Author: Team Avaantar

दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 29 सप्टेंबर 2025; वार : सोमवार भारतीय सौर : 07 आश्विन शके 1947; तिथि : सप्तमी 16:30; नक्षत्र : मूळ 30:16 योग : सौभाग्य 24:59; करण : विष्टी 29:22 सूर्य : कन्या; चंद्र : धनु; सूर्योदय : 06:28; सूर्यास्त : 18:29 पक्ष : शुक्ल; ऋतू : शरद; अयन : दक्षिणायन संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127 सरस्वती आवाहन महालक्ष्मी पूजन वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – एखादा नवीन उपक्रम सुरू करण्यासाठी उत्तम दिवस आहे. कामाच्या संदर्भात काही योजना आखली जाण्याची शक्यता आहे. एखाद्या सामाजिक कार्यात…

Read More

डॉ. किशोर महाबळ सर्व विद्यार्थी बुद्धीमान असतात, त्यांच्यात निसर्गदत्त अशा कोणत्या ना कोणत्या क्षमता, कौशल्ये असतातच, हे आपण मान्य केले आहे. आपल्याला विविध उपक्रमांच्या माध्यमातून प्रत्येक विद्यार्थ्याच्या बुद्धिमत्तेचा प्रकार, त्यांची कौशल्ये आणि क्षमता आपल्याला शोधून काढायच्या आहेत. शाळेतील सर्व उपक्रम सर्वांसाठी आयोजित करण्यातूनच हे शक्य होणार आहे. निवडक विद्यार्थ्यासाठी निवडक उपक्रम आणि काहीच विद्यार्थ्यांना वारंवार संधी देणे ही प्रचलित पद्धतच निकालात काढायला हवी आहे. अनेकदा विद्यार्थ्यांना उपक्रमात भाग घेण्यासाठी प्रोत्साहनच न मिळाल्याने ते कधी भागच घेत नाहीत आणि त्यामुळे त्यांना आपल्या सुप्त क्षमता ओळखण्याची संधीच मिळत नाही. म्हणून सर्व विद्यार्थ्यांसाठी आपण सर्व उपक्रम घ्यायला हवेत. या विविध उपक्रमांत भाग घेण्याने…

Read More

सौरभ वैशंपायन इतिहास अभ्यासक जगप्रसिद्ध अमेरीकन संशोधक आणि अत्यंत ज्येष्ठश्रेष्ठ इतिहासकार विल ड्युरांट आणि त्यांची पत्नी आणि नंतरची सहलेखिका एरियल ड्युरांट यांनी आपल्या आयुष्यातली किमान 30 वर्षे फक्त वेगवेगळ्या संस्कृतींचा अभ्यास करण्यात, वेगवेगळे साहित्य, लेख, ताम्रपट, वस्तू, हस्तलिखिते, पोथ्या, कथा वगैरे जमवण्यात घालवली. मग एक एक करत जगभरातील संस्कृतींवरती अवाढव्य ग्रंथ लिहिले. विल ड्युरांटचे फक्त ‘History of civilization’चेच 11 खंड आहेत. ते त्यांनी 1935 ते 1975 या 40 वर्षांच्या काळात लिहिले आणि प्रसिद्ध केले. 20 इतर ग्रंथ आहेत; त्यापैकी पाच ग्रंथ तर त्याच्या मृत्यूपश्चात तब्बल दोन दशकांनी प्रसिद्ध केले गेले. सांगायचा मुद्दा असा की, लोक आपलं उभं आयुष्य खर्ची घालतात…

Read More

कामिनी व्यवहारे रोजच्या रोज रुचकर, खमंग पदार्थ, तेही नवनवीन पदार्थ बनवणे म्हणजे महिलांसाठी एक परीक्षाच असते. विशेषत:, सुट्टीच्या दिवशी काहीतरी हटके करण्याकडे महिलांचा कल असतो. घरातल्या सर्वांनाच रोजच्या जेवणापेक्षा वेगळं काही तरी खाण्याचा मूड असतो. मग एखादा असा मेन्यू ठरतो की, तोच स्पेशल असतो. अशावेळी घरात वेगवेगळे पदार्थ करत असताना, हिरव्या वड्याची रेसिपी करून बघायला काय हरकत आहे! या प्रोटिनयुक्त वड्यांची कृती पाहुयात. तयारीस लागणारा एकूण वेळ – सुमारे 7 तास पुरवठा संख्या – 4 ते 5 व्यक्तींसाठी साहित्य मूग – अर्धी वाटी मटकी – अर्धी वाटी चणाडाळ – अर्धी वाटी हिरव्या मिरच्या – 5 ते 6 आले – 1 इंच…

Read More

प्राजक्ता अनंत काथे (ज्योतिष शास्त्री आणि होरा मार्तंड) मेष या आठवड्यात आर्थिक स्थिती चांगली राहील. तथापि, शब्दांवर ताबा ठेवावा लागेल. सकारात्मक विचार ठेवा. दुसऱ्यांचे सल्ले घेतले तरी स्वतःची भूमिका स्पष्ट ठेवा. पौर्णिमेच्या (06 ऑक्टोबर) आसपास कुटुंबासोबत आनंदी वेळ घालवाल. महिलांचे जोडीदाराशी मैत्रीचे नाते राहील आणि आठवडाही आनंदी जाईल. विद्यार्थ्यांवर काही कारणाने दडपण राहील, मात्र सकारात्मक विचार करा. वृषभ या आठवड्यात कामाच्या ठिकाणी उलाढाल चांगली राहील. नवीन योजनेला चांगला प्रतिसाद मिळू शकेल. गृहसौख्य उत्तम असेल. आधी केलेल्या गुंतवणुकीमुळे फायदा होऊन हाताशी पैसे येतील. पौर्णिमेच्या (06 ऑक्टोबर) सुमारास भावंडे भेटतील. महिला मनाप्रमाणे खर्च करू शकतील. जोडीदारासाठी भेटवस्तू खरेदी कराल. विद्यार्थ्यांना मित्रपरिवारात काही…

Read More

वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली. अध्याय तिसरा प्रकृतेर्गुणसंमूढाः सज्जन्ते गुणकर्मसु । तानकृत्स्नविदो मन्दान् कृत्स्नविन् न विचालयेत् ॥29॥ एथ कर्मी तोच लिंपे । जो गुणसंभ्रमें घेपे । प्रकृतीचेनि आटोपें । वर्ततु असे ॥184॥ इंद्रियें गुणाधारें । राहाटती निजव्यापारें । तें परकर्म बलात्कारें । आपादी जो ॥185॥ मयि सर्वाणि कर्माणि संन्यस्याध्यात्मचेतसा । निराशीर्निर्ममो भूत्वा युध्यस्व विगतज्वरः ॥30॥ तरी उचितें कर्में आघवीं । तुवां आचरोनि मज अर्पावीं । परी चित्तवृत्ति न्यासावी । आत्मरूपीं ॥186॥ हें कर्म मी कर्ता । कां आचरेन…

Read More

दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 28 सप्टेंबर 2025; वार : रविवार भारतीय सौर : 06 आश्विन शके 1947; तिथि : षष्ठी 14:26; नक्षत्र : ज्येष्ठा 27:53 योग : आयुष्मान 24:30; करण : गरज 27:31 सूर्य : कन्या; चंद्र : वृश्चिक 27:53; सूर्योदय : 06:28; सूर्यास्त : 18:29 पक्ष : शुक्ल; ऋतू : शरद; अयन : दक्षिणायन संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127 वेद कन्सल्टन्सी / 9987433660 हेही वाचा – निरामय आरोग्यासाठी मानसिकता बदलणे आवश्यक… दिनविशेष विश्वविख्यात गायिका लता मंगेशकर टीम अवांतर अत्यंत सुरेल आवाजाची देणगी लाभलेल्या, विश्वविख्यात, प्रतिभावंत गायिका लता मंगेशकर यांचा जन्म…

Read More

डॉ. सारिका जोगळेकर होमिओपॅथिक तज्ज्ञ मासिक पाळी हा स्त्रीच्या आयुष्यातला अविभाज्य भाग आहे. स्त्रीच्या गर्भाशयात गर्भधारणेसाठी दर महिन्याला एक नवीन थर तयार होतो. जर गर्भधारणा झाली नाही, तर हा थर रक्तासह शरीराबाहेर टाकला जातो. ही प्रक्रिया दर 28 दिवसांनी (कधी 21 ते 35 दिवसांत) नियमितपणे घडते. यालाच मासिक पाळी किंवा मासिक ऋतू म्हणतात. ही प्रक्रिया साधारणपणे वयाच्या 12-13 वर्षांपासून सुरू होते (Menarche) आणि 45-50 वर्षांपर्यंत (रजोनिवृत्ती येईपर्यंत – Menopause) चालते. मासिक पाळीची सायकल ही हार्मोन्सद्वारे नियंत्रित केली जाते. इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन असे दोन मुख्य हार्मोन्स मासिक पाळी नियमित ठेवण्याचे काम करते. प्रत्येक महिन्यात होणारा हा शारीरिक बदल नैसर्गिक असला तरीही…

Read More

रविंद्र परांजपे मागील तीन लेखांत आपण निरामय आरोग्य प्राप्तीसाठी मनापासून प्रबल इच्छा असणे, पुरेसा वेळ काढणे तसेच पैशांचा यथायोग्य विनियोग करणे या तीनही बाबींची नितांत आवश्यक आहे, हे ध्यानात घेतले. या लेखात आपण ‘निरामय आरोग्यासाठी मानसिकता बदलणे आवश्यक’ या मुलभूत मुद्द्याविषयी जाणून घेणार आहोत. मानसिकता म्हणजे काय? सोप्या भाषेत मानसिकता म्हणजे मनोवृत्ती. एखाद्या व्यक्तीच्या मनातील विचार, भावना, एखाद्या गोष्टीकडे अथवा प्रसंगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन तसेच व्यक्तीचे प्रत्यक्ष वर्तन आणि कृती या सर्व बाबींचा समावेश मानसिकता या संज्ञेत करता येईल. मानसिकता बदलणे का आवश्यक आहे? मानसिकता बदलण्याची गरज समजून घेण्यासाठी आपण सद्यमानसिकता काय आहे, हे लक्षात घेणे आवश्यक आहे. सर्वसाधारणपणे आरोग्यासंबंधित…

Read More

माधवी जोशी माहुलकर नवरात्रीच्या निमित्त ‘साबुदाणा बर्फी’ या रेसिपीची माहिती पाहुयात. साबुदाणा बर्फी हा एक पारंपरिक भारतीय मिठाईचा प्रकार आहे. यामध्ये साबुदाणा, तूप, नारळाचा किंवा सुक्या खोबऱ्याचा किस, साखर, दूध तसेच काजू, बदाम, पिस्ता या सुक्यामेव्यांचा उपयोग केला जातो. साहित्य साबुदाणा – 1 वाटी मलाईसह दूध – 1 कप सुक्या किंवा ओल्या नारळाचा किस – अर्धी वाटी साखर – 3-4 कप (किंवा चवीनुसार अंदाजे घ्यावी) तूप – 2 ते 3 चमचे वेलची पावडर – 1 चमचा केसराच्या – काड्या (आवडीनुसार) एकूण कालवाधी – साधारण पाऊण तास हेही वाचा – Recipe : विदर्भ स्पेशल… तुरीच्या उसळीतील दिवसे! कृती प्रथम साबुदाणा कोरडाच सोनेरी…

Read More