Friday, August 1, 2025

banner 468x60

Homeवास्तू आणि वेधPanchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष, 01 ऑगस्ट 2025

Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष, 01 ऑगस्ट 2025

दर्शन कुलकर्णी

आज, दिनांक : 01 ऑगस्ट 2025; वार : शुक्रवार

भारतीय सौर : 10 श्रावण शके 1947; तिथि : अष्टमी अहोरात्र; नक्षत्र : स्वाती 27:39

योग : शुभ 29:29; करण : विष्टी 18:09

सूर्य : कर्क; चंद्र : तुळ; सूर्योदय : 06:15; सूर्यास्त : 19:14

पक्ष : शुक्ल; ऋतू : वर्षा; अयन : दक्षिणायन

संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127

दुर्गाष्टमी
जरा जिवंतिका पूजन


वेद कन्सल्टन्सी / 9987433660


आजचे राशीभविष्य

मेष – व्यवसायाच्या दृष्टीने दिवस चांगला जाईल. एखादे काम बराच काळ प्रलंबित असेल तर ते संध्याकाळपर्यंत पूर्ण होऊ शकेल, ज्यामुळे मानसिक ताण कमी होईल. आर्थिक बाबतीत दिवस सामान्य राहणार आहे.

वृषभ – कामाच्या ठिकाणी शांततेने आणि संयमाने काम केल्यास यश मिळेल. राजकीय क्षेत्राशी संबंधितांना प्रयत्नांचे शुभ फळ मिळू शकेल. चांगली मैत्री किंवा संभाषणातून फायदा होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी नवीन प्रकल्पावर काम करण्याची संधी मिळू शकते, ज्यामुळे प्रतिष्ठा आणि पदात वाढ होईल.

मिथुन – कोणत्याही प्रवासात विशेष काळजी घ्यावी लागेल, अन्यथा एखादी मौल्यवान वस्तू हरवण्याचा किंवा चोरीला जाण्याचा धोका निर्माण होईल. कामाच्या ठिकाणी एखादे महत्त्वाचे काम प्रलंबित असेल, तर आता ते पूर्ण होण्यास सुरुवात होईल. प्रोजेक्टशी संबंधित एखादी चांगली बातमी तुम्हाला ऐकायला मिळेल.

कर्क – आजचा दिवस शुभ असेल. एखादी चांगली मालमत्ता मिळू शकते, याशिवाय आयुष्यात यशाचे नवीन मार्ग उघडतील. समाजात आदर आणि प्रतिष्ठा वाढेल. संध्याकाळी प्रियजनांची भेट होऊ शकते किंवा त्यांच्याशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते.

सिंह – राशीचा स्वामी सूर्य, कर्क राशीच्या बाराव्या घरात आहे. यामुळे नोकरीत उत्पन्नाचे नवीन स्रोत उदयास येऊ शकतात. गोड बोलण्यामुळे कामाच्या ठिकाणी आदर मिळेल, त्यामुळे मन आनंदी राहील. विरोधक तुमचे काहीही नुकसान करू शकणार नाहीत.

कन्या – दिवस भाग्याचा असणार आहे, त्यामुळे धैर्य वाढेल. नोकरी, व्यवसायाच्या क्षेत्रात करत असलेल्या प्रयत्नांना आता मोठे यश मिळेल, जे अपेक्षेपेक्षा जास्त असू शकते. कोणता कायदेशीर वाद सुरू असेल, तर त्यात यश मिळेल, ज्यामुळे मन आनंदी होईल.

हेही वाचा – Nakshatra Gatha : मूळ नक्षत्रासह पूर्वाषाढा अन् उत्तराषाढा

तुळ – दिवस नेहमीपेक्षा चांगला जाणार आहे. आजूबाजूला आनंदाचे वातावरण असेल. अनेक दिवसांपासून पैशांच्या व्यवहारात समस्या सुरू असतील, तर त्या आता सोडवता येतील. व्यवसायात प्रवासाची योजना बनवली जाऊ शकते, मात्र ती काही कारणांनी पुढे ढकलली जाऊ शकते.

वृश्चिक – धाडस आणि शौर्य यात वाढ होईल. महत्त्वाच्या बाबींमध्ये कुटुंबाकडून पूर्ण सहकार्य मिळेल. व्यवसायिकांना त्यांच्या आजूबाजूला असलेल्या लहान संधी देखील ओळखाव्या लागतील. मोठ्या नफ्याच्या मागे लागून लहान नफा सोडून देणे हानिकारक ठरू शकते. आरोग्याकडेही विशेष लक्ष देण्याची गरज आहे.

धनु – कामाच्या ठिकाणी विरोधक तुमच्या कामाची आणि सर्जनशील विचारसरणीची प्रशंसा करतील. सरकार आणि सत्ताधारी पक्षाशी चांगला संपर्क आणि संवाद ठेवल्याने मोठा फायदा मिळू शकेल. आर्थिक बाबतीत, सासरच्या लोकांकडून पुरेसे आर्थिक सहकार्य मिळू शकेल.

मकर – नोकरी आणि व्यवसायाच्या बाबतीत दिवस चांगला जाणार आहे. आर्थिक बाबींमध्ये यश मिळू शकते. कामाच्या ठिकाणी नवीन प्रकल्प आणि प्रगतीच्या मार्गाने पुढे जाल. सहकाऱ्यांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. संध्याकाळी कोणत्याही वाद किंवा भांडणापासून दूर रहा.

कुंभ – कामाच्या ठिकाणी विरोधकांपासून सावध राहावे लागेल. तुमच्याविरुद्ध काहीतरी रणनीती बनवण्याची शक्यता आहे. आर्थिक बाबतीतही वेळ अनुकूल नाही. त्यामुळे घाईघाईने कोणताही निर्णय घेऊ नका, जोखिमीचे निर्णय घेणे टाळा. कामाच्या ठिकाणी कठोर परिश्रम करूनही नुकसान होऊ शकते.

मीन – सासरच्या लोकांसोबत कोणतेही आर्थिक व्यवहार टाळणे योग्य ठरेल. असे केल्याने नाते बिघडण्याची भीती कमी होईल. व्यवसायाशी संबंधित प्रवासात सावधगिरी बाळगावी, अन्यथा काही मौल्यवान वस्तू हरवण्याची शक्यता आहे. शक्य असल्यास, प्रवास काही काळापुरता पुढे ढकला.

हेही वाचा – Nakshatra : श्रवण, धनिष्ठा आणि शततारका


दिनविशेष

भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य टिळक

टीम अवांतर

थोर भारतीय नेते, भगवद्‌गीतेचे आधुनिक भाष्यकार आणि प्राच्यविद्या पंडित बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी येथे झाला. त्यांचे जन्मनाव केशव परंतु बाळ हेच नाव पुढे रूढ झाले. 1876 साली पुण्याच्या डेक्कन कॉलेजमधून ते बीए पहिल्या वर्गात उत्तीर्ण झाले. एमए मात्र होऊ शकले नाहीत. अखेर त्यांनी 1879मध्ये एलएलबी ही पदवी घेतली. भारतातील तरुणांसाठी उच्च शिक्षणाचा दर्जा सुधारण्याच्या उद्देशाने त्यांनी 1884मध्ये डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना करून एक नवीन शिक्षण प्रणाली तयार केली आणि त्यांनी भारतीय संस्कृतीवर भर देऊन तरुण भारतीयांना राष्ट्रवादी विचार शिकवले. या संस्थेच्या माध्यमातून 1885मध्ये फर्ग्युसन कॉलेजची स्थापना केली. लोकमान्य टिळक यांनी भारतीय स्वातंत्र्य आणि स्वायत्तेसाठी ब्रिटिश राजवटीविरोधात लढा दिला. टिळक हे महात्मा गांधी यांच्या आधी सर्वात प्रभावी भारतीय राजकीय नेते होते. लोकमान्य टिळक हे 1890 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सामील झाले होते. स्वराज्याच्या लढ्यात त्यांनी काँग्रेसच्या मवाळ वृत्तीला विरोध केला. लोकांमध्ये स्वातंत्र्याची भावना वृद्धिंगत करण्यासाठी टिळक यांना अर्जविनंत्यांचे राजकारण करणाऱ्‍या नेमस्त पक्षाविरुद्ध सतत संघर्ष करावा लागला. त्यावेळी ते सर्वात प्रतिष्ठित जहालवादी नेत्यांपैकी प्रमुख नेते होते. नेमस्त भूमिका सोडून ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवीनच’, या भूमिकेपर्यंत लोकांना नेणे, हा लोकमान्यांचा संकल्प होता. 22 जून 1897 रोजी चाफेकर बंधूंनी कमिशनर रँडचा खून केला. त्या वेळी सरकारने पुण्यावर अनन्वित जुलूम केला. टिळकांनी ‘राज्य करणे म्हणजे सूड उगविणे नव्हे’, ‘सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?’ असे एकापाठोपाठ एक प्रखर लेख लिहिले. परिणामतः त्यांच्यावर राजद्रोहाचा आरोप ठेवण्यात येऊन खटला झाला आणि त्यांना अठरा महिन्यांची सक्तमजुरीची शिक्षा झाली. केसरी दैनिकाती दोन अग्रलेखासंदर्भात 24 जून 1908 रोजी टिळकांना मुंबईस पुन्हा राजद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात येऊन त्यांच्यावर खटला भरण्यात आला. त्यांनी अनेक वेळी तुरुंगवास भोगला. ते मंडले येथे दीर्घकाळ तुरुंगात होते. तिथल्या तुरुंगात टिळकांनी श्रीमद्‌भगवद्‌गीतारहस्य अथवा कर्मयोगशास्त्र हा ग्रंथ लिहिला. ब्रिटिश लेखक सर व्हॅलेंटाईन चिरोली यांनी त्यांना ‘भारतीय असंतोषाचे जनक’ असे म्हटले होते. सार्वजनिकरित्या सर्वांनी मिळून मिसळून राहावं, यासाठी टिळकांनी 1893 मध्ये सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. तसेच महात्मा फुले यांनी सुरू केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज जयंतीला व्यापक रूप देण्याचे काम सुद्धा टिळकांनी केले. या लोकमान्य नेत्याचे 1 ऑगस्ट 1920 रोजी निधन झाले. त्यांच्या निधनाबद्दल शोकसंवेदना व्यक्त करताना महात्मा गांधींनी त्यांना ‘आधुनिक भारताचे शिल्पकार’ म्हटले तर, जवाहरलाल नेहरूंनी त्यांना ‘भारतीय क्रांतीचे जनक’ म्हटले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!