Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    संस्कार… माणुसकी आणि सहिष्णुतेचे!

    March 24, 2026

    Dnyaneshwari : देशकाळवर्तमान, आघवें मजसीं करूनि अभिन्न…

    March 24, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 मार्च 2026

    March 24, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Tuesday, March 24
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Homeopathy : शरीर आणि मन जुळले, तरच आरोग्य फुलले…
    आरोग्य

    Homeopathy : शरीर आणि मन जुळले, तरच आरोग्य फुलले…

    Team AvaantarBy Team AvaantarAugust 23, 2025No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीआर्टिकल, निरोगी मन, निरोगी शरीर, मन शरीर संतुलन, मानसिक आजार, Healthy mind, healthy body, mind-body balance, mental illness
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    डॉ. सारिका जोगळेकर

    (होमिओपॅथिक तज्ज्ञ)

    ‘मन निरोगी तर तन निरोगी!’ शरीर आणि मनाचे अतूट नाते आज विज्ञानाने सुद्धा सिद्ध केले आहे. मन आणि शरीर हा संवाद मुख्यतः मेंदूतील न्यूरॉन्स, हार्मोन्स आणि स्नायूसंस्था यांच्या माध्यमातून घडतो.  मन शांत, सकारात्मक आणि आनंदी असते, तेव्हा शरीरात रोगप्रतिकारशक्ती वाढते, हार्मोन्सचे संतुलन राखले जाते आणि ऊर्जा पातळी सुधारते. पण जेव्हा मन तणावग्रस्त, अस्वस्थ किंवा नकारात्मक भावनांनी भरलेले असते, तेव्हा शरीरावर त्याचा थेट परिणाम होतो. त्यानंतर कालांतराने डायबिटीस, ब्लडप्रेशर, कोलेस्ट्रॉल अशा आजारांचा प्रवास सुरू होतो.

    आजच्या धावपळीच्या जीवनात ताणतणाव वाढत चालले आहेत. त्यामुळे मानसिक आजाराचे प्रमाण सुद्धा वाढत चालले आहे. शरीरात एखादी वेदना झाली की, आपण डॉक्टरकडे धाव घेतो, पण मन आजारी पडले की, त्याकडे हमखास दुर्लक्ष केले जाते. अनेकांना असा गैरसमज आहे की, ‘मानसिक आजार म्हणजे वेडेपणा’. पण हा समज अत्यंत चुकीचा आहे; या उलट मानसिक आजार म्हणजे संवेदनशील असणं आणि त्यात लाज वाटावी, असं काहीही नाही. तिथे संवेदनशीलता असते तिथेच खरी माणुसकी जन्म घेते. जो माणूस स्वतःच्या भावनांना समजतो, तोच माणूस इतरांच्या भावनांचा आदर सुद्धा करतो.

    सतत असलेला ताणतणाव, कौटुंबिक किंवा आर्थिक अडचणी, स्पर्धेचा दबाव तसेच त्यामुळे येणारी अपयशाची भीती, किंवा कुठल्यातरी घटनेमुळे मनावर झालेला आघात… यापैकी कुठल्याही कारणांमुळे मनाचे संतुलन बिघडू शकते. तणाव हाताळण्याची क्षमता प्रत्येकाची वेगवेगळी असते. ही क्षमता जेव्हा टोक गाठते, तेव्हा मानसिक आजाराची सुरुवात होते. मानसिक आजाराची लक्षणे प्रत्येकामध्ये वेगवेगळी असतात; पण स्वतःमध्ये निर्माण झालेल्या नकारात्मक भावनांची जाणीव होऊन त्या स्वीकारणं, हेच मुळात माणसाला कठीण जातं आणि त्यामुळे अनेकदा वेळ टळून जाते.

    हेही वाचा – Homeopathy : शुद्ध आणि सुसंवादी आरोग्याचा मार्ग

    मानसिक आजाराची सुरुवात कशी ओळखावी?

    छोट्या छोट्या गोष्टींवर चिडचिड होणे, भूक कमी होणे किंवा जास्त खाणे, झोप नीट न लागणे किंवा खूप झोप येणे, कोणत्याही गोष्टीत रस न वाटणे, सतत भीती आणि चिंता, असुरक्षितता वाटणे, आत्मविश्वास कमी असणे, लोकांपासून दूर राहायची इच्छा या लक्षणांनी मानसिक आजाराची सुरुवात होते आणि नेमकं  याच भावनांकडे आपण दुर्लक्ष करतो. मग हळूहळू या भावनांची आपल्याला सवय होते. मग त्या वाढू लागतात आणि जेव्हा या लक्षणांमुळे आपल्या कामावर किंवा दैनंदिन आयुष्यावरती परिणाम होतो, तेव्हा आपण त्याला मानसिक आजार असं म्हणायला सुरुवात करतो पण वास्तविक त्याची सुरुवात खूप आधीच झालेली असते. वेळीच त्याची जाणीव होऊन ते ओळखले गेले तर, काही जीवनशैलीतले बदल सुद्धा माणसाला पुन्हा पूर्ववत करू शकतात. बदल घडण्यासाठी आधी त्याची जाणीव होणं आणि ते स्वीकारणं, हे महत्त्वाचं असतं.

    शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी आपण व्यायाम, आहार याकडे लक्ष देतो, पण मनाचे काय? शरीराच्या आधी मन बोलते आणि त्याकडे दुर्लक्ष केले की, मग शरीर बोलायला लागते. जर आपण मानसिक आरोग्याकडे लक्ष दिले आणि मनाच्या तक्रारी वेळीच हाताळल्या तर, शारीरिक आजार आपण सहज दूर ठेवू शकतो.

    मनाचे आरोग्य जपण्यासाठी काय करावे? याचे उत्तर अगदी सोपे आहे ते म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये थोडासा बदल.

    1. नियमित व्यायाम – चालणे, योग, प्राणायाम.
    2. ध्यान आणि श्वसनाचे व्यायाम
    3. संतुलित आहार – पौष्टिक अन्नामुळे मनःस्थिती सुधारते.
    4. पुरेशी झोप – मन शांत राहते.
    5. छंद जोपासणे – काहीतरी केल्याचं समाधान सहजपणे मिळून जातं.
    6. मनातल्या भावना, मुख्यतः नकारात्मक भावना बोलून हलक्या होऊ शकतात. जी व्यक्ती विश्वासनीय आणि जवळची वाटेल तिच्याशी संवाद साधावा. डायरीमध्ये लिहिणं, हा सुद्धा एक उत्तम पर्याय आहे.

    हेही वाचा – प्राणशक्ती, आरोग्य आणि होमिओपॅथी : एक वैज्ञानिक दृष्टिकोन

    शारीरिक आरोग्य सुधारण्यासाठी नुसते औषधोपचार पुरेसे नसतात. शरीर आणि मनाचा संबंध हा फक्त म्हणीपुरता नाही तर, प्रत्यक्ष अनुभवता येणारं सत्य आहे. निरोगी मनामुळे निरोगी शरीर तयार होते आणि निरोगी शरीरामुळे मन शांत, स्थिर आणि आनंदी राहते. शरीर आणि मनाचे संतुलन हीच खरी आरोग्याची गुरुकिल्ली आहे.


    HOLISTIC HOMOEOCURE CLINIC
    ऋतू पार्क, ठाणे वेस्ट

    मोबाइल – 9890533941 

    FB – https://www.facebook.com/share/1YnodU891Z/?mibextid=wwXIfr

    Insta – https://www.instagram.com/holistichomoeocure?utm_source=qr

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    अनुलोम-विलोम प्राणायाम अभ्यासातून निरामय मानसिक आरोग्य

    March 21, 2026 आरोग्य

    सकस आहाराबरोबर संतुलनही महत्त्वाचे

    March 21, 2026 आरोग्य

    Ayurveda : वसंतातील ‘सुपर डाएट’… कफ कमी करण्यासाठी काय खावे?

    March 19, 2026 आरोग्य
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    आरोग्य

    अनुलोम-विलोम प्राणायाम अभ्यासातून निरामय मानसिक आरोग्य

    By रविंद्र परांजपेMarch 21, 2026

    मागील लेखात आपण योगाभ्यासातील प्राणायाम अभ्यास, प्राणायामाची आवश्यकता आणि पूर्वतयारी, विविध प्रकार तसेच प्राणायामाचे आरोग्य…

    सकस आहाराबरोबर संतुलनही महत्त्वाचे

    March 21, 2026

    Ayurveda : वसंतातील ‘सुपर डाएट’… कफ कमी करण्यासाठी काय खावे?

    March 19, 2026

    योगाभ्यासातील प्राणायाम अभ्यास

    March 14, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    संस्कार… माणुसकी आणि सहिष्णुतेचे!

    March 24, 2026

    Dnyaneshwari : देशकाळवर्तमान, आघवें मजसीं करूनि अभिन्न…

    March 24, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 मार्च 2026

    March 24, 2026

    सेटवरच मिळाली खूप मोठी कॉम्प्लिमेन्ट!

    March 24, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : खेळगटातील जीवनव्यवहार शिक्षण

    March 23, 2026

    आयुष्यात टवटवीतपणा आणणारा ‘तो’

    March 23, 2026

    POPULAR CATEGORY

    • अध्यात्म 246
    • अवांतर 174
    • आरोग्य 91
    • फिल्मी 44
    • फूड काॅर्नर 184
    • मैत्रीण 16
    • ललित 508
    • वास्तू आणि वेध 360
    • शैक्षणिक 73

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Advertise

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn