Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Dnyaneshwari : घटीं थोडेसें उदक घालिजे, तेणें न गळे तरी वरिता भरिजे…

    March 19, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 19 मार्च 2026

    March 18, 2026

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Thursday, March 19
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » सूरजच्या आयुष्यात नवा ‘उष:काल’!
    ललित

    सूरजच्या आयुष्यात नवा ‘उष:काल’!

    Team AvaantarBy Team AvaantarJanuary 12, 2026No Comments5 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीआर्टिकल, मराठीलेख, मराठी कथा, मराठी साहित्य, सूरज कामिनी, सूरज कामिनीचा घटस्फोट, सूरज कामिनीचा डिव्होर्स, सूरजचा पुनर्विवाह, सूरजसाठी नवीन स्थळ, सूरज उषा, सूरज उषा पुनर्विवाह
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    ॲड. कृष्णा पाटील

    भाग – 2

    कामिनीने घटस्फोटाची केस दाखल केली होती. सूरजबरोबर तिला काडीमोड हवा होता. तिने दोन्ही मुलांची जबाबदारी घेतली होती. कामिनी शांत होती. तिच्या चेहऱ्यावर कोणताही बदल झाला नाही. अत्यंत क्रूर चेहऱ्याने तिने पेपरवर सह्या केल्या. तो पेपर वकिलांच्याकडे देत म्हणाली, “साहेब तुम्ही तुमचे काम पुढे चालू ठेवा. आपल्याला लवकरात लवकर घटस्फोट हवा आहे.” तिने सूरजकडे पाहिले सुद्धा नाही. सूरजकडे पाठ करून ती कोर्टाबाहेर ताडताड चालत गेली.

    सूरजच्या वकिलांनी सूरजला सांगितले, “आता कोणताच इलाज नाही. ज्या काही घटना घडत आहेत त्या तुम्ही स्वीकारायला शिका. एखाद्या व्यक्तीला आपण समजावू शकतो. परंतु समजावून घेण्याची इच्छाच नसेल तर, तिथे प्रश्न मिटतो. तुम्ही आता शांतपणे निर्णय घ्यायला हवा.”

    सूरजने गपचूप पेपरवर सह्या केल्या. शांतपणे तो कोर्टाच्या बाहेर पडला. सायंकाळचे पाच वाजून गेले होते. रस्त्यावर रहदारी वाढली होती. दिवसभर ड्युटी करून थकलेले कर्मचारी आपापल्या घराकडे निघाले होते. सूरज मात्र भकास चेहऱ्याने गाडी चालवत होता. घरी आल्यावर जवळजवळ तो कोसळलाच. आई पळत आली. आईने विचारले, “काय काय झाले? आज कोर्टामध्ये प्रकरण मिटवणार होते ना? मिटले का प्रकरण?” त्याने आईला जवळ घेतले. तिचा हात हातात घेतला. म्हणाला, “तिने सोडचिठ्ठी घेतली.”

    आई काहीच न बोलता पुन्हा स्वयंपाक घरात गेली.

    त्यादिवशी रात्री त्याला झोप अशी लागली नाही. इतकी समजूत घालून सुद्धा कामिनीने ऐकले नाही, याचा अर्थ तिला फक्त निमित्त हवे होते. तिला तिच्या नोकरीचा आणि पैशाचा भयंकर गर्व होता. ती म्हणेल त्या पद्धतीने शेवटी आम्ही सर्वजण चालत राहिलो. दोन्ही मुलं इकडची राहिलीच नाहीत. ती एक तर कामिनी किंवा त्यांचे आजी-आजोबा यांच्याकडेच लहानाची मोठी होऊ लागली. तरीही, आईने किंवा बाबांनी कधी तक्रार केली नाही. बाबा तर नेहमी म्हणायचे, “तुम्ही दोघे सुखी राहा. आमचं काय? झालं गेलं. परंतु तुमच्यातली तक्रार आमच्या कानावर आली की, आमचा जीव तीळ तीळ तुटत राहतो. कृपा करून तुमच्या मुलांच्या भवितव्यासाठी आनंदी राहा. समाधानाने राहा. तुमच्या दोघांच्या कमाईमधला आम्हाला एक रुपया देऊ नका. परंतु भांडत बसू नका. आमची एवढी तुम्हा दोघांना कळकळीची विनंती आहे.”

    सकाळी दारावरची टकटक ऐकून सूरज जागा झाला. त्याने झटकन पांघरूण बाजूला सारले. घड्याळात पाहिले. सकाळचे आठ वाजले होते. खिडकीतून उन्हाची तिरीप आत आली होती. एवढ्या लवकर कोण आलं असेल याचा विचार करत त्याने दरवाजा उघडला. दारात आई आणि मित्र नंदू उभा होते.

    हेही वाचा – कामिनीने एवढा टोकाचा निर्णय घेणे गरजेचे होते का?

    नंदू म्हणाला, “झोप झाली नाही वाटतं. किती उशीर? कधीपासून दरवाजा वाजवतोय तरी, जागा झाला नाहीस!” सूरज डोळे चोळत चोळत म्हणाला, “रात्री झोपायला खूप उशीर झाला.”

    आईकडे पाहत म्हणाला, “तू कधी आलीस? नंदूची गाठ कुठे पडली?”

    आई म्हणाली, “मी पहाटेच आले आहे. परंतु अगोदर नंदूकडे गेली. तिथे चहा नाश्ता झाला. नंतर आपल्या घरी आली. तू आंघोळ करून घे पटकन. तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे.”

    बाथरूमकडे जाता जाता सूरज म्हणाला, “माझ्या लग्नाचा विषय सोडून दुसरं महत्त्वाचं काय आहे? तोच विषय असणार आहे.”

    सूरज आंघोळ करीत होता तोपर्यंत आईने सर्वांसाठी कॉफी बनवली. गरम कॉफीचे कप घेऊन ती हॉलमध्ये आली. इतक्यात आंघोळ आटोपून सूरज सुद्धा आला. कोचवर बसताना सूरज म्हणाला, “बोला काय महत्त्वाचं बोलायचं आहे.”

    कॉफीचा घोट घेता घेता नंदू म्हणाला, “काल आपण दोघे बोलत बसलो होतो. तू लग्न करणार नाहीस, असा निर्णय घेतला आहेस, तो तुला बदलावा लागणार आहे. आई तीर्थयात्रेला गेली नव्हती. ती तुझ्या चुलत मामाच्या गावी गेली होती. चुलत मामाची मुलगी सुद्धा घटस्फोटीत आहे. तिच्याबद्दल साकडे घालण्यासाठी आई गेली होती. त्या मुलीला तू पसंत आहेस. तिची काही चुकी नसताना तिच्या नवऱ्याने तिला सोडून दिले आहे. तिचा सर्व इतिहास तुला माहिती आहे. आम्ही सांगण्याची आवश्यकता नाही. आईने त्यांना आपली सर्व सत्य परिस्थिती सांगितली आहे. तिचे आईवडील तयार झाले आहेत. मुलीने तर स्पष्टपणे होकार दिला आहे. आता तू विचार करायचा आहेस.”

    सूरज खाली मान घालून सर्व काही ऐकत होता. तो काहीच बोलत नव्हता. आई त्याच्याकडे पाहत होती. नंदू पुन्हा म्हणाला, “सूरज, एक वस्तू खराब लागली म्हणून संपूर्ण मार्केट खराब नसते. तुला कामिनी तशी भेटली म्हणून उषा पण तशीच असेल, हा विचार डोक्यातून काढून टाक. तुझी किंमत तिला कळाली नाही. यात तुझा काय दोष? ती तिच्या पैशावर प्रेम करत राहिली. तू तिच्यावर जीव ओवाळून टाकत होतास. परंतु तिला या सर्व गोष्टी समजल्या नाहीत. तिच्या आकलनाच्या पलीकडच्या या गोष्टी होत्या. तिचा तरी शेवट कुठे चांगला झाला? दोन मुले पदरात असताना ती अचानक गेली. तिचा मृत्यू संशयास्पद आहे. अजूनही तिच्या मृत्यूचा आणि शरीराचा ठाव ठिकाणा लागला नाही. त्याची कारणेही समजलेली नाहीत. ते जाऊ दे. शेवटी तुझ्यासाठी राहू दे, पण तुझ्या आईसाठी तरी तुला निर्णय घ्यावाच लागेल.”

    सूरज मनातल्या मनात विचार करत होता. चुलत मामाची मुलगी ‘उषा’ बीकॉम झाली होती. शाळेत आणि कॉलेजमध्ये ती अत्यंत हुशार होती. परंतु पैशाच्या पाठीमागे लागून मामाने तिला चुकीच्या ठिकाणी दिली. तिला त्या घरामध्ये काडीची किंमत नव्हती. त्यात भरीस भर म्हणजे नवऱ्याचे बाहेर संबंध होते. या सर्व गोष्टीचा शेवट त्यांच्या घटस्फोटात झाला. त्यानंतर उषा त्या घरी गेली नाही. घटस्फोट होऊन चार वर्षे झाली होती. परंतु नारोबाची उषा म्हटलं की, सुसंस्कारीत मुलगी अशीच तिची प्रतिमा होती.

    हेही वाचा – सुटका सावकारी पाशातून…

    सूरजला वाटले, आपण तरी आपली जिंदगी का जाळून घ्यायची? कामिनी आयुष्यात आली. तिने काही दिवस संसार केला. त्यानंतर तिने बदला घेण्यासाठीच आयुष्य घालवले. आपण सगळे सोसत राहिलो. याचा अर्थ इथून पुढची जिंदगी आपण अशीच बरबाद करावी, असा होत नाही. आपण आता निर्णय घ्यायला हवा. नंदू म्हणतोय ते अगदी खरं आहे. आईसाठी का होईना पण तो निर्णय घ्यायला हवा. उषा समजूतदार आहे. समंजस आहे. शिवाय तिलाही अत्यंत कटू अनुभव आला आहे. दोघेही समदुःखी आहोत. होकार द्यायला काय हरकत आहे?

    सूरजचा चेहरा उजळला. झालं गेलं विसरून तो नव्या जीवनाची स्वप्ने पाहू लागला. त्याच्या चेहऱ्यावर नाजूक हास्य उमलले. नंदूने पुन्हा एकदा त्याच्या पाठीवर जोराची थाप मारली. म्हणाला, “सूरज कसला गहन विचार करायलायस? विचार करण्यासारखं यात काय आहे? तुझ्या जीवनाचा प्रश्न आहे. अजून चार-पाच वर्षे थांबलास तर पुन्हा आयुष्यात लग्न होणार नाही. आता संधी चालून आली आहे. तुला कामिनी NO म्हणाली. NO चा अर्थ नेक्स्ट वन असा असतो. आईने तुझ्यासाठी चार-पाच दिवस घालवले. खरं म्हटलं तर, गेल्या दोन-तीन वर्षांपासून ती अशीच तळमळत आहे. पण शेवटी बिचारीने चुलत भावाकडून शब्द आणला. आता तू आणखी कसला विचार करणार आहेस?”

    सूरज उठला. त्याने नंदूला आणि आईला जवळ घेतले. म्हणाला, “ठीक आहे. तुम्ही म्हणताय म्हणून नव्हे, परंतु माझ्या आणि आपल्या सर्वांच्या भविष्याच्या दृष्टीने मला निर्णय घ्यावा लागणार आहे.”

    आईकडे पाहून तो म्हणाला, “मामाला फोन कर. मी लग्नाला तयार आहे म्हणून सांग…!!!

    समाप्त

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    पुण्यातील मुक्काम अन् ठसठसणारी ती जखम!

    March 16, 2026 ललित

    दोन शब्द पुरे जगण्याला…

    March 16, 2026 ललित

    रामने शिवला थेटच विचारलं, ‘आरू का रडली?’

    March 16, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    पुण्यातील मुक्काम अन् ठसठसणारी ती जखम!

    By Team AvaantarMarch 16, 2026

    पराग गोडबोले दोन दिवस ऑफिसच्या कामानिमित्त पुण्यनगरीत होतो. पुण्याची आणि माझी नाळ तशी बालपणापासून जोडलेली,…

    दोन शब्द पुरे जगण्याला…

    March 16, 2026

    रामने शिवला थेटच विचारलं, ‘आरू का रडली?’

    March 16, 2026

    कॉलेज मैत्रीण छाया 52 वर्षांनी भेटली, पण…

    March 15, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    Dnyaneshwari : घटीं थोडेसें उदक घालिजे, तेणें न गळे तरी वरिता भरिजे…

    March 19, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 19 मार्च 2026

    March 18, 2026

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026

    पुण्यातील मुक्काम अन् ठसठसणारी ती जखम!

    March 16, 2026

    POPULAR CATEGORY

    • अध्यात्म 241
    • अवांतर 171
    • आरोग्य 88
    • फिल्मी 43
    • फूड काॅर्नर 181
    • मैत्रीण 16
    • ललित 499
    • वास्तू आणि वेध 354
    • शैक्षणिक 72

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Advertise

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn