आपल्या आयुष्यात अनेक समस्या येतात. आपण अनेकदा त्यासाठी परिस्थिती, नशीब किंवा इतर लोकांना दोष देतो. पण खरं पाहिलं, तर आपल्या अनेक समस्यांचं मूळ आपल्या मनातच असतं. म्हणूनच आपल्या ऋषी-मुनींनी हजारो वर्षांपूर्वी मन, भावना आणि आत्म्याचा खूप सखोल अभ्यास केला होता. आजचं आधुनिक मनोविज्ञान सांगतं की राग, भीती, दुःख किंवा चिंता आली तर, त्या भावनांमध्ये वाहून जाऊ नका. त्या भावनांकडे फक्त बघा. पण वेदांत इथे आणखी एक पाऊल पुढे जातो. तो विचारतो – या भावना पाहणारा नेमका कोण आहे? म्हणजे राग येतो, दुःख होतं, आनंद होतो… पण हे सगळं अनुभवणारा आणि पाहणारा कोण? याचं उत्तर शोधायला वेदांत शिकवतो. आपल्या शास्त्रांमध्ये सांगितलं…
Read More