Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 30 एप्रिल 2026

    April 30, 2026

    स्त्रीचे सौंदर्य अन् पुरुषाचे देखणेपण खुलते…

    April 29, 2026

    Bookshelf : ‘हिंदू’… भालचंद्र नेमाडेंनी सत्य समोर ठेवले, पण…

    April 29, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Thursday, April 30
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Ayurveda : वर्षा ऋतुचर्या
    आरोग्य

    Ayurveda : वर्षा ऋतुचर्या

    Team AvaantarBy Team AvaantarOctober 4, 2025No Comments5 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीआर्टिकल, आयुर्वेद, वर्षा, वर्षा ऋतू, ऋतुचर्या, पावसाळा, संसर्ग, वातविकार, आहार विहार
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    डॉ. प्रिया  गुमास्ते 

    आयुर्वेदिक फिजिशियन आणि कॅन्सर  कन्सलटन्ट

    वर्षा हा मोहक पावसाचा ऋतू श्रावण आणि भाद्रपद महिन्यांत भारतीय उपखंडात पसरतो. (Mid-June to Mid-September). वर्षा ऋतू हा जलतत्वाशी संबंधित आहे. हा पोषण, पुनरुज्जीवन आणि परिवर्तनाचा काळ आहे. या ऋतूमध्ये वातावरण आणि पर्यावरणाच्या गुणांमध्ये लक्षणीय बदल होतात, ज्याचा आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. पाऊस हा एक नैसर्गिक शुद्धीकरण करणारा  आहे, म्हणून हा ऋतू शुद्धीकरण आणि विषमुक्तीचा काळ मानला जातो. तो वातावरण आणि पृथ्वीवरील विषारी पदार्थ आणि अशुद्धता धुऊन टाकतो. या ऋतूत  अनेक औषधी वनस्पतींची लागवड केली जाते.

    दोष आणि ऋतू

    वर्षा ऋतू हा काळ वात दोषाच्या प्रकोपाचा असून या काळात शरीरातील वात वाढतो आणि तो वातविकारांना वाढवतो किंवा उत्पन्न करतो. वात दोष हवा आणि आकाशाच्या घटकांशी संबंधित आहे आणि जेव्हा तो असंतुलित होतो, तेव्हा तो कोरडेपणा, चिंता आणि पचनक्रियेत अडथळा यासारख्या समस्यांना कारणीभूत ठरू शकतो. वात प्रकोपास पोषक वातावरण असल्यामुळे वाढलेला वात हा संधीवात (Arthritis), आमवात (Rheumatoid Arthritis), दमा (Asthama), मणक्यांचे विकार, ज्वर, त्वचाविकार (Skin diseases) अशा आजारांना उत्पन्न करतो किंवा वाढवतो. याव्यतिरिक्त, या काळात  आपला पचनअग्नी कमकुवत होतो. पचनशक्ती कमी झाल्याने पचनाचे विकार बळावतात.

    तसेच, हवेतील आर्द्रता आणि सूर्यकिरणांचा अभाव हा जीवाणू, विषाणूंच्या वाढीसाठी पोषक असतो, यामुळे संसर्गजन्य आजारांचे प्रमाण वाढू लागते. तसेच, या काळातील दूषित पाण्यामुळे देखील अतिसार (loose motions / Diarrhea ), काविळ (Jaundice) त्वचाविकार, मलेरिया, टायफॉइड असे विकार उत्पन्न होतात. हे सर्व टाळण्यासाठी तसेच वर्षा ऋतूमध्ये देखील आरोग्य चांगले राहण्यासाठी आयुर्वेद ग्रंथांमधे विशिष्ट आहार आणि राहणीमान यांचे पालन करण्याचे निर्देश दिलेले आहेत.

    हेही वाचा – Ayurveda : शिशिर ऋतुचर्या

    वर्षा ऋतूमध्ये आहार कसा असावा?

    • या ऋतूत आहार हा ताजा आणि गरम सेवन करावा. फ्रीजमधील पदार्थ, पेय आणि भाज्या खाणे टाळावे. त्याने या ऋतूमध्ये वात आणि कफ वाढून वातविकार तसेच सर्दी चटकन होते.
    • वेगवेगळ्या डाळींचे किंवा मांस पदार्थांचे यूष (सूप) हे पाचक आणि जाठराग्निवर्धक असल्याने त्यांचे सेवन करावे. वातवर्धक आहार टाळावा. कडू, तुरट आणि तिखट चवीचे पदार्थ या ऋतूत कमी प्रमाणात सेवन करावेत.
    • मसाले, उदा. लसूण, आले, हिंग, हळद, मिरे यांचा योग्य प्रमाणात उपयोग आहारात करावा.
    • आले आणि मध मिसळलेले कोमट पाणी प्यायल्याने तुमच्या रोगप्रतिकारक शक्तीला नैसर्गिकरित्या चालना मिळू शकते आणि एकूणच आरोग्याला आधार मिळू शकतो.
    • आहारात पचण्यास हलक्या आणि ताज्या पदार्थांचा समावेश करावा.
    • तांदूळ, गहू तसेच विविध डाळी भाजून, त्यापासून वेगवेगळे  पदार्थ बनवावेत आणि त्यांचे सेवन करावे.
    • रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आहारात जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध विविध फळे, भाज्या, औषधी वनस्पती समाविष्ट कराव्यात. हे पदार्थ तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास आणि आजारांपासून तुमच्या शरीराचे रक्षण करण्यास मदत करू शकतात.

    राहणीमान (विहार) कसे असावे? (Lifestyle in Monsoon Season)

    पावसात भिजण्याचे आकर्षण सर्वांना असू शकते; परंतु या ऋतूमध्ये जास्त पावसात जाणे टाळावे. जाणे झालेच तर छत्री / रेनकोट यांचा वापर करावा. घरी परत आल्यावर अंग आणि केस पूर्ण कोरडे करावे. मूळात पावसात अधिक भिजणे टाळावे. पावसाच्या पाण्याच्या जास्त संपर्कामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होऊ शकते आणि संसर्ग होण्याचा धोका वाढू शकतो.

    वैयक्तिक स्वच्छता

    1. पावसाळ्यात  वैयक्तिक स्वच्छता राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पावसाचे पाणी अनेकदा दूषित असू शकते आणि स्वच्छतेच्या चुकीच्या पद्धतींमुळे संसर्ग पसरू शकतो. विशेषतः जेवणापूर्वी नियमितपणे साबण आणि पाण्याने हात धुवावेत.
    2. स्नानापूर्वी शरीरास कोमट तेलाने अभ्यंग करावे. तेल वातनाशक आहे, त्यामुळे या दिवसांत तीळ तेलाने अभ्यंग करावे.
    3. कपडे योग्य न वाळल्यामुळे बर्‍याचदा त्यात आर्द्रता असते आणि असे कपडे परिधान केल्यास त्वचा विकार होण्याचा संभव असतो. त्यामुळे परिधान करावयाचे सर्व बाह्य आणि अन्तर्वस्त्र चांगले वाळवून मगच वापरावेत.
    4. शरीर उबदार ठेवणे : पावसामुळे तापमान थंड राहात असल्याने, शरीर उबदार आणि संरक्षित ठेवणे आवश्यक होते. थरांमध्ये कपडे घालणे आणि हवामानानुसार कपडे घालणे शरीराचे तापमान नियंत्रित करण्यास मदत करू शकते. थंडी आणि ओलसरपणाचा धोका टाळू शकते.

    परिसर स्वच्छता

    घरातील वातावरण स्वच्छ आणि कोरडे ठेवावे, आजूबाजूस पाणी जास्त काळ जमा होऊ देऊ नये. घरामधे अगरू, गुग्गूळ, चंदन यांनी धूपन केल्यास जंतुसंसर्ग कमी होतो आणि वातवरण सुगंधी आणि आल्हाददायक राहाते. आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवल्यास डासांच्या उत्पत्तीस प्रतिबंध होतो आणि रोगांचा प्रसार रोखण्यास मदत होऊ शकते.

    हेही वाचा – Ayurveda : ग्रीष्म ऋतुचर्या

    वर्षा ऋतूतील पंचकर्म

    या ऋतूमध्ये प्रकुपित झालेल्या वाताच्या चिकित्सेसाठी बस्ती या पंचकर्माचे वर्णन आयुर्वेद ग्रंथांमध्ये केले आहे. बस्ती ही वाताची उत्तम चिकित्सा असून याने वात रोग  त्वरित आटोक्यात येण्यास मदत होते. यामुळे या ऋतूत बस्ती हे पंचकर्म करून घ्यावे.

    पावसाळ्यात काय टाळावे?

    • या ऋतूमध्ये मांसाहार टाळावा आणि मासे तर पूर्णपणे टाळावेत; कारण पचनशक्ती मंद असते तसेच मांस देखील दूषित असण्याची शक्यता अधिक असते. यामुळेच या कालावधीत श्रावण किंवा चातुर्मासाचे पालन केले जाते.
    • हूरव्या पालेभाज्या या ऋतूमध्ये दूषित असतात आणि त्यावर जीवाण, विषाणूंची अतिरिक्त वाढ होत असते. त्यावर अळ्या (लार्वा) यांचीही वाढ होत असते. तसेच या कालावधीत असा भाजीपाला वातवर्धक असतो; त्यामुळे तो कमी खावा आणि खाताना स्वच्छतेची चांगली काळजी घ्यावी.
    • आहारातील तिखट आणि आंबट पदार्थांचा वापर कमी करावा. लोणचे, चिंचेचे पदार्थ हे आहारातील स्वाद वाढवतात; परंतु या कालावधीत यांचे सेवन त्रासदायक ठरू शकते.
    • पावसाळ्यात बाहेरचे तळलेले आणि चमचमीत खाद्यपदार्थ खाण्याची तीव्र इच्छा होते; परंतु त्याने पचनाचे तसेच इतर आजार वाढू शकतात त्यामुळे भजी, वडापाव, चाट असे पदार्थ टाळलेले जास्त चांगले.
    • दिवसा झोपणे टाळावे. दिवसा घेतलेली झोप कफवर्धक असते आणि ती वर्षा ऋतूत कमी झालेली पचनशक्ती अजून कमी करते.
    • अपरिचित जलाशयात  जाणे टाळावे, कारण अशा जलाशयाच्या खोलीचा अंदाज नसल्याने जीवास धोका उत्पन्न होऊ शकतो.

    वर्षा ऋतू हा आजार होण्यास पोषक ऋतू असल्याने सर्वात जास्त साथीचे किंवा संसर्गजन्य आजार या दरम्यान होतात. योग्य ऋतुचर्या पाळल्यास तसेच योग्य काळजी घेतल्यास आजारांचा हा ऋतू आनंदी, आल्हाददायक आणि निरोगी जाऊ शकतो.

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    योगनिद्रा अभ्यासातून निरामय मानसिक आरोग्य

    April 25, 2026 आरोग्य

    Ayurveda : निरोगी वसंताचा सारांश आणि रोगप्रतिकारशक्ती

    April 24, 2026 आरोग्य

    जगायला नेमका किती मेंदू लागतो?

    April 23, 2026 आरोग्य
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    आरोग्य

    योगनिद्रा अभ्यासातून निरामय मानसिक आरोग्य

    By रविंद्र परांजपेApril 25, 2026

    मागील लेखात आपण आरोग्यदायी हस्त मुद्रा अभ्यासातून मिळणारे मानसिक आरोग्य लाभ याविषयी जाणून घेतले. या…

    Ayurveda : निरोगी वसंताचा सारांश आणि रोगप्रतिकारशक्ती

    April 24, 2026

    जगायला नेमका किती मेंदू लागतो?

    April 23, 2026

    आरोग्यदायी हस्त मुद्रा अभ्यासातून निरामय मानसिक आरोग्य

    April 18, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 30 एप्रिल 2026

    April 30, 2026

    स्त्रीचे सौंदर्य अन् पुरुषाचे देखणेपण खुलते…

    April 29, 2026

    Bookshelf : ‘हिंदू’… भालचंद्र नेमाडेंनी सत्य समोर ठेवले, पण…

    April 29, 2026

    प्रेम म्हणजे, प्रेम म्हणजे प्रेम असते…

    April 29, 2026

    कालाय तस्मै नमः

    April 29, 2026

    Dnyaneshwari : अनावरें मुखें समोर देखे, तयाभेणें पाठीमोरा जंव ठाके

    April 29, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 282
    • अवांतर 184
    • आरोग्य 106
    • थर्ड अंपायर 5
    • पंचांग आणि भविष्य 401
    • फिल्मी 47
    • फूड काॅर्नर 200
    • मैत्रीण 18
    • ललित 591
    • शैक्षणिक 77
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 30 एप्रिल 2026

    April 30, 2026

    स्त्रीचे सौंदर्य अन् पुरुषाचे देखणेपण खुलते…

    April 29, 2026

    Bookshelf : ‘हिंदू’… भालचंद्र नेमाडेंनी सत्य समोर ठेवले, पण…

    April 29, 2026
    Most Popular

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 30 एप्रिल 2026

    April 30, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.