादु ॥125॥ तो गाजत असे अद्भुतु | दोन्ही सैन्यांआंतु । प्रतिध्वनि न समातु । उपजत असे…

Read More

दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 05 ऑगस्ट 2025; वार : मंगळवार भारतीय सौर : 14 श्रावण शके 1947; तिथि : एकादशी 13:11; नक्षत्र : ज्येष्ठा 11:22 योग : ऐंद्र 07:23; करण : बव 25:44 सूर्य : कर्क; चंद्र : वृश्चिक 11.22; सूर्योदय : 06:16; सूर्यास्त : 19:12 पक्ष : शुक्ल; ऋतू : वर्षा; अयन : दक्षिणायन संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127 मंगळागौरी पूजन पुत्रदा एकादशी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – कामाच्या ठिकाणी अनेक बदलांना सामोरे जावे लागू शकते. हे बदल सरकार किंवा व्यवस्थेकडून केले जातील, ज्यामुळे समस्यांमध्ये भर…

Read More

सुहास गोखले सर्वसाधारणपणे आकाशातील ताऱ्यांच्या 88 मांडण्यांना आता जागतिक स्तरावर तारकासमूह (Constellations) म्हणून ओळखले जाते. याआधी ताऱ्यांच्या विविध गटांना, मांडण्यांना नक्षत्र असे म्हणण्याची रूढी होती. एकूण 27 नक्षत्रे असून अश्विनी, भरणी, कृत्तिका, रोहिणी, मृग, आर्द्रा, पुनर्वसू, पुष्य, आश्लेषा, मघा, पूर्वा फाल्गुनी, उत्तरा फाल्गुनी, हस्त, चित्रा, स्वाती, विशाखा, अनुराधा, ज्येष्ठा, मूळ, पूर्वाषाढा, उत्तराषाढा, श्रवण, धनिष्ठा, शततारका, पूर्वा भाद्रपदा, उत्तरा भाद्रपदा आणि रेवती अशी त्यांची नावे आहेत. या विषयीच्या लेखमालेत आतापर्यंत आपण 24 नक्षत्रांची माहिती घेतली. या मालिकेतील पूर्वा भाद्रपदा, उत्तरा भाद्रपदा आणि रेवती या नक्षत्रांबाबत जाणून घेऊ. पूर्वा भाद्रपदा आणि उत्तरा भाद्रपदा : काही नक्षत्रे जोडीने आढळतात. कारण या नक्षत्रांच्या जोडीमुळे…

Read More

रश्मी परांजपे मागील लेखात आपण पूर्व-प्राथमिक शाळेची आवश्यकता विभक्त कुटुंब पद्धतीमुळे जाणवायला लागली, हे लक्षात घेतले. तसेच प्राथमिक शिक्षण घेण्यासाठी पूर्व-प्राथमिक शिक्षण गरजेचे असल्याचे आपल्याला समजले. बाळाच्या जन्मानंतर वर्षभरातच पालकांची शाळा-शोध मोहीम सुरू होते. मुलाच्या शालेय शिक्षणाचा आरंभ यशस्वी होण्यासाठी खालील निवडक मुद्द्यांचा आवर्जून विचार करणे नक्कीच यथार्थ ठरेल. शाळा घराजवळ असावी घर आणि शाळा यातील अंतर फार असेल तर, शाळेत पोहोचायला साहजिकच जास्त वेळ लागतो, त्यामुळे मुलं कंटाळण्याची शक्यता असते. म्हणून शाळा शक्यतो घराजवळ असावी. शिक्षणाचे माध्यम मातृभाषा असावे मुलं जेव्हा शाळेत जातात तेव्हा आईवडील आणि घरातील कुटुंबीय यांच्यापासून दूर राहण्याची त्यांची पहिलीच वेळ असते. साहजिकच मुलं बावरतात आणि…

Read More

पराग गोडबोले शनिवार होता. आठवडा संपायला काहीच तास शिल्लक होते. उद्या सुट्टी. लेकाला, खरेदीला आणि बाहेर जेवायला न्यायचं कबूल केलं होतं मी. वाट बघत होता तो याची, बऱ्याच दिवसांपासून. बेत ठरले होते आमचे, धमाल करायचे. एक दिन बेटे के नाम! तेवढ्यात पडद्यावर ईमेल झळकला. उद्या काही महत्त्वाच्या कामांसाठी सगळ्यांना ऑफिसला बोलावण्याची दवंडी होती. मेल येताच माझं अवसानच गळालं, लेकाचा हिरमुसलेला चेहरा नजरेसमोर दिसायला लागला मला. किती आनंदात होता तो, आईसोबत संपूर्ण दिवस मिळणार, कधी नव्हे तो, म्हणून! नवरा गेल्यानंतर त्याला सांभाळताना, आई आणि बाप अशा दोन्ही जबाबदऱ्या पार पाडत होते मी. लेकाचं आणि माझं एक नवीनच नातं आकाराला आलं होतं या…

Read More

वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ. स. 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली. स्वतः ज्ञानेश्वरांनी या ग्रंथाचे नामकरण केलेच नाही. ‘केले ज्ञानदेवें गीते । देशीकार लेणे’ एवढेच त्यांनी म्हटले आहे; तथापि संत नामदेवांनी या ग्रंथाचा उल्लेख ज्ञानदेवी, ज्ञानेश्वरी आणि गीताटीका अशा तीन नावांनी केलेला आहे. अध्याय पहिला अपर्याप्तं तदस्माकं बलं भीष्माभिरक्षितम् । पर्याप्तं त्विदमेतेषां बलं भीमाभिरक्षितम् ।।10।। वरी क्षत्रियांमाजि श्रेष्ठु । जो जगजेठी जगीं सुभटु । तया दळवैपणाचा पाटु | भीष्मासी पैं ।।115।। आतां याचेनि बळें गवसलें । हें दुर्ग जैसें पन्नासिलें । येणें पाडें थेंकुलें…

Read More

दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 04 ऑगस्ट 2025; वार : सोमवार भारतीय सौर : 13 श्रावण शके 1947; तिथि : दशमी 11:41; नक्षत्र : अनुराधा 09:11 योग : ब्रह्मा 07:04; करण : वणिज 24:30 सूर्य : कर्क; चंद्र : वृश्चिक; सूर्योदय : 06:16; सूर्यास्त : 19:12 पक्ष : शुक्ल; ऋतू : वर्षा; अयन : दक्षिणायन संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127 श्रावणी सोमवार शिवामूठ : तीळ वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – कोपिष्ट व्यक्तीची ऊर्जा वाया जाते आणि निर्णयक्षमतेला खीळ बसते. म्हणून रागावर नियंत्रण मिळविणे गरजेचे आहे. अन्यथा गोष्टी आणखी…

Read More

डॉ. किशोर महाबळ वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा एक गट अतिदक्षता विभागात काम करत असताना खूपच गंभीर दिसत होता. एका ज्येष्ठ डॉक्टर प्राध्यापकाने ते पाहिले आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या तणावाचे कारण विचारले. एका विद्यार्थ्याने उत्तर दिले, “सर, सध्या आमची ड्युटी ही आयसीयूमध्ये असल्याने आम्ही तिथे काम करत असतो. मात्र अनेकदा आम्हाला विविध प्रकारचा तणाव, नैराश्य, चिंता, निद्रानाश, असहायता यांचा अनुभव येत आहे, त्यामुळेच आम्ही खूप थकलो आहोत. या सगळ्या परिस्थितीत आपण एखादा चुकीचा निर्णय तर घेणार नाही नं? अशी भीती देखील सध्या आमच्यावर अधिराज्य गाजवत आहे. खरंतर, यामागचं कारणही आम्हाला माहीत आहे की, हॉस्पिटलच्या ज्या विभागात आम्ही सध्या कार्यरत आहोत त्या आयसीयूमध्ये अनेक…

Read More

आराधना जोशी मित्र या शब्दापेक्षा मला ‘दोस्त’ हा शब्द जास्त आपुलकीचा वाटतो… आणि त्याहीपेक्षा हिंदी भाषेतील ‘यार’ हा शब्द जास्त जिव्हाळ्याचा वाटतो. ‘छोड दो यार’ या वाक्यात काही वेगळीच खुमारी आहे, असं प्रसिद्ध लेखक व. पु. काळे म्हणतात. खरंच, मैत्रीचं (Friendship) हे नातं अतूट असतं. आपले नातेवाईक कोण असावेत, हे आपण ठरवू शकत नाही, पण आपले मित्र कोण असावेत, हे ठरवण्याचा अधिकार पूर्णपणे आपला असतो. याच नातेसंबंधांचा उत्सव साजरा करणारा, ऑगस्ट महिन्याचा पहिला रविवार म्हणजे ‘मैत्री दिन’. महाविद्यालयांमधून एखाद्या सणासारखा साजरा होणारा हा दिवस. आपल्या मैत्रीला नव्याने उजाळा देण्याचा हा दिवस तरुणाई अगदी उत्साहाने साजरा करते. हल्ली तर एक मुलगा…

Read More

प्राजक्ता अनंत काथे (ज्योतिष शास्त्री आणि होरा मार्तंड) मेष हा आठवडा आपल्यासाठी खूप धावपळीचा आहे. घरातील लहान मुलांची काळजी घ्यावी लागू शकते. कामाचे नियोजन केले तरी, तुम्हाला आयत्या वेळी नवीन प्रश्न सोडवावे लागू शकतात. कामाचा ताण वाढू शकतो. शांत राहून प्रयत्न करावा. महिलांना घरामध्ये कधी न केलेली काम करावी लागतील. त्यामुळे थकवा जाणवू शकतो. विद्यार्थ्यांना शिक्षक एखादी जबाबदारी देऊ शकतात. मित्रांच्या मदतीने तुम्ही ती जबाबदारी पूर्ण करू शकाल. वृषभ हा आठवडा खूप आनंददायी आहे. या आठवड्यात आवडीचे पाहुणे घरी येतील. त्यांच्याबरोबर प्रवास घडू शकतो. पावसाळी सहलीचा आनंद घेऊ शकता. नोकरदार लोकांना हा आठवडा साधारण आहे. जास्त धावपळ करावी लागणार नाही.…

Read More