Author: Team Avaantar

माधवी जोशी माहुलकर दिवाळीत केले जाणारे फराळाचे पदार्थ हे घरीच केलेले असावेत, नाही का? कमीत कमी चिवडा, चकली आणि बेसनाचे लाडू तरी घरी करावेत! नोकरी करणाऱ्या स्त्रियांना कामाच्या व्यापामुळे हे पदार्थ करायला वेळ नसतो, परंतु वेळ मिळाला तर हे तीन पदार्थ वर्षातून एकदा घरी करावेत. तसंही आजकाल चिवडा, चकली, लाडू, शंकरपाळे यासारखे पदार्थ वर्षभर दुकानांमध्ये उपलब्ध असतात. परंतु वर्षातून एकदा येणाऱ्या दिवाळीत हे पदार्थ घरी करण्याचा अनुभव आणि मजा काही वेगळीच आहे. यामध्ये सातत्य आहे आणि आपण स्वतः केलेल्या उत्कृष्ट पाककृतीचे समाधान आहे! गृहिणीने केलेल्या चकली, लाडू यांचे तोंड भरून कौतुक जेव्हा तिच्या घरातील लोक करतात तेव्हा, तिच्या चेहऱ्यावरचा आनंद…

Read More

चंद्रकांत पाटील आदिती गार्डनमध्ये रोज सायंकाळी ज्येष्ठ नागरिकांचा कट्टा भरायचा… चेष्टा, विनोद चालायचे, वाढदिवस साजरे व्हायचे, नाटक,सिनेमा, राजकारण यांच्यावर गप्पा चालायच्या… वसंतराव या सर्वांमध्ये भरभरून भाग घ्यायचे… अगदी आनंदी आनंद असे. पण आज वसंतराव या मिटींगमध्ये नव्हते. दूरवरच्या झाडाखाली खिन्नपणे बसून राहिले होते. आकाश ढगाळ झालेले… एरवी वार्‍याच्या झुळकेने हालणारी झाडे, वेली स्तब्ध झाली होती… वातावरण सुन्न झाले होते… केव्हाही पाऊस पडेल असे वाटत होते. वसंतराव एका नामांकित कंपनीतून रिटायर झाले होते, तेव्हापासून ते पुण्यातच राहत. वसंतरावानां एक मुलगा आणि एक मुलगी. मुलगी इंग्लंडला आणि मुलगा यूएसमध्ये! घरी दोघेच नवराबायको. सकाळी उठल्या-उठल्या हास्यक्लब, योगा नंतर चहा… तोपर्यत पेपर आलेला असे,…

Read More

वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली. अध्याय चौथा हें असो विश्व पाहीं । जयासि आपणपेंवांचूनि नाहीं । आतां कवण तें कर्म कायी । बाधी तयातें ॥112॥ हा मत्सरु जेथ उपजे । तेतुलें नुरेचि जया दुजें । तो निर्मत्सरु काइ म्हणिजे । बोलवरी ॥113॥ म्हणोनि सर्वांपरी मुक्तु । तो सकर्मुचि कर्मरहितु । सगुण परि गुणातीतु । एथ भ्रांति नाहीं ॥114॥ गतसंगस्य मुक्तस्य ज्ञानावस्थितचेतसः । यज्ञायाचरतः कर्म समग्रं प्रविलीयते ॥23॥ तो देहसंगें तरी असे । परी चैतन्यासारिखा दिसे । पाहतां परब्रह्माचेनि…

Read More

दर्शन कुलकर्णी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – दिवस चांगला जाईल. व्यवसायात अनपेक्षित फायदा आणि नोकरीत प्रगती होण्याची शक्यता आहे. काही अडथळे येऊ शकतात, परंतु कठोर परिश्रमाने त्यावर यशस्वीपणे मात करता येईल. परिस्थितीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करा. कुटुंबासोबत वेळ घालवल्याने नातेसंबंध सुधारतील. आज जुने मित्र भेटू शकतात. आज आरोग्य चांगले राहील. वृषभ – दिवसभरात संमिश्र अनुभव येतील. व्यवसाय चांगला राहील. कामाच्या ठिकाणी काही नवीन योजना फलदायी ठरतील. वैयक्तिक कारणास्तव कुटुंबात वाद होण्याची शक्यता आहे. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. खाण्याच्या सवयींकडे लक्ष द्या. रागावर नियंत्रण ठेवा. मिथुन – दिवस सामान्य असेल. शिक्षण आणि नोकरी संदर्भात काही चांगल्या…

Read More

नमस्कार मी अभिनेत्री हर्षा गुप्ते… पुन्हा एकदा तुमच्या भेटीला! मी ‘लग्नाची बेडी’ सीरियलमध्ये काम करत होते. ‘राघव’ची ‘माई आत्या’… म्हणजे रायाच्या आईची भूमिका होती. आता माझा मुलगा ‘राया’ आर्मीमध्ये असतो आणि तो ड्युटीसाठी एक पोस्टवर जातो अन् तिथून गायब होतो, हरवतो! त्याचे वडील पण शहीद झाले होते. आता ती माई बिचारी या त्या देवस्थानला जाऊन ‘रायाला सुखरूप ठेव… लवकर घरी येऊ दे…’ अशी प्रार्थना करत असते… असे बरेचसे सीन टेलिकास्ट झाले. सांगायची गोष्ट अशी की, गुढी पाडाव्याच्या दुसऱ्या दिवशी आपल्या स्वामी समर्थांचा वाढदिवस होता. मी कांदिवलीच्या डहाणूकरवाडी येथील स्वामींच्या मठात दर्शन आणि भंडाऱ्यासाठी गेले होते. अशा गर्दीच्या ठिकाणी मला ओळखणारी…

Read More

स्वयंपाक बनवताना महिलांना नेहमीच कसरत करावी लागते. अशा परिस्थितीत याच महिला काही नवनवीन क्लृप्त्या वापरतात… याच आहेत, किचन टीप्स. जाणून घेऊयात काही टीप्स – हेही वाचा – Kitchen Tips : कायम तयार चिंचेचा कोळ, नारळाचे वाटण अन् पौष्टिक पोळ्या… हेही वाचा – Kitchen Tips :  कधीही करा फोडणीचा भात अन् सोबत झटपट दही (‘सुगरणीचा सल्ला’ पुस्तकातून साभार)

Read More

पराग गोडबोले साधारणपणे पाचएक महिन्यापूर्वीची ही गोष्ट. माझ्या तीन दिवसांच्या धावत्या दौऱ्याची सांगता, पुणे ते मुंबई या शेवटच्या टप्प्यात इंद्रायणी एक्स्प्रेसच्या प्रवासाने झाली. तत्कालमध्ये अगदी खिडकी मिळाली, चेअर-कारची! विमान असो, बस असो वा रेल्वे, खिडकी मिळाली की, मी अजूनही हरखतो, लहान मुलासारखा… पळती झाडे, इमारती, घाटातले बोगदे… हे सगळं नजरेत साठवून ठेवण्याचा मोह अजूनही न आवरता येण्यासारखा… एकटा असलो तरीही प्रवासाचा आनंद घेतोच मी, मनसोक्त! यावेळी माझ्यासमोर टेबल पण आलं. अगदी खास वाटलं… सहा पस्तीस वाजता अगदी वेळेवर गाडी हलली. शिवाजीनगर गेलं आणि हळूहळू अंधार पडायला लागला. बंद काचांच्या पलीकडली, बाहेरची दृश्यं धूसर व्हायला लागली आणि माझा हिरमोड झाला. बाहेरचं…

Read More

वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली. अध्याय चौथा यस्य सर्वे समारम्भाः कामसंकल्पवर्जिताः । ज्ञानाग्निदग्धकर्माणं तमाहुः पंडितं बुधाः ॥19॥ जया पुरुषाचां ठायीं । कर्माचा तरी खेदु नाहीं । परी फळापेक्षा कहीं । संचरेना ॥103॥ आणि हें कर्म मी करीन । अथवा आदरिले सिद्धी नेईन । येणें संकल्पेंही जयाचें मन । विटाळेना ॥104॥ ज्ञानाग्नीचेनि मुखें । जेणें जाळिली कर्में अशेखें । तो ब्रह्मचि मनुष्यवेखें । वोळख तूं ॥105॥ त्यक्त्वा कर्मफलासंगं नित्यतृप्तो निराश्रयः । कर्मण्यभिप्रवृत्तोऽपि नैव किंचित् करोति सः ॥20॥ जो शरीरीं…

Read More

दर्शन कुलकर्णी कालाष्टमी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – दिवस संमिश्र असेल. प्रलंबित कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. व्यवसायाच्या कामात व्यग्र रहाल. उत्पन्नातील घट अस्वस्थ करेल, परंतु ते कोणाशीही शेअर करू शकणार नाही. घरात किंवा बाहेर कोणाशी कोणतेही वाद सुरू असतील तर ते सोडवण्याचा प्रयत्न करा. नातेवाईकाच्या आगमनाने खर्च वाढेल. वृषभ – दिवस संमिश्र असेल. कामाचा ताण खूप जाणवेल, ज्यामुळे थकवा येईल. स्पर्धेत तुम्हाला फायदा होईल. करिअरच्या प्रगतीतील अडथळे दूर होतील. पालकांशी मतभेद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे डोके शांत ठेवून बोला. मिथुन – कामाच्या ठिकाणी हवे असलेले काम करायला न मिळाल्याने कदाचित नैराश्य येईल. राजकारणात सहभागी असलेल्यांनी त्यांच्या…

Read More

डॉ. किशोर महाबळ शालेय जीवनात विद्यार्थी हे शिक्षकांना मार्गदर्शक आणि आदर्श‍ मानतात. शिक्षक विद्यार्थ्यांशी वर्गात कसे वागतात? कसे शिकवतात? कसे बोलतात? कसे राहतात? कसे उभे राहतात? कसे चालतात? खुर्चीवर कसे बसतात? हजेरी कशी घेतात? प्रश्न कसे आणि कोणते विचारतात? विद्यार्थ्यांना कसा प्रतिसाद देतात? शिकवताना चेहेऱ्यावरील हावभाव कसे असतात? त्यांचा मूड कसा असतो?… या सर्व गोष्टी विद्यार्थी बारकाईने बघत असतात. शिक्षकांच्या वर्तनाचा दूरगामी परिणाम विद्यार्थ्याच्या विचारांवर, वर्तनावर तसेच मानसिक, बौद्धीक जडणघडणीवर होतो आणि तो विद्यार्थ्यांवर आयुष्यभर टिकून राहतो. म्हणूनच प्रत्येक शिक्षकाचे शाळेतील आणि वर्गातील वर्तन सकारात्मक असणे, अत्यंत महत्त्वाचे आणि गरजेचे असते. सकारात्मक वर्तनाचे महत्त्व न समजणाऱ्या शिक्षकाचे वर्तन नकारात्मक असेल.…

Read More