दर्शन कुलकर्णी
- आज, दिनांक : 28 डिसेंबर 2025; वार : रविवार
- भारतीय सौर : 07 पौष शके 1947; तिथि : अष्टमी 11:59; नक्षत्र : उत्तरा भाद्रपदा 08:42
- योग : वरियान 10:12; करण : बालव 23:10
- सूर्य : धनु; चंद्र : मीन; सूर्योदय : 07:09; सूर्यास्त : 18:08
- पक्ष : शुक्ल; ऋतू : हेमंत; अयन : उत्तरायण
- संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5127
दुर्गाष्टमी
शाकंभरीदेवी नवरात्रौत्सव आरंभ
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
हेही वाचा – योग आणि आयुर्वेद या एकाच वैदिक ज्ञानाच्या शाखा
दिनविशेष
भारतीय उद्योगविश्वाचा मुकुटमणी रतन टाटा
टीम अवांतर
भारतीय उद्योगविश्वाचा मुकुटमणी अशी जगभर ओळख असणाऱ्या रतन टाटा यांचा जन्म 28 डिसेंबर 1937 रोजी झाला. ते टाटा समूहाचे संस्थापक जमशेदजी टाटा यांचे दत्तक नातू नवल टाटा यांचे पुत्र होते. रतन टाटांचे शालेय शिक्षण मुंबईत झाले होते. पुढे त्यांनी कॉर्नेल युनिव्हर्सिटीतून आर्किटेक्चर बीएस आणि हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून अॅडव्हान्स मॅनेजमेंट प्रोग्रॅम हे अभ्यासक्रम पूर्ण केले.
रतन टाटा यांनी 1962 मध्ये टाटा समूहासोबत आपले करिअर सुरू केलं होतं. 1991 मध्ये जेआरडी टाटा यांच्यानंतर टाटा समूहाचे ते पाचवे अध्यक्ष बनले होते. रतन टाटा जेव्हा टाटा समूहात आले, तेव्हा कंपनीची एकूण उलाढाल एक हजार कोटी रुपये होती. तर, 2011-12 मध्ये समूहाचा महसूल 475.721 कोटी रुपये झाला होता. टाटाने विकसित देशांमधील अनेक अशा कंपन्यांचे अधिग्रहण केले, ज्या त्यांच्या देशात सुपर ब्रॅण्ड होत्या. आज टाटा समूहाचे जाळे जगभरात पसरलेले आहे. रतन टाटा यांनी त्यांचा दोन दशकांहून अधिकच्या कारकिर्दीत टाटा समूहाला सर्वोच्च शिखरावर नेऊन ठेवले.
रतन टाटांनी टेटली, जग्वार लॅण्ड रोव्हर आणि कोरस यासारख्या कंपन्यांचे टाटा समूहात अधिग्रहण केले. त्यांनी नॅनोसारखी कार बनवून सर्वसामान्यांचे कार घेण्याचे स्वप्न सत्यात उतरवले होते. याशिवाय, इंडिकासारखी प्रसिद्ध कारही बाजारात आणली होती.
हेही वाचा – स्वस्थ आरोग्य आणि आरोग्याचे विविध पैलू
26 जुलै 2008 मध्ये झालेल्या मुंबईवरील हल्ल्यात टाटा समूहाचे ताज हे पंचतारांकीत हॉटेलही दहशतवाद्यांनी लक्ष्य केले होते. यात हॉटेलचे तर मोठे नुकसान झालेच, शिवाय तिथले काही कर्मचारीही या हल्ल्यात मृत्युमुखी पडले. त्यावेळी रत्न टाटा यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसाठी सढळ हाताने मदत केली होती. ताज हॉटेलवरील हल्ल्यानंतर रतन टाटा स्वत: तिथे पोहचले होते. तिथली पाहाणी करून हॉटेलला परत एकदा पूर्वीची शान मिळवून देण्यासाठी त्यांनी आर्थिक पाठबळ दिले.
2002 मध्ये वयाच्या 65 व्या वर्षी रतन टाटांनी पहिल्यांदा निवृत्ती घेण्याचे जाहीर केले होते, मात्र, तेव्हा कंपनीनेच त्यांना निवृत्त होऊ दिले नव्हते. त्यानंतर तीन वर्षांनी पुन्हा तीच परिस्थिती आल्यावर कंपनीने सेवानिवृत्तीचे वय 75 वर्षे केले. त्यामुळे 28 डिसेंबर 2012 रोजी ते टाटा समूहातून निवृत्त झाले.
रतन टाटा यांना वर्ष 2000 मध्ये पद्मभूषण तर 2008 मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. महाराष्ट्र शासनाने 2023 मध्ये उद्योगरत्न पुरस्कारासाठी रतन टाटा यांचीच निवड केली होती. याशिवाय, अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार आणि विविध विद्यापीठांच्या डी.लिट् नेही त्यांना गौरविण्यात आले होते. ‘ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया’ हा सर्वोच्च ऑस्ट्रेलियन नागरी सन्मान देखील 2023 मध्ये त्यांना मिळाला.
रतन टाटा फक्त उद्योग विश्वासाठीच नव्हे तर, सर्व भारतीय समाजासाठीच आदर्श होते. ज्यांच्यापुढे सर्वांनीच आदराने नतमस्तक व्हावे, अशा काही मोजक्या व्यक्तिमत्त्वांपैकी ते एक होते. 9 ऑक्टोबर 2024 रोजी मुंबईत त्यांचे निधन झाले.


